घफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा



घफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा. तरुण तडफदार, इनामदार आणि काहीतरी मोठे करण्याची इच्छा असलेल्या गुजराती तरुणाची कथा. त्याच्या व्यवसायाची सुरवात, यश अपयश, उभारलेला व्यवसाय, लोकांच्या फायद्यासाठी अवलंबलेला एकच गैर मार्ग, स्वतःच्या फायद्यासाठी जुने जानते वरिष्ठ व्यवसायिकांची लोबी, विकत घेतलेला मिडिया, व्यवसायिक शत्रू असून जपले गेलेले हितसंबंध, १०० लोकांना आणि अब्जो रुपये वाचवण्यासाठी सतत दिला जाणारा एकाचा बळी. खुनाला आत्महत्या दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न, प्रस्थापित गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी केले जाणारे सरकारी कायदे, नियम व अटी, स्वतःच्या फायद्यासाठी अनेक वर्षे करत आलेले अब्जो रुपयांचे घोटाळे दाबून सामान्य लोकांच्या हितसंबंधांसाठी केलेला काही शे करोड रुपयांचा घोटाळा उघडकीस आणून तो घोटाळा करणार्याला सामान्य लोकांसमोर खलनायक म्हणून उभे करणे. हे काही मुद्दे.
फक्त एक गोष्ट लक्ष्यात ठेवा समुद्रात पोहताना कधीच शार्क माश्यासोबत शत्रुत्व नाही घ्यायचे.
काही करण्याअगोदर माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ता ह्याची झालेली हत्या व त्याच्या भावाने सांगितलेले भारतातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेचे सत्य हे एकदा युट्युब वर चेक करून घ्याल.
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

संधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा



गुंतवणूकदार अंबानी
"संधीची वाट बघत बसू नका,
अम्बानिसारखी संधी निर्माण करा."
अतिशय सुंदर एका गरीब घरच्या मुलावर आधारित लघुकथा, ज्याचे वडील दारुडे असतात, त्या वातावरणातून मिळालेल्या संधीचे तो कसे सोने करतो, एका नफ्यातून मिळालेल्या पैशांचा दिवसभरात, शाळेला दांडी न मारता एका मध्ये गुंतवणूक करून ४ व्यवसाय नफ्याचे करून, त्या प्रत्येक व्यवसायामध्ये अगोदरच्या व्यवसायातून मिळालेल्या पैशांना गुंतवत त्याला जोड म्हणून भेटणाऱ्या बोनस हि पुढच्या व्यवसायात गुंतवत ते रात्री झोपेपर्यंत चा हिशोब हा प्रवास दाखवला आहे.
एका दिवसाचा उद्योजकीय मानसिकतेची, किंवा आर्थिक साक्षर लोक वापर कसा करतात हेही उत्तम रित्या दाखविले आहे.
ज्याचा अगोदरपासून उद्योग व्यवसाय आहे किंवा जे आर्थिक दृष्ट्या साक्षर आहेत त्यांना आशय लगेच समजून येईल. त्याच्या वडिलांमुळे समजून येईल कि माणसाचा स्वभाव घातक असतो ना कि व्यसन. स्वभावाला औषध नाही कारण तो जन्मजात असतो.
त्यासाठी खालील लघुकथा पूर्ण बघा.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

मराठी आणि मारवाडी

मराठी आणि मारवाडी
केवल चौधरी वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजस्थानातल्या हनुमाननगरमधून आपल्या पत्नीसह पुण्यात आला आणि कुण्या दूरच्या राजस्थानी मित्राच्या किराणा मालाच्या दुकानावर कामाला लागला. त्याच दुकानाच्या मागे असलेल्या दोन खोल्यात तो मित्र त्याच्या कुटुंबासहीत राहायचा आणि त्याच्या पत्नीने केवल चौधरी आणि त्याची पत्नी गुड्डी यांना आपल्यात सामावून घेतले. गुड्डीनेही आदर राखून त्या दोन खोल्यांची बरीचशी जबाबदारी स्वतःवर उचलली आणि काही महिन्यातच वेळ अशी आली की तो मित्र, ज्याचे ते दुकान होते, तो आता आणखीन एक दुकान टाकायच्या मागे लागला आणि हे दुकान पूर्णपणे केवल चालवू लागला. त्या मित्राचे दुसरे दुकान चालू झाल्यावर त्याने केवलला विचारले की केवल काय आयुष्यभर या आधीच्याच दुकानात राबणार आहे का? त्यावर केवलने नम्रपणे पण ठामपणे उत्तर दिले की त्यालाही एक दुकान काढायचे आहे. मग मित्राने मौलिक सल्ले दिले व एका विशिष्ट भागात असे दुकान अत्यावश्यक आहे हे सांगीतले. तसेच सुरुवातीचे भांडवल म्हणून चक्क तीन लाख रुपये दिले जे केवलने दोन वर्षात फेडायचे होते.
त्या रात्री आयुष्यात पहिल्यांदाच गुड्डी आणि केवल चक्क रस्त्यावर फिरायला गेले. एकमेकांशी खूप बोलले. खूप हासले. स्वप्नांच्या पणत्या डोळ्यात ठेवून आणि एकमेकांबरोबर हनुमाननगरमध्ये चाललो असतो तर किती लोकांनी किती टीका केली असती या कल्पनेवर खुसखुसत रात्री दहा वाजता ते घरी परतले.
बाळू गाडे आता बाळासाहेब झाला होता कारण पिरंगुटजवळचा त्याचा एक अत्यंत पडीक आणि निकामी प्लॉट एका हॉटेलवाल्याने चक्क एक कोटी रुपयांना घेतला होता. बाळासाहेब आता शहरात चार खोल्या विकत घेऊन राहू लागला होता. एकटाच होता. दोन खोल्या खाली आणि दोन वर! दिवसभर बुलेटवरून गावभर फिरणे, मित्र जमवणे, मटणाच्या पार्ट्या आणि राजकारणात कुत्रेही विचारत नसतानाही कुठे ना कुठे स्वतःची वर्णी लावायच्या प्रयत्नात राहणे!
त्यातच मनसेचे विचार त्याला पटू लागले. आपल्या प्रदेशात सुबत्ता आणि संधी आहेत म्हणून परप्रांतातील लोक येथे येतात आणि त्यांची संख्या अमाप वाढल्यामुळेच पाणीकपात, वीजकपात, महागाई, जागांचे वाढते भाव, शिक्षणाचे प्रॉब्लेम्स आणि रहदारीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत हे त्याला पूर्णपणे पटू लागलेले होते. मनसेच्या विचारांचा आहे हे सांगण्यात त्याला आता अभिमान वाटू लागला होता. मात्र मनसेला अश रिकामटेकड्यांची गरज नव्हती. परप्रांतियांबाबत मनसेची पॉलिसी काहीशी तशीच असली तरीसुद्धा मनसे हा एका विचारी नेतृत्वाने काढलेला पक्ष होता. त्यात काम करणारे हवे होते, नुसते मलई पळवणारे नको होते. त्यामुळे बाळासाहेब जरी कितीही 'मनसे, मनसे' करत असला तरी त्याला पूर्ण पारखून घेतल्याशिवाय मनसेत कुणीही प्रवेश देणार नव्हते.
आज सकाळी बाळासाहेब खालच्या हॉलमध्ये पेपर वाचत मिश्री लावत तंगड्या पसरून बसलेला होता. अजून कालची नीट उतरलेली नव्हती. लालभडक डोळे, पिंजारलेले केस, अस्ताव्यस्त कपडे आणि अगडबंब देह यामुळे तो किळसवाणा दिसत होता. पण त्याला त्याच्याशी काहीही देणेघेणे नव्हतेच!
दार वाजले म्हणून त्याने मान फिरवून पाहिले आणि दचकलाच! त्या जोडप्यातील ती पोरगी म्हणजे मस्त माल वाटला त्याला! तिच्या मारवाडी हिरव्या अशा हायलायटरटाईप कलरच्या साडीतून तिचा देह जेवढा दिसेल तेवढा दोन सेकंदात निरखत त्याने उर्मटपणे "काय' असे विचारणारी खूण केली.
'मला बाबू चौधरींनी आपला पत्ता दिला असून आपली परवानगी असल्यास भाडेतत्वावर ही खालची खोली आम्ही किराणा मालाच्या दुकानात कन्व्हर्ट करून नियमीतपणे आपल्याला भाडे देत राहू' असे केवलने त्याला सांगीतले. वास्तविक बाळासाहेबच्या मनात दोन विचार होते. एक म्हणजे मनसेचा आहे म्हंटल्यावर परप्रांतियांना खोली देणे योग्य नाही. दुसरे म्हणजे काही झाले तरी नुसते साठवलेल्या पैशावर धमाल करण्यापेक्षा काही नियमीत उत्पन्न सुरू झाले तर उत्तमच होईल! आणि या दोन विचारांना झाकणारा तिसरा विचार मनात आला. पुढेमागे या मारवाड्याची ही बायको पटवता आली तर घरबसल्या मजा करता येईल. नाहीतरी मनसेत आपल्याला अजून कुणी विचारतच नाही. आपले विचार आता बदलले असून सर्व प्रांतातील लोकांबद्दल आपल्या मनात आता बंधूभाव आहे असे जाहीर करून काँग्रेसला जॉईनही होता येईल. नाहीतरी सत्तेत सारखा तोच पक्ष असतो.
या निर्णयावर येण्यासाठी सर्वात मोठा घटक जर कोणता कारणीभूत झाला असेल तर गुड्डी! तीही अगदी दिलखुलास हासत वगैरे होती. तिच्या त्या चांदीच्या रंगाच्या शरीराचा आणि आमंत्रण असलेल्या स्मितहास्याचा पागल झाला होता बाळासाहेब!
आणि त्याने होकार देऊनही टाकला.
दोन वर्षांनंतरः
गुड्डी कधीच हाती न लागल्यामुळे आणि शेवटी तिने भैय्या असे म्हणून राखी बांधल्यामुळे बाळासाहेबला आता फुकटचे भाऊ म्हणवून घेण्यातील सुख महत्वाचे आहे असे स्वतःलाच समजवावे लागते. मिळणारे भाडे नियमीत व अत्यंत आकर्षक असल्यामुळे हे दुकान बंद करायला लावण्याचा विचार त्याच्या मनात येत नाही. वरच्या दोन खोल्या आपल्याला पुरतात हे कळल्यामुळे तो आता फालतू दुकानात येऊन बसत नाही. तयच्या घरात लागणार्‍या बर्‍याचशा जिनसा दुकानातून आपोआप फुकट वर येत असतात. न मागता! केवल चौधरीच्या आता इतक्या ओळखी झालेल्या आहेत की बाळासाहेबपेक्षा मोठाल्ले दादा लोक त्याच्याशी हसून खेळून असतात. तो काही जणांना हप्तेही नियमीत पुरवतो. आता त्याने दुकानात राजस्थानची दोन लहान मुलेही कामाला ठेवलेली असून ती रात्री दुकानात झोपतात तर केवल आणि गुड्डी आपल्या नवीन बाळाला घेऊन मागच्या खोलीत! ते दुकान ही आता त्या भागाची वाढती गरज बनत असून तेथे रीघ लागलेली असते. 'मेरे कमरेमे इतना धंदा कररहा है और मेरेको इतनाच भाडा देताय भोसडीके' या बाळासाहेबने अनेकवेळा रागात उच्चारलेल्या प्रश्नाचा आवाज भिंतींना आदळायच्या आत केवलने भाडे वाढवून टाकलेले आहे प्रत्येकवेळा! आता ती जागा केवलच्या दुकानामुळे ओळखली जाते. इतकी, की बाळासाहेबही स्वतःचा पत्ता सांगताना हनुमान किराण शॉपच्या वर असा सांगतो.
काही महिन्यांपुर्वीच बाळासाहेब दुपारीच तर्र होऊन दुकानात आला आणि काही बाटल्या उघडून खाद्यपदार्थ तोंडात टाकू लागला. एकही गिर्‍हाईक दुकानात नसल्याचा फायदा घेऊन केवलने सरळ सरळ बाळासाहेबला दम भरला.
"पूछके लेलिय कीजिये... ये माल बेचकर रोट्टी कमाते है हम..."
कशी कुणास ठाऊक, पण केवलला दम भरायची हिम्मतच झाली नाही बाळासाहेबची! बाळासाहेब आता काँग्रेसमध्येही नाही आणि मनसेत तर कधी त्याला घेतलेलेच नव्हते.
साठवलेले पैसे अजून बरेच शिल्लक असल्यामुळे मध्यंतरी त्याने एक ढाबा टाकायचा प्रयत्न केला. पण त्या मराठी मित्राने त्यालाच फसवले. त्यात कित्येक लाख रुपयांचा घाटा झाला. आता ते पैसेही नाहीत आणि केवलकडून मिळालेल्या भाड्यात इतकी व्यसने आणि बुलेट बिलेट परवडतही नाही.
आजच दुपारी त्याने केवलला गिर्‍हाईकांसमोर दम भरला.
'हे दुकान मी चालवणार आहे.. तू चालता हो... '
संध्याकाळी वस्तीतील चार जाणती माणसे आणि एक दादा असे त्याला त्याच्यावरच्या खोलीत भेटून गेले. विषय संपला. ते सगळे मराठीच होते. पण धान्यबिन्य आणायला चार पावले चालून पुढच्या चौकात जायला तयार नव्हते. त्यापेक्षा केवलचे दुकान हीच त्यांची गरज होती.
आता बाळासाहेब खाली उतरला तरी दुकानाकडे एक नजरही न टाकता निघून जातो बाहेर! गुड्डी तर आता मालकिणीच्या थाटातच वावरते. तिला दोन मुले आहेत. ती आता शेठाणीसारखी दुपारी गल्ला सांभाळते तेव्हा केवल आतमध्ये वामकुक्षी घेत असतो. भाडे मात्र नियमीत पोचते करतात. केवलने हुषारीने पहिल्यापासूनच भाडे पावत्या करून घेतलेल्या आहेत.
केवलने आता दुसरे दुकान टाकले आहे. राजस्थानमधून आलेल्या दोन लहान मुलांना तो आता या जुन्या दुकानात गुडीबरोबर ठेवतो आणि स्वतः नव्या दुकानात बसतो.
गुड्डीने त्याला आजच सांगीतले..
"बालासाब कहरहे थे उन्हे ये उपरके कमरे बेच देने है... खरीदले हम क्या??"
"और??"
"और क्या?? नीचे दुकान दुगना होजायेगा... हम लोग उपर रहेंगे.. "
"कीमत क्या कहरहा है??"
"वो बात आप करलीजिये... "
"चलो भाई.. जबसे तुम जिंदगीमे आयी हो... हम तो आगेही बढते चले जा रहे है..."
काहीच महिन्यात केवलने त्या खोल्याही घेतल्या. बाळासाहेब आता मोकारपणा करत इतस्ततः फिरत आहे.


चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७

अपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि यशामध्ये सोबत येणाऱ्यांना कधीच जवळ करू नका

अपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि यशामध्ये सोबत येणाऱ्यांना कधीच जवळ करू नका
खेळ असो किंवा उद्योग, व्यवसाय जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तो पर्यंत तुम्हाला कोणीही विचारत नाही, त्याअगोदर कराव्या लागणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा सामना हा तुम्हालाच कराव लागतो. तुम्ही संपूर्ण पणे क्रिकेट च्या झोकात हरवून जातात. आणि जेव्हा यशस्वी होतात तेव्हा समाज, सरकार व इतर गुंतवणूकदार जागे होतात व तुम्हाला मदत करायला लागतात. तुमच्या यशावर स्वतःची पोळी भाजून घेतात, देशभक्ती जागी होते. नैराश्य आणि आत्महत्या करण्याचे मुख्य कारण हेच आहे, खेळाडू ह्यांचे आयुष्य काय चार वर्षानंतर येणाऱ्या फक्त 17 दिवसांच्या ऑलम्पिक पुरते नाही आहे, त्यांनाही दररोज जगावे लागते, ती देखील माणसेच आहे. त्यानंतर ती जिवंत आहेत कि मेली आहेत हे कोणीच विचार करत बसणार नाही. असाच प्रकार यशस्वी झालेल्या उद्योजकांसोबतही होतो, जेव्हा यशस्वी होतात तेव्हा त्यांना महत्व दिले जाते, बाकी खेळाडू आणि उद्योजक ह्यांच्या अपयशाच्या कठीण, बिकट परिस्थितीत अक्षरक्ष वाळीत टाकले जाते. घरचे पाठ फिरवतात तर समाजाचे बोलून काय फायदा. अपवाद आहेत आणि तेही फक्त आपवादच आहेत, उन्नीस बीस असले असते तर चालले असते पण फरक इतका आहे कि 0.00१ अशी त्यांची संख्या आहे. आत्मकेंद्रित व्हा, आत्मविकासात मग्न रहा, जे फक्त ह्या ऑलम्पिक च्या दिवसात प्रोत्साहन देतात त्यांच्या पासून चार हात लांब रहा आणि जे 4 वर्षे सतत तुम्हाला प्रोत्साहन देतात अश्यांना जवळ करा, उद्योजकांना सुद्धा हेच आवाहन आहे, अपयशात साथ देणाऱ्यांना कधीच सोडू नका.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

मुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस

मुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस
मराठी माणूस हा मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात होता, अतिशय सरळ आणि साधा, सर्वांना आपलेसे करणारा, मदत करणारा, डोळे बंद करून विश्वास टाकणारा, सण आणि संस्कृती जपणारा होता. सगळ्यात महत्वाचा दुर्गुण म्हणजे तो अतिशय भावनिक होता. ह्याचा फायदा राजकारण्यांनी घेतला, परप्रांतीयांनी घेतला. राजकारण्यांनी आपली मते पक्की केली, आणि ह्या सरळ स्वभावाचा फायदा परप्रांतीय उद्यजकांनी उचलला.
मराठी माणसाला करोडोची संधी देखील आली तरी तो सोडून जात नव्हता, भावनिक दृष्ट्या तो कंपनीशी आणि मालकाशी जोडला गेला होता आणि राजकारणाशी पण. कंपनीच्या मालकांची आणि राजकारण्यांची मुले हि इंग्लिश मिडीयम मध्ये शिकत होती व नंतर परदेशात शिकायला जाऊ लागली, आणि तेच सामान्य मराठी माणसाला आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवा असे आव्हाहन करू लागली. मराठी माणूस साधाभोळा, डोळे बंद करून विश्वास ठेवणारा, मोठ्या लोकांची मूळ इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात, आपली नाही असे बोलणारा.
काळ कुणाला सोडत नाही, तो मुंबई बाहेर फेकला गेला, मुंबई उपनगराबाहेरही फेकला गेला, आता तो ठाणे आणि त्यापुढील भागात सध्यातरी टिकून आहे. मुंबईची कोळी आगरी संस्कृती लुप्त झाली, जी पण आहे ती चाळींमध्ये आहे, परप्रांतीय संस्कृती पॉश इमारतीत आली. पॉश इमारतींमध्ये बोर्ड लागू लागले, "मांस खाणाऱ्यांना ह्या इमारतीमध्ये खोली विकत घेता येणार नाही." काही दिवसांनी बोर्ड लागतील कि ह्या इमारतीत मराठी लोकांना प्रवेश नाही.
राजकारण्यांना मराठी लोकांकडून फक्त मतांचाच फायदा होतो, आणि उद्योगपतींकडून नोटांचा फायदा होतो. राजकारणी मत तुमची मागणार पण कामे उद्योगपतींची, श्रीमंत लोकांची करणार. त्यांचेही काही चुकत नाही, ते त्यांचे काम आहे, पण मराठी माणसांचे काय? दादर मध्ये मराठी शाळेमध्ये कोणीही एडमिशन घेत नाही, ह्याचा अर्थ साधा आणि सोपा होतो कि मागच्या समाजाने आणि त्यांनी निवडून दिलेल्या राजकारण्यांनी कामे केली नाहीत.
जर तुम्ही खाजगी कंपनीत कामाला आहात आणि तुम्ही काम केले नाही तर तुम्हाला काढून टाकले जाते, हा पण विचार केला जात नाही कि तुम्ही कुठच्या प्रदेशाचे आहात किंवा कुठची भाषा बोलतात, ह्याचा खाजगी कंपन्यांवर काहीच फरक पडत नाही, ते लगेच काढून टाकतात, पण राजकारणाचे असे नाही आहे, ते जाती धर्म ह्या सारख्या भावनिक मुद्द्यांवर अवलंबून असल्यामुळे लोक विचार करत नाहीत व परत त्यांनाच निवडून देतात.
तुमचे घर तुम्हालाच चालवायचे आहे, तुमचे आयुष्य तुम्हालाच जगायचे आहे. तुमच्या भावनांना जगात किंमत नाही, तुम्हाला दगड व्हावेच लागेल, दुसरा कोणीही तुमचा गैर फायदा उचलता कामा नये, जसे तुमच्या पुढारीला त्यांच्या मुलांचे उत्तम भविष्य करायचा अधिकार आहे तसाच तुम्हालाही आहे, फक्त थोडे आत्मकेंद्रित व्हावे लागेल. जो काळानुसार बदलतो तोच जगतो, जो बदलत नाही तो संपून जातो किंवा त्याच्या पिढ्या ह्या गुलामीचे आयुष्य जगतात.
आता पळणे बास, परत मुंबईमध्ये यायचा प्रयत्न करा. मला आमच्यासारख्या तरुण तरुणींकडून अपेक्षा आहे, त्यांना एकच सांगतो कि संविधान लिहिणारा, रिझर्व्ह बँक ची स्थापना करणारा, अटकेपार झेंडा लावणारा, बलाढ्य शत्रूला कोंडीत पकडून संपवणारा, इंग्रजांना घाम फोडणारा, पहिले शेअर बाजार स्थापन करणारा हे सगळे मराठीच होते.
आर्थिक ताकद आपली असलीच पाहिजे, जगाच्या प्रत्यक काना कोपऱ्यात मराठी पोचलाच पाहिजे, झोपतानाही समृद्धीची स्वप्ने पडलीच पाहिजे.
धन्यवाद,
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


'बदल घडवून आणायचाच असेल तर षंढासारखं वागून चालणार नाही. बदमाशांच्या पालखीचे भोई किती दिवस होत राहणार? बारामतीपासून बोस्टनपर्यंत बदलांचे वारे आता वाह्तायेत. वाऱ्यांवर स्वार तर व्हायलाच हवं' !
डॉ. गिरीश जखोटिया
पुस्तक - चला, बदल घडवूया!
अश्विनीकुमार फुलझेले
 चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७

दहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी

दहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी
आज दही हंडी, गोपाळकाला उस्तव आहे. ह्यामध्ये किती उद्योग व्यवसाय आणि आपल्या कंपनी, सेवेची जाहिरात करण्याच्या संधी दडलेल्या आहेत?
ह्याचा कोणी विचार केला का?
ज्यांचे उद्योग किंवा व्यवसाय आहेत ते आपल्या कंपनीचे टी शर्ट बनवून देवू शकतात. कृपया कपड्याचा आणि प्रिंट चा दर्जा चांगला ठेवा जेणेकरून तरून मुल ती जास्त काळ वापरू शकतील, आणि आपल्या मित्रांना तशीच टी शर्ट घेण्याचा किंवा वापरण्याचा सल्ला देतील. ह्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या उत्पादनाचे किंवा सेवेचे नाव लोकांपर्यंत पोहचत असते.
बस, ट्रक व इतर लहान मोठी वाहने भाड्याने घेतली जातात.
त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली जाते इथे केटरिंग सेवा पुरवनार्यांचा, महिला बचत गटांचा व्यवसाय ह्यांची गरज लागते.
लहान मोठे खाद्यपदार्थ जागेनुसार जसे वडापाव, भजीपाव, समोसापाव, चायनीज भेळ, मंचुरियन, पोहे, शिरा, उपमा आणि वाईन शॉप जवळ नॉन वेज खाद्य पदार्थ ह्यांचा व्यवसाय चालतो.
ताक,लिंबू शरबत किंवा इतर शरबत ह्यांचाही व्यवसाय उत्तम होतो.
ह्या संधीचे २ फायदे आहेत
१) कायमस्वरूपी धंदा करणार्यांचे उत्पन्न वाढते
२) ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे किंवा छंदाचे व्यवसायात रुपांतर करायचे आहेत ते सुरवात करू शकतात, ह्या मध्ये त्यांना त्यांच्या क्षमता, उणीवा ह्याबद्दल समजते, आणि हा १ दिवसाचा अनुभव आयुष्य बदलून टाकतो. सकारात्मक व्यक्ती चुकांपासून शिकून शहाणी होते आणि नकारात्मक व्यक्ती चुकांना घाबरून कायमचे सोडून देते.
अजून काही नवीन कल्पना, उद्योग, व्यवसाय असेल तर कृपया खाली कमेंट मध्ये पोस्ट कराल.
धन्यवाद,
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७


'मराठी माणसाने मारवाडी- गुजराती मित्र जोडावेत, तसेच तीन गोष्टींचा ध्यास धरावा. एक म्हणजे संपत्ती कशी व किती मिळवायला हवी, याचं स्पष्ट भान हवे. दुसरी बाब म्हणजे मराठी माणसांनी 'वाकेन पण तुटणार नाही', अशी मानसिकता ठेवावी. तिसरी सर्वाधिक महत्त्वाची- थोडी चतुराई, थोडा आक्रमकपणा, थोडा स्वार्थ, थोडी मधाळ भाषा आणि थोडी सचोटीतील लवचिकता, असे मिश्रण आपल्या व्यक्तिमत्त्वात भिनवणे.'
डॉ. गिरीश जखोटिया
पुस्तक - चला, बदल घडवूया!
अश्विनीकुमार
 चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७


सकारात्मक मन

सकारात्मक विचार

सकारात्मक कंपन

सकारात्मक आयुष्य

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


'मारवाडी नजरेतून' महाराष्ट्रीयन उद्योजकाचे सडेतोड विश्लेषण करताना लेखक डॉ. गिरीश जखोटियाने म्हटले आहे की, एका विशिष्ट आकारास पोहचल्यानंतर मराठी उद्योगपती बावचळतो, अडखळतो, गोंधळतो वा घाबरतो...' असं का होते या मागील त्यांनी पाच कारणे दिली आहेत. लेखक म्हटले आहे की, 'राजा शिवाजी नि माधवराव पेशवे होऊन गेल्यावर 'राज हम करेंगे' अशी तडफ, इच्छा, ईर्ष्या सामान्य मराठी माणसाकडे मी पाहिलेली नाही, हेच वैशिष्ट्य मराठी उद्योजकाचे! गुजरातचा अंबानी, राजस्थानचा बिर्ला, कर्नाटकचा मल्ल्या, सिंधकडचा छाब्रिया नि हरियाणाचा जिंदाल म्हणूनच मुंबईवर राज्य करू शकतात आणि सारे काही मराठी माणूस निरिच्छपणे पाहत असतो... स्वत:मध्ये बदल करून आपणही शेवटची स्पर्धा जिंकू शकतो, ही जिद्द मराठी माणसात खूप कमी आढळली...' ही फार मोठी त्रुटी दाखवून लेखक डॉ. गिरीश जखोटियाने मराठी माणसापुढे एक प्रकारचे आव्हान ठेवले आहे.
डॉ. गिरीश जखोटिया
पुस्तक - चला, बदल घडवूया!
अश्विनीकुमार फुलझेले
 चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७


एकदा का तुमच्या मनाने ठरवले कि संपूर्ण ब्रम्हांड (निसर्ग, देव, अंतर्मन किंवा ज्यावर तुमचा विश्वास आहे ते) ते तुमच्या आयुष्यात मिळवून देते, मग ते समृद्धी, श्रीमंती, ऐषोआराम, आरोग्य, नातेसंबंध, प्रेम असो किंवा सर्वांगीण यशस्वी आयुष्य. अश्या पद्धतीने तुमच्या स्वप्नांचे आयुष्य तुम्ही जगायला लागता. जिथे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला भेटत जाते.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


सद्यपरिस्थितीत बदल आवश्यक आहे, या त्यांच्या हेतूसंबंधी मनोगत स्पष्ट करताना लेखक डॉ. गिरीश जखोटियाने म्हटले आहे की, बदलाचा प्रारंभ स्वत:पासून व्हायला हवा. मुळात बदल कसा, कुठे, किती, केव्हा, कुणासाठी, हे नीटपणे कळायला हवे... अमेरिकेतील बदलाचे निकष जसे भारताला लागू करता येत नाहीत, तसे महाराष्ट्रीय समाजातील बदलाचे निकष राजस्थानी समाजाला पूर्णपणे लावता येणार नाहीत... 'उत्तम बदल घडविण्याच्या प्रक्रियांना हाताळण्यासाठी 'कृष्णनीती'चा वापर करावाच लागतो,' असे स्पष्ट करून लेखक डॉ. गिरीश जखोटियाने वाचकाना 'बदला'साठी 'भावुक मना बन दगड, हाण रगड, बन दगड' असे आवाहनही केलेले आहे.
डॉ. गिरीश जखोटिया
पुस्तक - चला, बदल घडवूया!
अश्विनीकुमार फुलझेले
 चला उद्योजक घडवूया
 ८०८०२१८७९७

चायवाला सॉफ्टवेअर इंजीनिअर

चायवाला सॉफ्टवेअर इंजीनिअर
धंदा तोच चहाचा, पण त्याला जेव्हा सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा नवं विचारांचा तरुण करतो तेव्हा चमत्कार घडतो. एकतर काळानुसार तुम्ही स्वतः मध्ये बदल करत जा नाहीतर दुसरा काळानुसार बदललेला माणूस त्या उद्योग धंद्यामधील नफा कमी वेळेत घेऊन जाईल. जो काळानुसार बदलतो तोच जीवनात राहतो हा उत्क्रांतीचा अटळ नियम आहे.
ज्यांना खऱ्या अर्थाने "स्टार्टअप इंडिया‘ समजलाय, अशा तरुणांनी उत्तुंग भरारी घेण्यासाठी पंख पसरविले आहेत. अगदी किराणा मालापासून ते लाखो रुपयांची उत्पादने आज ऑनलाइन मागविता येतात. विदेशातला पिझ्झा ऑनलाइन खपू शकतो, तर आपला चहा का नाही, असं म्हणत भुवनेश्‍वरमधल्या एका तरुणाने थेट "एककप.इन‘ची स्थापना केली. ऑनलाइन चहाचे दुकान ही संकल्पना जरी विचित्र वाटत असली, तरी अवघ्या चार महिन्यांत तो त्यात चांगलाच यशस्वी झाल्याचं दिसतंय...
सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे रात्री अपरात्री काम करावे लागे, डोकं बधीर झालं, की चहाची तलफ येई; पण एवढ्या रात्री चहा पिण्यासाठी लांबचे कट्टे, नाके गाठावे लागत. कधी कधी प्रवासातच जीव दमून जाई आणि मग कामाचा बट्ट्याबोळ होई. दुसऱ्यांच्या वेबसाइट्‌स आणि सॉफ्टवेअर्स डेव्हलप करत असताना भुवनेश्‍वरमधल्या सुकल्याण दासला चहाच्या ऑनलाइन विक्रीची कल्पना सुचली आणि "एककप.इन‘चा जन्म झाला. त्याच्याचसारख्या "आउट ऑफ बॉक्‍स‘ विचार करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनीदेखील ही अफलातून अशी संकल्पना उचलून धरली आणि आज संपूर्ण भुवनेश्‍वरमध्ये त्यांचा चहा अनेकांची "तलफ‘ भागवत आहे.
शेअर अ कप
तुमचा मित्र किंवा मैत्रीण सुटीच्या दिवशी ऑफिसमध्ये एकटीच काम करत असेल किंवा तुम्हाला तुमच्या चहावेड्या प्रियजनांना सरप्राइज द्यायचे असेल, तर तुम्ही "शेअर अ कप‘च्या माध्यमातून त्या माणसाचा पत्ता देऊन ऑनलाइन ऑर्डर प्लेस करू शकता. सध्या त्यांच्याकडे दोन डिलिव्हरी बॉईज असून, ते केवळ 30 मिनिटांच्या आत भुवनेश्‍वरच्या कानाकोपऱ्यात चहा पोचवित आहेत. सध्या त्यांची सेवा सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी पाच या वेळेतच उपलब्ध असली, तरी दिवसाला सुमारे 500 कप चहा जात असल्याने त्यांचा बिझनेस तोट्यात तरी चाललेला नाही.
कमी भांडवलात मोठा फायदा
स्वत:ची सॉफ्टवेअर फर्म चालविणारा सुकल्याण सांगतो, की मला या व्यवसायाची सुरवात करताना कसलाच त्रास झाला नाही. त्या मानाने कमी भांडवल आणि उपलब्ध मनुष्यबळावर होणारे काम असल्याने जानेवारीमध्ये आम्ही प्रायोगिक तत्त्वावर ओळखीच्याच लोकांसाठी "एककप‘ सुरू केला. परंतु कंपन्यात आणि अन्य ठिकाणी माझ्याच काही माजी सहकाऱ्यांपुढे "चायवाला‘ म्हणून उभे राहणे सुरवातीला अवघड गेले, पण त्यांनीही प्रोत्साहन दिल्याने आमचा आत्मविश्‍वास वाढला.
"एककप‘मुळे ग्राहक खूश
सध्या आम्ही इंडियन मिल्क टी, लेमन टी, मसाला टी, ग्रीन टी आणि मटका टी अशा पाच प्रकारांतील चहा लोकांना पुरवित आहोत. साध्या चहाची किंमत 7 रुपये असून, मटका आणि स्पेशल मलाई मारके मटका चहाची किंमत 10 रुपये आहे. आमच्या चहाची वेगळी चव, आमचे मसाले आणि किंमत यामुळे सध्या ग्राहकवर्ग आमच्या "एककप‘मुळे खूश असल्याचेही सुकल्याण आवर्जून नमूद करतो.
अश्विनीकुमार फुलझेले
 चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


स्वप्न आणि वास्तव ह्यामधील अंतराला कृती म्हणतात.

अश्विनीकुमार
८0८0२१८७९७
1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण देऊन त्यांचा निकृष्ट माल अधिक किमतीने भारतीय ग्राहकांच्या माथी मारला गेला. अनेक वर्ष हा उद्योग चालू होता. असं एक कंपनीला जेव्हा तुम्ही कृत्रिम संरक्षण देता तेव्हा त्या कंपनीचा विकास होऊनच शकत नाही. आपल्याला असं म्हणायचं आहे का की ते संरक्षण आजही आपण देत राहायचं. का कंपन्यांना ज्याला इंग्रजीमध्ये थ्रो इन द डीप एंड म्हणतात, मुलाला पोहायला शिकवायचं म्हंटल तर त्याला खोल पाण्यात ढकलायला लागत, कायम एक सांगड बांधून त्याला सोडता येत नाही. इतक्या वर्षानुवर्षे आपण समाजवादाचा एक मृगजळ बघत त्याची सांगड घालून कंपन्यांना ढकललं आणि त्या कंपन्या पोहत राहिल्या ह्याच्या मुळे खरं म्हणजे आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे.
भारतीय कंपन्या सक्षम नाही आहे ह्याच मुळ कारण हे आहे की त्या टॉनिक वर वाढवल्या गेल्या, त्यांना व्यायाम करायला संधीच दिली नाही. आपण इतके ओरडतोय की भारतीय कंपन्यांची परिस्थिती वाईट आहे. आज आपल्या समोर पतंजली फार्मासिटिकल च उदाहरण आहे त्यांनी हिंदुस्तान लिव्हार सारख्या परकीय कंपन्यांना घाम आणलेला आहे. तेव्हा असं काही नसत की भारतीय कंपन्या ह्या कमजोरच होणार आहे.
उत्कृष्ट मार्केटिंग, उत्कृष्ट प्रॉडक्ट, उत्कृष्ट प्लेसमेंट हे जर केलं तर परकीय कंपन्यांना सहजपणे नमवता येते. कॅपिटल इज नॉट ए ओन्ली थिंग. दुसरी महत्वाची गोष्ट आता आपल्याला लक्ष्यात येत नाही आहे कि आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडन्ट आहे त्याच्या मध्ये वयाचा भाग जर सोडला तर स्किल किंवा कौशल्य हे फार कमी आहे. मॅनुफॅचुरींग युनिट मध्ये आता जी गुंतवणूक येत नाही त्याचे मुख्य कारण कुशल कामगार ह्या देशात नाही आहे. कारण टेकनॉलॉजिची वाढच झाली नाही. कालची टेकनॉलॉजि वापरून आजच्या लोकांना प्रॉडक्ट देण्याचा कार्यक्रम वर्षानुवर्षे चालला त्याला जर खंड पाडला नाही तर आपण कायम अशी बांडगुळ पोसत राहू आणि ती बांडगुळ पोसत राहिलो तर हे काही चालायचे नाही फार दिवस.
त्यामुळे आपल्या कंपन्यांना स्पर्धेमध्ये उतरावेच लागेल, स्पर्धेमध्ये उतरल्यानंतरच आपल्या कंपन्या सक्षम दिसतील आणि त्यातले काही सक्षम असतील ते तरतील, जे नसतील ते बुडतील, स्पर्धेचा हा नियमच आहे. आपण कायम बुडणाऱ्या लोकांना वाचवण्याचा ठेका घेतला आहे का?
चंद्रशेखर नेने
अर्थतज्ज्ञ
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


तुम्हाला थोडे जरी समजले कि उद्योग, व्यवसाय कसा उभा करायचा चालवायचा, लाखो करोडोंची उलाढाल कशी करायची ते, त्यानंतर भीती संपूर्णपणे नाहीशी होते व भीतीची जागा कुतूहल आणि धाडस घेते.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

एमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार !

एमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार !
एमबीए करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण पुण्यातल्या काही उच्चशिक्षित तरूणांनी शेतकर्‍यांसाठी काही करावं या उद्देशाने पुणे शहरात आठवडी बाजार भरवायला सुरूवात केलीये. यामुळे पुण्याजवळचे शेतकरी या बाजारात माल थेट आणून विकत आहे.
एमबीएचं शिक्षण म्हणजे गलेलठ्ठ पगार असंच समीकरण बहुतेकांच्या मनात असतं. पण आपल्या या शिक्षणाचा फायदा शेतकर्‍यांना मिळावा यासाठी पुण्यात राजेश माने, नरेंद्र पवार गणेश सवाने, तुषार अग्रवाल आणि ऋतुराज जाधव या उच्चशिक्षित युवकांनी पुण्यात 2014 पासून आठवडी बाजार भरवायला सुरूवात केली. या बाजारामुळे शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. पुण्याजवळच्या ग्रामीण भागातून अनेक शेतकरी आणि बचतगट या बाजारात आपला ताजा भाजीपाला खुडून आणतात. स्वामी समर्थ कंपनीतर्फे हा बाजार भरवला जातो.
पुण्यात बालेवाडीच्या दसरा चौकात दर गुरुवारी 3 वाजता हा आठवडे बाजार भरतो. याशिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आणखी 9 ठिकाणी हा बाजार भरतो. या बाजारात दर दिवशी 10 ते 12 लाखांची उलाढाल होते आणि स्वत:चा माल स्वत: विकण्याचा अधिकारही शेतकर्‍यांना मिळतो.
शेतकर्‍यांचे 60 बचतगट या बाजारात आपला माल आणतात आणि या बाजाराला पुणे कृषी पणन मंडळाकडूनही चांगला पाठिंबा मिळतोय.
ताजा आणि स्वच्छ भाजीपाला आणि फळं थेट मिळत असल्याने ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद या बाजाराला मिळतोय. अनेक ग्राहक
मॉलपेक्षा या बाजारात येऊन भाजीपाला खरेदी करत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आठवडे बाजार आयोजित करण्याविषयी मागणी वाढतेय. यामुळं राज्य सरकारचं शेतकरी आडतमुक्त धोरण खर्‍या अर्थानं साध्य होतंय.
सौजन्य आयबीन लोकमत
शेती हा हि एक व्यवसाय आहे, शेतकऱ्याने मार्केटिंग आणि सेल्स शिकून घेतले तर त्याला परत समृद्ध बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मुंबई मध्येही अश्या बाजारपेठेची दररोजची गरज आहे. जो काळानुसार बदलतोय तोच जगतो.


अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


मिलिंद सोमण
वय - 50
व्यवसाय – 
सिने नायक, कलाकार, मॉडेल, खेळाडू
पूर्ण केलेली स्पर्धा –
आयर्न मॅन ट्रायथलॉन (Ironman Triathlon), जगातील सर्वात कठीण स्पर्धा
इव्हेंट्स –
विश्रांती न घेता
3.8 किलोमीटर पोहणे
180.2 किलोमीटर सायकल चालवणे
42.2 किलोमीटर धावणे
वेळ मर्यादा –
16 तास
मिलिंद ने 15 तास 19 मिनटात जगातील सर्वात कठीण आवाहन पूर्ण केले.
पारितोषिक रक्कम –
$ 650 000 - सहा लाख पन्नास हजार डॉलर
भारतीय चलनात 4,35,50,000 चार कोटी पस्तीस लाख पन्नास हजार
अश्विनीकुमार
8080218797

कसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्टवेअर कोडर बनायचा प्रवास


ही कहाणी आहे आकाश ची, ज्याने शाळा सोडली आणि १३ वर्षांचा असताना संधीच्या शोधात तो मनपूर ह्या उत्तराखंड मधल्या छोट्याश्या खेडेगावातून २००९ साली मुंबईला आला होता.
इतर खेडेगावातील लहान मुलांसारखा मुंबई सारख्या गर्दीच्या, गजबजलेल्या शहरात नवीन, अशा परीस्थित त्याला रुळायला वेळ लागला. जगण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी तो भेटेल ते काम करू लागला. सिगरेट कंपनीची मार्केटिंग पासून ते पब मध्ये गिटार वाजवणे ते कॉल सेंटर मध्ये काम करेपर्यंत अशी भेटेल ती काम करत गेला, शेवटी त्याला भाग्याने बोलावले आणि तो IITB कोडर्स साठी त्यांच्यात घरात जेवण बनवायचे काम भेटले.
काही वर्ष गेल्यांनंतर, जेवण करत असताना त्याने बक्सी (हाउसिंग को फाउंडर) ला विचारले कि तू हे काय करत आहेस.
त्याने उत्तर दिले कि "तू जे हे फेसबुक, व्हाट्स एप वापरतो आहे ना तशीच कोडिंग वेबसाईट आणि एप वर होते. काम्पुटर ला शिकवावे लागते. आम्ही हे काम करतो."
आश्चर्याने तो लहान मुलगा बोलतो कि "अरे वा! मला पण हे करायचे आहे."
आणि अश्याप्रकारे महिन्यांचा दीर्घ कालावधीचा दिवस आणि रात्र सॉफ्टवेअर लिहायचे शिकायचा प्रवास चालू झाला. आकाशच्या आयुष्याचे सकाळी जेवण बनवणे, घर साफ करणे आणि दिवस 6 तास झोपून घेणे असे चक्र चालू झाले. एकदा का आम्ही कामावरून घरी आलो कि ज्या पण कम्प्युटर वर कोणी काम करत नसेल त्यावर तो शिकायला सुरुवात करतो. शिकायची सुरवात हि कोरसेरा हि कोडिंग शिकवणारी वेबसाईट ह्यावरील फ्रंट - एन्ड लेक्चर्सने होते, तो लवकर शिकत गेला. वर्षामध्येच एकाग्रतेने शिकल्यामुळे तो फ्रंट-एन्ड, बॅक-एन्ड डाटाबेस हाताळायला शिकला.
अगदी बेसिक पासून ते अल्गोरिदम स्पेसिफिक ते आता मशीन लर्निंग आणि NLP त्याचे कुतूहल वाढत गेले.
आम्ही तिघे मिळून लवकरच त्याला मॅकबुक एअर घेऊन देणार आहोत. आत तो आमचा मधील एक तज्ज्ञ आहे. शाळा अर्धवट सोडल्यापासून ते स्वयंपाकी ते सॉफ्टवेअर डेव्हलोपर असा आकाश चा प्रवास आमच्यासारख्या ध्येय आणि लक्ष्य असलेल्या लोकांना खूप प्रोत्साहन देणारा आहे.
जेव्हा मी हा लेख लिहीत होतो तेव्हा आकाश हा iOS चे कोडिंग करत होता. त्याचा आम्हा सगळ्यांना एकच सल्ला आहे "एका वेळेस एकच काम हातात घ्या आणि घुसून जा त्याच्यात." (Pick something you like. And commit yourself to it.)
आयुष्य म्हणजे अनुभवांचा संच आहे, जिथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळते, नव नवीन संधी उपलब्ध होतात. आपले आयुष्य घडवण्यासाठी त्यामधील फक्त काही संधी आपल्याला पकडायच्या आहेत, एका वेळेस एकच निवडा.

ईशान नाडकर्णी

अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


पंजाबी लोक हे शब्द ऐकले कि खाण्या पिण्याचं शौकीन, बिनधास्तपणा, उद्योग, व्यवसाय, सरकारी, खाजगी नोकरीमधील उच्च पद, अनिवासी भारतीय असे चित्र उभे राहते. गुजराती, मारवाडी, सिंधी आणि दक्षिण भारतीय ह्या लोकांचेही जवळपास सारखेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते. थोडक्यात सांगायचे झाल्यास सधन समाजाचे चित्र उभे राहते.
मराठी लोक बोलल्यावर आपल्या डोळ्यासमोर किंवा परप्रांतीयांच्या डोळ्यासमोर कुठचे चित्र उभे राहते?
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


खेळ + भांडवलशाही + पैसा = प्रसिद्धी
खेळ - भांडवलशाही - पैसा = प्रसिद्धी पासून कोसो दूर
उदाहरणार्थ
क्रिकेट = इतर सर्व खेळ

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



राजकारण हे संपूर्णपणे भावनेवर चालते ना कि उद्योग व्यवसाय. कृपया ग्राहकांना परदेशी उत्पादन न घेण्याबाबत आवाहन करू नका, आपल्या उत्पादनांची तुलना, दर्जा व इतर सकारात्मक बाबी ह्यांची तुलना परदेशी कंपनीच्या उत्पादनाबाबत करत बसू नका. ग्राहक ह्याने आकर्षित होत नाही तर उलट तुमचा आत्मविश्वास कमी होत जाईल आणि ह्याचा परिणाम तुमच्या उद्योग, व्यवसायावर पडेल. मानसिक दृष्ट्या सक्षम व्हा, शांत मनाने परिस्थिती समजून घ्या, व्यापार संबंध वाढवा, त्यांच्या प्रत्येक कमजोरीचा फायदा उचला त्या अगोदर आपले उत्पादन परिपूर्ण करून घ्या. त्यांच्या 200 उत्पादनाच्या विरुद्ध तुमचे एक उत्पादन टिकू शकत नाही. त्यांच्या सारख्या विविध उत्पादनाचा समूह बनवा. मागणी पूरवठा आणि बदली उत्पादन ह्यांचे दीर्घ काळासाठी उत्तम ताळमेळ ठेवा. आपल्या उत्पादनाची जेवढी स्तुती करता येईल तेवढी करा. त्यांच्या कडे डॉलर आहे ज्याची किमंत 70 रुपये आहे ह्या विरुद्ध तुमच्याकडे प्रचंड एकाग्रता, इच्छाशक्ती, धाडस, नवीन ज्ञान आणि सर्वात महत्वाची गतीशील कृती पाहिजे.
अश्विनीकुमार
८0८0२१८७९७

हा कसला तर्क आहे?

हा कसला तर्क आहे?
कुठल्याही सरकारी विभागात जेव्हा नोकरीसाठी रिक्त जागा निघतात तेव्हा फॉर्म ची फी असते ४०० - ५०० रुपये.
सरकारला नवशिक्षित तरुणांनकडून नफा कमवायचा आहे कि त्यांना रोजगार द्यायचा आहे? अजूनपर्यंत मला समजले नाही.
उदाहरणार्थ
सरकारी नोकरीसाठी रिक्त जागा निघतात ५०.
फॉर्म संपूर्ण भारतातून भरून घेतात.
फॉर्म ची फी असते ५०० रुपये.
अंदाज पकडूया "५० ते ८० लाख बेरोजगार तरुण तो फॉर्म भरत असतील" (हा आकडा कितीतरी पटीने अधिक असेल.)
आता आपण सरकारचा फायदा बघूया, किती रुपये सरकारी तिजोरी भरले जातात ते समजून घेऊया.
फॉर्म फी ५०० रुपये X फॉर्म भरलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांची संख्या ५०,००,००० = (नुसत्या फॉर्म भरल्याने होणारी सरकारची कमाई) "२ अरब ५० करोड रुपये"
फक्त ५० बेरोजगारांना नोकरी द्यायची आहे.
पगार आपण जास्तीत जास्त २५००० पकडू. पगार जास्त पकडलाय, इतका नाही भेटत.
२५००० (पगार) + ५० (नोकरी भेटलेले तरुण) = १२,५०,००० रुपये महिना.
१२,५०,००० X १२ महिने = १ करोड ५० लाख (१,५०,००,०००)
४० वर्षे नोकरी केल्यानंतर
१,५०,००,००० X ४० वर्षे = ६० करोड (६०,००,००,०००)
सरकारची फॉर्म विकून झालेली कमाई = २ अरब ५० करोड रुपये
नोकरी मिळालेल्यांना ४० वर्षांपर्यंतचा पगार = ६० करोड रुपये.
२,५०,००,००,००० - ६०,००,००,००० = १,९०,००,००,०००
सरकारची एकूण कमाई "१ अरब ९० करोड रुपये"
माझा प्रश्न सरळ आहे, सरकारला सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी द्यायचे आहे कि त्यांच्याकडून पैसे कमवायचे आहे.
ज्यांना उद्योग किंवा व्यवसाय करायचा असेल त्यांनी कृपया ह्या फॉर्म डिजाईन, प्रिंटिंग चे सरकारी काँट्रॅक्त घ्यावे.
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



तुम्हाला माहित आहे का?
हिरा ना हा दुर्मिळ आहे आणि नाही मौल्यवान आहे. जाहिरात विश्वातील आतापर्यंतच्या यशस्वी जाहिरातींपैकी एका ज्यामध्ये डी बियर्स पुरुष ग्राहकांना सांगत होता कि तुम्ही तुमच्या महिन्यभरचा पगार हा हिऱ्याच्या अंगठीवर खर्च केलाच पाहिजे. नंतर त्यांनी किमंत वाढवली, आपला पुरवठा मर्यादित केला, आणि असा लोकांमध्ये एक भ्रम निर्माण केला कि पिढ्यान पिढ्या लोकांचा विश्वास बसला कि हिऱ्याची अंगठी हा अनिवार्य भाग आहे लग्न कार्यामधला.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


माझी भीती कानात कुजबुजते कि मी वादळासमोर टिकू नाही शकत,
मी भीतीच्या कानात कुजबुजतो कि मीच वादळ आहे.
अश्विनीकुमार
८0८0२१८७९७
जेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्ये उतरतो, फाईव्ह स्टार हॉटेल सारखे हॉस्पिटल बांधतो तेव्हा समजून जावे कि तिथे जाणारा आजारी मनुष्य हा रुग्ण नसून एक ग्राहक आहे, त्याच्याकडील जास्तीत जास्त पैसे कसे काढता येईल ह्याकडे लक्ष्य असते. रुग्ण बरे होण्यापेक्षा, त्यांच्या आरोग्यापेक्षा त्यांच्याकडून नफा किती झाला ह्याकडे लक्ष्य असते. गरीब लोकांनी तिथे न बघितलेलेच बरे आणि मध्यम वर्गीयांनी तिथे गरीब किंवा कर्जबाजारी होण्यासाठी जावे. उद्योग जगतात सगळे ध्यान नफ्यावर केंद्रिंत असते डॉक्टर इंजिनिअर कामावर ठेवताना, मुलाखत घेताना ते तपासून घेतात कि खरंच हा आपल्याला नफा कमावून देणार आहे कि नाही. आणि कितीही काही झाले तरी मुख्य सूत्रधार हा जर मोठा उद्योजक किंवा सत्ताधारी असेल तर त्यावर कोणीच कारवाई करू शकत नाही. सरकारी रुग्णालय ह्या साठी उत्तम दर्जाचे करत नाही कारण खाजगी रुग्णालय चालले पाहिजे. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ह्याची सेवा निकृष्ट दर्जाचे करून रिलायंस ला फायदा करून दिला. असे उदाहरण अनेक आहेत, जो स्वतःच्या मेंदूने विचार करतो त्याला कोणीच मूर्ख बनवू शकत नाही. पुढच्या वेळेस खाजगी रुग्णालयात सांभाळून जाल, कदाचित तुमचे अवयव गायब होऊ शकतात. पोलीस आणि न्यायालय ह्यांचा अनुभव एकदा घेतला कि पुरेसा, दोन्हीही पिच्छा नाही सोडत, जर तुमच्या विरुद्धचे जर आर्थिक दृष्ट्या मजबूत असतील तर प्रत्येक क्षणी तुम्हाला झुंज द्यावी लागेल, त्यावेळेस तुम्हाला जाणवेल कि खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत कि नाही, आणि झालेले आर्थिक आणि मानसिक नुकसान हे कोणीच भरून देणार नाही. हुशार बना.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७



१० पैकी ९ लोक बोलले कि जेव्हा सकारात्मक लोकांसोबत काम करतो तेव्हा जास्त काम केले जाते.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


रोहित खंडेलवाल
पैसे कमवायचे क्षेत्र :-
 मॉडेलिंग, टीव्ही सिरीयल, कलाकार, जाहिरात
जिंकलेली स्पर्धा : -
 मिस्टर वर्ल्ड 2016
पारितोषिक राशी : -
 $ ५०,००० (रुपये ३३,४१,९९८)
पुढील फायदे : -
 जाहिराती, सिनेमे, प्रमुख पाहुणे, स्वतःचा उद्योग,
व्यवसाय, भागीदार व इतर अनेक.


तुमच्या मेंदूने एकदा का स्वीकारले म्हणजे तुमच्या मेंदूतील न्यूरल पाथवे ची संरचना बदलली की तेव्हाच तुमची कृती किंवा सवय बोलू आपण ती बदलतेआणि एकदा मन, मेंदू आणि कृती बदलली की माणसाची परिस्थिती संपूर्णपणे बदलून जाते. ज्यांची क्षणात बदलते त्याला आपण आकर्षणाचा सिद्धांत म्हणू, चमत्कार म्हणून, देवाची कृपा म्हणू, भाग्य म्हणू किंवा शास्त्रज्ञांच्या भाषेत स्पॉण्टेनियूस रेमेशन (Spontaneous remission) किंवा जिथे सोप्या IT च्या भाषेत रिसेट करणे म्हणू. मेंदू संपूर्णपणे रेषेत होऊन परत आहे त्या नैसर्गिक स्थितीत येतो जिथे सगळे आजार, यश-अपयश, तणाव इत्यादी एक क्षणात निघून जातात. बाकींच्या आयुष्यात कालावधी घेत बदल होत जातो आणि काही मरेपर्यंत बदलत नाही.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


गुंतवणूक हि शेअर, म्युच्युअल फ़ंड, बॉण्ड, सोने - चांदी, पॉलिसी, फिक्स डिपॉझिट, घर, जमीन अश्या विविध मार्गाने किंवा एकापेक्षा जास्त मार्गाने करतात, ना कि फक्त पॉलिसी आणि म्युच्युअल फ़ंड ने. आपल्या आताच्या मर्यादा, भविष्यातील गरजा आणि परिस्थिती नुसार अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन मुदतीसाठी करावी लागते. गुंतवणूक करताना मनाची स्थिती हि खूपच महत्वाची असते, जास्तीत जास्त स्वतः लक्ष्य घालावे लागते. भावनिक दृष्ट्या सक्षम राहावे लागते. जो आर्थिक व्यवहारात दुसऱ्यांवर अवलंबुन असतो तो बुडतो आणि जो स्वावलंबी असतो तो पोहत किनाऱ्यापर्यंत जिवंत जातो.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


जर तुम्ही विद्यार्थी आणि पालकांना विचारले कि ते मुलांच्या पदव्यांवर लाखो रुपये खर्च का करतात? तेव्हा ते उत्तर देतील कि पांढरपेशा नोकरीसाठी त्यांना लाखो रुपये खर्च करावेच लागतात. विद्यापीठांना ते योग्य का आहेत ते विचारा तेव्हा ते उत्तर देतील कि आमच्याकडे प्रयोगशाळा आहेत, अनुभवी कर्मचारी आहेत, आणि लागणाऱ्या इतर बाबी आहेत. ग्राहक (विद्यार्थी आणि पालक) आणि विक्रेत्याला (विद्यापीठ) वाटते कि ते दोन वेगवेगळ्या गोष्टी विकत आहेत आणि विकत घेत आहेत.
सलमान खान
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७



सकारत्मक आणि नकारात्मक ह्या दोन्ही
व्यक्तिमत्वांनी समाजामध्ये योगदान दिले आहे.
सकारात्मक व्यक्तिमत्वाने विमानाचा शोध लावला,
नकारात्मक व्यक्तिमत्वाने पॅराशूट चा शोध लावला.
जॉर्ज बर्नार्ड शो
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले
 ८०८०२१८७९७


माझ्या दयाळू, प्रेमळ स्वभावाला
माझी कमजोरी समजू नका.
माझ्यामधला सिंह हा झोपलेला आहे,
मेलेला नाही आहे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



एकतर मी श्रीमंत बनायचं मार्ग शोधले,
किंवा मी माझा श्रीमंत बनायचं मार्ग निर्माण करेन.
पण मी गरीब, मध्यमवर्गीय, नोकरी करत रहायची
नवनवीन कारणे निर्माण करत नाही बसणार.
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


राजांसारखे अष्टपैलू बना, राजकारणाच्या वेळेस राजकारण करा, युद्धाच्या वेळेस युद्ध करा, समाजकारणाच्या वेळेस समाजकारण करा, शीत युद्धाच्यावेळेस शीत युद्ध करा, गटबाजी करायच्या वेळेस गटबाजी करा, नमते घेण्याच्या वेळेस नमते घ्या, गनिमी युद्धाच्या वेळेस गनिमी युद्ध करा, गुप्तहेरीच्या वेळेस गुप्तहेरी करा, मैत्री, नात्यांचा आदर करा पण अंध विश्वास ठेवू नका, धोकेबाजीला चोख प्रत्युत्तर द्या, फायद्याच्या ठिकाणी नवीन नाते बनवा, जे जे प्रजेच्या आणि राज्याच्या संरक्षणासाठी लागते ते ते राजा करतो.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


मराठी लोक सण साजरा करतात, आणि गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी, भैय्या, दक्षिण भारतीय हे त्या सणाला लागणाऱ्या पुरवठ्याचा व्यवसाय करतात. हि चुकी आपली आहे कि त्यांची? दुसऱ्यांना दोष देत बसू नका, जाती संदर्भाचा वाद आणि प्रादेशिक वाद, स्त्रियांबद्दलचे हीन दर्जाचे विचार ह्याला आम्ही मराठी जागतिक विचारांचे नवतरुण खालच्या पातळीवरचे विचार म्हणतो. आमच्या मध्ये अपार क्षमता आहे आणि कौशल्यही आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही झेंडा गाडलेला आहे. विचार आणि दृष्टिकोन बदला तेव्हाच आम्ही दिसून येऊ कारण नकारात्मक मनुष्याला कधीच सकारात्मक मनुष्य दिसणार नाही.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया

मशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा !




उच्च शिक्षण घेऊनही नोकरीच्या पाठी न लागत पाटील दाम्पत्याने मशरूम चे उत्पादन घ्यायचे ठरवले. आता ते महिन्याला लाखो रुपये कमावतात.
कोण बोलतो कि मराठी स्त्री पुरुष फक्त नोकरीच करू शकतो म्हणून?
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले
8080218797


माणसाचा स्वभाव हा कोणीच बदलू शकत नाही, घरचा असू देत किंवा बाहेरचा जर त्याचा स्वभाव विंचू सारखा असेल तर डंख मारल्याशिवाय राहणार नाही.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

करोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्यावर छोले भटुरे विकते


गुडगाव ची रहिवाशी उर्वशी दररोज गुडगाव च्या सेक्टर १४ मध्ये पिंपळाच्या झाडाखाली छोले भटुरेची हातगाडी लावते. ह्या पिंपळाच्या झाडाखाली एकूण खाद्यपदार्थाच्या १४ हातगाड्या लागतात, पण उर्वशीच्या छोले भटुरेच्या हातगाडीची खासियत आहे कि ती स्वस्तात चांगले साफ जेवण देते.
उर्वशीकडे ३ करोड किंमत असलेले घर आहे आणि एक स्कॉर्पियो सोबत २ SUV गाड्या आहेत, पण नवऱ्याच्या आजारपणामुळे कमाईचे मार्ग कमी झालेले दिसत होते. म्हणून उर्वशीने भविष्याची प्लॅनिंग केली आणि शिक्षिकेची नोकरी सोडून हातगाडीवर छोले आणि कुलचा विकायला सुरवात केली ज्यामुळे ती दररोज २५०० ते ३००० रुपये कमावते.
उर्वशी पुढे म्हणते कि "ठीक आहे कि आज माझ्याकडे महागड्या गाड्या, महागडे घर आणि पैसे आता आहेत पण जर मी आता काम समाधानकारक कमाईचे नाही सुरु केले तर हे सगळे संपून जाईल. मला नाही आवडणार कि पुढे जाऊन माझ्या मुलांना शाळा बदलावी लागेल. पैश्यांची समस्या पुढे न होण्यासाठी मी आज हे पॉल उचलले आहे."
माहितीनुसार उर्वशी BA पास आहे आणि लवकरच तीला स्वतःचे एक हॉटेल उघडायचे आहे. ह्या मध्ये एक समजले कि तिला पैसे कमावण्याच्या सोबत तिचे स्वप्न देखील पूर्ण करायचे आहे, म्हणून हा मार्ग निवडला आहे. सोबत उर्वशीची आर्थिक परिस्थिती पण चांगली नाही आहे म्हणून त्यांनी हार मार्ग निवडला.
तिला जेव्हा हाच व्यवसाय का निवडला असे विचारले असता तिने उत्तर दिले कि KFC चा मालक कोलोनेल सँडर्स च्या जीवनाचा खूप प्रभाव पडला आहे. कारण त्यांनी आल्या स्वप्नाची सुरवात हि वयाच्या ६५ वर्षी एक छोटासा उद्योग सुरु करून केली होती जे आज संपूर्ण जग ओळखते.
बोध : -
आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायला वयाची मर्यादा नसते. १० वर्षाखालील पण नवं उद्योजक आहेत आणि ६० वर्षांपुढील देखील नवउद्योजक आहेत.
परिस्थितीनुसार बदलत जा.
परिस्थिती तुमच्यावर हावी होते कि तुम्ही परिस्थितीवर?
जर परिस्थिती तुमच्यावर हावी होत असेल तर आजच संपर्क कराल.

अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


तुमच्याकडे maruti alto असू द्यात किंवा BMW , रस्ता तोच राहणार आहे.
तुम्ही इकॉनॉमी क्लास ने प्रवास करा किंवा बिजनेस क्लास ने तुमचे
पोहचायचे शेवटचे ठिकाण तेच असणार आहे, ते बदलणार नाही.
तुमच्याकडे टायटन घडी असू द्यात किंवा रोलेक्स, वेळ तोच दाखवणार आहे.
तुमच्याकडे एप्पल, सॅमसंग किंवा लाव्हा मोबाईल असू द्यात, फोन करणारी लोक तीच राहणार आहे.
ऐषआरामच्या आयुष्याचे स्वप्न बघणे किंवा जगणे काही चुकीचे नाही आहे.
फक्त एक गोष्टीची काळजी घ्या, आपल्या गरजेला लोभामध्ये परिवर्तित नका होऊ देऊ.
कारण गरज पूर्ण होतात, पण लोभ कधीच पूर्ण होत नाही.
रजनीकांत
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

कथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका


1) 1938 साली ली बियांग चल नावाच्या माणसाने दक्षीण केरियामध्ये 'सॅमसंग' या नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले.
2) 1940 साली किराणा दुकानांमध्ये सुरु झालेल्या प्रचंड स्पर्धेमूळे त्याने किराणा मालाचे दुकान बंद करून नूडल्स बनवण्याच्या व विक्रीच्या व्यवसायाला सुरवात केली
3) 1950 साली सॅमसंगने नूडल्सचे उत्पादन बंद करून साखरेचे उत्पादन करायला सुरवात केली.
4) 1954 साली सॅमसंगने साखरेचे उत्पादन बंद केले व गरम कपडे बनवण्यासाठी वूलन मिल सुरू केली
5) 1956 साली सॅमसंगने वूलन मिल बंद करून इन्शुरन्स व सिक्युरिटिज विकायच्या व्यवसायाला सुरवात केली.
6) 1960 साली सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात प्रवेश केला व 'बलॅक ऍन्ड व्हाईट' टेलिव्हीजन सेट्स बनवायला सुरवात केली.
7) 1980 साली सॅमसंगने टेलिकॉमच्या क्षेत्रात प्रवेश केला व व टेलिफोन स्विच बोर्ड बनवायला सुरवात केली.
8) 1987 साली सॅमसंग कंपनीचा संस्थापक ली याचा मृत्यु झाला. त्यामूळे कंपनीचे विभाजन चार वेगवेगळ्या व स्वतंत्र कंपन्यांमध्ये झाले. डिपार्टमेन्टल स्टोअर्स, केमिकल्स व लॉजिस्टिक्स, पेपर व टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक्स असे विभाजन झाले.
9) त्याच साली सॅमसंगने जागतीक स्तरावर सेमिकंडक्टर प्लॅन्ट्समध्ये गुंतवणूक करायला सुरवात केली.
10) 1990 साली सॅमसंगने जागतीक स्तरावरची गुंतवणूक बंद करून रिअल इस्टेच्या क्षेत्रात प्रवेश केला. मेशियामधले पेट्रॉनास टॉवर्स तसेच तैवानमधील तैपेई 101 या जगातील सर्वात उंच इमारतींचे बांधकाम सॅमसंगने केले.
11) 1993 साली मोठी मंदी आली. एशीयन मार्केटमध्ये मोठी मंदी होती. सॅमसंगला पण याचा मोठा फटका बचला. त्यावेळी लीच्या मुलाने कंपनीचा सीईओ म्हणून सूत्रे हातात घेतली होती. त्याने कंपनीचे डाऊनसायझींग करायला, कंपनीच्या उप कंपन्या म्हणजेच सबसिडिअरीज विकायला व उरलेल्या कंपन्यांचे एकत्रीकरण करायला सुरवात केली.
12) इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरींग व केमिकल डिव्हीजन्सचे एकत्रीकरण केल्यामूळे सॅमसंग ही जगातील मेमरी चिप्सचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी बनली.
13) 1995 साली सॅमसंगने 'लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले' च्या क्षेत्रात प्रवेश केला व केवळ 10 वर्षातच 'फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन' बनवणारी जगातील सगळ्यात मोठी कंपनी बनली.
14) 2010 साली लिक्विड क्रिस्टल डिसप्लेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्याने सॅमसंग कंपनीने पुढील 10 वर्षांच्या वाटचालीचे धोरण ठरवले व स्मार्टफोनच्या क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले.
15) 2016 सालामध्ये सॅमसंग ही मोबाइल फोन व स्मार्टफोन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. आज सॅमसंगच्या स्मार्टफोनची विक्री आय फोनच्या विक्रीच्या दुपटीहून अधीक आहे.
आज सॅमसनंगची विक्री 250 बिलियन डॉलर्सपेक्षा अधीक आहे व दक्षीण कोरियाच्या एकूण एक्सपोर्टमध्ये सॅमसंगचा वाटा एक पंचमांश ईतका आहे.
किराणा मालाचे दुकान - नूडल्सचे उप्पादन - साखरेचे उत्पादन- वूलन मिल - इन्शुरन्स व सिक्युरिटिजची विक्री - टेलिव्हीजन सेट्सचे उत्पादन - टेलिफोन स्विच बोर्डचे उत्पादन - सेमिकंडक्टर प्लॅन्टमध्ये जागतीक स्तरावर गुंतवणूक - रिअल इस्टेट - मेमरी चिप्स - फ्लॅट स्क्रीन टेलिव्हीजन - मोबाइल फोन व स्मार्ट फोन असा सॅमसंगचा प्रवास आहे.
एक वाण्याचे दुकान ते जगातील सर्वात बलाढ्य कंपन्यांपैकी एक असा सॅमसंगचा प्रवास थक्क करणारा आहे.
तात्पर्यः-
बदल हा जसा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तसाच तो बिझनेस, इंडस्ट्री व उद्योग व्यवसायाचा पण अविभाज्य भाग आहे. त्यामूळे बदल करायला घाबरू नका. तुम्ही जर बदल स्विकारला नाही तर तुम्ही नगण्य व्हाल! त्याच त्याच गोष्टी परत परत करण्याच्या मानसिकतेमध्ये अडकून पडू नका. त्यामूळे बोअर व्हाल. अयशस्वी होत असताना सुद्धा काही बिझनेस चालतच असतात ते एकप्रकारच्या अंतरीक उर्जेमूळे. या अपयशातूनच या कंपन्या प्रगती साधत असतात ते कशामूळे? कारण बिझनेसमधले अपयश हे तुम्ही प्रयत्न करता आहात याचे प्रतीक असते. ते नव्या पद्धतीने कंपन्यांची पुन्हा रचना करत असतात. नवी क्षेत्रे शोधून काढून त्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत असतात. नवीन पाण्यात शिरायचा प्रयत्न करीत असतात.
आता सॅमसंगचेच पहा. त्यांनी कित्येक असे बिझनेस केले की त्यांचा परस्पराशी काही संबंध नाही. पण परिस्थितीनूसार ते बदलत गेले. नवीन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात प्रवेश करत गेले व नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करत गेले. स्वतःच्या कंपन्यांचा नव्याने शोध घेत नवीन कल्चर आत्मसात करत गेले. बदल हाच आयुष्यातील एकमेव 'कॉन्सन्ट' आहे हे लक्षात ठेवा. यशाचा कोणताही परफेक्ट फॉर्म्युला नाही. त्यामूळे सतत प्रयत्न करत रहा. योग्य वेळी बदल करत रहा. केव्हा ना केव्हातरी तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल याची खात्री बाळगा. आपला बिझनेस किंवा उद्योग व्यवसाय यशस्वी करा! आयुष्यात यश मिळवा! अर्था आपण आयुष्यात व बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचे की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे नाही का?
( श्री. सुरेन्द्र श्रेष्ठ यांच्या सौजन्याने)
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७