मराठी लोकांचे व्यवसाय होते पण ते एका क्षणात कमी झाले नाही तर अनेक दशकांचा प्रवास होता तो
मुंबई मध्ये वडापाव च्या व्यवसायात मराठी जास्त प्रमाणात होते, खानावळ च्या व्यवसायात मराठी जास्त प्रमाणात होते.
ह्यापुढील टप्पा हा फ्रेंचायझी किंवा हॉटेल मध्ये परिवर्तीत व्हायला पाहिजे होता तो जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या प्रमाणात झाला नाही.
सेलिब्रेटी चे सोडून बोलत आहे, कृपया इमेज मार्केटिंग नको.
मुंबई आंतरराष्ट्रीय शहर, इथून मराठी खाद्य पदार्थ हे जगभरात पसरायला पाहिजे होते जसे पंजाबी आणि दक्षिण भारतीय पसरले तसे, हे झाले नाही.
ह्या नंतर रस्त्यावरील खाद्य पदार्थ हे मराठी खाद्य व्यवसायिकांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होते, जसे कि दक्षिण भारतीय पदार्थ इडली वडा वगैरे, फ्रेन्की, मोमोज, मंच्युरीयन, वगैरे.
नंतर असे दिसून आले कि उत्तर भारतीय दक्षिण भारतीय पदार्थ विकतांना दिसले, पण मराठी नाही.
चायनीज मध्ये देखील उत्तर आणि दक्षिण भारतीय दिसून आले, पण मराठी चा टक्का प्रचंड कमी झाला.
आता मराठी व्यवसायात आहे पण अनेक ठिकाणी पार्टनर म्हणून. जसे कि हॉटेल, बार व इतर व्यवसायात.
एक समजले कि मराठी लोकांचे व्यवसाय होते पण ते एका क्षणात कमी झाले नाही तर अनेक दशकांचा प्रवास होता तो.
एक नाही तर अनेक व्यवसाय आहेत जिथे मराठी कमी होत गेले व आता नामशेष होण्याच्या मार्गावर किंवा पार्टनर म्हणून.
कारणे शोधणे खूप महत्वाचे आहे. कारण हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कृपया मुंबई मध्ये येवून प्रत्यक्ष अनुभव घ्याल.
कारण जर पुण्यात अशी परिस्थिती निर्माण झाली तर उर्वरित महाराष्ट्र हातातून जायला वेळ लागणार नाही.
आणि हे फक्त खाद्य पदार्थाच्या व्यवसायाबद्दल नाही तर अनेक व्यवसायातून मराठी जवळपास हद्दपार झाले आहेत.
माझ्या समोर मराठी किराणा व्यवसायिकाचे दुकान बंद होतांना बघितले आहे.
परप्रांतीय उद्योग व्यवसाय बंद होतो तिथे परत परप्रांतीय उद्योजक व्यवसायिक येतो, आणि मराठी उद्योग व्यवसाय बंद होतो तिथे जास्त प्रमाणात परप्रांतीय उद्योजक आणि व्यवसायिक येतात, मराठी खूपच कमी
मराठी चायवाले देखील होते जे टपरी चालवायचे ते देखील गायब होत गेले.
उद्योग, व्यवसाय करणे काही रॉकेट सायंस नाही आहे, शांत डोक्याने विचार केला आणि अनुभवी लोकांची साथ मिळाली तर परत जसे जुना काळ होता त्यामध्ये आपण जावू.
धन्यवाद
अश्विनीकुमार
फेसबुक : चला उद्योजक घडवूया
#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #रिअलइस्टेट #आर्थिकमानसिकता #फ्रीलांसर #कौशल्य
"मायक्रोसॉफ्टने पुन्हा एकदा हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं!"
मायक्रोसॉफ्टने मे 2025 मध्ये सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे, जी त्यांच्या एकूण जागतिक कर्मचार्यांच्या सुमारे 3% आहे. ही कपात 2023 नंतरची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आहे, जेव्हा कंपनीने 10,000 कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं.
कपातीमागील कारणे
-
AI मध्ये गुंतवणूक: मायक्रोसॉफ्टने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे कंपनीने कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि AI-आधारित तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यासाठी कर्मचार्यांची पुनर्रचना केली आहे.
-
व्यवस्थापन संरचनेत बदल: कंपनीने व्यवस्थापन स्तरावरील पदे कमी करून निर्णय प्रक्रिया जलद करण्याचा प्रयत्न केला आहे. या बदलामुळे संस्थात्मक संरचना अधिक सुटसुटीत होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
-
जागतिक आर्थिक अनिश्चितता: अमेरिकेतील व्यापार धोरणांमधील अनिश्चितता आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणांमुळे टेक उद्योगावर पडणारा संभाव्य परिणाम यामुळे मायक्रोसॉफ्टने खर्च नियंत्रणासाठी हा निर्णय घेतला आहे.
कोणत्या विभागांवर परिणाम?
या नोकरकपातीचा परिणाम विविध विभागांवर झाला आहे, ज्यामध्ये Xbox, LinkedIn, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि प्रॉडक्ट मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. विशेषतः, वॉशिंग्टन राज्यातील रेडमंड येथील मुख्यालयाशी संबंधित 1,985 कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे.
भारतातील परिणाम
सध्याच्या माहितीनुसार, या नोकरकपातीचा भारतातील कर्मचार्यांवर थेट परिणाम झाल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मायक्रोसॉफ्टने भारतातील कर्मचार्यांना कामावरून कमी करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
निष्कर्ष
मायक्रोसॉफ्टची ही नोकरकपात कंपनीच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे, ज्यामध्ये AI आणि डिजिटल इनोव्हेशनवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कंपनीला स्पर्धात्मक आणि कार्यक्षम बनवण्याचा उद्देश आहे.
अश्विनीकुमार
आर्थिक मानसिक सल्लागार, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक
जर तुम्ही एकदा हार मानली तर ती सवय बनते. हि सवय बदलण्यासाठी माझ्या मोफत ५ प्रमुख टिप्स.👇
यशाचा प्रवास म्हणजे डोंगर चढण्यासारखा आहे. सुरुवात नेहमीच सर्वात कठीण असते. या आव्हानात्मक क्षणांमध्ये तुमच्या स्वप्नांप्रती असलेल्या तुमच्या वचनबद्धतेची खरी परीक्षा होते.
एकदा हार मानणे ही सवय बनते आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या आयुष्यापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत दृढनिश्चयी मानसिकता विकसित करण्यासाठी आणि जिंकण्यासाठीची पाच प्रमुख रणनीती पुढीलप्रमाणे:
👉आव्हाने स्वीकारा: आव्हानांना प्रगतीच्या संधी म्हणून पहा. प्रत्येक अडथळा ही आपली कौशल्ये आणि चारित्र्य सुधारण्याची संधी असते. अडचणींचा स्वीकार करून त्यांचा सामना केल्या अडचणींचे रुपांतर यशाकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांमध्ये होते.
👉तुमच्या 'का' यावर लक्ष केंद्रित करा: तुमच्या उद्देशाचा अर्थ सुस्पष्ट करा आणि त्यावर तीक्ष्ण लक्ष केंद्रित करा. जेव्हा प्रवास कठीण होतो, तेव्हा 'का' सुरुवात केली हे लक्षात ठेवणं तुम्हाला पुढे जायला मदत करतं. ते तुमच्या दृढनिश्चयाला बळकटी देते आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती प्रदान करते.
👉सकारात्मक मानसिकता जोपासा: प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकतेची सोनेरी कडा पाहण्यासाठी तुमच्या मनाला प्रशिक्षित करा. सकारात्मक मानसिकता तुम्हाला अपयशातून शिकण्यास, बदलांशी जुळवून घेण्यास आणि इतरांना अडचणी येतात तेव्हा उपाय शोधण्यास सक्षम करते. तुमचा दृष्टिकोन ठरवतो तुम्ही आयुष्यात किती पुढे जाल ते.
👉स्वतःला सकारात्मकतेने वेढून घ्या: तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या समान विचारसरणीच्या व्यक्तींची एक सपोर्ट सिस्टम बनवा. सकारात्मक ऊर्जा संक्रामक आहे आणि कठीण काळात तुम्हाला प्रेरित ठेवण्यासाठी एक शक्तिशाली शक्ती असू शकते.
👉ध्येये विभाजित करा: तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या स्वप्नांचे व्यवस्थित मेनेज होऊ शकतील अश्या छोट्या ध्येयांमध्ये विभाजित करा. तुमच्या स्वप्नांना व्यवस्थापित करण्यायोग्य, छोट्या-मोठ्या ध्येयांमध्ये विभाजित करा. वाटेत छोटे विजय साजरे करा, कारण ते वेग वाढवतात आणि तुमचे स्वप्न साध्य होण्यावर तुमचा विश्वास मजबूत करतात. प्रगती कितीही लहान असली तरी प्रगतीच असते.
लक्षात ठेवा, सुरुवात ही तुमच्या यशोगाथेतील फक्त एक अध्याय आहे. चिकाटी ठेवा, उत्साही रहा आणि पुढे जात रहा. तुमची स्वप्ने तुमच्या आवाक्यात आहेत आणि प्रवास हा ध्येयापर्यंत पोहचण्याइतकाच महत्त्वाचा आहे.
अगणित लोकांचे ध्येय आणि स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचे आणि प्रशिक्षण देण्याचे सौभाग्य लाभले आहे. गुरु, मार्गदर्शकाच्या मदतीने योग्य कौशल्ये अपग्रेड करून, अंतर्मनात दडलेली सुप्त शक्ती जागृत करून तुम्ही न समजलेली नवीन संधी उघडू शकता.
🌠मला फॉलो करा अश्विनीकुमार
सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
#मानसशास्त्र #मानसिकता #आत्मविकास #प्रोस्ताहन #प्रेरणा #व्यक्तिमत्वविकास
Image by Rudy and Peter Skitterians from Pixabay
स्ट्रीट फूड च्या व्यवसायात काही सोप्या टेक्निक्स लक्षात ठेवा भाग ५
सर्वात फेमस पदार्थ म्हणजे पोहा, पुढे यादी देत आहे त्यानुसार जा.
१) पोहे
२) उपमा
३) शिरा
ह्यामध्ये तुम्हाला जास्त काही एड करायची गरज नाही, पोहे कुठेही लावा लगेच संपले जातात. मला जोर्पयंत मित्राने अण्णा कडील मेदू वडा खायची सवय लावली नाही त्या अगोदर पोहे फिक्स असायचे. ऑफिस ला जातांना मध्येच एक जन टोप घेवून बसायचा पण गर्दी तुफान. तो परिसरच तसा होता म्हणून.
क्वालिटी तुम्ही जिथे आणि जसा व्यवसाय करणार आहात त्यानुसार ठेवा, जिथे कमी दर्ज्याचे जाते तिथे उत्तम दर्ज्याचे विकले जाणार नाही आणि कोणी विकत पण घेणार नाही.
इथे पदार्थ ओव्हन किंवा एअर फ्रायर मध्ये बनू शकतात कि नाही हे माहिती नाही.
हा व्यवसाय एक छोटासा टेबल टाकून, दुकान घेवून किंवा घरातून करू शकता.
जसे पहिल्या ३ भागांमध्ये सांगितले आहे त्यानुसार कमी जास्त करत व्यवसाय सुरु करू शकता.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Image by Mohammad Shahbaz Ansari from Pixabay
स्ट्रीट फूड च्या व्यवसायात काही सोप्या टेक्निक्स लक्षात ठेवा भाग ४
इथे मुख्य पदार्थ शिमला मिरची, गाजर, पत्ता गोबी, कांदा पात अंड आणि चिकन आहे. इथे व्हेज आणि नोन व्हेज असे दोन भाग पाडू शकता आणि त्यानुसार आपण काय काय बनवू शकतो ते बघू.
१) मंचुरियन (विविध प्रकार)
२) चायनीज भेळ (विविध प्रकार)
३) सूप
४) नुडल्स
५) राईस
इथे तुम्हाला शेझवान चटणी लागेल, तिच्या टेस्ट वर काम करा.
जितका सोपा मेनू ठेवता येईल तितका सोपा ठेवा, जास्त एड करण्याची गरज नाही.
क्वालिटी तुम्ही जिथे आणि जसा व्यवसाय करणार आहात त्यानुसार ठेवा, जिथे कमी दर्ज्याचे जाते तिथे उत्तम दर्ज्याचे विकले जाणार नाही आणि कोणी विकत पण घेणार नाही.
इथे काही पदार्थ ओव्हन किंवा एअर फ्रायर मध्ये बनवू शकतो पण सगळे नाही, हे मी फक्त माझे मत व्यक्त करत आहे.
हा व्यवसाय एक छोटासा टेबल टाकून, दुकान घेवून किंवा घरातून करू शकता.
जसे पहिल्या ३ भागांमध्ये सांगितले आहे त्यानुसार कमी जास्त करत व्यवसाय सुरु करू शकता.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Image by Jamir Tamboli from Pixabay
स्ट्रीट फूड च्या व्यवसायात काही सोप्या टेक्निक्स लक्षात ठेवा भाग ३
मैद्या पासून बनणारे पदार्थ भाग ३ मध्ये बघणार आहोत.
इथे मुख्य पदार्थ मैदा आहे त्यानुसार आपण काय काय बनवू शकतो ते बघू.
१) पंजाबी समोसा
२) पट्टी समोसा
३) मोठी कचोरी
४) पराठा
५) भटुरे किंवा तुम्ही जे काही एड करू शकता ते
इथे तुम्हाला चटणी लागेल, स्लाईस कांदा वगैरे लागेल, ह्यावर थोडा काम कराल, माझ्या मते लोणचे देखील लागेल.
समोस्याचे अनेक प्रकार येतात त्यामुळे जे जास्त सामान्यतः चालतात तेच घ्या. ह्यामध्ये व्हेज तर आहेच पण शक्य असल्यास नोन वेज चा देखील वापर कराल, जिथे मिळतात तिथे नोन वेज समोस्याला डिमांड असते.
मोठी गोल कचोरी तर तुम्हाल समजलीच असेल. पराठ्या साठी तवा लागेल, भटुरे तेलात होतील.
भाजी बटाट्याची तर झाली सोबत छोल्याची लागेल.
इतर विविध व्यवसाय पुढील प्रमाणे
ह्यामध्ये लहान मुलांसाठी स्नेक सारखे छोटे तयार करता येतील तर उत्तम.
चकण्यासारखे करता स्नेक करता येत असतील तर उत्तम.
बेक किंवा एअर फ्रायर करता येतील तर उत्तम.
चांगल्या क्वालिटीचा कच्चा माल वापरून महागात तुम्ही घरपोच विकू शकता.
घरून किंवा दुकान घेवून व्यवसाय करू शकता, व्होलसेल शक्य असल्यास करू शकता. विविध ऑर्डर्स घेवू शकता.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Image by ashish choudhary from Pixabay
स्ट्रीट फूड च्या व्यवसायात काही सोप्या टेक्निक्स लक्षात ठेवा भाग २
भाग 2 मध्ये आपण विविध व्यवसाय प्रकार बघणार आहोत
१) बेसन, बटाटा, कांदा, तिखट मिरची, कमी तिखट मिरची मोठी वाली, ऑप्शनल, पाव व ब्रेड
बेसन पासून तुम्ही किती प्रकारचे पदार्थ बनवू शकता? जास्त अतिरेक करायचा नाही प्रयोग करण्यासाठी, काही सोपे प्रयोग करू शकता पण जास्त नको.
अ) बटाटा वडा
ब) बटाटा भजी
क) कांदा भजी
ड) मिरची भजी
इ) ऑप्शनल भजी
फ) ब्रेड पेटीस
वरील पदार्थ तुम्हाला ओव्हन मध्ये आणि एअर फ्रायर मध्ये बनवता येतील असे बनवायचे आहे. इथे तुम्हाला चटणी वर काम करायचे आहे जेणे करून मुख्य गाभा जास्तीत जास्त मेंटेन राहिला पाहिजे. मुंबौ मध्ये काही पैसे वाल्यांच्या परिसरात चीज वगैरे टाकले जाते त्या मायाजालात पडू नका, जर चव चांगली असेल तर ठराविक ग्राहक सोडले कि अनेक ग्राहक मिळतील. इथे पैसा मुख्य मुद्दा नाही तर चव आहे.
इथे तुम्ही २ प्रकारे व्यवसाय करू शकता, पहिले म्हणजे घरातून आणि दुसरे म्हणजे दुकान घेवून. ते तुमच्यावर अवलंबून आहे.
इथे तुम्ही चांगल्या प्रतीचा माल ठेवा कारण इथे किंमत वाढणार आहे, दुसरा पर्याय नाही.
जर हॉटेल किंवा खानावळ किंवा इतर कुणासोबत सोबत टाय अप असेल तर त्या नुसार माल बनवून द्याल, इथे तुम्हाला कौशल्य लागेल.
जिथे पैसा असतो तिथे कौशल्य आणि अनुभव लागतो.
जर शक्य असल्या मिनी स्नेक्स बनवू शकत असाल तर उत्तम, हे लहान मुलांसाठी खूप कामी येईल.
मिनी सेक्स जर बार आणि रेस्टॉरंट मध्ये देणार असाल तर चवीकडे लक्ष ठेवलं व त्यानुसार माल तयार कराल.
कमीत कमी १० लोकांच्या घरपोच ऑर्डर घेत चला डीस्तंस बघून. आणि जर तुमच्या जागी येत असतील तर तसे करा. शक्य असल्यास तडजोड सगळे करतात.
सुरुवात नेहमी हळू होते त्यामुळे फक्त दररोजच्या कामावर लक्ष द्या, आपोआप व्यवसाय जोर पकडत जातो.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Photo by Aditya Mara: https://www.pexels.com/photo/a-vada-pav-lunchbox-17433353/
स्ट्रीट फूड च्या व्यवसायात काही सोप्या टेक्निक्स लक्षात ठेवा भाग १
१) बेसन, बटाटा, कांदा, तिखट मिरची, कमी तिखट मिरची मोठी वाली, ऑप्शनल, पाव व ब्रेड
बेसन पासून तुम्ही किती प्रकारचे पदार्थ बनवू शकता? जास्त अतिरेक करायचा नाही प्रयोग करण्यासाठी, काही सोपे प्रयोग करू शकता पण जास्त नको.
अ) बटाटा वडा
ब) बटाटा भजी
क) कांदा भजी
ड) मिरची भजी
इ) ऑप्शनल भजी
फ) ब्रेड पेटीस
मी वैयक्तिक रित्या इथे समोसा एड करत नाही कारण इथे एक मुख्य सामग्री लागते ती म्हणजे मैदा आणि मैद्यापासून आपण कुठचे पदार्थ बनतात ते पुढे बघू
जितके सोपे मेनू ठेवता येईल तितके सोपे ठेवा, चटणी खूप महत्वाची आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जास्तीत जास्त ३ प्रकारची चटण्या ठेवा त्यापेक्षा जास्त नको. ओली सुखी चटणी बनवणे सोपे आहे फक्त प्रयोग करून बघायचे आहेत प्रमाण कमी जास्त करून.
बटाट्याच्या भाजीची चव चांगली ठेवा आणि जर ठीक ठक चव असेल तर जास्तीत जास्त गरम गरम देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून गरम लोक लगेच खाऊन टाकतात व सहसा चवीकडे लक्ष जात नाही पण थंड झाल्यास लोकांमधील करमचंद जागृत होईल.
माल घेताना जो तुमची बनवता त्या पद्धतीला योग्य असेल तोच घ्याल, त्यामध्ये बदल नको, तोटा झाला तरी चालेल पण ग्राहकाला एकसारखाच माल द्याल मग तो तुमचा कायमस्वरूपी ग्राहक बनेल. हा जेव्हा प्रचंड महाग असले तेव्हा तुम्हाला तुमच्या बजेट नुसार वागावे लागेल पण उन्नीस बीस असेल तर ग्राहकांकडे लक्ष द्या.
म्हणजे इथे तुम्ही बेसनाचा वर करून विविध पदार्थ बनवत आहात. आणि जे जे बेसनाने शक्य आहे तेच बनवा म्हणून मी समोसा बाजूला ठेवायला सांगितला, हा पण इथे तुम्ही बाहेरून माल मागवू शकता, काही इश्यू नाही.
एक लक्ष्यात ठेवा व्यवसाय म्हणजे तुम्हाला ग्राहकांचा विचार करायचा आहे, जास्त वेळ दुकान बंद ठेवू शकत नाही, सातत्य प्रचंड पाहिजे आणि संपूर्ण कुटुंब कामाला लागले पाहिजे ना की फक्त एक व्यक्ती. तुम्ही वडापाव विका किंवा एसी मध्ये बसून काम करा शेवटी पैसाच कमवायचा आहे, जर रेडीमेड व्यवसाय मिळत असेल तर नोकरी करणे टाळा व व्यवसायाकडे लक्ष द्या.
तुमचे आई वडील जुने विचारांचे असे बोलून वडापाव मध्ये चीज टाकत बसू नका, जे उत्तम सुरु आहे तेच सुरु राहू द्या, आयुष्य असेच असते, काही नवीन नसते. आणि सोशल नेटवर्क पासून सहसा लांब रहा कुणाला व्हिडीओ रेकोर्ड करायला देवू नका, स्थानिक ग्राहक आणि रनिंग ग्राहक सर्व तुम्हाला मिळतील आणि जर चव उत्तम असेल तर दुरून देखील ग्राहक येतील.
कुणाची भांडू नका, ज्यांना ज्यांना पैसे द्यायचे आहेत त्यांना त्यांना देत जा, स्थानिक सारखे वागू नका, असे समजा कि तुमचे कोणीच नाही आणि व्यवसाय करा, तुम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्यायचे आहे. आणि एकदा का तुम्ही तुमच्या लोकल परिसरात स्थिर झालात तर प्रयत्न करा कि स्टेशन सारख्या किंवा इतर कुठल्याही गजबजलेल्या परिसरात व्यवसाय सुरु करण्याचा. एकदा का अनुभव आला कि तुम्ही आरामात करू शकता.
केल्याशिवाय समजत नाही आणि आर्थिक तोट्या पासून शिका ना कि लांब पळा. तुमच्याकडे पैसे असतील तरी ओळखीच्या कडून उधार घ्या व त्यांना परत देत चला, कारण वेळ प्रसंगी तुमच्याकडे पैसे नसतील आणि देता नाही आले तर समजून घेतील.
प्रयत्न करा कि डोक शांत ठेवण्याचा, हळू हळू सवय होईल, काही कोरिअन सीरिअल मध्ये बघितले आहे कि तोंडाला बांधायचे मिळते ते जर तुम्ही वापरले तर उत्तम कारण ते पूर्ण पेक नाही आहे मास्क सारखे. ग्लोज वापरणे शक्य नाही त्यामुळे हाताचा वापर कराल, आतापर्यंत इतकी वर्षे बिना ग्लोज चे खात आलो आहेत आपण, आणि नेहमीचा ३६५ दिवस कोणी आजारी नसतो.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Photo by Aditya Mara: https://www.pexels.com/photo/a-vada-pav-lunchbox-17433353/