तुम्हाला माहित आहे का?



लहान मुल आणि तरून ह्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि डोळ्यांतील चमक हि कमी किंवा नाहीशी झाली आहे, कारण आहे तणाव, धकाधकीचे आयुष्य.

हा ताण आता १० वर्षांखालील मुलांमध्येही पोहचला आहे.

आजारांचे प्रमाणही वाढले आहे. आपल्यामधील असलेल्या नैसर्गिक आजार आणि जखम बरे करण्याची क्षमता हि औषधे आणि मलम ह्यांच्या अति वापरामुळे कमी कमी होत चालली आहे. (मोठे आजार किंवा जखमा वगळता.)

नैसर्गिक जागे होणे, झोपणे खाणे पिणे ह्यांच्या वेळा बदललेल्या आहेत. ह्याचा परिणाम हा संपूर्ण मानवजातीवर होत आहे व नवीन येणाऱ्या पिढीवरही.

आपल्या नैसर्गिक भावनिक आणि शारीरिक गरजाही निट पूर्ण होऊ शकत नाही.

तणावामुळे प्रजनन क्षमतेचे प्रमाण हे कमी कमी होत चालले आहे.

पुढील काही वर्षांमध्ये नवजात मुल हे फक्त शास्त्रीय पद्धतीनेच जन्माला येत जाईल.

मैदानी खेळ ज्यामुळे मानसिक आणि शारीरक संपर्क व्हायचा त्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.

भावनांची अदलाबदल होत नाही आहे.

वरून समाजाचा दबाव हा वेगळा.

हे आजचे वास्तव आहे. सगळीकडे अविश्वासाचे वातावरण आहे. पैश्याचे महत्व वाढले आहे.

ह्याला बदलती सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे. मनुष्य हा दिवसेन दिवस निसर्गापासून लांब चालला आहे. त्याला नैसर्गिक गरजांपेक्षा भौतिक गरजांमध्ये जास्त रस आहे.

आता नैसर्गिक गरजांचेसुद्धा बाजारीकरण झाले आहे. अनेक कंपन्या माणसाच्या खाजगी भावनांचे जाहिरातींमध्ये वापर करून घेत आहे.

मनुष्याची विचार करण्याची क्षमता हि कमी कमी करून नष्ट करण्यात येत आहे. त्याला एखाद्या नेत्याची गरज लागलीच पाहिजे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

ह्याला पर्याय एकच आत्मविकास. नैसर्गिक कायदा.

ध्यान व इतर आत्मविकासाच्या तंत्राद्वारे आपण आत्मविकास घडवून आणू शकतो. आत्मविकास घडवून आणण्यासाठी कमीत कमी ३ महिने द्यावे लागतात तेही तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली.

अनेकांना ३ किंवा ६ दिवसांच्या ५० किंवा १०० लोकांच्या गर्दीमध्ये आत्मविकास करण्यासाठी जातात. काही दिवस बरे वाटते मग परत येरे माझ्या मागल्या.

प्रत्येक मनुष्य हा भावनिक दृष्टीने वेगवेगळा असतो, त्याच्या शारीरिक आणि मानसिक नैसर्गिक गरजा वेगवेगळ्या असतात. त्याचे बालपण हे वेगळ्या परिस्थितीमध्ये गेलेले असते. त्याची आताची परिस्थिती पण वेगळी असते.

आणि इतक्या वर्षांचे जे नकारात्मक गुण ६ दिवसात जावू शकतात?शक्य नाही. पण योग्य समुपदेशनाद्वारे आपण आपल्या अंतर्मनाचे दरवाजे उघडू शकतो. अनेक खाजगी विषयांवर हात घालून खोलात शिरून मुळासकट समस्या हि दूर करू शकतो. त्यासाठी कमीत कमी ३ महिने व काही बैठकीनंतर शक्यतांचे प्रमाण हे चमत्कारिक रित्या वाढते.

आकर्षणाचा सिद्धांत तेव्हाच काम करतो जेव्हा तुम्ही निसर्गनियमांचे पालन करायला लागता. आणि एकदा का आकर्षणाच्या सिद्धांताने काम करायला सुरवात केली मग मागे वळणे शक्यच नाही. तुमचे आयुष्य हे कायमसाठी बदलून जाते.

मग वाट कसली बघत आहात करा तुमच्या अंतर्मनाला मुक्त. जग मनमोकळे पणाने तुमच्या स्वप्नांचे आयुष्य. तुम्हाला जे पाहिजे ते अमर्याद स्वरुपात मिळवा.

धन्यवाद
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार