जर तुम्ही तणाव हाताळू शकत नाही तर तुम्ही यशही हाताळू शकत नाही.

जर तुम्ही द्वेष हाताळू शकत नाही तर तुम्ही प्रेमही हाताळू शकत नाही.

जर तुम्ही दुख हाताळू शकत नाही तर तुम्ही आनंदही हाताळू शकत नाही.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



गरीब हे कधी कधी श्रीमंतांपेक्षा जास्त हुशार असतात.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



गर्व निसर्ग
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



जर तुम्ही आर्थिक नुकसान हाताळू शकत नाही तर तुम्ही उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक आणि श्रीमंती हि हाताळू शकत नाही.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


जर तुम्ही अपेक्षा करत असाल कि तुम्ही चांगले वागत आहात तर जगानेही तुमच्याशी चांगले वागावे, म्हणजे तुम्ही अशी अपेक्षा करत आहात कि तुम्ही सिंहाला खात नाही म्हणून सिंहानेही तुम्हाला खाल्ले नाही पाहिजे.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



माझे “गरीब” वडील विचार करायचे कि पैसे कमावणे हे ध्येय आहे.
माझे “श्रीमंत” वडील विचार करायचे कि आपले स्वप्न पूर्ण करणे हे ध्येय आहे.
रोबर्ट कियोसाकी
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


“ब्रम्हांडाचा एक सामान्य नियम हा आहे कि इथे काहीच किंवा कोणीच परिपूर्ण नाही आहे. परिपूर्णता हि अस्तित्वातच नाही आहे... ह्या अपरिपूर्णते शिवाय तुम्ही किंवा मी अस्तित्वातच नसलो असतो.”

स्टीफन हॉकिंग

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



फरारीच्या संस्थापकाने ट्रॅक्टर कंपनीच्या मालकाचा अपमान केला होता. आज ती ट्रॅक्टर कंपनी लाम्बोर्गिनी ह्या नावाने जगप्रसिद्ध आहे. भारतामध्ये एका गाडीची किंमत हि ३ करोड पासून सुरु होते ते ४ करोडच्या घरात आहे.
यशस्वी होणे हाच सर्वोत्तम बदला आहे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



भितीशिवाय तुम्ही धाडसी नाही बनू शकत.

अपयशाशिवाय तुम्ही यशस्वी नाही बनू शकत.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



तोट्याशिवाय तुम्ही उद्योजक व्यवसायिक नाही बनू शकत.
आर्थिक नुकसानिशिवाय तुम्ही गुंतवणूकदार नाही बनू शकत.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया 
८०८०२१८७९७

" भडकवणारे " आणि " भडकणारे "

" भडकवणारे " आणि " भडकणारे "
तो एक तरूण...अत्यंत हुशार... सर्वांचा लाडका...

हा मुलगा एकदा पोलिसांनी पकडला, गाड्या फोडताना...
गेला तुरूंगात, लागली केस, वारी सुरू झाली कोर्टाची....

करिअर गेलं, वर्षे वाया गेलं, जामीन पण नाही, जवळ पैसे नाहीत, आयुष्यातुन उठला.....

का.....?????

का तर याला कोणीतरी कुणाच्या तरी विरोधात भडकवले...
आणि...हे घडले....

हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.

पण लक्षात ठेवा...

आज जगात दोन प्रकारचे लोक आहेत...

दुसऱ्याला भडकवणारे आणि भडकणारे .....

भडकवणारे
दारू विक्रेत्याप्रमाणे द्वेष विकतात...

आणि...

भडकणारे दारूप्रमाणे द्वेष पितात...

दारूची नशा लगेच उतरते, पण, द्वेशाची नशा चढत राहते...

आणि...

एक दिवस ज्याप्रमाणे दारू विकणारा बंगले बांधतो...

आणि...

दारू पिणारा भिकारी होतो...

तसे भडकवणारे मोठे होतात

आणि...

भडकलेले, बरबाद होतात...

आज आपला तंबाखू सारखा वापर करून घेतला जातोय...

यासाठी...

शिवाजी महाराजांचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेतले जाते...

त्यांच्या नावाने भडकावले जाते...

ज्याने भडकावले, त्याचा मुलगा स्टडीरूममधे...

आणि...

जे भडकले ते कस्टडी रूममधे...

ज्यांनी भडकवले त्याचा मुलगा अभ्यास करतोय...
आणि...
जे भडकले ते खडी फोडायचा अभ्यास करतेय...

ज्यानी भडकवले त्याचा पोरगा परदेशात शिकायला जातो...
आणि...
जे भडकले ते देशी प्यायला शिकतेय...

भडकवणाऱ्यांचा मुलगा फाड-फाड ईग्लिश बोलतो,
आणि...
भडकणारा, बघून घेतो, तंगडंच काढतो, नादाला लागू नको, वावर गेलं तरी पावर नाय गेली पाहिजे, असं बोलतोय...

भडकवणारे
परदेशातून विमानाने भारतात येतात...
आणि....
भडकणारे...
शिवाजीनगर-
१० रूपये...१० रूपये
संभाजीनगर -
५रूपरे... ५रूपये...
बसा ना...
ह्या बाजूला ...
त्या बाजूला ...
गाडी भरली, की
लगेच निघणार ...
१० रूपये ... ५ रूपये ...

भडकवणारे
विमानतळावर उतरतात...
भडकणारे गर्दीत घोषणा देतात...
...आमके तमके आगे बढो...
हम तुम्हारे साथ है...
बजाव.....
वन्सं मोर...
ढिंगच्यांग ढिच्यांग....

भडकवणाऱ्यांचा पोरगा पंचतारांकित हाँटालात ऐटीत बसतो...
आणि...
भडकणारे तिथं वेटर असतात...

कुठे गेली लाज...
कुठे गेला आत्मसन्मान...
छञपती शिवाजी महाराजांचे
नांव घेता..
डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे
नांव घेता..
पण स्वाभिमान माञ गहाण टाकलाय...
लाजाही वाटत नाही ...

अरे किती दिवस ...किती पिढ्यां....
आपल्या तरूणांना वाटत नाही कां...?
स्वतः काही तरी स्वाभिमान निर्माण करावा..
दुसऱ्याचे पाय चाटण्यापेक्षा स्वतःमधे आत्मविश्वास निर्माण करावा...
दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः मोठं व्हावे...
दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालण्यापेक्षा, स्वतः चे रोपटे लावले तर ते मोठं झाड होतं...कधी कळणार आम्हाला हे...???

आज आमच्या पोरांचा केवळ वापर करून घेतला जातोय...
कुणाच्या तरी विरोधात..भांडण करण्यासाठी ...मारामारी करण्यासाठी...
कसा होणार आमचा भारत देश महासत्ता....२१व्या शतकात आहोत.

पण आमची पोरं काय करतायेत....
वाद घालणे, भांडण करणे, मारामारी करणे...

हीच गोष्ट मनाला खटकत होती....वाईट वाटत होते...तळमळ वाटत होती...पण सांगणार कुणाला...???

एकमेकांशी वाद लावतोय, वापर करून घेतोय, स्वतःच्या पक्ष, संघटना वाढवतोय....

भावांनो,

वाद घालण्यापेक्षा स्वतःशी जर संवाद साधला तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही...

आपल्याला भडकावणाऱ्यांनी कधी स्वतःच्या मुलाला, भावाला, गाड्या फोडायला, मारामारी करायला लावले का ?

का नाही लावत...???

अरे, विचार करा...

आणि...

तरीही जर तुम्ही भडकवणाऱ्या लोकांचं ऐकत असाल तर
तुमचं भविष्य अंधारात आहे...

विचार करा...

कुणाच ऐकून का बरबाद होता...???

या लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या नोकरी, व्यावसाय, धंदा, शिक्षण, घर, संसार इ. कडे लक्ष द्या...

कोणी जर कुणा विरोधात भडकवले तर त्याला सांगा...

अगोदर स्वतःच्या मुलाला सांग...
त्याला गाड्या फोडायला लाव...

म्हणजे...

काम करायाला आम्ही आरामाला तुम्ही ...

बनवायला आम्ही खायला तुम्ही ....

रस्त्यावर आम्ही पेपरात तुम्ही ...

तुरूंगात आम्ही tv वर तुम्ही...

हे आता थांबले पाहीजे....

तरूणांनो

जागे व्हा....

दुसऱ्याला गुलाम म्हणणारे विचार करा...
आपण कुणाचे गुलाम नाही ना....???

आपला कुणी वापर करत नाही ना...???

विचार करा.

विचार पटले तर
मिञांना पाठवा.....!!!
धन्यवाद मंडळी

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबई मध्ये मराठी पाठोपाठ गुजराती लोकसंख्या जास्त का आहे?

महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबई मध्ये मराठी पाठोपाठ गुजराती लोकसंख्या जास्त का आहे?
कारण ते कोळी समाजापाठोपाठ गुजराती आणि पारसी हे समाज वसले गेले होते. गुजराती समाज हा धाडसी आणि उद्योग, व्यवसाय करणारा समाज म्हणून शतकानुशतके ओळखला जात आहे. जेव्हा इस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय हे सुरत वरून मुंबई ला हलवल्यावर अनेक गुजराती आणि पारसी उद्योजक आणि व्यवसायिक हे संधीच्या शोधात मुंबई ला स्थलांतरीत झाले.
जुने नाम बॉम्बे आणि आताचे मुंबई हे त्या काळापासून ते आतापर्यंत आर्थिक उलाढालीचे, उद्योग, व्यवसायिक शहर म्हणून ओळखले जाते. आणि गुजराती हे जिथे संधी आणि आर्थिक नफा हा जास्त असतो तिथे स्थलांतरीत होत असतात, भारताच्या विभाजनाअगोदर ते कराचीला सुद्धा स्थायिक झाले होते. गुजरात्यांची मोठी लोकसंख्या हि मुंबई मध्ये उच्चभ्रू वस्तीत राहते.
एनडीटीव्ही ह्या वृत्त वाहिनीच्या वेबसाईटवर २०१५ साली लिहिलेला लेख सापडला, त्यामध्ये मराठी लेखक मधु मंगेश कर्णिक हे म्हणतात कि “मराठी माणसांची लोकसंख्या हि मुंबई मध्ये झपाट्याने कमी होत चालली आहे. १९६० साली मराठी समाजाची लोकसंख्या हि ५२ टक्के होती ती आता २२ टक्क्यांपर्यंत कमी होत आली आहे. मराठी माध्यमांच्या शाळादेखील बंद होत चालल्या आहेत, जर असेच सुरु राहिल्यास येत्या २० वर्षात फक्त ५ टक्के मराठी बोलणारी लोक उरतील मुंबई मध्ये.”
इतिहास आणि आजची परिस्थिती ह्यावर मी प्रकाश टाकायचा प्रयत्न करत आहे. इतर समाजाला नावे ठेवून काही फायदा नाही, चुकत कुठे असू तर फक्त आणि फक्त आपणच. खरच आपण जिथे संधी आहे तिथे स्थायिक होतो का? आपल्या समाजाला आर्थिक विकासाचा इतिहास आहे का? आपल्या पिढ्या ह्या काय करत होत्या?
ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मुक्त मनाने शोधायची आहेत. जिथे पिढ्या ह्या उद्योग व्यवसायात असतात तिथे थोडे तरी कमी पडले जाणार आहोत, पण जर प्रयत्न केला तर नक्कीच तिसऱ्या पिढीनंतर समाजाचे चित्र हे बदलले दिसेल. त्यावेळेस मराठी हा एकमेकांना मदत करताना दिसेल.
म्हणून मी प्रत्येक लेख किंवा माझ्या विचारात सतत मानसिकता आणि संस्कार हे शब्द वापरत असतो त्याचे उत्तर हे तुम्हाला आता भेटले असेल. नोकरी करणार्यांच्या मानसिकतेमुळे दृष्टीकोन हाही तसाच होवून जातो, मग सगळीकडे त्याला फक्त आणि फक्त नोकर्याच दिसू लागतात, पण जर उद्योग, व्यवसाय किंवा आर्थिक विकासाची मानसिकता ठेवली कि फक्त आणि फक्त श्रीमंती आणि समृद्धीच दिसून येते.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

उद्योजक, व्यवसायिक आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत

उद्योजक, व्यवसायिक आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत ह्या प्रशिक्षणासाठी जे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार येवून गेले त्यामधील काही अपयशी झालेल्या लोकांचा अनुभव असा होता कि “आम्ही खूप कमी वेळेत यशस्वी झालो पण परत आम्ही यशस्वी होवूच शकलो नाही, कसे तरी आम्ही दिवस ढकलत आहोत.”
हे ऐकणे जरी सोपे असले तरी त्यांनी अनुभवलेले किंवा अनुभवत असलेले आयुष्य हे खरच खडतर आहे. आपले आयुष्य म्हणजे काय सिनेमा नाही कि इथे खोटे सुख दुख, जन्म मृत्यू, यश अपयश येते. इथे आकडा अनुभव आला कि काही वर्षे त्याची चटके सहन करावेच लागतात.
इथे जे यशस्वी झाले ते हे विसरले कि यश म्हणजे काही ध्येय नाही आहे, तो प्रवास आहे, ते ध्येयाला प्रवास संपला असे समजून चुकले आणि अपयशाच्या परतीला लागले. आणि ज्यांना यशाला प्रवास समजला त्यांनी यशाची नवनवीन शिखरे पदक्रांत केली.
इथे भावना खूप महत्वाच्या आहेत ज्या आपल्या विचारांना दिशा देतात आणि विचार कृती करवतात. जेव्हा तुम्ही ध्येय ठरवल्या बरोबर लगेच कमी कालावधीत साध्य केले तर तुमच्या मध्ये गर्वाची भावना वाढण्याची शक्यता हि ९९ टक्के असते, उरलेला १ टक्का हा वर्ग सतत, जन्मजात किंवा सतत च्या प्रयत्नाने आपल्या भावना ताब्यात ठेवतात त्यामुळे ते त्यांनी साध्य केलेले ध्येय टिकवून ठेवतात आणि नव नवीन ध्येय साध्यही करतात.
आयुष्य हे असेच असते. इथे पहिला निकाल दिला जातो त्यानंतर मनुष्य शिकतो. पण जो आत्मविकासाला महत्व देतो तो सततच्या अंतरमनाच्या निकालाने शिकत जात वास्तवात परीक्षा पास होत जातो. पुढचा ठेच मागचा शहाणा हि म्हण तर प्रत्येकला लागू होतेच पण ह्यासाठीही मन मेंदूने स्थिर असावे लागते.
हाच नियम तुमच्या खाजगी आयुष्यालाही लागू होतो. नियम सगळ्यांना एकसारखाच लागू होतो. ह्यामध्ये अनुभवी आणि विनानुभावी असा भेदभाव केला जात नाही.
कृती करा. तुमच्या कडे हाच क्षण आहे जगण्यासाठी. पुढच्या क्षणाला काय होईल ते सांगता येणार नाही. जगा आपल्या स्वप्नांचे आयुष्य.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७




समुद्र बनून काय फायदा
बनायच तळे बना, जिथे वाघ पण
पाणी पितो, तो पण मान झुकवून.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

महाभारतातील अभिमन्यू, गर्भ संस्कार, अनुवांशिकता आणि कौटुंबिक संस्कार भाग १



उद्योजक, व्यवसायिक, नोकरदार आणि इतर सामान्य लोक ह्यांनी आवर्जून वाचा आणि समजून घ्या हा लेख. कमी वयात यशस्वी होण्याचे रहस्य हि तुम्हाला समजेल, आणि ह्यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करून सिद्ध हि केले आहे.
अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रा हिचा मुलगा. अतिशय शूरवीर. १६ व्या वर्षांपर्यंत अर्जुनाने एक चांगला पिता व्हायचे निभावले होते, अर्जुनाने वडिलांकडून द्याचे संस्कार जसे धनुर्विद्या आणि इतर शस्त्र चालवायचे शिकवले होते. प्रत्येक वडिलांनी शिकण्यासारखे.
जेव्हा गर्भ पोटात वाढत असतो तेव्हा तो संपूर्ण आई वर अवलंबून असतो. खाणे पिणे, ऐकणे, बघणे, अनुभवणे ह्यामार्फत गर्भातच त्याचे शिक्षण सुरु होते. जे कायमस्वरूपी त्याला स्वभाव देऊन जातो जे कोणीही बदलू शकत नाही, अपवाद फक्त १ टक्का लोक.
अभिमन्यू जेव्हा गर्भात होता तेव्हा अर्जुन सुभद्राला कौरवांचे युद्ध कौशल्याचा एक भाग चक्रव्युव्ह कसे भेदायचे हे सविस्तर सांगत होता. आणि आईच्या मार्गे गर्भ शिकत जातो त्यामुळे अभिमन्यू हि शकत होता. अर्जुनाने चक्रव्युव्ह भेदून आत कसा प्रवेश करायचा हे पूर्ण सांगून झाल्यावर सुभद्राला झोप आली आणि ती त्या चक्रव्युव्हा मधून बाहेर कसे पडायचे हे ऐकू शकली नाही.
गर्भ हा संपूर्ण पणे आई वर अवलंबून असल्यामुळे आई झोपल्यामुळे गर्भातील अभिमन्यू हि चक्रव्युव्हा मधून बाहेर कसे पडायचे हे ऐकू शकला नाही, ह्यामुईल तो अर्धवटच शिकू शकला. आणि नंतर मोठे झाल्यावर त्याला अर्जुन, श्रीकृष्ण ह्यांना वेळ भेटला नाही.
हे इथपर्यंत ठीक होते, पण ह्याचे परिणाम भयंकर झाले. ज्यांच्या मुलांनी परिणाम भोगले असतील किंवा भोगत असतील त्यांनी त्याची पार्श्वभूमी समजून घ्यावी. आणि उद्योजक व्यवसायिक, गुंतवणूकदारांनीही समजून घ्यावी. अर्धवट शिक्षण नेहमीच घात करते. आता परिणामासाठी पुढे वाचा.
जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध सुरु होते तेव्हा कौरवांनी त्यांचे अभेद्य चक्रव्युव्ह रचले जे फक्त अर्जुन आणि कृष्णाला येत होते. अर्जुन आणि त्याचा सारथी कृष्ण हे दोघेही रणांगनापासून लांब लढाईत व्यस्त होते आणि ह्या कौरवांच्या चक्रव्युव्हामुळे पांडवांच्या सैन्याचे खूप नुकसान होत होते. हे बघून अभिमन्यू युधिष्ठीर ला चक्रव्यूव्ह भेदण्यासाठी परवानगी मागतो पण युधिष्ठीर सुरवातीला परवानगी देत नाही, सैन्याचे होणारे नुकसान आणि अभिमन्यूच्या हट्टामुळे त्याला परवानगी द्यावी लागते.
अभिमन्यू चक्रव्युव्ह भेदण्यास यशस्वी ठरला कारण त्याने आईच्या गर्भातच ह्याचे शिक्षण घेतले होते पण चक्रव्युव्हा बाहेर निघायचे शिक्षण तो मोठे झाल्यानंतरही घेवू शकला नाही आणि ह्यामुळे तो चक्रव्युहामध्ये अडकून पडला. शेवटी त्याचा अंत हा जयद्रथाच्या हातून झाला.
लहान मुल यांची शिकण्याची सुरवात हि गर्भापासून होते, त्यानंतर ते आई वडिलांची बघून ऐकून शिकतात, त्यानंतर ते कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक आणि ज्या समुहात राहतात त्यापासून शिकतात. चांगले संस्कार चांगला मनुष्य घडवते आणि वाईट संस्कार हे वाईट मनुष्य घडवते.
उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहार करताना अर्धवट ज्ञानासोबत कृती हि कधीही प्रचंड नुकसानीचे परिणाम घेवून येते, त्यापेक्षा ती कृती न केलेली बरी.
आयुष्यामधील उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, खाजगी आयुष्य ह्यामधील चक्रव्युव्ह तुम्ही आरामत भेदू शकता, ह्यामध्ये कृष्णाचा रोल हा नेहमी आत्मविकास प्रशिक्षक करत असतो. तज्ञांचे फायदे हे ह्याच लेखातील पुढील भागात स्पष्ट करेन.
(कृपया हा लेख कुठल्या विशिष्ट धर्माच्या दृष्टीकोनातून बघू नका, आप आपल्या विश्वासानुसार वरील लेखामधील नावे हि आप आपल्या विश्वासानुसार बदलून वाचाल, सर्वात महत्वाचा आशय आहे.)
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



सर्व पक्षी मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी आसरा शोधतात, फक्त गरुड हा मुसळधार पावसाला टाळण्यासाठी पावसाळी ढगांवरुन उडतो. फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

मुख्य मुंबई, पश्चिम मुंबई उपनगर आणि नवी मुंबई मधून उध्वस्त झालेला इमानदार, सरळ मार्गाने चालणारा मराठी

मुख्य मुंबई, पश्चिम मुंबई उपनगर आणि नवी मुंबई मधून उध्वस्त झालेला इमानदार, सरळ मार्गाने चालणारा मराठी
आजची भारतातील सगळ्यात श्रीमंत वसाहत हि मुख्य मुंबई मध्ये आहे. तिथे कधी काळी आगरी आणि कोळी ह्यांचे वास्तव होते ते आता अतिशय संकुचित होत गेले आहे.
कधी काळी मुंबई चा मुख्य रहिवासी हा कोळी आणि त्या पाठोपाठ आगरी हा दिसेनासा झाला आहे. राजकारणी सोडली तर ९८ टक्के मुंबईचा रहिवासी हा संपवण्यात आला आहे.
मनुष्याच्या अस्ताला तो च जबाबदार असतो, कारण जो हार मानतो तो रणांगण सोडून जातो, हा इतिहास आहे मनुष्य प्राण्याचा.
त्यानंतर गिरणी कामगार उध्वस्त झाला, मराठी मुख्य मुंबई मधून मुंबई उपनगरात जाऊ लागला, त्यानंतर मुंबई उपनगर सोडून तो ठाणे कल्याण ह्या ठिकाणी जावू लागला, त्यांतर पाठ दाखवत पळत तो खोपोली आणि गाव गाठायला लागला.
खरे म्हणजे पाठ दाखवत पळणे हे काही भित्रे पणाचे लक्षण नव्हते, त्याला चतुराईने पळवले गेले. त्यांच्या सरळ स्वभावाचा फायदा पूर्ण पणे उचलला गेला. त्याच्या भावनेशी खेळले गेले, धोके तर प्रचंड दिले आणि पाठीवर वरही खूप करण्यात आले.
हेच नवी मुंबई वसवण्यासाठी करण्यात आले. मोठ मोठे मराठी शेतकऱ्यांचे मोर्चे आणि नेते संपवण्यात आले. तिथला आगरी हा जवळपास आयसीयू वर आहे. जवळपास तो १० ते ३० वर्षात संपून जाईल.
जात धर्म आणि राजकारणात त्याला इतके व्यस्त ठेवण्यात आले कि दंगली मध्ये मुक्त अर्थ व्यवस्थेचा स्वीकार करत त्याचे परिणाम हे साल २००० नंतर दिसण्यात आले.
आता तर शेवट असा आहे कि कुणीच काहीही करू शकत नाही. जिथे मच्छी चा सुगंध यायचा तो शहरी संस्कृतीला तो घाण वास वाटू लागला आहे. कधी काळी कोळी आगरी लोकांची संस्कृती हि बंगले सोडून चाळी मध्ये आणि त्यापुढे झोपडीमध्ये तग धरू पाहत आहे.
मुंबई जवळून आलेली मराठी मंडळी हि परत कोकण, पुणे नाशिक अश्या ठिकाणी परत जात आहे. कुठेही गेले तरी स्वभाव तर बदलावाच लागेल. ज्या स्वभावामुळे माझे माझ्या पिढ्यांचे आणि मराठी समाजाचे नुकसान झाले तोच स्वभाव धरून आताच्या काळात चाललो तर शेवटचा मराठी उरायला काही वेळ लागणार नाही.
तुम्हाला पिढ्यान पिढ्यांचे नोकर बनायचे आहे कि पिढ्यान पिढ्यांचे मालक बनायचे आहे? श्रीमंत आपल्या मुलाला सांगतो : "ह्याचे वडील आपल्याकडे नोकर होते आणि आता त्यांचा मुलगा आपला नोकर आहे.", नोकर आपल्या मुलाला सांगतो : "ह्याचे वडील अगोदर हा उद्योग, व्यवसाय सांभाळायचे आता त्यांचा मुलगा हा मालक झाला आहे."
काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलतो तोच निसर्ग नियमानुसार टिकतो. आता पळणे बंद करा. पाण्यासारखे बना, कधी बर्फ तर कधी वितळलेले पाणी. कधी कोल्हा तर कधी वाघ, कधी कावळा तर कधी गरुड.
शत्रू जर बलाढ्य असेल तर लपून पाठून वार करा. हरा किंवा जिंका, मान्य करा आणि योजनेमध्ये बदल करत जा. ध्येय फक्त सोडू नका. अति विश्वास कुणावर टाकू नका. प्रत्यक ठिकाणी स्वतः जातीने लक्ष्य घाला.
जग तुम्हाला नाव ठेवेल ते मनावर घेवू नका. आपल्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा. कर भला तो हो भला हे अजून मला वास्तवात दिसले नाही, अशी अनेक उदाहरणे देवू शकतो कि वाम मार्गाने कमावलेल्या पैश्यांवर पिढ्या ह्या सुखी झाल्या आहेत आणि इमानदारीच्या पैश्यांवर जगणारे हे आपल्या पिढ्यांसाठी परत शून्य पासून सुरवात ठेवून गेले आहे. हि उदाहरणे तुमच्या जवळपास कितीतरी असतील, जास्त लांब जायची गरज नाही.
सिनेमा आणि वास्तव आयुष्य ह्या मध्ये खूप फरक आहे. लोकशाही च्या देशात अघोषित हुकुम शाही बघितली आहे. पैश्यांच्या जोरावर कायदे नियम मोडताना बघितले आहे. सामान्य लोकांचा पदोपदी अपमान होताना बघितले आहे आणि तीच लोक मिडिया समोर येवून इमानदारीच्या आणि लोकशाहीच्या मोठ मोठ्या बाता करताना बघितल्या आहेत.
नेते आपल्या मुलांसाठी पक्ष, त्याचे पद, संपत्ती आणि पावर ठेवून जातात, आणि कार्यकर्त्यांची मुल हि कोर्ट आणि पोलीस च्या केसेस घेवून असतात, नोकरी शोधतात किंवा छोटा मोठा व्यवसाय करत असतात.
मर्यादित, संकुचित आणि लाचारीची विचारसरणी सोडा. नैतृत्व करा. एकटे चाला. निर्णय घ्या, धोका पत्कारा, १० ते ६ नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देणारे बना. उंच उडी घ्या, धाडसी पालकांचे मुलच धाडसी बनतात. मुलांना आपण करत असलेली धडपड बघू द्या.
इतिहास साक्षी आहे कि धूर्त लोक हि पिढ्यान पिढ्या टिकून राहिली आहेत. कालही होती, आजही आहेत आणि भविष्यातही राहणार. तुम्हाला पदोपदी ह्यांचा सामना करावाच लागेल. आणि जो त्या क्षणी सक्षम तोच जगण्याचे युद्ध जिंकेल.
उत्क्रांतीचा सिद्धांत सुद्धा हेच सांगतो कि जो काळानुसार, परिस्थितीनुसार बदलतो तोच टिकतो. बाकी बदलाच्या ओघात संपून जातात, जसे मुंबई मधील इमानदार सरळ मार्गी चालणारा मराठी माणूस.
लवचिक बना. मानसिक दृष्ट्या कणखर बना.
पुढील लेखामध्ये मी अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


रामायणात दोन व्यक्ति अशा होत्या,

एक बिभीषण आणि दुसरी कैकयी.

रावणाच्या राज्यात राहूनही
बिभीषण बिघडला नाही,

श्रीरामाच्या राज्यात राहुन
कैकयी सुधारली नाही.

सुधारणे आणि बिघडणे व्यक्तिच्या
विचारावर आणि स्वभावावर
अवलंबून असते.

परिस्थितिवर नाही.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

प्रोस्ताहन देणारे व्यक्तिमत्व ओपरा विनफ्रे



अमेरिकेतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, प्रसारमाध्यमाची मालकीण, अब्जो रुपयांची मालकीण.

भूतकाळ संकट आणि समस्यांनी भरलेला. वयाच्या ९ व्या वर्षी लैंगिक अत्याचाराला बळी पडली, वयाच्या १३ व्या वर्षी फुटपाथ वर आली, १४ व्या वर्षी आपले बाळ गमावले.

ह्या सर्व भयंकर परिस्थितीतून बाहेर येत ती आज अब्जो रुपयांची मालकीण आहे आणि जगभरातील तरून तरुणींची आदर्श आहे.

वयाच्या ३२ व्या वर्षी ती अमेरिकेतील राष्ट्रीय दुरचित्र वाहिनीवरील पहिली निग्रो स्त्री आणि अब्जोपती आहे.

टाइम ह्या जगप्रसिद्ध मासिकाने केलेल्या जगातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व ह्या निवडणुकीमध्ये ओपरा विनफ्रे ला लोकांनी सतत निवडून दिले होते, ह्यामुळे ती २० व्या शतकातील जगातील सर्वात प्रभावी १०० व्यक्तीमत्वांमध्ये तिचा समावेश झाला आहे.

बोध :

तुमचा जन्म कुठलाही असू द्यात, तुम्ही तुमच्या आयुष्याला किती उंचीवर घेवून जाणार आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही स्वतःला परिस्थितीला दोष देत बसलात तर तुम्ही काहीच साध्य करू नाही शकणार. आणि हे नकारात्म युद्ध तेव्हाच संपेल जेव्हा तुम्ही संपवाल.

अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत

८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



हि समस्या जेव्हा तुम्ही लोक बोललेले प्रत्येक म्हणणे ऐकल्यावर उद्भवते.

अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



सामान्यतः मिळणारे पिढीजात संस्कार आणि फायदे
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

पाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO

पाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO
या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २१३ कोटी रुपयांचा नफा कमावला असून २१ कोटी रुपये कंपनीचे सीईओ असलेल्या 'दादाजीं'च्या खात्यात जमा झालेत.
त्यामुळे कमी शिक्षण हे कारण तुम्ही देवू शकत नाही. तुम्ही १०० करणे द्याल तर माझ्याकडे जगभरातील १००० कमी शिक्षित किंवा लहान उद्योजक व्यवसायिकांची यादी तयार असेल.
खालील मटा मधील लेख संपूर्ण वाचाल.

पाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO -Maharashtra Times

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई आपल्या स्वयंपाकघरात अनेक वर्षांपासून हक्काचं स्थान मिळवलेल्या एमडीएच मसाल्याच्या पॅकेटवर तुम्ही फेटावाल्या आजोबांचं चित्र पाहिलंच असेल ना?... किंवा मग टीव्हीवरच्या एमडीएचच्या जाहिरातीतील पीळदार मिशीवाले 'दादाजी' नक्कीच बघितले असतील?... ९४ वर्षांच्या या आजोबांनी बड्या बड्या उद्योगपतींना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
समुपदेशन, मार्गदर्शक, प्रशिक्षक

संपूर्ण जगामध्ये तुम्हाला ९ प्रकारच्या मानसिकतेची लोक भेटतीलच



संपूर्ण जगामध्ये तुम्हाला ९ प्रकारच्या मानसिकतेची लोक भेटतीलच
१) अब्जो खरबोंची संपत्ती असलेले श्रीमंत
२) पिढीजात श्रीमंत
३) द्वितीय पिढी आणि त्यापुढील श्रीमंत
४) नव श्रीमंत
५) उच्च मध्यम वर्ग
६) मध्यम वर्ग
७) कनिष्ठ मध्य वर्ग
८) गरीब
९) अतिगरीब
हे काही फक्त पैश्यान बाबतीत नाही आहे, जेव्हा तुम्ही ह्यांचा जवळून अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला जाणवेल कि हा जो उतरता क्रम लागला हा तो त्यांच्या मानसिकतेमुळे लागला आहे. वरील २ ते ५ क्रमांकातील लोकांशी माझा दररोज चा परिचय होत असतो, त्यांचे प्रमाण अंदाजे आपण ९० % पकडू आणि बाकी १० टक्क्यांमध्ये येतात.
जस जसा क्रम चढत जातो तस तसे विचार, भावनांची स्थिरता आणि सकारात्मक विचार हे वाढत जातात. आयुष्याचा प्रत्येक भाग ते अमर्याद जगत असतात. आणि जस जसा क्रम खाली खाली येत जातो तस तसे विचार, भावनांची अस्थिरता आणि नकारात्मक विचार वाढत जातात.
असेच काहीसे आरोग्याच्या श्रीमंती विषयी आहे, वरील १ ते ५ क्रमांकातील लोक हि रोग झाल्यावर उपचारांसाठी जास्त खर्च नाही करत, त्यांचा जास्तीत जास्त खर्च हा मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवणे ह्यावर जास्त भर असतो.
खालील ६ ते ९ क्रमांकातील लोकांचा औषध उपचारांवर जास्त खर्च असतो आणि आरोग्यावर खूपच कमी असतो.
१ ते ५ क्रमांकातील लोक शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्याला नेहमीच प्राधान्य देतात, ६ ते ९ क्रमांकातील लोक हि मानसिक आरोग्याकडे आत्मविकासाच्या दृष्टीकोनातून न बघता “मी काय वेडा आहे का?” असे बोलून ते टाळतात किंवा साफ दुर्लक्ष्य करतात.
१ ते ५ क्रमांकातील लोकांकडे स्वार्थी किंवा निस्वार्थी भावनेने बोला पण नातेवाईक आणि जवळच्या नात्यांचा लोकांचा जमवला हा खूप असतो आणि वेळ प्रसंगी जास्तीत जास्त ते कामालाही येतात. ६ ते ९ क्रमांकातील लोकांमध्ये जास्तीत जास्त भांडणे आणि एकमेकांचा हेवा हा दिसुन येतो. मदतीचे प्रमाणही खुप कमी असते.
१ ते ५ क्रमांकातील मुल हि लहानपणापासून तज्ञ लोकांच्या सहवासात प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रित्या वाढलेली असतात म्हणून ती जीवन जगायला सुरवात करतात तेव्हा लग्न, आणि मुलबाळ होवून लवकर आयुष्यात जम बसवतात. त्याउलट ६ ते ९ क्रमांकांना खूप मेहनत करावी लागते, लग्न मुलबाळ ह्यासाठी हि ते वेळ घेतात किंवा हि जबाबदारी उचलताना त्यांना प्रचंड त्रास होत असतो.
ह्या प्रत्येकांची एक मानसिक सीमा रेषा असते ज्यामुळे तो तसेच आयुष्य जगत असतो, जो पर्यंत त्यांच्या पिढीमधील कोणीतरी ती सीमारेषा तोडत नाही तोपर्यंत. मानवी समाजत हालचाल तर होते पण ती काही काही क्षणात नाही होत, काही पिढ्यांचा कालावधी किंवा शेकडो वर्षे द्यावी लागतात.
हा एका पिरेमिड सारखा आकार आहे, वर जस जसे जात जाल तस तशी लोकसंख्या खूपच कमी कमी होत जाईल आणि जस जसे खाली येत जाल तस तशी लोकसंख्या हि प्रचंड वाढलेली दिसेल. वरच्या मजल्यावरून खाली यायचे प्रमाण खूपच कमी आहे आणि खालच्या मजल्यावरून वर जायचे प्रमाण तर अगदी नगण्य आहे.
वरील १ ते ५ क्रमांका मधील लोकांना जीवनशैली फक्त टिकवून ठेवायचे आहे तर ६ ते ९ मधील लोकांना जीवन शैली निर्माण करून मगच टिकवून ठेवायची आहे. वरील १ ते ५ क्रमांकामध्ये जे असतात त्यांची मुले यशस्वी होतात व सतत मिडिया मध्ये देखील येत असतात. खालील ६ ते ९ मधीलहि यशस्वी होतात पण इथे यश हे आर्थिक स्वरुपात कमी प्रमाणात असते आणि भांडवलशाही ला पोषक नसते म्हणून ते मिडिया मध्ये येत नाहीत आणि आले तरी एखाद दुसरा चुकून.
हे पिरेमिड फक्त आणि फक्त मानसिकतेमुळे तयार झाले आहेत. एकदा का तुम्ही तुमची मानसिकता बदलली कि त्यामुळे दृष्टीकोन बदलतो आणि मग प्रत्येक संधीचे सोने करत मनुष्य आपल्याच पिढीमध्ये यशस्वी होतो.
जागृत मनोवृत्तीचा मनुष्य हे चांगलेच ओळखून आहे, समस्या होते ती सामान्य मानसिकतेच्या लोकांची. ते भावनेच्या भरात इतके वाहून जातात कि ते पैश्यांना महत्व देत नाही आणि मग ते नकारात्मकता, मानसिक, शारीरिक गरिबीमध्ये जगायला लागतात.
जागृत मनोवृत्ती ची लोक हि आपल्या शारीरक आणि मानसिक गरजा ह्या पैश्याने पूर्ण करून घेतात. ह्यासाठी अगोदर ते आत्मविकासा द्वारे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या दररोज किंवा वेळोवेळी स्वतःला मजबूत, सक्षम आणि साक्षर करून घेतात.
सामान्य मानसिकतेची लोक हि फक्त भावनेच्या भरत सतत इकडून तिकडे वाहत जातात. आणि इथे मानसिक आणि शारीरिक सक्षमतेच्या जागी आजार, अपघात त्यांच्या अनुभवास येतात. ह्यांच्या दररोजच्या पोटापाण्याचे कसे तरी भागून जाते त्यामध्ये ह्यांना छंद किंवा इतर आवडीचे करण्यासाठी वेळच नसतो.
जागृत मनोवृत्तीची लोक हि ध्येयाशी एकनिष्ठ असतात. ते पहिले महत्व ध्येयाला देतात व नंतर इतर बाबींना. त्यांना माहित असते कि आपल्यावर करोडो रुपये सांभाळायची जबाबदारी आहे, त्यासोबत अनेक कामगारांचे आणि त्यांच्या परिवाराचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या पोट भरायचे आहे. ह्यासाठी त्यांना आपल्या परिवारालाही वेळ देता येत नाही.
सामान्य मानसिकतेची लोक फक्त त्यांच्या जीवनशैलीकडे बघतात आणि बाकी वेळ हा त्याच्याच बद्दल चर्चा करत बसतात
उद्योजक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार बनने, श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगणे हि काही मोठी गोष्ट नाही आहे, ह्यासाठी सर्वात महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे धाडस, ह्या पाठोपाठ गुणांची एक शृंखलाच सुरु होते. त्यानंतर सर्वात महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे मर्यादा तोडताना परत पाठी न जाण्याची जिद्द, चिकाटी.
ह्या बरोबर सकारात्मक दृष्टीकोन, स्थिर, शांत आणि थंड मानसिकता, मधाळ भाषा शैली, धूर्तपणा (हा खूप महत्वाचा आहे, हा नसेल तर तुम्ही तुमचे स्वप्न किंवा ध्येय हे दुसर्यांना आरामत देवून टाकाल. जगही त्याच धुर्ताचे ऐकेल, ना की तुमच्यासारख्या इमानदाराचे.), परिस्थितीनुसार त्याच क्षणाला साम, दाम, दंड किंवा भेद ह्याचा वापर करणे, प्रचंड एकाग्रता आणि भावनांवर ताबा असे प्रमुख गुण असणे आवश्यकच आहे, त्यानंतर त्या मनुष्य प्राण्यानुसार आणि परिस्थितीनुसार वेगवेगळे असतात आणि गुण जाणून घेण्यासाठी तज्ञांची मदत घ्यावी लागते.
ह्या गुणांना पर्याय नाही आहे. हे तुमच्याकडे असलेच पाहिजे. सिनेमा आणि वास्तव आयुष्य ह्या मध्ये जमीन आसमान चा फरक आहे.
सुरवात करणारा काही सुरवातीलाच यशस्वी होत नाही आणि होतही असले तरी त्यांचे प्रमाण हे खूपच कमी आहे, सामान्यतः सुरवातीला जास्तीत जास्त लोक अपयशी होतात. त्यामधले तज्ञांची मदत घेतात ते कसे तरी किनारा गाठतात आणि हाच अनुभव त्यांना उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार बनवतो, बाकी बुडून जातात, म्हणजे परत आपल्या नोकरीच्या जुन्या मार्गाला लागतात, किंवा कमी धोके आहेत ते काम करतात.
जास्तीत जास्त उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणुकदार ह्यांना तुम्ही यशाचे रहस्य विचारले कि ते सगळीकडे पुस्तकात किंवा भाषणात एकसारखे रट्टा मारलेले मुद्दे सांगत बसत नाहि, ते एकच म्हणतील कि मला माहित नाही, मला हे काम करण्यात मजा येत होती, मला असे काही विशेष करावे लागले नाही, मला वाटले आणि मी करत गेलो आणि आज इथपर्यंत पोहचलो. जो अंतर्मनापासून काम करतो तो कधीच त्याला स्वतःला व्यक्त करू शकत नाही आणि तो खोटेही बोलू शकत नाही कारण त्याचे आयुष्य आणि तो करत असलेला उद्योग व्यवसाय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचा आवाज आणि त्याची देहबोली हे सर्वकाही बोलून जाते. मनुष्याच्या आयुष्याला आणि त्याच्या अंतर्मनाला कोणीच कागदावर उतरवू शकत नाही.
एक एक पाउल टाकायला सुरवात करा. पर्वताच्या शिखरावर पोहचल्यावरच तुम्हाला समजेल कि ते शिखर आहे ना कि पायथ्याशी बसून किंवा अर्धवट सोडून. एव्हरेस्ट चढणे हे खूप सोपे आहे पण त्यासाठी मनाला तयार करणे हे खूपच कठीण आहे, मानसिक क्षमतेची तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत चाचणी सुरु असते आणि जो हि चाचणी पार करतो तोच शिखर गाठतो.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



आपले ध्येय, स्वप्न आणि वास्तविक आयुष्य.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



हुशार मनुष्य हा आपल्या शत्रू कडूनही फायदा करून घेतो आणि मूर्ख मनुष्य हा आपल्या मित्रांकडूनही फायदा करून घेत नाही.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



ज्यांना प्रश्न पडला असेल कि काही माणसांच्या आयुष्यात यश आणि समाधान सतत येत असते, का काही लोक हे सतत खाजगी आणि व्यवसायिक आयुष्यात भाग्यशाली जगत असतात त्याचे उत्तर हे तुम्हाला खालील कथेमध्ये मिळेल.
खाजगी आणि व्यवसायिक जीवनात यश आणि पैश्यांचा प्रवाह हा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी हि कथा नुसती वाचू नका तर आत्मसात कराल.
आपल्या कमेंट्स खाली द्याल, किंवा जर काही समस्या असतील इमेल कराल.
एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...
तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,
भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?
काही त्याला शिकवा.
त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "
आणि
मोठ्याने हसू लागला ....
हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...
तो घरी गेला ....
त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते ..
तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!
मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...
रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे
मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो ..
त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात ....
राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..
आणि
मी चांदीचे नाणे उचलतो ..
त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ...
सार्यांना मजा वाटते .......
***असे रोज घडते*** (हे लक्ष्यत ठेवा ह्याचे उत्तर खाली भेटेल)
मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो
चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही
न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?
असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"
मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती ...
हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..
मुलगा म्हणाला
" ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल ..
त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या ..
पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "
सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...
प्लिज नक्की forward करा, खूप छान मेसेज आहे. 👍👍👍
इंटरनेट वरून साभार
"गुरुमंत्रा"
अश्विनीकुमार
आर्थिक आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



कुणाला श्रींमत व्हायचे आहे?
ह्या प्रश्नावर उत्तर म्हणून सर्व हा वरती करतील.
कोण आतापासून सुरवात करणार आहे?
आजपासून कृती करायला कोणीही हात वरती करणार नाही.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

मनुष्याची परिस्थिती इतिहास, वर्तमान आणि भविष्य



प्रत्येक जन आपआपल्या परिस्थितीनुसार इतिहास, वर्तमान आणि भविष्यात लिहून ठेवत असतो. जगामध्ये हा नियम सारखाच आहे.
मला नाही माहित कि मनुष्य प्राणी कधी पासून भेदभाव करायला लागला, पण इतके माहित आहे कि श्रीमन, मध्यमवर्ग, गरीब आणि अति गरीब हे पुरातन काळाच्या ग्रंथामध्येहि उल्लेख केलेला आढळतो.
मुंबई मध्ये ढोबळ मानाने मनुष्य प्राण्याचे वर्गीकरण केल्यास गर्भ श्रीमंत, श्रीमंत, उच्च मध्यम वर्ग, मध्यमवर्ग, गरीब आणि अति गरीब असे आढळून येते. वरील तीन वर्ग जिथेही जातील तिथे ते त्यांच्याच वर्गाशी मिळत्या जुळत्या लोकांमध्ये उठणे बसने करतील.
परदेशातून येणारा प्रवासी हा जर श्रीमंत असेल तर तो मुंबई ला आल्यावर ताज, ओबेरॉय अश्या सप्त आणि पंचतारांकित हॉटेल मध्येच थांबेल. त्याचा घरापासून ते हॉटेल पर्यंतचा प्रवास हा सुखकारकच असेल.
तोच प्रवास हा जस जसे तुम्ही खाली याल तस तसे बदलत जाईल आणि थोडा थोडा त्रास दायक होत जाईल. आणि जर ह्या वर्गांपैकी जो कोणी लेखक असेल तो लिहिताना त्या त्या पद्धतीच्या अनुभवाप्रमाणे लीहीत जाईल.
वर्तमानच इतिहास आणि भविष्य बनत असतो. मला जर कोणी बोलले कि इतिहासात सोन्याचा धूर निघत होता आणि भविष्यात सोन्याचा धूर निघणार आहे तर त्याला बोलतो कि मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही आहे, आता दाखव, मी जिवंत असे पर्यंत मला बघायचा आहे, जर नाही दाखवू शकत तर सांगायची काही गरज नाही.
अश्या अतिरेकी वक्तव्य करणाऱ्या लोकांपासून लांब रहा, स्वर्ग आणि नर्क इकडेच ह्याच क्षणात आहे, तो आप आपल्या दृष्टीकोनात आहे. तुम्ही ह्या क्षणाला जसे आयुष्य जगत आहात तेच तुमचे वास्तव आहे. आणि हे वास्तव बदलायला तुम्हाला हाच क्षण आहे.
वेळ हे सतत चालणारे चक्र आहे, जो योग्य वळणावर वळवून परत आपल्या ध्येयाच्या स्वप्नाच्या दिशेने नेतो त्याला ते प्राप्त होते. जो नाही नेत त्याला हे चक्र भरडून टाकते. कोणीही अमरत्व घेवून आलेले नाही हे इतिहासात मोठ्या लोकांच्या उदाहरणावरून दिसून येईल. नाहीतर ते वर्तमानात आपल्या सोबत असले असते.
श्रीमंत - गरीब, सभ्य - असभ्य, चोर, डाकू - पोलीस, राजा - रंक, मित्र - शत्रू, चांगले - वाईट, रोगी निरोगी हे सर्व वर्णन इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत आहे आणि भविष्यातही ते राहणार आहे.
मी समोर येणाऱ्या मग तो स्त्री असो किंवा पुरुष ह्याला मनुष्य प्राण्याच्याच नजरेने बघतो. बाकी भेदभाव हे समाजात जरी असतील तरी माझ्या आयुष्यात नाही आहे. आम्हाला निसर्गानेच (आपला आपला विश्वास जो असेल त्याने) निर्माण केले आहे. आमच्या नैसर्गिक भावनिक आणि शारीरिक गरजा एकसारख्याच आहे.
जर आयुष्य पूर्ण जगायचे असेल तर वर्तमानातच जगा. जर वर्तमानात तुम्ही तुमचे लक्ष्य विचलित केले तर इतिहास तर जाऊ द्याच पण संपूर्ण भविष्य हे अंधकारमय करून टाकाल.
मी जे आता सांगितले आहे त्याला अनुभवाशिवाय पर्याय नाही. अनुभव मनुष्याला हुशार बनवतो. विना अनुभवी मनुष्य हा त्याच्या बोलण्यावरूनच ओळखून येतो.
लक्ष्य फक्त वर्तमान काळावर आणि आपल्या ध्येय, स्वप्नांवर ठेवा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



ग्राहकांची मानसिकता
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, पैसा आणि आयुष्य समज गैरसमज



उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक आणि पैसा ह्याला आपन मनुष्य प्राण्याचे आर्थिक आयुष्य असे ह्या लेखामध्ये समजू. मनुष्याच्या आयुष्यातील भाग म्हणजे खाजगी, व्यवसायिक आणि सामाजिक हे आहेत, ह्यामधील आर्थिक आयुष्य हा एक भाग आहे.
मनुष्य प्राण्याच्या मुलभूत गरजा कुठल्या?
१) मानसिक नैसर्गिक गरजा
२) शारीरिक नैसर्गिक गरजा
इतके सोपे आहे. आता पुढे जाऊ. मनुष्य प्राण्याचा इतिहास जर तपासला तर तो जस जसा काळ पुढे जात राहिला तस तसा मनुष्य प्राणी हा निसर्गापासून लांब जात राहिला. आता तर इतका लांब गेला कि तो स्वतःला निसर्गापेक्षा स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला.
निसर्ग जे पण देतो ते अमर्याद देतो पण त्यालाही मनुष्याने मर्यादित करून कृत्रिम निर्मितीवर भर देवू लागला. प्राणी फक्त दुष्काळ पडला कि मरायचे पण इथे सर्व मुबलक प्रमाणात असूनही मनुष्य प्राणी मरत आहे, का तर ते विकत घेण्यासाठी पैसा नाही. आणि हे दुष्काळ नसेल तेव्हाही घडत आहे.
आताही बघा जर कोठेही पक्षी किंवा प्राणी मेला तर इतर पक्षी प्राणी एक तर तिथे जवळ येवून आपल्या भावना व्यक्त करतात आणि लांब असेल तर आवाज काढून, इतक्या दूर पर्यंत ते जाणीवेच्या माध्यमातून एकमेकांशी जुळलेले असतात.
पण मनुष्य प्राणी हा जानिवेपासून खूप लांब गेला आहे. कसे ते तुम्हाला सांगायची गरज नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या इतर प्राण्यांमध्ये कुठेही कसला भेद नाही पण मनुष्य प्राण्यामध्ये अनेक प्रकारचे भेदभाव भरलेले आहेत.
आता मुद्द्यावर येतो, पैसा मानवी आयुष्यातील एक अविभाज्य घटक सध्याच्या काळामध्ये मध्ये आहे. तो अप्रत्यक्ष रित्या नैसर्गिक महत्वाचा गुणधर्म जगण्याशी निगडीत आहे.
जेव्हा जीवावर येते तेव्हा बिरबल ची कथा माकडीण आणि तिचे पिल्लू हे आठवले असेल, आणि हा जीव वाचवायचा गुणधर्म महत्वाचाच आहे नाहीतर तुम्ही संपून जाल.
आपण तीन मुलभूत गरजांबद्दल बोलू
१) अन्न
सर्वात महत्वाचे अगोदर मनुष्य अन्नासाठी शिकार करायचा आणि जंगलातून गोळा करायचा. आता हे बंद झाले आहे. आता तुम्हाला अन्न हे विकतच घ्यावे लागेल आणि तेही पैसे देवून. जर पैसे न देता घेतले तर त्याला चोरी समजली जाईल. ह्यासाठी तुम्हाला शिक्षाही होऊ शकते.
२) वस्त्र
नैसर्गिक ऋतू मधील बदलांनुसार त्याला शरीर गरम, सुके किंवा थंड ठेवायला वस्त्रांची गरज भासते. इतर प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरा मध्येच तशी संरचना करून ठेवली आहे पण मनुष्य जस जसा घडत गेला तेव्हा त्याच्या शरीरामधील हि संरचना बदलत गेली आता त्याला तशी तरतूद करावी लागते.
वस्त्र सुद्धा तुम्हाला दुकानातूनच पैसे देवून विकत घ्यावे लागतात. इथेही पैसा आला.
३) निवारा
सर्व प्राण्यांना सुरक्षित झोपता यावे व बदलणाऱ्या ऋतू पासून, हिंस्त्र पशू पासून आपले व आपल्या लहान मुला बाळांचे संरक्षण व्हावे ह्यासाठी निवार्याची सक्त गरज आहे. आताच्या काळात निवाराही विकत घ्यावा लागतो आणि ह्यासाठी पैसा लागतो.
मानसिक आणि शारीरिक गरजा ह्या प्रत्येकानुसार वेग वेगळे किंवा कमी जास्त प्रमाणात गरजेचे असतात. उदाहरणार्थ एखाद्याला ४ तासाची गाढ झोपही पुरेसी असते तर एखाद्याला ८ तासाची. हे दोघेही यशाच्या बाबतीत एकमेकांना पूरक असतात. ह्या मध्ये खाणे पिणे, वागणे बोलणे, राहणीमान आणि अति खाजगी आयुष्य हि आलेच.
बाकी अंबानी टाटा बनायचे सोडून द्या ह्या मुलभूत गरजांसाठी आपल्याकडे पैसे असणे किंवा ती गरज पूर्ण करण्याइतपत तरी पैसे कमावता आले पाहिजे. श्रद्धा करण्यासाठीही पैसा लागतोच, म्हणून आस्तीकांची देवस्थान हे समृद्ध असतात आणि नास्तीकांची प्रयोगशाळा हि समृद्ध लोक उभी करून देतात किंवा ते नवीन संशोधन करून पैसे उभे करतात.
आत्मज्ञान आणि श्रद्धा हि फक्त सर्वांगीण समृद्ध असलेल्या मनुष्याकडेच जाते. ते मन मेंदूने स्थिर असतात, प्रचंड आशावादी आणि सकारात्मक असतात. त्यांना आयुष्याच्या प्रत्येक भागात भरभरून भेटतच जाते.
*तुम्ही मर्यादित आयुष्य जगत आहात कि अमर्यादित?
*तुम्ही जे आयुष्य जगत आहात त्यामध्ये समाधानी आहात का?
जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य रित्या आयुष्य जगत आहात, आणि जर नाही असेल तर तुम्हाला आत्मविकासाची सक्त गरज आहे.
आयुष्याच्या कुठल्याही भागात जर समस्या असतील तर "nirvana.self.development@gmail.com" ह्या इमेल आयडी वर मैल कराल. समस्या जितकी नवीन तितके निदान लवकर होईल आणि जितकी जुनी तितका वेळ ती समस्या समूळ नष्ट करण्यासाठी लागेल.
सर्वकाही शक्य आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
*समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



जर कोणताही मार्ग नसेल तर
नवीन मार्ग बनवा
अश्विनीकुमार
आत्मविश्वास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



फक्त एकच मार्ग आहे.
ह्यापेक्षा घातक विश्वास दुसरा कुठलाही नाही आहे.
अश्विनीकुमार
आत्मविश्वास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


आनंदी राहण्यासाठी कारणे नका शोधू,
प्रत्येक क्षण आनंदी राहा.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

प्रोस्ताहन देणारे मराठी व्यक्तिमत्व फिटनेस गुरू, सेलिब्रिटी ट्रेनर शैलेश परुळेकर



डॉक्टर, इंजिनीअर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, बीए आणि बीकॉम असे पठडीतील मर्यादित आयुष्य निवडण्यापेक्षा व्यायामासारखे नवीन, धाडसी, तंदुरुस्त, निरोगी, आवडीचे आणि सगळ्यात महत्वाचे ह्या वरील सर्वांपेक्षा जास्त पैसा देणारे क्षेत्र फिटनेस गुरू, सेलिब्रिटी ट्रेनर शैलेश परुळेकर ह्या मराठी तरुणाने निवडले.
आज त्यांची शाखा कांदिवली, गोरेगाव आणि मिरारोड येथे आहे.
शैलेश परुळेकर ह्यांनी दिलेले यशाचे मंत्र
“प्रामाणिकपणे काम केले तर पैसा आणि प्रसिद्धीही मिळते, त्यासाठी या दोन्हींच्या मागे धावत जाण्याची काहीच गरज नाही. मेहनत आणि संयमच स्वतहून तुम्हाला त्या मार्गावर नेईल.”
लिंक मधील लेख पूर्ण वाचा. ज्यांना वेगळे काही करायची इच्छा आहे त्यांनी संपर्क करावा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



जेव्हा नकारात्मक उर्जा आणि कंपने तुमच्या मन, मेंदू आणि पेशीमध्ये जाऊन गोंधळ घालायचा प्रयत्न करतात, पण तुमची सकारात्मक उर्जा आणि कंपने हि इतकी बलवान असतात कि तुम्ही त्यांचे प्रयत्न नाकाम करून त्यांना कमजोर करतात.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



नैतृत्व गर्दीमधून कधीच तयार होत नाही. नैतृत्व एकट्या मध्ये सतत च्या मानसिक आणि शारीरिक सरावाने, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, गाजावाजा न करता सतत घडत असते. ते स्वतः वर प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक क्षण इतकी मेहनत घेतात कि त्याच्या दुसर्याच क्षणी ते त्यांचे ध्येय प्राप्त करतात.
काही जन्मजात असतात आणि काही घडवलेले असतात, ह्यामध्ये साम्य एकच त्यांच्या ध्येय आणि स्वप्नांशी एकनिष्ठता. लीडर म्हणजे कोण, जो स्वतः चे ध्येय आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचेच नैतृत्व करतो त्याला लीडर म्हणतात. लीडर कधीच जगाला घडवत नाही, ते स्वतः घडतात आणि ते बघून जग घडत जाते. तो नेहमीच एकटा चालतो नाहीतर ५ ७ समविचारी आणि धाडसी लोक त्याच्यासोबत असतात आणि जेव्हा यश भेटत जाते त्यानंतर समूह च्या समूह त्याला जुळत जातो.
एकट्यात निर्माण झालेले नैतृत्व वर्तमानात काम करतो आणि भविष्य घडवतो. समुहात निर्माण झालेले नैतृत्व हे भूतकाळात रममाण असते, तो वर्तमान हा दुषित करतो आणि भविष्य अंधारात ठेवतो. जर तुमचे वर्तमान सुखकर आहे आणि भविष्य उज्वल तर तुमच्यामध्ये नैतृत्व करण्याची क्षमता आहे किंवा तुम्ही योग्य नैतृत्व च्या पाठी जात आहात, आणि नाही तर तुम्हाला तुमचे नैतृत्व बदलावे लागेल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


काहीही मनावर घेवू नका, काहीही. तुमचे अपयश, नकारात्मक परिस्थिती, हृद्य भंग आणि आणि इतर नकारात्मक घटना, लक्ष्यात ठेवा.......
तुम्ही इथे आहात.
अश्विनीकुमार
आत्मविश्वास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

मायकल जॉर्डन जगप्रसिद्ध बास्केट बॉल खेळाडू



मायकल जॉर्डन
जगप्रसिद्ध बास्केट बॉल खेळाडू
सिद्धांत : प्रयत्न न करण्यालाला माफी नाही.
• फक्त ५.९ उंची असल्यामुळे बास्केट बॉल च्या संघात घेतले गेले नाही,
त्याजागी त्याचा उंच वर्ग मित्र लीरोय स्मिथ ह्याला संधी मिळाली.
• त्याने मनाशी ठरवले कि परत तो हि परिस्थिती आयुष्यात येवू देणार नाही.
तो दररोज न चुकता सराव करू लागला.
• प्रचंड मेहनत घेवून त्याने आपली उंची ६.३ फुटापर्यंत कमी वेळेत वाढवली
आणि पुढील वर्षीच तो संघामध्ये निवडला गेला, ह्यानंतर त्याने पाठी वळून
बघितले नाही.
• २ वेळा ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवले. एनबीए मध्ये ५ वेळा सर्वात
महत्वाचा खेळाडू हा किताब पटकावला.
• हे सर्व त्याला निर्धार आणि सततच्या न चुकता आणि थकता केलेल्या
प्रयत्नामुळे मिळाले.
अश्विनीकुमार फुलझेले
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत ८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

सकाळी उठल्या उठल्या करायचे विचार



आफ्रिकेच्या जंगलात दररोज सकाळी जेव्हा हरीण उठते तेव्हा ती विचार करते कि जिवंत राहायचे आहे तर सिंहापेक्षाहि जोरात पळावे लागेल.
फ्रिकेच्या जंगलात दररोज सकाळी जेव्हा सिंह उठतो तेव्हा विचार करतो कि त्याला उपासमारीने मरायचे नसेल तर हरणापेक्षा पेक्षा जोरात पळून त्याला पकडावे लागेल.
तुम्ही सिंह असा किंवा हरीण, सकाळी उठल्या उठल्या जगण्यासाठी धावपळ हि दोघांनाही करावीच लागेल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

नव उद्योजक, व्यवसायिक, अपयश, तणाव आणि आत्महत्या


हजारो तरून तरुणी नव उद्योजक, व्यवसायिक टाटा, अंबानी बनायचे स्वप्न घेवून उद्योग व्यवसायात उतरतात, पण सगळ्यांचेच स्वप्न काही पूर्ण होत नाहीत. आणि जेव्हा त्यांची स्वप्ने पूर्ण होत नाही, जेव्हा त्यांचा अपयशाशी सामना होतो तेव्हा त्यांचे आयुष्य हे खूप दुख दायी आणि तणावपूर्ण होवून जाते.
हि घटना आहे एप्रिल २०१६ ची. एका अश्याच नव उद्योजकाची, त्याचे नाव आहे लकी अग्रवाल, वय फक्त ३३ वर्षे. लकी हा टेकी (ज्याला कंप्यूटर आणि टेक्नोलोजीची आवड असते तो) होता. त्याने त्याची जेव्हा सोशल नेटवर्किंग वेबसाईट २ वर्षे अथक परिश्रम करूनही अपयशी ठरली तेव्हा त्याने आत्महत्या केली. आत्महत्या हि नायट्रोजन गॅस चे सिलेंडर घेवून मास्क द्वारे त्याने नायट्रोजन वायू आपल्या शरीरात घेवून आत्महत्या केली.
लकीने आपले इंजिनीरिंग हैद्राबाद मधून केले. त्याने २०१४ साली “KQingdom” नावाचे सोशल नेटवर्किंग एप सुरु केले होते. ह्या एका एप मध्ये तुम्ही चॅट आणि फोटो ब्लोग करू शकत होता, ह्यासोबत तुम्हाला बक्षीस म्हणून गुणही भेटणार होते. हे वैशिष्ट्य फेसबुक आणि बाकीच्या वेबसाईट आणि एप मध्ये नव्हते.
बाकीच्या सोशल नेट्वर्किंग साईट आणि एप आपल्या प्रमोटर्स न जास्त नफा मिळवून देत होती तिथे “KQingdom” युजर्सना प्रत्यक्ष नफा देणार होती. लकी आपल्या पालकांना दररोज सांगायचा कि त्याचे एप हे व्हास्टएप पेक्षा जास्त प्रसिद्ध आणि यशस्वी होणार आहे, त्याचे मित्र हि त्याच्या ह्या बोलण्याला प्रतिसाद द्यायचे. त्याचे हे एप आणि स्वप्न अपयशी झाल्यामुळे लकी हा आत्महत्या करण्यापूर्वी तणावात गेला होता, आणि योग्य मार्गदर्शन न झाल्यामुळे शेवटी त्याने आत्महत्या केली.
भारतातील नव उद्योजक व्यवसायीकांमध्ये इतक्या टोकाचे पाउल उचलण्याचे कारण म्हणजे “अपयशाची भीती”, ह्यामुळे नव उद्योजक आणि व्यवसायिकांच्या कथा उदयास येत नाही.
नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ च्या नुसार डिप्रेशन, उदासीनता ह्याची अनेक लक्षणे आहेत, जसे कि लक्ष्य केंद्रित न होणे, स्मरणशक्ती कमजोर होणे, निर्णय घेता न येणे, थकवा आणि उर्जेची कमतरता, अपराधीपणाची भावना, स्वतःला लायक न समजणे, असहाय वाटणे, निराशावादी आणि नकारात्मक विचार, भावना निर्माण होणे, निद्रानाश, एकदम सकाळी जाग येणे, आळशीपणा, जास्त वेळ झोपणे, आत्महत्येचे विचार येणे, आत्महत्येचे प्रयत्न करून होणे आणि इतर बरेच.
जेव्हा तुमच्या आयुष्यात डिप्रेशन उदासीनतेला चालना मिळते तेव्हा तुमची उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक कोसळायला सुरवात होते किंवा कोसळलेली असते. तुम्ही कर्जात बुडता, घरचे आणि बाहेरचे नातेसंबंध बिघडतात, आयुष्य पूर्ण अंधकारमय वाटते, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला असे वाटते कि कोणीच तुमच्या समस्या ह्या समजून घेवू शकत नाही म्हणून त्या समस्या ह्या कुणालाही सांगत नाही.
तुम्ही नवउद्योजक असाल आणि जर तुमचे मित्र परिवार हे नोकरदार असतील असतील तर ते तुमची समस्या हे कधीच समजू शकत नाही. तुमच्या जीवनशैली बद्दल तुमच्या नोकरी करणाऱ्या मित्रांना थोडाही अंदाज नसेल. अपयशाला तुम्ही स्वतःलाच जबाबदार धरत असता, तुम्हाला सतत तुमच्या जुन्या साहेबांनी दिलेली नोकरीची ऑफर आठवायला लागते, ज्यामध्ये तुम्ही निवृत्त होईपर्यंत आरामत काम करू शकणार होते.
तुम्हाला स्वतःचीच लाज वाटायला लागते, तुम्ही सतत विचार करता कि तुमचे अपयशी असण्याचे कारण हे तुम्ही स्वतःला कमजोर समजायची भावना हि होय, आणि हीच अपयशाची भावना हि तुम्ही सपशेल अपयशी आहात असे समजता म्हणून येते.
जेव्हा तुम्ही डिप्रेशन किंवा उदासीनता ह्यामधून बाहेर पडता तेव्हा हे सगळे तुमचे वागणे हे मूर्खपणाचे वाटते. खालील ६ मार्ग जर एखाद्याला डिप्रेशन मधून बाहेर काढू शकतात तर तुम्हालाही बाहेर काढू शकतात.
६ मार्ग खालीलप्रमाणे :
१) मित्रांमध्ये उठणे बसने करा :
महत्वाचा सागायचे झाल्यास जे समविचारी असतात त्यांच्यासोबत मैत्री करा, त्यांच्यासोबत वेळ घालवा, ह्या मध्ये तेही मित्र जमा करू शकतात जे तुम्हाला वेळेवर कमी येतील किंवा तुम्हाला प्रोस्ताहित करतील. जर असे नसतील तर ज्या मित्रांमध्ये उठणे बसने करत आहात त्यांच्यासोबत सामान्य गोष्टीवर चर्चा कराल, जेणे करून नकारात्मक चर्चा होणार नाही.
२) तज्ञांची मदत घ्या :
जेव्हा तुम्हाला घरचे किंवा मित्रांसोबतहि आपले मन मोकळे करावेसे वाटत नसेल तेव्हा मानसोपचार तज्ञांची, आत्मविकास प्रशिक्षकांची मदत घ्या. हे एखाद्या चमत्कारासारखे आयुशाय्त काम करते. तुम्ही डिप्रेशन च्या भावना वाटल्यामुळे त्याचे ओझे कमी झाल्यासारखे वाटते त्यामुळे तुम्हाला खूप हलके वाटते. जे त्रास तुम्हाला घरच्या लोकांसमोर, मित्रांसमोर सांगायचे धाडस होत नव्हते ते सगळे तुम्ही मानसोपचार आणि आत्मविकास तज्ञांना सांगून टाकल्यामुळे तुम्हाला हलके झाल्यासारखे वाटते. काही शारीरिक घडामोळी जसे हार्मोन डीस बेलेन्स मुळे जे त्रास होतात ते तुम्ही विना तज्ञांच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षणाने बरे करू शकत नाहीत. (कृपया तज्ञांचे जसे टीव्ही आणि सिनेमा मध्ये चकाचक ऑफिस दाखवतात तसे वास्तव मध्ये नसते हि बाब नमूद करावी.
३) आपल्या आयुष्याचा आराखडा मुद्दाम बदलत रहा, दुरुस्त करत राहा :
तज्ञ जे काही दिवसभरातील काम किंवा कृती करायचे वेळापत्रक देतात त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. अगदी लहान सहान बदल सुद्धा चमत्कार घडवतात, जसे कि सकाळी एकाच वेळेला नाश्ता करणे, दुपारचे आणि रात्रीचे जेवण करणे, आणि एकदा का तुम्ही हे अंगवळणी पडले कि ते अजून काय काय करायचे ते वाढवत जातात आणि कठीण करत जातात. जसे कि आता त्यामध्ये थोडा वेळ हा वाचनासाठी देणे, आपल्या छंदासाठी देणे, घरच्यांसोबत वेळ घालवणे, गाणी ऐकणे आणि दररोज प्रार्थना किंवा मंत्रा बोलणे असे वाढवत जातात (प्रार्थना किंवा मंत्रा म्हणजे माझ्या भाषेत शब्दांचा समूह, हा तुम्ही तुमच्या प्रमाणे बनवून घेतलेला बरा). आयुष्यात बदल घडवून आण्यासाठी काही एकदम मोठे बदल करायची गरज नाही, हे लहान सहान बदल आयुष्यात मोठ मोठे बदल घडवून आणतात.
४) जास्तीत जास्त सकारात्मक आणि प्रोस्ताहन देणारे वाचन करा, सिरीयल, सिनेमे, डोक्युमेंट्री बघा, ऐका आणि त्यांचा आनंद घ्या :
हे खूप महत्वाचे आहे. कारण तुम्ही फक्त हसत नाही तर जे काही तुमच्या जीवनात बदल करायचे आहे ते वेळापत्रक सुद्धा तुम्ही आनंदाने पळत जाता व बदल करत जाता. ह्यामुळे तुमचे मनही शांत आणि तुमच्या ताब्यात राहते. ह्यामुळे’ तुमच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून येतात.
५) व्यसनांपासून दूर रहा :
व्यसन म्हणेज एखादी गोष्ट किंवा कृती तुम्ही त्याच वेळेस दररोज न चुकता करता त्याला म्हणतात. म्हणजे ती गोष्ट किवान कृती तुम्हाला लागतेच, त्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. व्यसन मग कसलेही असो, सकारात्मक किंवा नकारात्मक हे घातकच आहे. तुम्ही जग नाही बदलू शकत, तुम्ही स्वतः बदलता, मग नकारात्मक परिस्थितीकडे व्यक्तीकडे हुशारीने तुमच्या वर फरक न पाडता हाताळता.
६) उज्वल भविष्याकडे बघा
तुमचा उज्वल भविष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा तुम्हाला आजच्या मर्यादा तोडायला मदत करतो आणि उज्वल भविष्य वर्तमानात जगवतो. प्रत्येक क्षणी तुम्ही सकारात्मक विचार करत आताची वेळ निभावून नेत शिकत अनुभव घेत जुने दिवस घालवून नवीन उज्वल दिवस तुमच्या आयुष्यात घेवून येतात.
शेवटचे सांगायचे झाल्यास डिप्रेशन तणाव हे तुमचे नोकरी, व्यवसाय आणि तुमची क्षमता बघून नाही येत. हि सामान्य परिस्थिती आहे, ह्यामुळे तुम्हाला आत्महत्या करण्याअगोदर बाहेर निघायचे आहे ह्याची जाणीव होते. डिप्रेशन असले तरी तुम्ही सामान्य स्त्री आणि पुरुषच राहणार आहे, सगळ्यांच्या आयुष्यात हि स्टेज येवून गेली आहे.
डिप्रेशन म्हणजे रात्री नंतर दिवस उजाडणे हे होय. ह्या मुळे तुम्ही अधिक नव्या दृष्टीकोनातून आयुष्यात अमर्याद भरारी घ्यायला लागतात. तुमचा उद्योजक आणि व्यवसायिकां कडे बघ्नायचा दृष्टीकोन हा अधिक संवेदनशील होतो, त्यांना तुम्ही एक सामान्य मनुष्याप्रमाणे बघतात. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला यश, अपयश, उद्योग, व्यवसाय आणि नोकरी ह्यापासून स्वतःला वेगळे करतात. तुम्ही स्वतःला ह्या बाकीच्या तार्किक आयुष्यापेक्षा जस्त महत्व देता. कारण तुम्ही आहे म्हणून हा तुमचा आयुष्याचा डोलारा आहे.
एकदा का तुम्ही हा अनुभव घेतला कि भविष्यात तुम्ही आरामत सामना करू शकता आणि मोठ मोठी आव्हाहने हि पार पडू शकता आणि अपयश आले तरी ते फार काल टिकत नाही. तुमचे खाजगी आयुष्य हे संपूर्ण पणे तुमच्या ताब्यात येते, यशाची नव नवीन शिखरे तुम्ही पार करू लागता, नव नवीन उद्योग, व्यवसाय सुरु करू लागता आणि गुंतवणुकीत नवीन भरारी घेत जाता.
तुमच्या उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीपेक्षा तुमचे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत असणे आणि सगळ्यात महत्वाचे जिवंत असणे महत्वाचे आहे. तुम्ही आहात म्हणून जग आहे
जर तुम्ही ह्या परिस्थितीमधून जात असाल तर आजच संपर्क कराल. हि परिस्थिती उंच भरारी आणि नवीन दृष्टीकोनातून आयुष्य जगायची असते.
अपयशाची लाज वाटायचे काहीही कारण नाही आहे. आपण मानसिक समस्येने ग्रस्त आहोत हेही सागायला लाज वाटायचे काही कारण नाही आहे. जर तुम्ही अश्या परिस्थितींना तोंड देवून बाहेर निघाला असाल तर आपली स्टोरी मला मेसेज कराल, ती मी ह्या पेज वर पोस्ट करेन.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७