बहुतांश लोकांचे दोन आयुष्य असतात : जे आयुष्य आता जगत आहे ते आणि जे आयुष्य त्यांची जगण्याची क्षमता आहे ते.

स्टीव्हन प्रेसफिल्ड (लेखक)

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

आपल्यामधील काही गैरसमज दूर करा


चूक - उद्योजक बनायला खूप मेहनत करावी लागते.
बरोबर - उद्योजक बनणे खूप सोपे आहे. फक्त आवड आणि इच्छाशक्ती लागते. काही एका प्रयत्नातच आणि मेहनत न घेत सुरवातीपासून उत्तम व भरभराटिचा व्यवसाय करतात, काही थोड्या प्रयत्नाने, काही अथक प्रयत्नाने व काही जे बनतच नाही पण प्रयत्न करतच असतात. हे मानसिकतेशी आणि स्वभावाशी संबधित आहे.

चूक - उद्योजक उच्चशिक्षित असतात आणि त्यांनी नावाजलेल्या विद्यापीठामधून पदवी घेतली असते.
बरोबर - उद्योजक शाळेबाहेर प्रत्यक्ष व्यवहारिक अनुभव घेवून तयार होतो.

चूक - गरीब लोक उद्योजक बनू शकत नाही.
बरोबर - उद्योजक बनणे हे संपूर्णपणे मानसिकतेशी निगडीत आहे त्यामुळे कोणीही, जगाच्या पाठीवर कुठेही उद्योजक बनू शकतो.

चूक - फक्त वाममार्गाने मोठा उद्योजक होऊ शकतो.
बरोबर - प्रत्येक माणूस हा आपल्या स्वभावानुसार राहतो व त्यानुसार त्याचा उद्योग चालवतो. आणि दोन्ही प्रकारचे मोठे उद्योजक आपल्याकडे आहेत, मी त्यांच्या नावाचा उल्लेख इथे करणार नाही.

चूक - उद्योजक बनायला १८ वर्षे पूर्ण असावी लागतात.
बरोबर - उद्योजक बनायला वयाची मर्यादा लागत नाही कारण हा संपूर्णपणे मानसिक खेळ आहे. जेवढे कमी वयाचे उद्योजक भारताबाहेर जगात आहेत त्यापेक्षा जास्त त्यांचे प्रमाण भारतात आहे हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष उद्योगाला सुरवात कराल तेव्हा अनुभवास येईल.

चूक - ज्यांनी उद्योग करायचा प्रयत्न केला ते आज भिकेला लागलेत किंवा रस्त्यावर आले आहेत.
बरोबर - अर्धवट अनुभव, केलेल्या चुका परत परत करणे, विरुद्ध दिशेने जाने, अनुभवी किंवा तज्ञ लोकांची मदत न घेणे, ध्येय नसलेल्या नकारात्मक मानसिकता असलेल्या लोकांच्या समूहात वावरणे व भविष्यात चांगले होईल ह्या भ्रमात राहून उद्योग चालू ठेवणे ह्या सध्या गोष्टींमुळे नवीन उद्योजक आपला उद्योग डबघाईला आणतात.

आपले आयुष्य सोपे असते. नकारात्मक विचार ते कठीण बनवतात व सकारात्मक विचार ते सोपे बनवतात आणि इथेच मदत करते ते आत्म विकास. जो स्वतःच्या अंतर्मनामध्ये बदल घडवत जातो तो प्रगतीच्या पथावर असतो. म्हणून प्राचीन काळापासून एक सुविचार आहे "जे आत आहे तेच बाहेर आहे"

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


जो दिवस तुमचे संपूर्ण आयुष्य
बिघडवू शकतो तोच
दिवस तुमचे
संपूर्ण आयुष्य
घडवूही शकतो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


ते तुमच्यावर हसतात कारण त्यांना तुमची क्षमता माहित नाही.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


मी शक्तिशाली आहे कारण
कधीकाळी मी कमजोर होतो.

मी आज निर्भय आहे कारण
कधीकाळी मी भित्रा होतो.

मी आज शहाणा आहे कारण
कधीकाळी मी मूर्ख होतो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

प्रोस्ताहन देणारी कथा राजा आणि दोन भिकारी


अनेक वर्षांपूर्वी एक महान राजा राज्य करत होता, आणि त्याच्या राजवाड्याच्या बाहेर मुख्य दरवाज्यापाशी दोन भिकारी दररोज भिक मागत असत.

राजाचे त्या रस्त्याने दररोज येणे जाने होत होते, पहिला भिकारी म्हणायचा “आशीर्वाद आणि कृपा त्याला लाभो ज्याची मदत राजा करेल.” त्यानंतर दुसरा भिकारी म्हणायचा “आशीर्वाद आणि कृपा त्याला लाभो ज्याला देव मदत करेन.”

राजा पहिल्या भिकार्याचे शब्द ऐकून आनंदित व्हायचा.

एके रात्री राजाने विचार केला कि जो भिकारी स्तुती करतो त्याला बक्षीस द्यायचे; राजा आपल्या स्वयपाक्याला आदेश देतो कि एक मिठाई बनव, त्यामध्ये सोने असले पाहिजे आणि त्याच्या आजूबाजूने मिठाईचे आवरण असले पाहिजे.

दुसऱ्या दिवशी तो त्याच रस्त्याने चालला असताना ती मिठाई जो भिकारी स्तुती करतो त्याला देवून टाकतो.

पहिल्या भिकार्याला पैश्यांची खूप गरज असते म्हणून तो ती मिठाई दुसऱ्या भिकाऱ्याला खूप स्वस्तामध्ये विकून टाकतो.

जेव्हा दुसरा भिकारी खाण्यासाठी त्या मिठाईचे दोन भाग करतो तेव्हा त्याला सोने दिसते, तो ते सोने विकून श्रीमंत मनुष्य बनून जातो.

मग तो दुसऱ्याच दिवसांपासून राजाच्या राजवाड्याबाहेर भिक मागायला जाने बंद करून टाकतो.

जेव्हा राजा मिठाई दिलेल्या दुसऱ्याच दिवशी त्याच रस्त्याने चाललेला असतो तेव्हा त्याला पहिला भिकारी पैश्यांसाठी भिक मागताना दिसून येतो. राजा थांबून त्याला विचारतो कि मी दिलेली मिठाई तू खाल्लीस का?

पहिला भिकारी नाही म्हणून उत्तर देत सांगतो कि ती मिठाई जो कालपर्यंत माझा शेजारचा भिकारी होता त्याला विकली, आणि आज तो काही मला दिसला नाही.
राजा अत्यंत निराशाने मान हलवत मनातल्या मनात बोलत मान्य करतो कि खरच कृपा त्याच्यावरच होते ज्याला देव मदत करतो.

आपल्या देवाला सर्वकाही माहिती असते. तो कधीच तुम्हाला विसरत नाही. देव योग्य वेळी मदत करतो. देवावर विश्वास ठेवा. त्याची करणी तुम्हाला समजणार नाही. एखाद दिवशी तुम्हाला समृद्ध आयुष्य जगायचा आशीर्वाद तुम्हाला देवाकडून भेटेल व ते आयुष्य तुम्ही जगायला लागाल. विश्वास ठेवा.

*****तुमची आताची परिस्थिती कोणती आहे?****

राजा सारखी, किंवा दुसऱ्या भिकार्यासारखी?
कि
पहिल्या भिकार्यासारखी?

****जर पहिल्या प्रश्नाचे उत्तर हा असेल तर तुमच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत काम करत आहे, तो फक्त तुम्हाला आत्मविकासाद्वारे सतत टिकवून ठेवायचा आहे.****

****आणि जर दुसऱ्या प्र्षांचे उत्तर हा असेल तर तुम्हाला तातडीने आत्मविकासाची गरज आहे.****

(देवाच्या जागी तुमचा ज्यावर विश्वास आहे ते समजून वाचाल. तिथे अंतर्मन किंवा आकर्षणाचा सिद्धांतही वापरू शकता.)

धन्यवाद
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

३७०० करोड रुपयांचा आणि ६ लाख ५० लोकांना फसवणारा फेसबुक लाईक घोटाळा उघडकीस आला

३७०० करोड रुपयांचा आणि ६ लाख ५० लोकांना फसवणारा फेसबुक लाईक घोटाळा उघडकीस आला
उत्तर प्रदेश पोलिसांनी ३७०० करोड रुपयांचा आणि ६ लाख ५० लोकांना फसवणारा फेसबुक लाईक घोटाळा उघडकीस पाडला. हा उघड झालेला भारतातील सर्वात मोठा इंटरनेट घोटाळा आहे.
मुख्य सूत्रधाराचे नाव आहे अनुभव मित्तल, वय फक्त २६ वर्षे, २०१२ ला कंपनीची सुरवात झाली होती आणि आज ३७०० हजार करोडच्या उलाढाली पर्यंत पोहचली. खाजगी इंजीनिअरिंग कॉलेज मधून शिक्षण घेतले, कॉलेज मध्ये आमीर खानच्या थ्री इडीयट मधील हुशार व्यक्तिमत्व त्याला फुनसुक वांगडू म्हणून ओळखले जात होते.
एबलेझ इन्फो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (Ablaze Info Solutions Pvt Ltd.) ह्या नावाने कंपनी नोएडा मध्ये कार्यरत होती आणि ह्याच्या वेबसाईट सध्याचे चे नाव आहे socialtrade . biz. हे सतत आपल्या वेबसाईटचे नाव बदलत असत.
हा भारतातील सर्वात मोठा उघड पडलेला घोटाळा ज्याची कार्यपद्धती हि एमएलएम सारखी होती म्हणजे जर एक मनुष्य जॉईन झाला तर त्याने कमीत कमी २ मनुष्यांना जॉईन करायचे. हि काम करायची पद्धत त्यांच्या ३ साथीदारांनी दिली ज्यांना पोलिसांनी ५०० करोड रुपयांसोबत दिल्लीमध्ये पकडले होते.
पोलीस सांगतात कि “ती काही लोकांना विश्वास बसण्यासाठी पैसे द्यायचे ज्यामुळे लोकांचा विश्वास बसायचा आणि त्यांचे बघून इतर लोक गुंतवणूक करत होते.”
जो मनुष्य ती वेबसाईट चालवत होता तो जे वेबसाईटला जॉईन झाले त्यांना हमी द्यायचा कि “जी लिंक तुमच्या मोबाईल वर येईल तिला क्लिक केल्यावर ५ रुपये भेटतील.” असे पोलीस सांगत होते.
अश्या पद्धतीने जेव्हा गुंतवणूकदार कंपनीच्या बँक अकाऊंट मध्ये हजारो रुपये टाकायचे तेव्हा त्यांना खोटी पैसे भरल्याची लिंक पाठवली जायची.
अनेक वर्षांपासून कंपनीचा हा घोटाळा सुरूच होता, पण जास्तीत जास्त पैसा हा कंपनीने मागील काही महिन्यात म्हणजे मागील वर्षी ऑगस्ट पासून कमावला, त्यानंतर ते काही पैसा हा ज्यांच्या कडून जास्त फायदा झाला अश्या काही हजार मूर्खांना देणार होते ज्यामुळे त्यांचे बघून अजून लाखो मूर्ख कंपनीला जॉईन झाले असते. (इथे मूर्खाच्या जागी शिवीचा वापर करू शकतात.)
जेव्हा पोलिसांनी नोएडा मधील कंपनीच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकला होता तेव्हा त्यांना तिथे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आणि सभासदांचे २५० पासपोर्ट आढळून आले ज्यांना चांगल्या कामाचे बक्षीस म्हणून ऑस्ट्रेलिया ची सहल देण्यात आली होती.
अजून मूर्खांना फसवण्यासाठी ते तिथे जे कर्मचारी आणि सभासद गेले त्यांचे मौज मजा करण्याचे व्हिडीओ बनवून ते मार्केटिंग साठी वापरणार होते.
ह्याच्या मुख्य सूत्रधाराने घोटाळ्याचे पैसे अनेक महागडे बंगले, महागड्या गाड्या आणि सेलिब्रिटी पार्टी वर खर्च केले.
तरीही काही लाभधारक ह्या कंपनीला सपोर्ट करत आहेत, त्यांना “बकरेकि मा कब तक खैर मनायेगी” हि हिंदीची म्हण माहित नाही. जगामध्ये कुठेही जा फक्त घोटाळे करू शकणारेच इतक्या जलद गतीने पैसे कमवू शकतात ना कि नवीन कल्पना घेवून येणारे.
हा घोटाळा इतका मोठा आहे कि पोलिसांना हा घोटाळ्याचा सर्व पैसा शोधून काढण्यासाठी बराच वेळ लागणार आहे, ह्यामध्ये काही बँक कर्मचाऱ्यांचा हि समावेश असण्याची शक्यता पोलीस नाकारत नाही. हे इतके मोठे काम आहे कि पोलिसांना इन्कमटेक्स आणि बाकी सरकारी खात्यांची मदत घ्यावी लागणार आहे.
सायबर क्राईम म्हणजे इंटरनेट वरील गुन्ह्यांचे भारत हे जगात दुसर्या नंबरचे माहेर घर झाले आहे, तीन वर्ष म्हणजे २०१४ पर्यंत सायबर गुन्ह्यात ३५० टक्क्यांनी प्रचंड वाढ झाली आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

पिढीजात समृद्धी खेचण्याचे मानसशास्त्र, विक्रीकला, मानसिक गुलामी


आपले अंतर्मन हे २४ तास जागे असते. ते कधीही झोपत नाही. तुमचे घोरणे जरी बंद असेल पण अंतर्मन हे जागेच असते.

टीव्ही सुरु असेल आणि आपण झोपले असू तरी आपले अंतर्मन हे झोपेमध्येही सतत माहिती मिळवत असते.

ते सगळे आवाज आपल्या अंतर्मनात रुजत असतात.

आणि जेव्हा तुम्ही उठतात किंवा जागे होतात तेव्हा तेव्हा तुम्ही ती वस्तू किंवा सेवा विकत घेतात जेव्हा तुम्ही झोपले होतात पण ज्याची जाहीरात हि टीव्ही वर सुरु होती.
हो. म्हणून तुम्ही ती वस्तू किंवा सेवा विकत घेतात ज्याच्या जाहिरातीचा दिवस आणि रात्र तुमच्यावर मारा सुरु असतो.

तुम्ही ती वस्तू आज जरी नाही घेतली तरी एक न एक दिवशी घेणारच.
जर तुम्ही लहानपणापासून आपल्या मुलांना सतत टीव्ही दाखवत असाल किंवा तुम्हाला ती सवय असेल तेव्हा तुमची लहान मुल हि एक मनुष्य म्हणून मोठ्यापनी नाही वावरणार, ती ग्राहक म्हणून वावरतील.

असे करून तुमच्या पिढ्या एकाच कंपनीचे उत्पादन किंवा सेवा विकत घेत जातील आणि तुमच्या पिढ्या ह्या अजाणतेपणे त्यांचे गुलाम होवून जातील.

कारण तुमच्या आई वडिलांनी जी उत्पादने किंवा सेवा वापरली होती त्याच सेवा आणि उत्पादने जवळपास तुम्ही आता वापरत असाल.

म्हणजे तुम्ही नाही म्हणत सुद्धा मानसिक गुलामासारखे वागत एकाच कंपनी किंवा सेवेचा लाखो किंवा करोडो रुपयांचा फायदा तर करूनच देतात त्यामध्ये अधिक भर म्हणून आपल्या मुलांनाही त्या उत्पादन किंवा सेवेचा गुलाम करत तुमच्या पिढ्या त्याच कंपनीचे उत्पादन मानसिक गुलामासारखे घेत जातात.

असेच तुम्हाला एखाद्या नेत्याची गुलामी करणारी पिढी, मालकाकडे नोकर म्हणून काम करणारी पिढी, पिढीजात व्यवसाय किंवा रोजगार करणारे अशी लोक दिसून येतील.
असेच तुम्हाला उच्च शिक्षित लोक आपल्या मालकांची गुलामी करतानाही दिसून येतील. त्यांची क्षमता कितीही प्रचंड असली तरीही ती गुलामीच करणार, फक्त फरक इकडे पैश्यांचा असतो, त्यांना पगाराच्या रुपात जास्त पैसा भेटत असतो.

जर कोणी व्यवसायिक किंवा उद्योगपती आला तर त्याचा उद्देश हा आपला नफा वाढवायचा असतो तेव्हा हेच मानसशास्त्राचे ज्ञान वापरले जाते आणि जेव्हा कोणी सामान्य नोकरदार मनुष्य येतो तेव्हा हेच ज्ञान तो स्वतःचे आर्थिक मनसिकतेच्या गुलामिमधून मुक्त होण्यासाठी आणि आपला आर्थक फायदा वापरण्यासाठी करतो.

आगीने आपणा जेवण बनवून कुणाची भूकही मिटवून त्याला जगवू शकतो आणि त्याच आगीने त्याचा जीवही घेवू शकतो.

क्षमता तुमच्यातही आहे गरज आहे ती जागृत करण्याची. आणि ह्याला पर्याय फक्त आणि फक्त आत्मविकासच आहे.

जागृत बना, ह्या मार्गांनी तुमच्या कडील समृद्धी हि तुम्ही समोरच्याला देत आहेत आणि त्याच्या पिढ्या ह्या समृद्ध आयुष्य जगत आहे.

धन्यवाद,
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

अनाथ, गुंडगिरी ते २० हजार करोड चा व्यवसाय



जोह्न पौल डीजोरिया यांना श्रीमंत आणि यशस्वी होण्या अगोदर कार मध्ये राहवे लागत होते.
डीजोरिया ह्यांचे बालपण हे खूप खडतर होते. ते दोन वर्षांचे असताना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला होता, त्यांना घर चालवण्यासाठी १० वर्षांचे होण्याच्या अगोदरच ख्रिसमस कार्ड आणि पेपर विकावे लागत होते. शेवटी नाईलाजाने डीजोरिया यांना लॉस एजेलीस येथील अनाथ आश्रमात पाठवण्यात आले.
सैनिकात भरती होण्याअगोदर ते गुंडांच्या टोळीतहि सहभागी होते. रेडकेन लेबोरेटरिज येथे कामच अनुभव घेतल्यानंतर ४७ हजार रुपये कर्जाऊ घेवून स्वतःची जोह्न पौल मिश्‍चेल सिस्टम्स नावाची कंपनी सुरु केली.
डीजोरिया स्वतः घरोघरी दारोदारी जावून आपले उत्पादन विकत होते, हे करत असताना त्यांना स्वतःच्याच गाडीमध्ये रहावे लागत होते. उत्पादनाचा दर्जा इतका चांगला होता कि कोणी नाकारू शकत नव्हते. आज जेपिएम सिस्टम्स ची उलाढाल हि २० हजार करोड (२,००,००,००,००,०००) इतकी आहे.
त्यांनी पेट्रोन टकीला नावाचा वोडकाचा ब्रांड निर्माण केला आहे आणि त्यासोबत हिरे ते मोबाईल फोन असे इतर विविध उद्योग हि त्यांचे आहेत.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



काही म्हणी काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलल्या पाहिजे.

जर आपण शून्यात असू तेव्हा
“वाकेन पण मोडणार नाही.”
हि म्हण लक्ष्यात ठेवायची.

आणि जर आपण शिखरावर असू तेव्हा
“मोडेन पण वाकणार नाही.”
हि म्हण लक्ष्यात ठेवायची.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

गरीबीचे बालपण ते ओरेकल कंपनीचा सहसंस्थापक लेरी इलीसन



प्रोस्ताहन देणारी वास्तव आयुष्यावर आधारित कथा
गरीबीचे बालपण ते ओरेकल कंपनीचा सहसंस्थापक लेरी इलीसन
इलीसन ह्याचा जन्म न्यू यॉर्क शहराच्या अतिपूर्व भागात झाला. तो बाळ असतानाच त्याला न्युमोनिया झाला होता, त्याची आई त्याची काळजी घ्यायला सक्षम नव्हती, संगोपनासाठी त्याला त्याच्या काका काकींकडे जे शिकागोच्या दक्षिणेकडे रहायचे तिथे पाठवून दिले. त्याने त्याच्या जन्मदात्या वडिलांना कधीच बघितले नव्हते आणि त्याला दत्तक घेतले आहे हे खूप वर्षांनंतर समजले होते.
१९७७ साली त्याने भागीदारासोबत सोफ्टवेअर डेव्हलपमेंट लेबेरोटरिज नावाची डाटाबेस मेनेजमेंट कंपनी सुरु केली त्यामध्ये तो सह संस्थापक होता. पुढे १९७९ साली कंपनीचे नाम बदलून रिलेशनल सोफ्टवेअर हे नाव ठेवले, पुढे हीच कंपनी ओरेकल म्हणून ओळखली जावू लागली.
आज ओरेकल चे वार्षिक उत्पन्न हे २५ अरब (२५, 00,00,00,00,000) रुपये इतके आहे. लेरी इलीसनची आजची संपत्ती हि ५२ हजार करोड रुपये (५२, 00,00,00,000) इतकी आहे. त्याच्या कडे ते सर्व आहे जे एका अब्जाधीश कडे असते जसे कि खाजगी विमाने, बोटी, अनेक बंगले आणि हवाईअन बेटामधील एक बेट सुद्धा त्याच्या मालकीचे आहे. त्याने सीइओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) चा पदभार २०१४ साली सोडला.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



श्रीमंत बनणे हे काही ध्येय नाही आहे. “तीन वर्षात एक करोड कमावणे” हे ध्येय आहे.

अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत. अज्ञानाने केलेला गैर वापर आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर झालेला दुष्परिणाम

आकर्षणाचा सिद्धांत. अज्ञानाने केलेला गैर वापर आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर झालेला दुष्परिणाम
तिशीतील तरून एकदा माझ्याकडे आत्मविकासाच्या समुपदेशनासाठी आला होता. त्याने सरकारी नोकरी हि आकर्षणाच्या सिद्धांताद्वारे मिळवली होती, आणि ह्यामध्येच त्याची सर्व मानसिक आणि शारीरिक उर्जा हो संपून गेली होती.

सरकारी नोकरी, पगार असून असून किती असेल? आणि वरची कमाईहि असून असून किती असेल? त्याहीपेक्षा जास्त कमावणारे आहत कि. जेव्हा आपल्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत काम करणार असतो ती वेळ किंवा तो क्षण हा कुणालाच माहित नसतो. नाही धर्मगुरूला आणि नाही मानसोपचार तज्ञाला. म्हणून ते सतत सांगत असतात कि नेहमी सकारत्मक आणि मोठा विचार करा म्हणून.

पण आपण ऐकणार कुठे? गर्व जागा झालेला असतो, जिद्दीने आंधळे झालेले असतो. नको त्या ठिकाणी हजारो आणि लाखो खर्च कराल पण आत्मविकासासाठी १ रुपयाही खर्च नाही करणार. मग काय स्वर्ग आणि नर्क इकडेच आहे, तुम्हाला जे पाहिजे तसेच आयुष्य भेटेल. आणि कोणीही काहीही करू शकत नाही, अगदी तुम्हीसुद्धा.

जे काही महिने आणि वर्ष त्या तरुणाने आत्मविकासाद्वारे आकर्षणाच्या सिद्धांताला जागृत करायला घालवले आणि तेही फक्त समृद्धीचा एक घटक असलेल्या पैश्याला आकर्षित करण्यासाठी. म्हणजे प्रचंड समृद्धीचा समुद्र समोर आहे तर त्यामध्ये करोडोंचा पैश्यांचा प्रवाह येईल अशी नहर खोदण्याऐवजी फक्त एक छोटासा पाईप टाकून फक्त काही हजारांचा प्रवाह हा आपल्याकडे घेतला आणि तोही कायमस्वरूपी.

ह्यामध्ये त्याच्या खाजगी आयुष्यामधील बाकीचे भाग जसे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, मानसिक आणि शारीरिक मुलभूत गरजा, जोडीदार म्हणजे बायको किंवा प्रेयसी, कौटुंबिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य हे संपूर्णपणे दुर्लक्षित केले गेले आणि आता ह्याचा परिणाम तो ह्या सर्व आयुष्यातील भागात अपयशी म्हणून जगत आहे.

मुर्खपणा करू नका. आपले आयुष्य काही मस्करी नाही आहे, एकदा जन्माला आला तर आलाच आणि एकदा मेलात तर मेलातच. इथे काही दुसरा मार्ग नाही आहे. म्हणून जेव्हाही विचार कराल, भावना व्यक्त कराल तेव्हा समृद्धीची व्यक्त कराल. समृद्धी मध्ये जीवनातील सगळे अंग येतात, एकही सुटत नाही. किंवा तुम्ही असे करू शकता कि फक्त ज्या अंगांची कमी आहे फक्त तितकेही घेतले तरी पुरेसे आहे.

आपल्या नैसर्गिक शारीरिक आणि मानसिक गरजा ओळखा. आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. ह्यामुळे तुमच्या आतील नकारात्मक उर्जेचे अडथळे जे भावनिक आणि वैचारिक स्वरुपात आहेत ते दूर होवून अध्यात्मिक उर्जा ज्याला आपण सकारात्मक किंवा आकर्षणाचा सिद्धांत बोलू ती वाहायला लागते.

आणि ह्यासोबतच तुमच्या आंतरिक बदलाबरोबर आजूबाजूची परिस्थितीही बदलत जाते. तुम्ही तुमच्या स्वप्नांचे आयुष्य अमर्याद स्वरुपात जगू लागतात.

आयुष्य तुमचे आणि जबाबदारही तुम्हीच.

घ्या आपल्या आयुष्याचा लगाम आत्मविकासाद्वारे आपल्या हातात.

धन्यवाद
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

बेघर परिस्थिती ते जगप्रसिद्ध सिने नायक, अभिनेता आणि श्रीमंत व्यक्तिमत्व सिल्वेस्टर स्टेलोन


प्रेरणादायी सत्य घटनांवर आधारित जीवनगाथा

हि कथा वाचूनही तुमचे रक्त सळसळले नाही तर ते रक्त नसून पाणी आहे.

आयुष्यामधील प्रचंड दुख संकट आणि दारिद्र्यापासून सुख समृद्धीचे साम्राज्य उभे केले.

सिल्वेस्टर स्टेलोन, जगप्रसिद्ध सुपरस्टार हॉलीवूड अभिनेता, २०१६ साली नमूद केलेली संपत्ती ४ बिलियन डॉलर म्हणजे भारतीय २४० खरब रुपये इतकी आहे. हि झाली सिल्वेस्टर स्टेलोन ची वर्तमान परिस्थिती.

भूतकाळात सिल्वेस्टर स्टेलोन काही चांदीचा चमचा घेवून जन्माला नव्हता आला. त्याने आयुष्याच्या प्रत्येक भागात संघर्ष केला. तो इतक्या आर्थिक अडचणीत होता कि त्याला त्याच्या बायकोचे दागिने हे चोरून विकावे लागले. परिस्थिती इतकी खालावत गेली कि तो शेवटी बेघर झाला. ३ दिवस तो न्यू योर्क च्या बस स्टेशन वर झोपला होता. परिस्थिती इतकी बिकट होती कि न तो घर भाडे भरू शकत होता आणि नाही जेवण विकत घेवू शकत होता.

आश्चर्याची गोष्ट हि होती कि ह्या परिस्थितीची परिसीमा गाठली तेव्हा गाठली जेव्हा तो त्याच्या कुत्रायालाही खाऊ घालू शकत नव्हता, त्यावेळेस दारूच्या दुकानाजवळ तो कुणाही अनोळखी व्यक्तीला कुत्रा विकायला तयार झाला होता. शेवटी त्याने तो कुत्रा १७०० रुपयांना विकला आणि रडत रडत तो तिथून निघून गेला.

२ आठवड्यानंतर जेव्हा सिल्वेस्टर स्टेलोन मुहोम्मद अली विरुद्ध चक वेपनर ह्यांचा बॉक्सिंग चा सामना बघितला होता, त्यानंतर त्याला रॉकी ह्या इतिहासातील प्रसिद्ध सिनेमाची कथा लिहायचे प्रोस्ताहन भेटले. त्याने २० तासातच सिनेमाची स्क्रिप्ट लिहून काढले. त्यानंतर जेव्हा सिल्वेस्टर स्टेलोन जेव्हा स्क्रिप्ट विकायला गेला होता तेव्हा त्याला १,२५,००० डॉलर (८५ लाख रुपये) इतकी ऑफरहि भेटत होती. पण त्याची एक अट होती कि त्याला त्या सिनेमामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करायचे होते.

पण प्रत्येक स्टुडीओ त्याला नाकारत होता कारण त्यांना मुख्य अभिनेता म्हणजेच त्या वेळचा प्रसिद्ध कलाकार घ्यायचा होता. ते त्याला म्हणत असत कि “तू दिसतोही जोकर सारखा आणि बोलतोही जोकर सारखा.” मग तो तिकडून आपली स्क्रिप्ट घेवून निघून यायचा. काही आठवड्यानंतर स्टुडीओ ने परत १,७०,००,००० रुपयांची ऑफर दिली सिल्वेस्टर ने तो ऑफरहि नाकारली. त्यानंतर त्यांनी २,३८,००,००० ची ऑफर दिली आणि तीही नाकारली गेली. त्याला त्या सिनेमामध्ये मुख्य अभिनेता म्हणूनच काम पाहिजेच होता.

शेवटी त्या स्टुडीओ ने स्क्रिप्ट साठी २४ लाख दिले आणि सिल्वेस्टर स्टेलोन ला मुख्य नायकाची भूमिकाहि दिली. बाकीचा इतिहास हा तुम्हाला माहितच आहे. तुम्हाला काय वाटते कि त्याने हे २४ लाख भेटल्यावर काय विकत घेतले असेल? जो कुत्रा त्याने विकला होता तो. हो, स्टेलोन आपल्या कुत्र्यावर खूप प्रेम करत होता. स्टेलोन ३ दिवस त्या दारूच्या दुकानाच्या बाहेर ज्या माणसाला कुत्रा विकला होता त्याला शोधत थांबला होता.

शेवटी तिसर्या दिवशी तो मनुष्य त्याच्या कुत्र्यासोबत येताना त्याला दिसला. त्याने त्या मनुष्याला तो कुत्रा का विकला हे कारणही समजून सांगितले आणि आपला कुत्रा परत मागितला, त्या मनुष्याने स्पष्ट नकार दिला. स्टेलोन ने त्याला ७००० रुपये देवू केले तेही त्या मनुष्याने नाकारले. ३४ हजार देवू केले तेही नाकारण्यात आले, ६८ हजार देवू केले तेही नाकारण्यात आले.

तुमचा विश्वास नाही बसणार पण शेवटी स्टेलोनने त्याला चक्क १० लाख २० हजार रुपये देवू केले त्याच कुत्र्यासाठी जो त्याने संकटात असताना फक्त १७०० ला विकला होता आणि स्टेलोनने आपला कुत्रा परत मिळवला.

तोच स्टेलोन जो रस्त्यावर झोपायला मजबूर झाला होता, ज्याने आपला कुत्रा फक्त त्याला खायला घालू शकत नाही म्हणून विकला होता तो आजच्या घडीला ह्या पृथ्वीतलावर इतिहासातील सर्वकृष्ट अभिनेता आणि एक श्रीमंत व्यक्ती म्हणून वावरत आहे.

बिकट परिस्थिती खूप वाईट असते. खरच खूप वाईट असते. कधी तुम्हाला स्वप्न पडले होते का? अद्भुत स्वप्न? पण तुम्ही इतक्या बिकट परिस्थितीत असतात कि त्यावर तुम्ही अमलबजावणी करू शकत नाही? ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला खूप शुद्र समजत आहात? स्वतःला कमी लेखत आहात? असे माझ्यासोबतहि अनेक वेळा झाले आहे.

आयुष्य खूप कठीण आहे. संधी अशी काय तुमच्या बाजूने निघून जाते कि तुम्ही कोणीच नाही आहात. लोकांना तुम्ही उत्पादनासारखे पाहिजे आहात, ना कि तुम्ही. जग खूप निष्ठुर आहे. जर तुम्ही प्रसिद्ध, श्रीमंत किंवा तुमची ओळख नसेल तर तुम्ही बिकट परिस्थितीत आहात.

तुमच्या तोंडावर दरवाजे बंद केले जातील. लोक तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळवतील, आणि तुमच्या आशा ह्या पायदळी तुडवतील. तुम्हाला कसे तरी धक्का देत देत पुढे जात जायचे आहे आणि तरीही काही नाही घडणार.

आणि मग तुमच्या आशा ह्या मावळल्या जातील. तुम्ही कोलमडून गेला असाल. पूर्णपणे कोलमडून गेला असाल. तुम्हाला जगण्यासाठी मिळेल ते काम करावे लागेल. तुम्हाला कदाचित पोटभर तर सोडाच पण एकवेळचे अन्न देखील मिळणार नाही. आणि हो कदाचित तुम्हाला रस्त्यावर झोपावेही लागेल.

तुमच्या स्वप्नांना कधीच म्हणजे कधीच संपू देवू नका. काहीही घडत गेले तरी स्वप्न बघने सोडू नका. तुमची आशा संपली असेल तरीही स्वप्न बघत रहा.

त्यांनी पाठ फिरवली तरीही स्वप्न बघत रहा.

त्यांनी दरवाजा बंद केला तरीही स्वप्न बघत राहा.

तुम्ही सोडून कुणालाच माहिती नाही कि तुमची क्षमता काय आहे ते. तुम्ही काय आहात आणि कोण आहात हे सामान्य लोक तुमच्या कपड्यांवरून म्हणजेच बाहेरील पेहरावावरून ओळखतील. पण कृपया करून आपली लढाई थांबवू नका, इतिहासात आपली जागा बनवण्यासाठी लढाई करा. आपल्या प्रतिष्ठेसाठी लढाई करा. कधी म्हणजे कधीच हार माणू नका.

भले तुमच्या अंगावर एकही कपडा नसू देत, भले मग तुम्ही रस्त्यावरील कुत्र्यांसोबत झोपत असाल, हे ठीक आहे, पण जो पर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही संपला नाही आहात, माझ्यावर विश्वास ठेवा.

सतत लढाई करत रहा. सतत तुमची स्वप्न आणि आशा ह्या जिवंत ठेवा. श्रेष्ठतेकडे वाटचाल सुरु ठेवा. प्रतिष्ठेकडे वाटचाल सुरु ठेवा.

अश्या आयुष्यात चमत्कार घडवणाऱ्या मराठी व्यक्तीमत्वानसोबत माझा दररोज चा संपर्क येत असतो.

सिल्वेस्टर स्टेलोन करू शकतो तर तुम्हीही करू शकता.
मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता.
जगामध्ये इतर कोणी करू शकते तर तुम्हीही करू शकता.

धन्यवाद
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

सकारात्मक आणि नकारात्मक शब्दांचा परिणाम


७ वर्षांचा अजय हा सतत हस्त खेळत आनंदात राहणारा मुलगा एकदा बगीच्यात खेळायला आला होता. तो झाडावर चढत होता.

अजय काही पहिल्यांदाच झाडावर चढत नव्हता. तो वर जात जात ३० फुटापर्यंत त्या झाडावर चढून गेला.

त्याला त्याचा उस्ताह हा तब्यत ठेवता येत नव्हता. तो एक फांदी पकडून त्यावर हातांनी जोर जोरात मागे पुढे झुलू लागला.

तो त्याच्या खेळण्यात इतका मग्न होता कि त्याला कळतच नव्हते कि ती फांदी तुटूही शकते.

अजयचे बघून त्याचा चुलत लहान भाऊ सचिनही झाडावर चढू लागला, तोही जवळपास अजय च्या १० फुट खाली एका फांदीवर लटकू लागला.

अजय चे वडील आणि सचिन ची आई हे आप आपल्या मुलांवर लक्ष्य ठेवून होते. ते काही बोलण्याअगोदर जोर जोरात वारे वाहू लागले आणि ते झाड हेलकावे घेवू लागले,

“अजय घट्ट पकडून ठेव” अजयच्या वडिलांनी मोठ्याने ओरडून सांगितले.
“सचिन खाली पडू नको” सचिनच्या आईने घाबरून जावून मोठ्याने ओरडून सांगितले.

काही सेकंदानेच सचिनचा झाडाच्या फांदीला पकडलेला हात सुटला आणि तो तोल जावून खाली पडला. नशिबाने त्याला काही जास्त लागले नाही, आणि अजय आरामत सांभाळत झाडावरून खाली उतरत आला.

घरी गेल्यावर सचिनच्या आईने अजयच्या वडिलांना विचारले “मला आश्चर्य वाटले कि दोन्ही मुल हि एकाच झाडावर लटकलेली होती माझ्या मुलाचा हात निसटला आणि पडला पण तुमचा मुलगा नाही पडला, असे कसे झाले?”

अजय च्या वडिलांनी उत्तर दिले “मला नक्की नाही सांगता येत पण जेव्हा जोर जोरात वारे वाहू लागले होते तेव्हा तुम्ही घाबरलात आणि घाबरून मोठ्याने ओरडलात कि “सचिन पडू नकोस” आणि दुसर्याच क्षणी सचिन फांदी पकडून ठेवू शकला नाही आणि तो पडला.”

सचिन ची आई जेव्हा न समजल्याने परत आश्चर्याने बघू लागली तेव्हा अजय चे वडील स्पष्ट करून सांगू लागले “आपल्या मन मेंदूला आपल्या नकारात्मक आदेशावर कृती करायला कठीण जाते, आपले मन मेंदू हे गोंधळून जाते.
सचिन ची पहिली प्रतिक्रिया हि होती कि तो कल्पना करू लागला आहे कि तो पडला आहे म्हणून आणि त्याचे मन मेंदू हे त्याला पडू नको म्हणून सांगत होते.
जेव्हा अजय ने आपल्या मन मेंदूला आदेश दिला कि घट्ट पकडून ठेव तेव्हा त्याचा मेंदू लगेच घट्ट पकडून लटकण्याची कल्पना करू लागला आणि फांदी घट्ट पकडून ठेवायची हा आदेशही माणू लागला, व त्याने तसे केले.”

सचिनची आई हे उत्तर ऐकून चक्रावून गेली. कसे सकारात्मक विचार आणि शब्द हे आपल्या मन, मेंदू आणि आयुष्यात बदल घडवून आणतात हा विचार ती करत बसली.

ह्या लघु कथेमध्ये आपल्या संपूर्ण आयुष्याचा सारांश दडलेला आहे. ह्या परिस्थितीजागी तुम्ही तुमच्या आयुष्यातील कुठल्या अंगात समस्यांना सामोरे जात आहात किंवा गेला आहात ते ठेवा, तुम्हाला उत्तर आरामात भेटेल.

ह्यामधील ९० % समस्या ह्या समुपदेशनाद्वारे आपण आपल्या आयुष्यातून कायमस्वरूपी मुळापासून नष्ट करू शकतो, किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो.

प्रत्येक क्षणी सकरात्मकच विचार कराल, कारण आकर्षणाचा सिद्धांत आणि आपले मन मेंदू पाहिजे ते वास्तवात आणू शकते.

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक आणि कुटुंब
८०८०२१८७९७



कडवे सत्य

गरीब जेव्हा जमिनीवर बसतो तेव्हा त्याची ती लायकी असते.
आणि

जेव्हा श्रीमंत जमिनीवर बसतो तेव्हा तो त्याचा मोठेपणा असतो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आनि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



स्वतःवर विश्वास ठेवा.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७




अर्थ मंत्रा

माझ्याकडे नेहमीच गरजेपेक्षा जास्त पैसा असतो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


शांतता आणि मौन हे सोने आहे.
शब्द हि कंपने आहेत.
विचार चमत्कार आहे.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



गरीब आणि श्रीमंता
मधील फरक
गरीब :
मी कमी पैश्यात 
(पगार) तुमच्यासाठी
काहीही करेन.
श्रीमंत:
मी जास्त पैसे
बनवण्यासाठी तुझ्याकडून
काहीही करून घेईल.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक