मराठी लोकांचे व्यवसाय होते पण ते एका क्षणात कमी झाले नाही तर अनेक दशकांचा प्रवास होता तो
मुंबई मध्ये वडापाव च्या व्यवसायात मराठी जास्त प्रमाणात होते, खानावळ च्या व्यवसायात मराठी जास्त प्रमाणात होते.
ह्यापुढील टप्पा हा फ्रेंचायझी किंवा हॉटेल मध्ये परिवर्तीत व्हायला पाहिजे होता तो जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या प्रमाणात झाला नाही.
सेलिब्रेटी चे सोडून बोलत आहे, कृपया इमेज मार्केटिंग नको.
मुंबई आंतरराष्ट्रीय शहर, इथून मराठी खाद्य पदार्थ हे जगभरात पसरायला पाहिजे होते जसे पंजाबी आणि दक्षिण भारतीय पसरले तसे, हे झाले नाही.
ह्या नंतर रस्त्यावरील खाद्य पदार्थ हे मराठी खाद्य व्यवसायिकांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होते, जसे कि दक्षिण भारतीय पदार्थ इडली वडा वगैरे, फ्रेन्की, मोमोज, मंच्युरीयन, वगैरे.
नंतर असे दिसून आले कि उत्तर भारतीय दक्षिण भारतीय पदार्थ विकतांना दिसले, पण मराठी नाही.
चायनीज मध्ये देखील उत्तर आणि दक्षिण भारतीय दिसून आले, पण मराठी चा टक्का प्रचंड कमी झाला.
आता मराठी व्यवसायात आहे पण अनेक ठिकाणी पार्टनर म्हणून. जसे कि हॉटेल, बार व इतर व्यवसायात.
एक समजले कि मराठी लोकांचे व्यवसाय होते पण ते एका क्षणात कमी झाले नाही तर अनेक दशकांचा प्रवास होता तो.
एक नाही तर अनेक व्यवसाय आहेत जिथे मराठी कमी होत गेले व आता नामशेष होण्याच्या मार्गावर किंवा पार्टनर म्हणून.
कारणे शोधणे खूप महत्वाचे आहे. कारण हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कृपया मुंबई मध्ये येवून प्रत्यक्ष अनुभव घ्याल.
कारण जर पुण्यात अशी परिस्थिती निर्माण झाली तर उर्वरित महाराष्ट्र हातातून जायला वेळ लागणार नाही.
आणि हे फक्त खाद्य पदार्थाच्या व्यवसायाबद्दल नाही तर अनेक व्यवसायातून मराठी जवळपास हद्दपार झाले आहेत.
माझ्या समोर मराठी किराणा व्यवसायिकाचे दुकान बंद होतांना बघितले आहे.
परप्रांतीय उद्योग व्यवसाय बंद होतो तिथे परत परप्रांतीय उद्योजक व्यवसायिक येतो, आणि मराठी उद्योग व्यवसाय बंद होतो तिथे जास्त प्रमाणात परप्रांतीय उद्योजक आणि व्यवसायिक येतात, मराठी खूपच कमी
मराठी चायवाले देखील होते जे टपरी चालवायचे ते देखील गायब होत गेले.
उद्योग, व्यवसाय करणे काही रॉकेट सायंस नाही आहे, शांत डोक्याने विचार केला आणि अनुभवी लोकांची साथ मिळाली तर परत जसे जुना काळ होता त्यामध्ये आपण जावू.
धन्यवाद
अश्विनीकुमार
फेसबुक : चला उद्योजक घडवूया
#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #रिअलइस्टेट #आर्थिकमानसिकता #फ्रीलांसर #कौशल्य
चायचा व्यवसाय करण्याचे करिअर कि एमबीए चायवाला ह्यापैकी कुणाल महत्व द्यायचे?
चायचा व्यवसाय करण्याचे करिअर कि एमबीए चायवाला ह्यापैकी कुणाल महत्व द्यायचे?
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
उद्योग व्यवसाय गुंतवणूक शिक्षण आर्थिक साक्षरता आर्थिक मानसिकता
तुम्ही मोठ्यात मोठ्या संकटावर मात करू शकता.
तुम्ही स्वतःला पूर्णपणे विकसित करू शकता.
काहीही कायमस्वरूपी नाही आहे, तुमची आजची परिस्थिती सुद्धा.
तुम्ही अडकलेले नाही आहात.
तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत.
तुम्ही नवीन सकारात्मक मानसिकता घडवू शकता.
तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकता.
तुम्ही नवीन सकारात्मक सवयी घडवू शकता.
आज ह्या क्षणी निर्णय घेणे महत्वाचे आहे, त्यानंतर तुम्ही मागे वळून बघू नका.
अश्विनीकुमार
सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
अशी काही लोक आहेत, मित्र आहेत जे तुमचे यश स्वतःचे मानतात आणि जेव्हा तुम्ही प्रगतीच्या शिखरावर जाता तेव्हा त्यांना तुमचा अभिमान वाटतो. दुसरीकडे अशीही काही लोक आहेत मित्र आहेत जे तुमचे हितचिंतक असल्याचा, तुमचे मित्र असल्याचे ढोंग करतात, ह्यांना तुम्हाला मिळालेले यश सहन होत नाही व तुम्ही जेव्हा प्रगतीच्या शिखरावर असता तेव्हा ह्यांना तुमची प्रचंड इर्षा वाटते.
पहिल्या प्रकारच्या लोकांना सांभाळा, त्यांचे जतन करा.
दुसऱ्या प्रकारच्या लोकांपासून सावध रहा.
अश्विनीकुमार
सर्वांगीण आर्थिक विकास
सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
शांत समुद्र कधीही उत्तम कौशल्यपूर्ण नाविक निर्माण करू शकत नाही.
उद्योग, व्यवसाय आणि शेअर बाजारात प्रगतीसाठी, वाढीसाठी आणि आर्थिक आत्मविकासासाठी आवाहने असणे महत्वाचे आहे. जो संकटांचा सामना करतो, समस्यांना तोंड देतो त्याच्यात विविध क्षमता कौशल्ये निर्माण होतात व ती व्यक्ती अजून सक्षम बनत जाते. आर्थिक आत्मविकासासाठी आवाहने आणि अडचणींचा स्वीकार करा, उद्योग, व्यवसाय व शेअर बाजारात संकटे आणि समस्यांमधून मार्ग काढायला शिका. तुम्ही जितक्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना कराल तितक्या अद्भुत क्षमता तुमच्यात जागृत होतील.
अश्विनीकुमार
सल्ला, मार्गदर्शन, प्रशिक्षण
तुम्ही शेअर ट्रेडिंग करा, उद्योग व्यवसाय करा किंवा इतर कुठलाही मार्ग तुम्ही ज्याने पैसा कमावता आहे तो करा पण एक कालावधी देत चला, हजारदा छोटे मोठे उतार चढाव येतील पण दीर्घकाळात तुम्हाला फायदाच मिळेल. धीर धरायला शिका.
काल मी पुण्यातील एका यशस्वी उद्योजकाला भेटलो ज्याची नेटवर्थ ₹३० कोटींपेक्षा कमी नाही आणि लहान इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या वितरणात आहे.
चर्चेदरम्यान, त्याने सांगितले की गेल्या १0 वर्षांत त्याने तीनदा शेअर बाजारात प्रवेश केला आहे आणि आतापर्यंत सुमारे ₹३ कोटी वाया गेले आहेत.
तो पुढे म्हणाले की जर मी हे शेअर्स फक्त पोर्टफ़ोलिओ मध्ये ठेवले जरी असते तर सध्याच्या मूल्यांकनानुसार ते जवळपास ₹१८ कोटी झाले असते.
मला त्याच्याबद्दल वाईट वाटले. शेअर बाजारातून प्रत्येकजण यशस्वी होऊ शकत नाही, संपत्ती निर्माण करू शकत नाही, श्रीमंत बनू शकत नाही.
तुम्ही हुशार उद्योजक, व्यवसायिक असू शकता पण तरीही तुम्ही वाईट गुंतवणूकदार होऊ शकता. आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे काम नाही.
भीती आणि लोभाची भावना उफाळून येणे सामान्य आहे पण ह्या भावनांद्वारे कृती करण्यापासून स्वतःला रोखणे हे सोपे काम नाही आणि हाच फरक एक यशस्वी गुंतवणूकदार आणि अयशस्वी गुंतवणूकदार मधला आहे.
हे तितके अवघड नाही आहे. सर्वात कठीण कार्य म्हणजे प्रथम मनात विचार करणे आणि मनात सोडवणे की मला मध्येच शेअर्स विक्री करण्याची गरज नाही.
जास्तीत जास्त लोकांना क्षणात नफा हवा असतो म्हणून ते शेअर्स विकत घेतात पण काही शेअर्स मुळातच फंडामेंटली मजबूत असतात तरीही ते पर्वा करत नाही नंतर काही वर्षांनी त्यांना पश्चाताप होतो.
झाड लावल्यावर देखील ४, ५ वर्षे जातात व त्यानंतर ते फळ देत, ह्याचा अर्थ असा नाही कि आपण सतत जमीन खोदून आपण बी वाढत आहे कि नाही ते तपासात बसणार आहोत. अश्या कृतीमुले सुपीक जमिनीत देखील झाड वाढणार नाही.
तुम्ही शेअर ट्रेडिंग करा, उद्योग व्यवसाय करा किंवा इतर कुठलाही मार्ग तुम्ही ज्याने पैसा कमावता आहे तो करा पण एक कालावधी देत चला, हजारदा छोटे मोठे उतार चढाव येतील पण दीर्घकाळात तुम्हाला फायदाच मिळेल. धीर धरायला शिका.
धन्यवाद
अश्विनीकुमार
तीसरा टास्क
आपल्या उद्योग व्यवसाय संदर्भात नवीन नातेसंबंध बनवायचे आहे.
प्रत्यक्ष बाजारपेठ कशी चालते ह्याचा अनुभव घ्यायचा आहे.
इतरांनी केलेल्या नफा तोटा संदर्भात माहिती काढायची आहे.
जवळपास चायवाला आणि खानावळ ते महागडे हॉटेल येथे उद्योजक व्यवसायिकांच्या जेवणाच्या वेळेस जावून त्यांचे काय विषय सुरु आहेत ह्याचा मागोवा घ्यायचा आहे.
अश्विनीकुमार
दुसरा टास्क
तुमच्या आर्थिक आयुष्याचा अभ्यास करायचा आहे.
बाजारपेठेचा अभ्यास करायचा आहे.
तुमचा अनुभव कश्यात आहे पहिला तो मार्ग निवडायचा आहे.
उद्योग व्यवसाय करण्याचे अजून २ किंवा ३ मार्ग शोधून काढायचे आहे.
दीर्घकालीन व अल्पकालीन मार्ग शोधून काढायचे आहे.
सर्व मार्गांचा अतिसूक्ष्म व खोलवर अभ्यास करायचा आहे.
अश्विनीकुमार
मध्यम वर्गीय मानसिकता हि उद्योजक व्यवसायिक बनण्यासाठी अतिशय उत्तम आहे, इथे बचतीवर जोर दिला जातो, त्यामुळे आर्थिक आयुष्याचा पाया इतका भक्कम बनतो कि थोडे पैसे हे उद्योग व्यवसायासाठी वापरू शकता. अपयशी झाला तरीही जास्त नुकसान होत नाही व प्रयत्न करायला तुमच्याकडे पुरेसा पैसा असतो. आणि जर उद्योग व्यवसाय हा यशस्वी झाला तर सुरुवातीपासून बचत करत करत तुम्ही तुमचाच उद्योग व्यवसाय हा कुठेही कर्ज न घेता वाढवू शकता, स्वतःच्याच उद्योग व्यवसायात पैसे गुंतवू शकता.
अश्विनीकुमार
जेव्हा सकाळी तुम्ही तुमच्या ऑफिस चे दार उघडाल, दुकानाचे शटर उघडाल किंवा व्यवसायिक वस्तूला हात लावाल तेव्हा नेहमी
"नवीन दिवस नवीन सुरुवात."
"आजचा दिवस सकारात्मक जाईल."
"आज मी आनंद मौज मजेने दिवस घालवेल."
हे वाक्य बोलून करा भले तुम्ही कर्जात का असेना, आर्थिक विवंचनेत का असेना तुम्ही हि परिस्थिती फक्त सकारात्मक मानसिकतेनेच बदलू शकता. सकारात्मक मानसिकतेवाला उद्योजक व्यवसायिक हा कुठल्याही परिस्थितीवर मात करून परत भरारी घेवू शकतो.
अश्विनीकुमार
पैसा टिकवण्यासाठी आर्थीक मानसिकता खूप महत्वाची असते. एका विद्यार्थ्याला त्याचा नवीन व्यवसाय सुरु करेपर्यंत ते स्थिर होईपर्यंत मार्गदर्शन केले. जिथे सुरुवातीला सर्व बरोबर सुरु होते पण जस जसा व्यवसाय जमू लागला तस तसा विद्यार्थी बदलला. आलेले पैसे हे साठवले नाही तर परदेशी सुट्ट्या, मुली आणि दारू ह्यावर खर्च केले. अशी वागणूक होती कि जसे ह्या पैश्यांच्या प्रवाहाचा सातत्य आहे तसाच राहणार आहे पण असे काही झाले नाही, पैश्यांचा प्रवाह तर आटलाच पण सोबत वडीलांचे आजारपण आले. पैसा जो पर्यंत तुमच्याकडे आहे तो पर्यंत तुमचा आहे, एकदा का गेला कि परत शक्यता नाही कि तुम्हाला भेटेलच म्हणून. आहे तो जपून वापरा ह्याचा अर्थ असा नाही कि घाबरून करत आहात, ह्याचा अर्थ असा आहे कि हुशारीने वापरत आहात. एक वेळ अशी येईल कि पैसा साठलेला देखील असेल, गुंतवलेला देखील व खर्च करून देखील उरत असेल. नफा तोटा व्यवसायाचा भाग आहे आणि फक्त नफा हा घोटाळा, फसवणूक आहे.
अश्विनीकुमार














