ध्येय गाठण्याचा प्रवास
हा कधी कधी ध्येय गाठून
जितके शिकतो त्यापेक्षा
जास्त शिकवून जातो.
अश्विनीकुमार
लेखक अश्विनीकुमार. उद्योग व्यवसाय गुंतवणूक सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण आणि कायदेशीर मदत. मानसिक विकास - संमोहन, आकर्षणाचा सिद्धांत, ध्यान. अध्यात्मिक विकास - ध्यान साधना, मंत्र साधना, जप, उपाय. अघोरी विकास - तंत्र साधना, मंत्र साधना, उपाय. वास्तू - वास्तू उर्जा शास्त्र (सर्व प्रकारच्या वास्तू). उर्जा शास्त्र - वास्तू उर्जा शास्त्र, शारीरिक उर्जा शास्त्र, रेकी हिलिंग. स्पर्शन चीकीस्ता.
उद्योग, व्यवसाय आणि शेअर बाजारात प्रगतीसाठी, वाढीसाठी आणि आर्थिक आत्मविकासासाठी आवाहने असणे महत्वाचे आहे. जो संकटांचा सामना करतो, समस्यांना तोंड देतो त्याच्यात विविध क्षमता कौशल्ये निर्माण होतात व ती व्यक्ती अजून सक्षम बनत जाते. आर्थिक आत्मविकासासाठी आवाहने आणि अडचणींचा स्वीकार करा, उद्योग, व्यवसाय व शेअर बाजारात संकटे आणि समस्यांमधून मार्ग काढायला शिका. तुम्ही जितक्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना कराल तितक्या अद्भुत क्षमता तुमच्यात जागृत होतील.
अश्विनीकुमार
सल्ला, मार्गदर्शन, प्रशिक्षण
काल मी पुण्यातील एका यशस्वी उद्योजकाला भेटलो ज्याची नेटवर्थ ₹३० कोटींपेक्षा कमी नाही आणि लहान इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या वितरणात आहे.
चर्चेदरम्यान, त्याने सांगितले की गेल्या १0 वर्षांत त्याने तीनदा शेअर बाजारात प्रवेश केला आहे आणि आतापर्यंत सुमारे ₹३ कोटी वाया गेले आहेत.
तो पुढे म्हणाले की जर मी हे शेअर्स फक्त पोर्टफ़ोलिओ मध्ये ठेवले जरी असते तर सध्याच्या मूल्यांकनानुसार ते जवळपास ₹१८ कोटी झाले असते.
मला त्याच्याबद्दल वाईट वाटले. शेअर बाजारातून प्रत्येकजण यशस्वी होऊ शकत नाही, संपत्ती निर्माण करू शकत नाही, श्रीमंत बनू शकत नाही.
तुम्ही हुशार उद्योजक, व्यवसायिक असू शकता पण तरीही तुम्ही वाईट गुंतवणूकदार होऊ शकता. आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे काम नाही.
भीती आणि लोभाची भावना उफाळून येणे सामान्य आहे पण ह्या भावनांद्वारे कृती करण्यापासून स्वतःला रोखणे हे सोपे काम नाही आणि हाच फरक एक यशस्वी गुंतवणूकदार आणि अयशस्वी गुंतवणूकदार मधला आहे.
हे तितके अवघड नाही आहे. सर्वात कठीण कार्य म्हणजे प्रथम मनात विचार करणे आणि मनात सोडवणे की मला मध्येच शेअर्स विक्री करण्याची गरज नाही.
जास्तीत जास्त लोकांना क्षणात नफा हवा असतो म्हणून ते शेअर्स विकत घेतात पण काही शेअर्स मुळातच फंडामेंटली मजबूत असतात तरीही ते पर्वा करत नाही नंतर काही वर्षांनी त्यांना पश्चाताप होतो.
झाड लावल्यावर देखील ४, ५ वर्षे जातात व त्यानंतर ते फळ देत, ह्याचा अर्थ असा नाही कि आपण सतत जमीन खोदून आपण बी वाढत आहे कि नाही ते तपासात बसणार आहोत. अश्या कृतीमुले सुपीक जमिनीत देखील झाड वाढणार नाही.
तुम्ही शेअर ट्रेडिंग करा, उद्योग व्यवसाय करा किंवा इतर कुठलाही मार्ग तुम्ही ज्याने पैसा कमावता आहे तो करा पण एक कालावधी देत चला, हजारदा छोटे मोठे उतार चढाव येतील पण दीर्घकाळात तुम्हाला फायदाच मिळेल. धीर धरायला शिका.
धन्यवाद
अश्विनीकुमार
“तुम्ही आणि तुमच्या ध्येयामध्ये काहीच अडथळे नसतील आणि तुम्हाला तुमचे ध्येय हे अंतर्मनांत सुस्पष्ट दिसत असेल तर तुम्ही ते ध्येय ह्या क्षणी साध्य कराल. आणि ज्याच्या ध्येयात अडथळे असतात तो ध्येय कधीच गाठू शकत नाहीत आणि गाठले तरीही आयुष्याचा खूप मोठा भाग खर्च झालेला असतो. ध्येयाशी एकनिष्ठ रहा.”
अश्विनीकुमार