बाल कलाकार कमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी



बाल कलाकार
कमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी

अनेक सिनेमा आणि सीरिअल मध्ये बाल कलाकारांची गरज लागते. त्यांना तिथे त्यांची नैसर्गिक कला दाखवता येते.

हंसिका मोटवानी जिने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते ती आज प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.

आमीर खान ह्याने देखील बाल कलाकार म्हणून काम केले होते व आज तुम्ही तो किती प्रसिद्ध अभिनेता आहे हे बघू शकता.

वरील नावे फक्त उदाहरणादाखल दिलेली आहेत. हा लेख कोण कोणी व किती बाल कलाकार होवून गेले हे सांगण्याचा नाही तर मराठी पालकांनी आपल्या मुलांना कमी वयात कशी यश व प्रसिद्धी मिळवून द्यायचे हा आहे.

जसे बोल गेट्स चे कमी वयात यशस्वी झाला म्हणून दाखले दिले जातात तसेच इतर क्षेत्रातील प्रसिद्ध मुलांचे देखील आहे आणि सिनेमा देखील त्यापैकी एक क्षेत्र आहे.

काहींना ध्येय जन्मापासून किंवा लहानपणी मिळून जाते तर बहुतेक लोक हि नंतर ध्येय ठरवून ते ध्येय साध्य करतात. हि सर्व काही बिल गेट्स सारखी प्रोस्ताहन देणारी पुस्तके लिहित नाही.

हर्षाली मल्होत्रा ह्या बाल कलाकाराने बजरंगी भाईजान ह्या सलमान खान च्या सिनेमात काम केले होते त्या वेळी तिला २, ३ लाख रुपये मानधन मिळाले होते.

बाजारपेठ बोला किंवा वास्तव आयुष्य बोला हे असेच असते, इथे कोणी वय मानत नाही. तुमच्यात धमक आहे तर उतरा बाजारपेठेत आणि तुम्हाला हवे ते घेवून जा. इतिहासात देखील अशी उदाहरणे आहेत जिथे कमी वयात राजपाट सांभाळले गेले आहे.

म्हणजे काळ कुठलाही असो त्यामध्ये तुम्हाला संधी आहे. अमीर खान, हंसिका मोटवानी आणि हर्षाली मल्होत्रा अशी मी वेगवेगळ्या काळात सुरुवात केलेल्या कलाकारांची उदाहरणे दिली आहे ती ह्यासाठी कि तुम्ही बोलायला नको कि काळ हा तुमच्या प्रगतीसाठी आणी ध्येय गाठण्यासाठी अडथळा बनत आहे.

तुम्हाला काय वाटते कि तुम्ही ट्रेन ने प्रवास करत आहात आणि तुम्ही तिथली गर्दी अनुभवता व विचार करता कि विमानतळावर गर्दीच नसते म्हणून? कधी विमानतळावर ह्या तेव्हा समजेल कि किती गर्दी तिथे देखील असते म्हणून. म्हणजे गरीब असो किंवा श्रीमंत ह्या सर्वांना स्पर्धेचा सामना हा करावाच लागतो.

हा लेख ह्यासाठी लिहित आहे कि पारंपारिक मार्ग सोडून मराठी पालकांनी जग बघावे, काही पालक विनाकारण मुलांवर दबाव टाकून त्यांना तणाव आणि नैराश्याने ग्रस्त करत होते आणि स्वतःमध्ये काही बदल करून ह्या मार्गात कसे टिकावे ह्यासाठी.

काही पालक हे हुशार असतात आणि ते असे वेगळे मार्ग अवलंबवून आपल्या मुलांचे भविष्य हे सुखकर करून ठेवतात. ते स्वतः मुलांना प्रोस्ताहित करतात, शिक्षणासोबत जिथे मुलांना प्रात्यक्षिक करण्याची संधी भेटेल म्हणून प्रयत्न करत असतात.

मला जी लोक आयुष्यात यशस्वी झालेली दिसली त्या सर्वांना त्यांच्या आई वडिलांनी प्रोस्ताहन दिले होते आणि जी यशस्वी नाही झाली त्यांना त्यांच्या पालकांकडून प्रोस्ताहन भेटले नव्हते. म्हणून मी प्रत्यके लेखामध्ये बोलत असतो कि संस्कारांना पर्याय नाही.

यश वय बघत नाही, जिथे यशासाठी सुपीक पोषक वातावरण असते तिथे यश हे येतेच, कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही तुमच्या घरात यशाचे सुपीक पोषक वातावरण निर्माण करा, मुलांना तसे बनवा आणि बघा कसे तुम्ही आणि तुमची मुल यशस्वी होतात ते.

अनेकांना वाटते कि लहान मुलांना काही समजत नाही पण हे साफ चुकीचे आहे, त्यांच्यात जो समजूतदारपणा आढळून आला तो त्यांच्या आई वडिलांमध्ये देखील आढळून नाही आला. लहान मुलांना माहिती असते कि काय योग्य आहे आणि काय अयोग्य ते पण आई वडील अनेकदा वयाने मोठे असण्याच्या गर्वात असतात व मुलांचा समजूतदारपणा हा दुर्लक्षित करतात व त्यांना मारून रागावून त्यांच्यासारखे नकारात्मक बनवतात.

मुलांना तुम्ही जसे संस्कार देतील तसेच ते बनतील. तुम्ही योग्य संस्कार द्या ते आयुष्यात भरभराट करतील आणि अयोग्य संस्कार द्या ते आयुष्य आणि कुटुंब बरबाद करतील.

तुम्हाला मुलांना तयार करण्यासाठी किंवा त्यांच्यातील जन्मजात गुणांना वाव देण्यासाठी सुरवातीला मानसिकतेवर काम करावे लागेल आणी त्यानंतर व्यवसायिक वाटचाल करावी लागेल. जितकी मानसिकता सक्षम आणि खोल त्यापेक्षा अनेक पटीने यशाची इमारत उंच किंवा मजबूत पाया असलेली.

इथे मुलांसोबत पालकांवर देखील काम करावे लागते. मुलांकडे कौशल्य असते पण त्याला योग्य दिशा देण्याचे काम पालक करत असतात त्यासाठी पालकांना देखील योग्य दिशेचे ज्ञान असले पाहिजे.

मुलं जे निरागसपणे आणि मनापासून कला सादर करत असतानाचा बघण्याचा आनंदच वेगळा असतो. एक दैवी क्षण असतो तो. जिथे मुलांवर काम करण्याची गरज असते तिथे मुलांवर काम केले जाते आणि जिथे पालकांवर जबाबदारी असते तिथे पालकांवर काम केले जाते.

एकदम सोपे आहे, मुलांची नैसर्गिक क्षमता, पालकांचे प्रोस्ताहन आणि तज्ञांचे मार्गदर्शन मिळून मुलं कमी वयात यशस्वी होतात एक पैश्यांचा ओघच त्यांच्या आयुष्यात सुरु होतो. अनेकांचे आयुष्य एका घटनेने बदलले बघितले आहे.

आजकालची मुलं हि हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कि त्यांना कसे वागायचे आहे, कसे बोलायचे आहे, कसे कपडे परिधान करायचे आहे, कशी एक्टिंग करायची आहे आणि हे सगळे नैसर्गिक त्यांच्यामधून येत असते त्यामुळे विनाकारण मेंदूवर ताण देवून तणावात ते जात नाही. पण ज्यांना लहानपणी योग्य पोषक वातवरण आणि तज्ञांचे मार्गदर्शन भेटले नाही त्यांना मोठे झाल्यावर तणावाचा सामना करावा लागतो.

मग वाट कसली बघत आहात? तुमच्यासमोर मार्ग आहे फक्त वाटचाल करायची आहे. पुढील लेखात मी इंटरनेट, सोशल नेटवर्किंग साईट चा वापर करून लहान मुलं कसे त्यांच्यातील कौशल्य जगासमोर मांडतात आणि यशस्वी होतात ते.

मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष कोर्स तयार केलेला आहे तुम्ही त्याचा लाभ घेवू शकता. स्पर्धेला घाबरू नका कारण स्पर्धा सर्वच क्षेत्रात आहे, योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाने तुम्ही तुमचे ध्येय आरामात गाठू शकतात फक्त तुम्हाला किंमत मोजावी लागेल आणि ती किंमत असेल तुमचे मागील नकारात्मक आयुष्य. तन मन धन झोकून द्या आणि जे तुमचे आहे त्यावर हक्क गाजवा.

#अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #बाजारपेठ #चलाउद्योजकघडवूया #आर्थिकविकास #नवउद्योजक #नवव्यवसायिक #ग्राहक #श्रीमंत #ऐषआराम #पैसा #नफा #नोकरी #बढती #घरखर्च

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर तारीख आणि वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :
https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

भ्रमिक प्रोस्ताहन जीवघेणे ठरू शकते



काल मुंबई मेरेथोन झाले, खूप आनंदाची बातमी आहे कारण अश्या स्पर्धा लोकांना चांगल्या कामासाठी एकत्र आणतात. पण अजून एक मेरेथोन संदर्भात बातमी आली ज्यामध्ये ७ स्पर्धकांना हृदयविकाराचा झटका आला आणि एक हृदयविकाराच्या झटक्याने दगावला गेला. जे दगावले गेले त्यांचे वय ६४ होते.

हे असे झाले का? अति प्रोस्ताहन, भ्र्मिक प्रोस्ताहन, इव्हेंट करून तयार केलेले वातावरण, तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय प्रोस्ताहित होवून केलेली कृती, विनाकारण ओलांडलेली मर्यादा, दुसऱ्यांशी शर्यतीत जिंकण्याचा अट्टाहास आणि एका मेडल च्या लोभापायी केलेला शारीरिक अतिरेक.

हि अशी शर्यत असू दे किंवा उद्योग व्यवसाय असू दे तुम्ही कितीही लोकांना समजवा पण ते जाणार तर ह्याच मार्गाने.

मी तुम्हाला उदाहरण देवून सांगतो

माझ्याकडे अनेक फोन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात, श्रीमंत बनण्यासंदर्भात, मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासंदर्भात येतात त्यामध्ये लोक घाई करतात जसे कि त्यांना अगदी पुढच्या क्षणी श्रीमंत बनायचे आहे, अगदी पुढच्या क्षणी आजारपण बरे करायचे आहे, अगदी पुढच्या क्षणी आयुष्यातील सर्व समस्या दूर करायच्या आहेत आणि परत आयुष्यात समस्या उद्भ्वायलाच नको म्हणून एकदाच उपाय करू घ्यायचे आहेत.

अश्यांचे होते काय?

कोणीतरी त्यांना भेटते आणि आणि सांगते कि हा हा उद्योग व्यवसाय करा तर तुम्हाला प्रचंड नफा होईल, तुम्ही इतके पैसे कमवू शकतात आणि त्यांच्याकडून हजारो, लाखो आणि करोडो रुपये घेतात व शेवटी तो उद्योग, व्यवसाय सपशेल बुडतो आणि ते मानसिक प्रवाहात असल्यामुळे, मृगजळाच्या पाठी पळत असल्यामुळे सर्व पैसे गमावून कर्ज करून बसतात. नंतर माझ्याकडून समाजसेवेची अपेक्षा करतात पण जेव्हा पैसा असतो तेव्हा ते योग्य तज्ञांचे मार्गदर्शन घेत नाही किंवा ऐकतही नाही.

असेच काही शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांचे देखील आहे. जे शेअर बाजारातील इमानदार तज्ञ सांगतात कि कमी वेळेत जास्त पैसा कमावणे शक्य नाही तिथे लोक जातच नाही तर तिथे जातात जे बोलतात कि मी तुम्हाला दिवसाला हजारो, लाखो आणि करोडो काढून देईल आणि मग काय सपशेल बुडतात व नंतर जागे होतात.

असेच आत्मविकास करणाऱ्याचे आहे, त्यांना लवकरात लवकर समस्या दूर झालेली बघायची आहे. मग ते अश्या लोकांच्या जाळ्यात अडकतात जे फक्त लुबाडण्यासाठी बसलेले असतात, ते त्यांचे मानसिक, आर्थिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण करतात.

वरील मेरेथोन मध्ये असेच घडले, ना योग्य तज्ञांची मदत, भ्र्मिक प्रोस्ताहन स्वयं उपचार किंवा प्रोस्ताहित होणे आणि इंटरनेट चा वापर करून, व्हिडीओ बघून नकोत ते प्रयोग करणे जीवावर बेतू शकते.

अनेक लोक जाहिरातींना भुलून उपचार करतात व आपला आजार अजून बळावून घेतात. मग काय पैसा तर जातोच पण रुग्ण देखील दगावतो. आमच्या घरी देखील एक रुग्ण आम्ही गमावला आहे, कृपया पैसे वाचवण्यासाठी कुठलेही प्रयोग करू नका नाहीतर पैसा आणि रुग्ण दोन्ही जातील.

प्रोत्साहन देणाऱ्याचे काम असे तसे व्हिडीओ बनवणे, सेमिनार घेणे आणि पैसे कमावणे आणि तुमचे देखील काम आहे कि ह्या सर्व भ्रमाच्या चक्रातून बाहेत पडून वास्तवात राहणे, आपले आयुष्य काही प्रोस्ताहित करणारा स्पीकर सांगतो तसे सिनेमासारखे नाही.

द सिक्रेट पुस्तकाने देखील प्रचंड पैसे कमावले, आपले अध्यात्मिक गुरु तर प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांना माहिती देखील नसेल कि तुम्ही त्यांचे शिष्य आहात म्हणून, त्यांची संपत्ती अमाप आहे. तरीही अंध भक्तांची कमी नाही आणि अशीच भक्त लोक जाहिरात करण्यार्या गुरूंना श्रीमंत करतात.

तुम्ही किती धीर धरू शकतात?

माझ्याकडे माझे शिष्य अनेक वर्षे संपर्कात आहे, सतत ते आत्मविकास करत असतात आणि त्यापैकी काही तर १० वर्षांनंतर यशस्वी झाले, एक तर करोडपती झाला. हि आहे धीर धरण्याची शक्ती जी यश देते व सोबत त्या यशाचा पाया हा भक्कम असतो. आज ते अश्या परिस्थितीत आहे कि सर्व मार्गांनी त्यांना पाहिजे ते ह्याच क्षणी मिळत जाते म्हणजे थोडक्यात ते चमत्कारिक आयुष्य जगत आहे.

अजूनपर्यंत एकालाही भ्रमात ठेवले नाही त्यामुळे जवळपास ९९ % विद्यार्थी आणि शिष्यांनी उत्तम कामगिरी करत त्यांना पाहिजे ते त्यांनी मिळवले आहे. भ्रमाच्या करोड रुपयांपेक्षा वास्तवातील हजार रुपये वर्तमान काळात कमावून दिले आहेत म्हणून ते कुटुंबासह आरामात आयुष्य जगत करोडपती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

कुणाशीही स्पर्धा करण्यास सांगत नाही, आणि नाही तश्या वातावरणात जायला सांगतो म्हणून आज राष्ट्रीय खेळाडू देखील माझ्याकडे मनो शारीरिक विकास करण्यासाठी येत असतात.ते स्वतःसाठी खेळतात आणि मेडल घेवून जातात आणि जर खेळत यश नसेल दिसत तर लगेच मार्ग बदलतात पण विनाकारण भ्रमात जगत नाही, ते वर्तमान काळात सुख समाधानाने जगतात.

कृपया आरोग्य, जीव, पैसा आणि तुमच्या आयुष्याशी खेळू नका. इथे सर्वांनाच दुसरी संधी भेटत नाही. सवाशे करोड चा भारत आहे त्यापैकी असे कितीतरी खोट्या प्रोस्ताहनात अडकून आपला, जीव आणि पैसा गमावत आहेत आणि कुटुंब रस्त्यावर आणत आहे.

तुम्ही महत्वाचे, तुमचा जीव महत्वाचा आणि तुमचे कुटुंब महत्वाचे, दीर्घ सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य जगण्याची स्पर्धा स्वतःशी करा ना कि अश्या स्पर्धेत जा जिथे क्षणासाठी तणाव, नैराश्य आणि विविध आजार होतील व जीव देखील जावू शकतो. आणि हो आता हॉस्पिटल चा खर्च कुणालाही परवडणारा नाही.

तुम्ही तुमच्या आयुष्याला जबाबदार आहात आणि तुमचे कुटुंब सोडले कि इतरांना काहीही फरक पडणार नाही.

कृपया हात जोडून विनंती आहे कि जीवघेणे प्रयोग करू नका.

धन्यवाद
अश्विनीकुमार

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.

appointment 8080218797 ह्या व्हास्टएप क्रमांकावर बुक करू शकता.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

चला उद्योजक घडवूया
(फक्त आर्थिक विकास)
https://www.facebook.com/chalaudyojakghadwuya/

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
(सर्वांगीण विकास)
https://www.facebook.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-281324852234592/

Balak Palak Children Parents
(फक्त कौटुंबिक खाजगी आयुष्य)
https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/

लैंगिक गरज आणि वासना ह्यामधील फरक ओळखायला शिका



लैंगिक गरज आणि वासना ह्यामधील फरक ओळखायला शिका

सामान्य लोक हि भावनिक दृष्ट्या साक्षर नसतात, कमजोर असतात. त्यांना भावनिक आणि शारीरिक गरजा ह्यामधील फरक ओळखता येत नाही. अश्या वेळेस काही लोक हि चुकीच्या नातेसंबंधात फसतात व त्यामधून त्यांना बाहेर पडणे हे जमतच नाही. हे तुरुंग भावनिक आणि शारीरिक असते त्यामुळे आपल्याला बाहेरून बोलणे सोपे आहे पण जी व्यक्ती त्यामध्ये अडकलेली असते तिला समजून घेवू शकत नाही.

लैंगिक गरज नैसर्गिक आहे पण वासना अनैसर्गिक आहे. लैंगिक गरज हि पूर्ण झाली कि व्यक्ती शांत होते व सर्वसामान्य पणे आयुष्य जगू लागते. लैंगिक गरज आयुष्याचा एक भाग आहे त्यामुळे आपण सर्वकाळ लैंगिक गरज पूर्ण करत राहू शकत नाही. त्यानंतर व्यक्ती हि आयुष्याचा बाकीच्या भागावर लक्ष्य केंद्रित करते.

वासना अनैसर्गिक असल्यामुळे तिचा त्रास सहन करावा लागतो आणि अनेकदा कुटुंबातील, चार भिंतींच्या आतील गोष्ट असल्यामुळे ती सहसा बाहेर येत नाही तरीही काही माहिती हि बाहेर येतेच. एक मर्यादा पार झाल्यावर देखील सर्वकाही सहन करत बसतात. हे एका उच्च शिक्षित आणि उच्च पदावर असलेल्या व्यक्तीबरोबर देखील घडलेले आहे. इथे श्रीमंती आणि गरिबीचा भेद नाही, मध्यम वर्गात त्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणत वासनेचे बळी आढळून येतात.

जेव्हा मुल हि वयात येतात तेव्हा आपल्याकडे पद्धत नाही कि त्यांना लैंगिक शिक्षण द्यावे म्हणून. काही घरात दिले देखील जाते पण अनेक घरात तसे शिक्षण भेटत नाही आणि ह्या वयात अनेकदा वासनेचे शिकार होतात, काही तात्पुरते आणि काही कायमस्वरूपी. अनेकदा सामुहिक वासनेचे शिकार देखील होतात, सर्वच गुन्हे काही नोंदवले जात नाही. पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मुलं हि धक्क्यातून सावरली आहेत कशी ते माहिती नाही आणि त्यांनी नव्याने आयुष्य देखील जगायला सुरवात केलेली आहे.

घरात कोणी लक्ष्य देत नाही, कोणी समजून घेत नाही, हळवे आणि भावनिक दृष्ट्या कमजोर आणि भावनिक अशिक्षित लोक बाहेर सहारा शोधतात. जर बाहेर सहारा नीट भेटला तर ठीक नाहीतर आयुष्य पूर्ण नर्क बनून जाते.

हि लोक अश्या वासनेने भरलेल्या नातेसंबंधामधून बाहेर पडायचा प्रयत्नच करत नाही. अगदी शाळा कॉलेज मधील जोडीदारासोबत लग्न करतात आणि त्याच नकारात्मक आयुष्यात अडकून जातात.

शारीरिक गरज भागवण्यासाठी अनेकदा भावनिकदृष्ट्या फसवले जाते. लग्नाचे आमिष दाखवून मुलींचे अनेकदा शारीरिक शोषण होते. जी जी लोक भावनिकदृष्ट्या दुसर्यांच्या जाळ्यात फसली गेली आहेत त्यांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक छळ झालेला आहे.

लैंगिक गरज हि संपूर्णपणे मनोशारीरिक आहे. ह्या गरजेचे मुख्य उद्देश अपत्य जन्माला घालणे जेणे करून मनुष्य प्रजाती हि टिकून राहील ह्याकरिता आहे. ह्यामध्ये मन आणि शरीर खूप वेगळ्या पद्धतीने काम करते. तुम्ही काही क्रिया ह्या थांबवू शकत नाही. जे बोलत आहे कि अध्यात्मिक गुरुंनी मात केली आहे हे साफ चुकीचे आहे, मग त्यांचा जन्म झाला कसा? आतल्या गोष्टी ह्या फक्त त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती असतात, सामान्य भक्तांना नाही.

निसर्गासाठी मनुष्य प्रजाती टिकवणे गरजेचे आहे ना कि कुठलेही खोटे अनैसर्गिक विश्वास जे मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले आहे.

वासनेचे शिकार जास्ती करून लहान मुले ह्यामध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही आले, स्त्रिया ह्या होतात. घरात जास्त छळ होतात म्हणजे ओळखीच्या लोकांकडून आणि खूप कमी बाहेरच्या अनोळखी लोकांकडून छळ होतात. त्यामुळे अनोळखी लोकांना दोष देवून फायदा नाही.

वेळ असे पर्यंत तुम्ही कुठे अडकला आहात हे ओळखा, सर्वांना दुसरी संधी भेटत नाही, हे वास्तव आयुष्य आहे. लैंगिक गरज पूर्ण करणे काही वाईट नाही, काळ बदलला तुम्ही उघडपणे बोलू शकता आणि जो विरोध करत असेल त्यांचे किंवा त्यांच्या घरच्यांचे आयुष्य एखाद्या गुप्तहेरासारखे खोडून काढले तर तुम्हाला अनेक वासनेचे बळी दिसून येतील. आता पुरावा गोळा करणे सोपे आहे.

परत बोलतो कि समाजातील खूप कमी लोक तुमच्या कमी येतील, बकिंच्यांना समजले तर समाजात बदनामी करण्याची धमकी देवून तुमचे अजून लैंगिक शोषण करतील, सर्वच तुम्हाला मदत नाही करणार तर अनेक तुमचा गैर फायदा उचलतील. जेव्हा लैंगिक गरज पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा सर्व जाती धर्म एक होवून जातात मग जबरदस्ती करणे का असेना, तुम्हाला अधिक माहिती तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये भेटेल.

जर तुम्ही अश्या कुठल्या समस्येमधून जात असाल तर बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याने शक्य होत नसेल तर तुम्ही तज्ञांची मदत घेवू शकता.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

तुम्ही कुठच्या वातावरणात राहता? सकारात्मक कि नकारात्मक?



तुम्ही कुठच्या वातावरणात राहता?
सकारात्मक कि नकारात्मक?

सकारात्मक वातावरणात राहत असाल तर सकारात्मक फिल्टर नकारात्मकता गाळते आणि सकारात्मक स्पंज नकारात्मकता शोषून घेते व तुम्हाला शुद्ध सकारात्मक वातावरण देते.

नकारात्मक वातावरणात राहत असाल तर नकारात्मक फिल्टर सकारात्मकता गाळते आणि नकारात्मक स्पंज सकारात्मकता शोषून घेते व तुम्हाला शुद्ध नकारात्मक वातावरण देते.

सकारात्मक वातावरणात सकारात्मक अनुभव येतील, सकारात्मक परिस्थिती तुम्हाला भेटेल व सकारात्मक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. भाग्य आणि चमत्कार ह्या तुमच्या अंतर्मनातील शक्ती देखील जागृत होतील.

नकारात्मक वातावरणात नकारात्मक अनुभव येतील, नकारात्मक परिस्थिती तुम्हाला भेटेल व नकारात्मक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दुर्भाग्य आणि आणि नैराश्य ह्या तुमच्या अंतर्मनातील नकारात्मक शक्ती देखील जागृत होतील.

स्पंज आणि फिल्टर हे तुम्ही बदलू शकता. जर सकारात्मक आयुष्य जगायचे असेल, श्रीमंत आणि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायचे असेल तर ध्यान, साधना, समुपदेशन असे आत्मविकासाचे मार्ग निवडावे लागतील आणि जर नकारात्मक आयुष्य जगायचे असेल तर जे जसे चालले आहे ते तसेच चालू द्यायचे.

तुम्ही किती वर्षे सकारात्मक किंवा नकारात्मकतेला देतात ह्यावरून तुमची सकारात्मकता किंवा नकारात्मकता किती खोलवर रुजली आहे आणि किती मजबूत कठीण झाली आहे हे समजते.

सकारात्मकतेमध्ये एक नकारात्मकता काहीही करू शकत नाही आणि नकारात्मकतेमध्ये एक सकारात्मकता चमत्कार घडवून आणू शकते.

आकर्षण चा सिद्धांत असेच विविध प्रकारचे सकारात्मक फिल्टर आणि स्पंज आपल्या आयुष्यात लावतो ज्यामुळे तुम्ही सकारात्मक आयुष्य जगायला लागता. आकर्षण चा सिद्धांत भेदभाव नाही करत, जी व्यक्ती आकर्षण च्या सिद्धांताचा वापर करते भले ते चांगल्या कामासाठी असो किंवा वाईट ते तिला मिळतेच.

इथे अनुभवला पर्याय नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

सवा कोटी मुंबई च्या लोकसंख्येत एकटेपणा का जाणवतो?



मुंबई ची लोकसंख्या सवा कोटी. उच्च पदावर कामाला. दररोज लोकांच्या संपर्कात. सर्व व्यवसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी तरीही एकटेपणा का जाणवतो? कोणीच आपल्याला समजून घेवू शकत नाही हि भावना का उत्पन्न होते? अशी कसली मानसिक अवस्था निर्माण होते ज्यामुळे एकटेपणा जाणवतो? हा एकटेपणा फक्त त्या व्यक्तीलाच का जाणवतो? इतर समजून घेण्यात कमी पडतात का?

असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. चला मानले कि इथे बाह्य स्वरूप म्हणजे सुंदरता महत्वाची असेल पण जे सुंदर आहेत जे देखणे आहेत त्यांना देखील एकटेपणा का जाणवतो?

मितभाषी असणे, कमी बोलणे, लोकांमध्ये न मिसळणे हा स्वभाव असेल आणि ती व्यक्ती स्वतःची कंपनी इंजोय करू शकत असेल तर काही समस्या नाही. हा स्वभावाचा भाग झाला पण चार चौघात मिसळून, राहून एकटेपणा जाणवणे, कोणी आपलेसे न वाटणे हा मानसिक आजार तर नाही पण त्या व्यक्तीला भावना व्यक्त करता आली नाही किंवा तिला जसे जगायचे आहे तसे जगता आले नाही किंवा भूतकाळात अशी काही घटना झाली असेल ज्यामुळे तिला अजून त्रास होत असेल हे जेव्हा समुपदेशन होईल तेव्हाच मी सांगू शकेन.

आताची जीवनशैली देखील अशी केली गेली आहे कि एकटेपणा शिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही. कारण जिथे काम करतो तिथे जर जवळीक निर्माण केली तर गैरफायदा उचलला जातो जसे एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लोक भीतीने कुणाच्याही अंगावरून पळून जाण्यास पाठी पुढे बघत नाही तशी स्पर्धा विनाकारण निर्माण केली गेली आहे. ह्यामुळे देखील एकटेपणा जाणवतो.

काहींचे संगोपनच असे गेले असते कि खूप कमी लोक त्यांच्या संपर्कात आलेले असतात, त्यांना चार चौघात किंवा जगात कसे वावरायचे ह्याबद्दल संस्कार भेटलेले नसतात त्यामुळे त्यांना एकटेपणा येतो.

ह्यापैकी काही लोकांचे असे असते कि चुकून कोणीही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांना वाटते कि जग असेच आहे. मग हळू ती ती व्यक्ती त्यांचे शोषण करायला लागते, त्यांना वाटते कि हे प्रेमात असे चालते, विश्वासात मैत्रीच्या नात्यात असे चालते, मग शोषण हळू हळू वाढत जाते आणि जेव्हा अतिरेक होतो तेव्हा ती लोक जागे होतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशी लोक नवीन नातेसंबंध नाकारतात.

मी वर स्पष्ट केल्याप्रमाणे स्वभाव असेल आणि त्याचा मानसिक शारीरिक आरोग्यावर काही परिणाम होत नसेल तर ठीक आहे कारण अशी लोक त्यांच्या स्वभावानुसार आयुष्य इंजोय करतात, त्यांना ते एकटेपणात जे काही करतात त्याच्यात आनंद वाटतो, किंवा नुसते झोपले तरी काही समस्या नाही.

पण जिथे अंतर्मनात मानसिक शांती नसते ती लोक काय करत असतील? ती लोक काही ना काही मनोशारीरिक आजार निर्माण करतात ज्यामुळे कारण मिळते व डॉक्टर कडे जावून आपले मन मोकळे करण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांना देखील त्यांच्या मानसिकतेची कल्पना नसते, ते उपचार करतात, थोडे बोलतात व विषय तिथे संपून जातो मग परत आजारपणाचे चक्र सुरु होवून जाते.

जर त्यांना वाटले कि डॉक्टर देखील लक्ष्य देत नाही, आपण सतत जात असतो म्हणून डॉक्टर देखील आपल्याला महत्व देत नाही असे त्यांना वाटते आणि हे स्वाभाविकच असेल कारण शारीरिक रोगांवर इलाज करणारे डॉक्टर असतात त्यामुळे त्याचे लक्ष्य हे शारीरिक आजार बरे करण्यावरच असते. मानसिक आजारांचे डॉक्टर वेगळे असतात आणि तिथे उपचार पद्धती हि वेगळी असते. मग ह्या गैरसमजेतून ते मनोशारीरिक आजाराचे शारीरिक आजारात रुपांतर करतात आणि आजारपण वाढवतात.

आपला मेंदू खूप काही करू शकतो त्यापैकी एक आजारपण देखील निर्माण करू शकतो. तुम्ही एकलेच असेल कि किती चांगला आनंदी व्यक्ती होता पण अचानक सोडून गेला? त्याचे मुख्य कारण मानसिकच होते, जर ह्या मानसिकतेवर वेळेवर उपचार झाले असते तर त्या व्यक्तीचा जीव वाचवता आला असता.

आता इथे देखील स्त्री पुरुष भेदभाव वाढला आहे. जो तो येतो तो स्त्रियांकडे लक्ष्य देतो आणि पुरुषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष्य केले जाते. अनेक अध्यात्मिक गुरु देखील स्त्रियांना महत्व देतात आणि पुरुषांकडे दुर्लक्ष्य करतात. हे भांडवलशाही युगात प्रमाण वाढले आहे. जर भर रस्त्यात स्त्री रडली कि सगळे तिचे अश्रू पुसायला जातात आणि पुरुष रडला कि हसतात, हो हा आपला सुसंकृत समाज आहे. स्त्रियांची सांत्वना करण्यास अनेक पुरुष आणि स्त्रिया पुढे सरसावतील पण पुरुषांची सांत्वना करण्यात कोणीही पुढे येणार नाही आणि आले तरी खूप कमी स्त्री पुरुष पुढे येतील.

तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखी मानसिक समस्या अनेकांना आहे फक्त ते तुम्हाला समजून येणार नाही. जेव्हा व्यक्ती माझ्याकडे येते आणि स्वतःला व्यक्त करते तेव्हा समजते कि ती किती मोठ्या मानसिक आणि शारीरिक समस्येने ग्रस्त आहे म्हणून नाहीतर त्यांचे बाह्य स्वरूप हे सामान्यच दिसून येते. असेच काही गुन्हेगारांचे देखील आहे,ते आपल्या आजूबाजूला असतात पण आपण ओळखू शकत नाही, जेव्हा ते आपली शिकार करतात तेव्हा आपल्याला त्यांचे खरे स्वरूप समजून येते.

मी हे नाही बोलत कि सतत चारचौघात रहा किंवा सर्व कार्यक्रम समारंभ अटेंड करा, माझे म्हणणे इतके आहे कि जो एकटेपणा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत आहे त्यामधून बाहेर पडा आणि नंतर तुम्हाला पाहिजे तसे आयुष्य जगा. जर तुम्ही समस्येत आहात तर हाच एकटेपणा जीवघेणा ठरू शकतो त्यापेक्षा नेहमी तज्ञांची मदत घेतलेली बरी. जरी कोणी नसले तरी तज्ञ तुम्हाला मदत करू शकतात.

जर आपण कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मानसिक समस्येतून जात असाल, किंवा तुमचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण झाले असेल तर बिनधास्त व्यक्त व्हा, मी जज करत नाही कारण मला वास्तव माहिती आहे आणि तुम्ही ज्या समस्येतून गेला आहात त्या समस्येतून अनेक लोक गेली आहेत किंवा जात आहेत. आणि अनेकांनी अश्या समस्यांमुळे निर्माण झालेल्या मानसिक आणि शारीरिक आजारांवर मात करत आयुष्यात नवीन सुरवात केलेली आहे.

कृपया hi hello किंवा good morning चे मेसेज पाठवू नका, सरळ विषयावर या.

लेख कृपया नावासकट शेअर करण्यात यावा. मी मनोरंजन आणि ग्राहक मिळवण्यासाठी लेख नाही लिहित आहे तर लोकांचे जीव वाचावे ह्यासाठी लिहित आहे, ह्याच लेखांमुळे अनेक आत्महत्या करणार्यांपैकी एक आत्महत्येचा विचार सोडून परत आपले आयुष्य पुनर्जीवित करत आहे. पैसा देखील महत्वाचा आहे पण जेव्हा व्यक्तीचा जीव वाचला जातो तेव्हा मिळणारे समाधान शब्दात नाही सांगू शकत. अनुभवला पर्याय नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

चमत्कार घडवण्यासाठी, भाग्यशाली बनण्यासाठी, संधी मिळवण्यासाठी आणि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायला खूप परिश्रम घ्यावे लागते का? २४ तास ध्यान आणि इतर साधना कराव्या लागतात का? सतत सकारात्मक विचार करत बसावा लागतो का?



प्रश्न : आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी, भाग्यशाली बनण्यासाठी, संधी मिळवण्यासाठी आणि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायला खूप परिश्रम घ्यावे लागते का? २४ तास ध्यान आणि इतर साधना कराव्या लागतात का? सतत सकारात्मक विचार करत बसावा लागतो का?

उत्तर : नाही. काही लोक हि नैराश्यात जातात, परिस्थिती समोर हार मानतात आणि नकारात्मक आयुष्य जगायला लागतात. एक नकारात्मक इतका नैराश्यात जातो कि त्याची सकारात्मक बायको मुलांसोबत निघून जाते. तो आपल्या काम धंद्यावर लक्ष्य केंद्रित न करता सतत नकारात्मक विचार करत जातो आणि तिथे देखील त्याला काढून टाकले जाते किंवा नुकसानीत, कर्जबाजारी होतो. विविध आजारपण जडतात. त्याने जे आयुष्य वर्तमान आणि भविष्यात जगायला पाहिजे त्यावर त्याचा हक्क राहत नाही.

एकदा का ह्या नकारात्मक व्यक्तीने हक्क नाकारला कि जी दुसरी सकारात्मक किंवा धूर्त ह्यापैकी एक व्यक्ती सतत चमत्काराच्या शोधात असते त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतो. त्याने सोडलेल्या बायको सोबत लग्न होते व तो मुलाला देखील आपलेसे करतो. अश्या पद्धतीने त्याच्या आयुष्यात सकारात्मक व्यक्ती येते आणि तो सुखी समाधानी आयुष्य जगायला लागतो.

नकारात्मक व्यक्तीने नैराश्यामुळे सोडलेल्या विविध संध्या, बंद केलेले पैसे कमावण्याचे मार्ग हे ज्या दुसऱ्या सकारात्मक व्यक्ती शोधत असतात त्यांना मिळतात. नकारात्मक व्यक्तीला कामावरून काढले जाते तिथे सकारात्मक किंवा धूर्त ह्यापैकी एक व्यक्ती लागते व प्रगती करत जाते.

नकारात्मक व्यक्ती हिलिंग ची उर्जा आणि कंपने आपल्या शरीरात येवू देत नाही त्यामुळे तो आजारपण बरा करू शकत नाही. हीच उर्जा व कंपने सकारात्मक व्यक्ती आपल्या आयुष्यात येवू देतो आणि असाध्य, न बरा होणारा आजर देखील बरा करून पूर्णपणे ठणठणीत, धडधाकट आणि निरोगी आयुष्य जगायला लागतो.

आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी अति मेहनत करण्याची गरज नाही आहे. नकारात्मक लोक सोडतील ते सकारात्मक लोकांना भेटत जाईल. तुम्हाला फक्त जास्तीत जास्त वेळ सकारात्मक रहायचे आहे आणि आलेली संधी पकडायची आहे. इथे तुमची स्पर्धा सकारात्मक + धूर्त लोकांसोबत असेल. इथे जी सकारात्मक + धूर्त लोक असतील ती ऐश आराम घेवून जातील, आणि बाकी सकारात्मक सर्वसामान्य आयुष्य घेवून जातील. सकारात्मक व्यक्तींना कसेहि आयुष्य भेटो त्यामध्ये त्यांचा फायदाच आहे.

एकदा का तुम्ही सकरात्मक आयुष्य जगायला लागला कि अनेक वर्षे किंवा शेवट पर्यंत तुम्ही सकारात्मक आयुष्य जगायला लागता त्यामुळे फक्त तुम्हाला एकदा सकारात्मक आयुष्याचे चक्र सुरु करायचे आहे. मग हे सकारात्मक आयुष्याचे चक्र स्वतः सुरु करा किंवा तज्ञांची मदत घ्या. जर तुम्ही सकारात्मक आयुष्याचे चक्र स्वताहून सुरु करणार असाल तर जास्तीत जास्त ३ महिने द्या आणि परिणाम नाही जाणवला कि लगेच तज्ञांची मदत घ्याल.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसिक आजार २ डिप्रेशन



मानसिक आजार २

डिप्रेशन

डिप्रेशन हे तणाव, नैराश्य, उदासीनता, नकारात्मक विचार, भावना आणि शोषित भूत किंवा वर्तमान काळ ह्याचे मिश्रण आहे. तपासल्याशिवाय डिप्रेशन चे मूळ कारण समजणार नाही. आपल्या भावना ह्या गुंतलेल्या असतात म्हणून जे काही पुस्तकात देतात त्यावरून अंदाजा लावू शकत नाही. निसर्गाने मनुष्य बनवला आहे आणि मनुष्याने शास्त्र. त्यामुळे फक्त नैसर्गिक शास्त्रच डिप्रेशन वर प्रभावी उपाय कार्य शकते ना कि इतर शास्त्र.

डिप्रेशन ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची लक्षणे कशी ओळखायची?

सहसा व्यक्ती डिप्रेशन ने ग्रस्त आहे हे तिच्या वागण्या, बोलण्या आणि चेहऱ्यावरून सांगू शकत नाही. ह्या सर्व थेअरी फेल गेलेल्या बघितल्या आहेत. हसत खेळत प्रगती करणारी लग्न करून घर बसवलेली व्यक्ती सुद्धा डिप्रेशन ने ग्रस्त असू शकते. त्यामुळे डिप्रेशन चे कारण शोधणे खूप आवश्यक आहे नाहीतर किंमत संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागते.

डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि नेहमी खिन्न आणि उदास चेहऱ्याने आयुष्य जगत असते?

नाही. ती सतत स्वतःला ती आनंदी आहे हे भासवत असते. ती सर्वांना मदत करत असते. ती तत्वज्ञान देखील सांगत असते. ती जोडीदारासोबत सामान्य आयुष्य जगत असते. ती लहान मुलांसोबत सामान्यपणे खेळत असते.

डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती सतत एकटे राहणे पसंद करते?

नाही. डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि मित्रांच्या समुहात देखील असू शकते. पार्टी आणि मौज मजा देखील करताना दिसेल. पण हे सर्व वागणे वरवरचे आहे ना कि अंतर्मनातील वागणे आहे.

विभक्त कुटुंबात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते का?

नाही. सयुंक्त कुटुंबात जास्त प्रमाणात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते.

डिप्रेशन फक्त तरून, वयस्कर लोकांना होते का?

नाही. आजकाल लहान मुलांना देखील डिप्रेशन होते. मी माझ्याच मित्राच्या मुलीचे उपचार केले होते आणि ती त्यावेळेस चौथीला शिकत होती. बदललेली जीवनशैली मुळे कोणीही डिप्रेशन ने ग्रस्त होऊ शकते.

डिप्रेशन फक्त नास्तिक विश्वास असलेल्या लोकांना होते का?

नाही. ह्याचा जास्त परिणाम हा आस्तिक लोकांमध्ये दिसून आला. पण इथे उपचाराला उत्तम प्रतिसाद नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांकडून जास्त आला.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, अध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ह्यांना डिप्रेशन होते का?

हो. माझ्याकडे सर्व क्षेत्रातील डॉक्टर, अध्यात्मिक गुरु कारण जेव्हा भय्यूजी महाराज ह्यांनी आत्महत्या केली तेव्हापासून मी अध्यात्मिक गुरूंना देखील अटेंड करायला लागलो. प्रशिक्षक, सर्व प्रकारचे वक्ते हे सर्व माझ्याकडे उपचारासाठी येतात. ज्योतिष, हीलर, रेकी मास्टर आणि इतर सलंग्न क्षेत्रातील व्यक्ती देखील येतात. काही क्षेत्रातील व्यक्तींना मी ह्यासाठी अटेंड नव्हतो करत कारण प्रसिद्धी पासून दूर राहून जास्तीत जास्त लोकांना मानसिक आजारापासून मुक्त करायचे होते पण जर भय्यूजी महाराज सारखी एक व्यक्ती गेली कि खूप मोठी पोकळी निर्माण होते व नकळत लोड हा येतोच. काही कडक नियम बनवून प्रसिद्ध व्यक्तींना अटेंड केले जाते.

डिप्रेशन म्हणजे वेड लागले आहे असे आहे का?

नाही. डिप्रेशन हा मानसिक आजार आहे आणि सर्वच मानसिक आजार म्हणजे वेड लागणे नाही. वेड्या व्यक्तीचा मेंदू आणि शरीरावर ताबा नसतो आणि डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्तीचा मन मेंदू आणि आयुष्यावर ताबा असतो.

डिप्रेशन वर उपचार होतात का?

हो. डिप्रेशन वर उपचार होतात फक्त योग्य तज्ञ व्यक्ती भेटली पाहिजे.

डिप्रेशन कायमचे बरे मारू शकतो का?

जर सुरवातीपासून डिप्रेशन चे मूळ सापडले कि डिप्रेशन कायमचे बरे करू शकतो.

डिप्रेशन बरा व्हायला किती कालवधी लागतो?

जितका जुना आजार तितका कालवधी जास्त. जर तज्ञ योग्य भेटला तर लवकर बरे करू शकतो. काही लगेच बरे होतात तर काहींना वेळ लागतो. कालावधी बघण्यापेक्षा उपचारावर लक्ष्य केंद्रित करावे.

डिप्रेशन वर वयक्तिक उपचार चांगला कि सामुहिक?

डिप्रेशन वर वयक्तिक उपचार नेहमी चांगला. सामुहिक उपचार होणे शक्य नाही कारण प्रत्येक व्यक्तीची समस्या हि वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. अति खाजगी किंवा लैंगिक समस्या ह्या समूहात बोलू शकत नाही. माझ्या मते तरी वयक्तिक उपचार केल्यास उपचार उत्तम होतो आणि रिझल्ट देखील जाणवतो.


महत्वाचे मुद्दे

वेळ आणि पैसा असल्यास आपण डिप्रेशन वर आरामात मात करू शकतो.

आता ऑनलाईन मार्गाने लगेच अटेंड केले जाते व भविष्यात होणारे नुकसान टाळले जाते.

काही वेळेस डिप्रेशनवर चौकटीबाहेर जावून उपचार करावे लागतात.

समोरच्या व्यक्तीचा जो विश्वास आहे त्यानुसार उपचार करावे लागतात.

व्यक्तीचा स्वभाव देखील उपचारा अगोदर बघावे लागते.

तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारख्या समस्या अनेक लोकांना असतात फक्त ते आपल्याला माहिती नसतात. अंतर्मुखी स्वभाव असणे हा गुन्हा नाही. माझ्याकडे अंतर्मुखी स्वभावाची लोक व्यक्त होतात, त्यांना विनाकारण बडबड आवडत नाही किंवा जबरदस्तीने बोललेले आवडत नाही.

जिथे भावना जुळतात तिथे एकटेपण जाणवत नाही पण जिथे भावना नाही जुळत तिथे एकटेपण जाणवते. जर तुम्ही सयुंक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहत असाल तरी तुम्हाला एकटेपणा जाणवेन.

कोणीही तुमच्यासोबत नसले तरी मी तुमच्या सोबत आहे. बिनधास्त आपले आयुष्य जसे पाहिजे जगा. बाकी पुढच्या पुढे बघून घेवू. आयुष्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

Image by Free-Photos from Pixabay

परीक्षेच्या कालावधीत मुलांची स्मरणशक्ती वाढवून उत्तम मार्क कसे पाडायचे?



अनेक पालक सध्या माझ्याकडे मुलांच्या शिक्षणासंदर्भात तक्रारी घेवून येतात. अनेक पालक हे आता परीक्षा जवळ आली म्हणून अगदी घाई मध्ये येत आहे. त्यांना त्यांच्या मुलांच्या नापसाची भीती सतावत आहे आणि ह्यामुळे घरातील वातावरण देखील तणावपूर्ण बनत आहे.

ह्यामुळे नवरा बायको, कुटुंबातील इतर सदस्य ह्यांच्यामध्ये भांडणे होत आहेत. म्हणजे वर्षातील आणि आयुष्यातील १० दिवसांच्या परीक्षेसाठी अनेक कटुता निर्माण होत आहे. आणी ह्या भांडणामुळे जोडीदारावर सर्व राग काढला जात आहे. अगदी लहान सहान चुका देखील मोठ्या करून सांगितल्या जात आहे.

शेवटी हाच ताण तणाव मानसिक आणि शारीरिक आजारात रुपांतरीत होतो. मग कुटुंबात सुखसमाधान आणि आरोग्याची जागा हि आजारपण ताण तणाव घेते.

फक्त एका परीक्षेसाठी आयुष्यात आणि कुटुंबात इतके तणाव आणण्यापेक्षा तज्ञांची मदत घेतलेली बरी. सर्वच उपाय आणि घरी करू शकत नाही आणि जर ह्या नकारात्मक भावना साठत गेल्या तर त्यामधून नकारात्मकताच बाहेर येईल. ह्यामुळे अनेक मुल यशस्वी देखील होतील पण ते फक्त बाह्य स्वरूपाने ना कि अंतर्मनाने. त्यांना सतत त्यांचे अंतर्मन, भावना आणि विचार हे आतल्या आत खात जातील.

इतके करण्यापेक्षा घरचे वातावरण हे आनंदी ठेवा. जास्त दबाव निर्माण करू नका. बंधने मर्यादेत आणा. जेव्हा देखील मुल अभ्यास करत असेल तर हळूच आपल्या जोडीदारासोबत बोला कि "मुलगा खूप हुशात आहे, आरामात पास होईल." हाच विचार तुमचा मुलगा पकडून ठेवेल व जरी मन लावून अभ्यास नाही केले तरी त्याच्या लक्ष्यात राहील कारण तुम्ही दाखवलेला विश्वास. विश्वास चमत्कार घडवतो.

त्याच्या नकळत त्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवा. कुठे अडत असेल त्यावर उपाय शोधा. समजण्याचे एक नाही तर अनेक मार्ग आहे त्यापैकी तुमच्या मुलाला जो मार्ग सोयीस्कर वाटल किंवा ज्या मार्गाने समजेल, अंतर्मनात रुजेल त्या मार्गांचा वापर करा.

घरातील परीक्षेमुळे दुषित झालेले वातावरण काढून टाका. वास्तू शांती, वास्तू पूजा, यंत्रे ह्यांचा वापर करा. माझ्या स्पर्श उर्जा शास्त्राचा देखील वापर करू शकता. हे सर्व शास्त्र तुम्हाला तुमचे घर, शरीर शुद्ध करायला मदत करते व शुद्ध वातावरणात सकारात्मकता, भाग्य आणि चमत्कार निर्माण होवून तुम्हाला हवा तो रिझल्ट भेटतो.

संमोहन देखील उत्तम शास्त्र आहे, ह्याचा वापर करून देखील तुम्ही तुमच्यात आणि तुमच्या मुलांमध्ये प्रोग्रामिंग करून घेवू शकता ज्यामुळे त्यांना परीक्षा पास होण्यास मदत होते. संमोहन शास्त्र आणि वरील शास्त्र ८० % रिझल्ट देतातच. हे शास्त्र तेव्हाच वापायचे जेव्हा मी वर सांगितल्याप्रमाणे देखील सकारात्मक परिणाम येत नसतील तर.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जर परीक्षा तुमच्यासाठी समस्या असेल तर त्या समस्येवर मात करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मी जे वर उपाय सांगितले आहे त्याचा वापर दीर्घ कालावधीसाठी नका करू. वरील मार्ग फक्त उत्तेजन दिल्यासारखे आहे, ह्या मार्गाचा वापर फक्त जेव्हा कुटुंबात ताण तणाव वाढतो तेव्हाच करायचा आहे आईन त्यानंतर लगेच तज्ञांची भेट घ्यायची आहे. कायमस्वरूपी बदलासाठी दीर्घकाळ तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करावे लागतात.

परीक्षा पास होणे सोपे आहे पण हे जे नकारात्मक विचार आणि भावना येतात ह्यामुळे हुशार विद्यार्थी देखील येत असून सुधा नापास होतो किंवा स्वतःला कमी मार्ग पाडून घेतो. तुमची मुल हि नैसर्गिक हुशार आहे. जर नैसर्गिक मार्गांनी ते यशस्वी होत असतील तर होऊ द्या, फक्त घरचे वातावरण ठीक ठेवा नाहीतर घरच्या समस्यांमुळे मुलांवर परिणाम होतो किंवा ते परिणाम करून घेतात.

वरील मार्गांचा अवलंब करा, तुमच्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि सोबत तुम्हाला देखील. तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठीक ठेवण्यात मदत होईल.

appointment बुक करून तुम्ही माझ्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेवू शकता. ह्या कालावधी मध्ये रीस्पोंस जास्त असल्यामुळे जो पहिला येईल त्याला अटेंड केले जाईल.

अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक : Balak Palak Children Parents

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही?



उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव
मराठी आणि परप्रांतीय मधील फरक
मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही?

एक परप्रांतीय मुंबई मध्ये येतो. त्याच्याकडे काहीही नसते. पोट भरायला आणि आपले कुटुंब चालवायला काहीतरी करणे गरजेचेच आहे.

एक मराठी मुंबई मध्येच राहतो, सर्व सुखसुविधा आहेत. पोट भरण्यासाठी तर बोलू शकत नाही पण नोकरी सोडून पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो.

परप्रांतीय धंद्यासाठी पैसे जमवण्याचा प्रयत्न करतो. जास्त व्याजावर पैसे घेतो. धाडस दाखवतो. जास्तीत जास्त काही हजारांसाठी त्याला जास्त व्याज द्यावे लागते.

मराठी धंद्यासाठी घरातून पैसे घेतो. काहीही व्याज द्यायची गरज नाही. घरचे मुलगा आयुष्यात जम बसवेल ह्याचे स्वप्न बघत बसतात.

परप्रांतीय गरीब आणि दिसायला बारीक पण (पण चे उत्तर खाली भेटत जाईल)

मराठी दिसायल सुखवस्तू कुटुंबातील धडधाकट पण (उत्तर खाली भेटत जाईल)

एक व्यवसायाच्या उदाहरणाने सांगतो

परप्रांतीय पाणीपुरीची घाऊक विक्रीसाठी असलेली गोनी विकत घेतो, टेबल कोणीतरी देतो, एक केटरिंग चा व्यवसायिक त्याला पाणीपुरी साठी लागणारा माल बनवून देतो. ह्यासाठी त्याने सुरवातीला थोडे पैसे दिलेले असतात कारण त्यालाच तितके पैसे व्याजाने भेटलेले असतात. दुकान भाड्याने घेवू शकत नाही म्हणून तो रस्त्यावर एका चार रस्त्याच्या कडेला जागा शोधून ठेवतो.

मराठी जास्त भाडे असलेली जागा विकत घेतो. पूर्ण चकाचक दुकान करतो. फर्निचर वर पैसे खर्च करतो. माल जास्त पैसे घेऊन विकत घेतो. सगळीकडे फक्त पैसा ओतत जातो.

आता खरी सुरवात होते.

परप्रांतीय पाणीपुरी १० रुपये प्लेट ने विकायला सुरवात करतो. बघता बघता माल संपतो. त्याच्याकडे पैसे येतात.

मराठी दुकानाचे उद्घाटन समारंभ करतो. लोकांना बोलावतो. लवाजमा गोळा करतो. गिर्हाईक तर नाही पण कुटुंबातील आणि परिचयातील लोक असतात. ह्यावरच जास्त पैसे खर्च होवून जातात. त्या दिवशी एकही गिर्हाईक येत नाही तर समारंभाला जास्त पैसे खर्च होतात. तिथे पाणीपुरी तो ३० रुपयांना ठेवतो. सगळीकडे फक्त शो असतो व्यवसाय दिसत नाही.

परप्रांतीय पाणीपुरी च्या जास्तीत जास्त प्लेट विकतो. बघता बघता नफा वाढू लागतो ते देखील काही दिवसातच. नेहमीचे गिर्हाईक देखील इतक्या कमी वेळात तयार होतात.

मराठी फक्त ग्राहकांची वाट बघत असतो. फक्त नवीन दुकान आहे म्हणून काही म्हणजे बोटावर मोजता येईल इतके ग्राहक येतात. पाणीपुरी च्या प्लेटी विकल्याच जात नाही. बघता बघता तोटा वाढत जातो, परत त्यामध्ये पैसे टाकले जातात, पण तोटा वाढण्याचे थांबत नाही. नेहमीचे ग्राहक तयारच होत नाही आणि असले तरी खूप कमी किंवा जे काही स्वस्तात भेटेल त्यासाठी किंवा जास्त वेळ बसायला भेटते म्हणून येतात.

परप्रांतीय व्यवसायिकामुळे अनेकांचे व्यवसाय चालतात. म्हणजे पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारे सामान व जे काही गरजेचे आहे ते सर्व व्यवसाय चालतात, त्यांचा माल खपायला लागतो, पैश्यांची देवाण घेवाण होते. त्याच्यासोबत सर्व उद्योग व्यवसायाची शृंखला सुरु होते. हफ्ते किंवा लाच देखील जायला लागते ज्यामुळे त्यांना देखील आर्थिक फायदा होत जातो.

मराठी मुळे फक्त एकदा सुरवातीला दुकान चकाचक करायला इतर व्यवसायिकांना फायदा होतो पण जो महत्वाचा खाद्य पदार्थाचा व्यवसाय आहे त्या शृंखलेला काहीही फायदा होत नाही. म्हणजे एकप्रकारे फक्त लघु कालावधी साठी फायदा होतो.

परप्रांतीय व्यवसाय करायला जितकी जागा लागते तशीच जागा शोधतो आणि तिथे कायमस्वरूपी आपले बस्तान बसवतो. मग ती जागा एखाद्या दुकानासमोरची का असेना. नफ्या तोट्याचे गणित तो योग्य मांडतो आणि नफा घेवूनच जातो.

मराठी फक्त मोठ मोठी जागा शोधण्यात गुंग असतो आणि पैसे असल्यामुळे तो बिनधास्त असतो पण हाच पैसा सतत भाडे भरून दुकान चकाचक करण्यात कधी निघून जातो तेच समजत नाही. म्हणजे व्यवसाय तर उभा राहतच नाही आणि फक्त पैसे जात असतात. त्यापेक्षा फिक्स डीपोझीट मध्ये टाकलेले किंवा स्वतःवर उडवलेले बरे.

नवीन परप्रांतीय जुन्या परप्रांतीयाचे बघून दुसऱ्या खाद्यपदार्थाचे तसेच टेबल रुपी दुकान मांडतो आणि त्याचा देखील व्यवसाय अगदी कमी पैश्यात चालायला लागतो.

नवीन मराठी पिढी परत सेम चुका करत मोठे दुकान भाड्याने घेवून चकाचक करते आणि ते देखील बंद होवून जाते.

परप्रांतियाचा व्यवसाय असाच दीर्घ कालावधीसाठी सुरु राहतो आणि समोर दुकान भाड्याने जाताना बघतो, पैसे खर्च होताना बघतो, बंद होताना बघतो.

मराठी नवनवीन दुकानाचा भाडेकरू येत जातो, तो समोर चालू असलेला परप्रांतीयाचा व्यवसाय बघतो आणि काही महिन्यानी तोट्यात त्याचा व्यवसाय बंद करतो.

परप्रांतीय आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा गावावरून नातेवाईक तरुणांना संधी देतो, आपल्याकडे काम करायला लावतो व तसेच एखादा उद्योग व्यवसाय सुरु करून देतो. म्हणजे अजून एक परप्रांतीय कुटुंब सेट होते.

मराठी स्वतःच इतकी धडपड करत असतो कि त्याच्या चुकीच्या निर्णयांना तो मानत नाही आणि बोलतो कि उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, हजारो लाखो आणि करोडो रुपयांची उलाढाल करणे हि मराठी समाजाचे काम नाही, तो फक्त नोकरी करू शकतो. तो स्वतः चुकांपासून शिकत नाही आणि इतर मराठी लोकांना देखील प्रोस्ताहित करत नाही. उलट तो त्यांना उद्योग व्यवसाय करण्यापासून रोखतो.

परप्रांतीयाचे दुकान म्हणजे कौटुंबिक व्यवसाय झाला ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब मदत करते.

मराठी दुकान म्हणजे जी व्यक्ती बसणारच तिचीच जबाबदारी असणार, बाकी मदत करणार नाही किंवा घेणार नाही.

परप्रांतीय भल्या पहाटे ते रात्री उशिरापर्यंत दुकान सुरु ठेवतो, धंद्यात जम बसला तरी तो कुठे जात नाही कारण तो व्यवसाय ग्राहकांसाठी करोत ना कि स्वतःसाठी ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास बसतो आणि त्याला कायमस्वरूपी ग्राहक आपोआप भेटत जातात.

मराठी उशिरा दुकान उघडतो आणि लवकर बंद ठेवतो, सर्व सन वर, लग्न कार्य वगैरे वगैरे करत जातो आणि हजारदा दुकान बंद ठेवून ग्राहक तोडून टाकतो. मग ग्राहक त्याच्याकडे जाने बंद करतात.

जास्तीत जास्त परप्रांतीय हे समजूतदार, आणि गोड बोलणारे असतात. अति झाल्याशिवाय भांडत नाही. म्हणून ह्यांचा नकली माल देखील विकला जातो ते देखील विना तक्रारी.

जास्तीत जास्त मराठी हे उद्धट बोलणारे रागावणारे आणि नीट न समजावणारे असतात. ह्यामुळे ह्यांचा उच्च दर्जाचा माल विकलाच जात नाही आणि ग्राहक देखिल येत नाही.

परप्रांतीय मुल जर शिकत असतील तर शिक्षण पूर्ण झाल्यावर वडील जो पर्यंत दुकान सांभाळत आहे तो पर्यंत कुठेतरी नोकरी करतात किंवा पार्ट टाइम दुकान सांभाळून वडिलांना मदत करतात. आणि जेव्हा वडील बोलतात कि दुकान पूर्ण वेळ सांभाळ तेव्हा ते नोकरी सोडून पूर्ण वेळ दुकान सांभाळतात व नोकरी पेक्षा जास्त पैसा कमावतात. हि लोक कामाला नाव ठेवत नाही.

मराठी मुल शिक्षण पूर्ण झाल्यावर दुकान बंद करायला लावतात, त्यांना दुकान हे कमी दर्जाचे काम वाटते. मग आपोआप तिथे परप्रांतीय संधी उचलतो किंवा त्याला दुकान भाड्याने दिले जाते आणि परप्रांतीय सेट होवून जातो. शेवटी भाडे घ्यायचा देखील कंटाळा येतो किंवा परप्रांतीयाच्या गोड बोलण्यात अडकून दुकान त्याला विकून टाकतो.

परप्रांतीय एकदा का दुकान भाड्याने घेतले कि परत दुसऱ्या परप्रांतीयालाच देतील पण मराठी माणसाला देणार नाही. तसेच राहतील, वाट बघतील आणि मराठी आला कि त्याला काहीतरी कारण सांगून किंवा मालकाला खास करून ते दुकान मराठी माणसाला देणारच नाही. मग परप्रांतीय भेटेल व त्याला तिथे व्यवसायाची संधी भेटेल जिथे अगोरच दुकान सुरु होते व ग्राहक देखील जमले होते.

मराठी कुणालाही दुकान भाड्याने देईल आणि जास्त विचार करणार नाही त्यामुळे आज परप्रांतीय उद्योग व्यवसायात तुम्हाला दिसत आहे आणि मराठी नाही.

लिहायचे खूप आहे पण काही महत्वाचे मुद्दे मांडले आहे. इथे कुठलाही भेदभाव करायची किंवा मराठी समजला कमी दाखवायचा प्रयत्न करत नाही तर जे वास्तव आहे ते सांगत आहे.

आमचा विक्रोळी परिसर हा मराठी समाजाची लोकवस्ती आहे पण परप्रांतीय उद्योग व्यवसायात आहे. मारवाडी मध्ये तुम्हाला एकही मराठी वाणी दिसणार नाही हि परिस्थिती आहे. ते आज वाघ आहे आणि आपण बकरे. एकच मराठी होता तो देखील सोडून गेला आणि लाईन मध्ये मारवाडी दुकानदार आहे आणि एकमेकांना सांभाळून घेतात.

मराठी परप्रांतीयांसारखे नाही काय?

आहेत. बोटावर मोजण्याइतके आहेत. मी फक्त त्यांच्याकडेच जातो. वागण्या बोलण्यात आणि कामामध्ये सरस. अश्याच मराठी लोकांसोबत रहा आणि जर नसतील तर परप्रांतीय लोकांसोबत रहा, तुम्ही १०० % उद्योजक व्यवसायिक बनालच.

अशीच परप्रांतीयासारखी प्रगती केलेले अनेक मराठी आहेत, ते तुमच्या आमच्या परिसरात देखील आहे म्हणजे ह्याचा अर्थ आपल्यात देखील गुण आहेत ज्यामुळे आपण उद्योग व्यवसायात मराठी लॉबी तयार करून उद्योग व्यवसाय सुरु करू शकतो.

जास्तीत जास्त परप्रांतीय ह्यांनी शिक्षण फक्त पदवीच्या कागदासाठी घेतले आहे आणि ते पैसे कमावण्याचे सर्व मार्ग ओपन ठेवतात. जास्तीत जास्त मराठी ज्याच्यात शिक्षण घेतले आहे तोच मार्ग काहीही झाले तरी निवडतात, पगार कमी भेटला तरी निवडतात.

म्हणून मी पहिले तपासून बघतो कि समोरच्या व्यक्तीची आर्थिक मानसिकता आहे कि नाही. जर आर्थिक मानसिकता असेल तर तो आरामात म्हणजे अगदी आरामात उद्योग व्यवसाय करू शकत आणि नसेल तर त्याने नोकरी केलेली बरी. पण असे अनेक मराठी भेटले जे लाखो रुपये द्यायला तयार आहेत फक्त त्यांना उद्योग व्यवसायात पैसे टाकायचे आहे ना कि आर्थिक मानसिकता घडवायची आहे. मग शेवट काय? पैसा गेलाच. मी जरी त्यांना अटेंड नाही केले तरी दुसरा कोणी तरी त्यांना अटेंड करतो, स्वप्न दाखवतो आणि त्यांना डबघाईला आणतो. मग शेवटी ते मला फोन करून मदत मागतात आणि मी अश्यांना मदत नाकारतो. पैसा असताना माझी आठवन नाही येत आणि गेल्यावर येते ह्याला काहीही अर्थच नाही. आयुष्यात परत संधी भेटत नाही. ती लोक शिकार झाली.

माझ्यासमोर अगदी ६ महिने ते जास्तीत जास्त २ महिन्यात अनेक मराठी लोकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अनेक चेहरा ओळख किंवा परिसरात राहतात म्हणून ओळखतो. त्यांचे कमीत कमी २ लाख ते जास्तीत जास्त ५० लाख हे दुकानात घुसले आणि शेवटी ते दुकान बंद करावे लागले. नुकसान मान्य आहे पण हा शुद्ध मुर्खपणा आहे, ह्याला मी आर्थिक आत्महत्या बोलतो.

आज माझे विद्यार्थी जे कोणी आहेत ते आर्थिक भावनिक साक्षर आणि सक्षम आहेत. ते परप्रांतीय देखील आहेत आणि मराठी देखील. आणि हे सर्व दीर्घकालीन आहेत ना कि वरील सांगितल्याप्रमाणे अल्प कालावधीसाठी.

मी देखील लोकांना लोकांना स्वप्न दाखवून त्यांना लुटू शकतो पण माझा मूळ उद्देश मराठी समाज श्रीमंत आणि समृद्ध बनवणे हा आहे. पिढीजात तो श्रीमंत आणि समृद्ध राहिला पाहिजे हा आहे. भले पैसे कमावण्याचा कुठलाही मार्ग का असेना मग तिथे मराठीच असला पाहिजे हा उद्देश आहे त्यामुळे मी कुणालाही प्रशिक्षणासाठी घेत नाही आणि ह्यामुळे दर्जा उंचावून आहे आणि दीर्घकालीन विद्यार्थी माझ्या सेवेचा लाभ घेतात व स्वतहून अनेकदा फी स्वरुपात जास्त पैसे किंवा इतर भेटवस्तू देवून जातात.

माझ्याकडे पैसे कमावण्याचे २ ३ मार्ग आहेत तर माझ्या विद्यार्थ्यांमुळे माझ्याकडे माझे दोन मार्ग पकडून १०२ मार्ग आहेत आणि ह्य सर्व मार्गातून आम्हाला पैसे येत जातात, फायदा होत जातो. म्हणून मी सांगत असतो कि समविचारी कृतीशील लोकांसोबतच रहा तरच फायद्यात रहाल.

आयुष्यात सर्वांना दुसरी संधी भेटत नाही.

श्रीमंत बनणे सोपे आहे. जर तुम्हाला देखील श्रीमंतीच्या आयुष्यात झेप घायची असेल तर आजच संपर्क कराल.

धन्यवाद
अश्विनीकुमार

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

सकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात



सकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात

उद्योग व्यवसायात सपशेल अपयशी. विश्वास जागृत केला, पुढील क्षणी शक्तिशाली कंपने निर्माण झाली आणि सर्व अडथळे पार करत तोट्यात गेलेल्याला, कर्जात आकांठ बुडालेल्याला बाहेर काढले व काही महिन्यातच यशाच्या, श्रीमंती आणि सर्वांगीण समृद्धीच्या उंच शिखरावर पोहचवले.

असाध्य रोग झाला आहे? एलर्जी आहे? अपघाताने कमी किंवा जास्त अपंगत्व आल्यामुळे नैराश्याने ग्रस्त झाला आहात? जसा विश्वास जागृत होतो तसे तो सर्व आजार, न बरे होणारे आजार आणि लहान मोठे मानसिक किंवा मनोशारीरिक आजारपणामुळे निर्माण झालेले अपंगत्व बरे करतो. जर बरे न होणारे अपंगत्व असेल तर त्या व्यक्तीला इतके सक्षम करतो कि जे धडधाकट असणारी व्यक्ती नाही करू शकत ते अपंग व्यक्ती करून जाते.

सुशिक्षित बेरोजगार म्हणून फिरत होता / होती. विश्वास जागृत झाला. उत्तम नोकरी मिळाली, बढती मिळाली आणि जग देखील फिरून झाले. आता उच्च पदावर आहे. सरकारी नोकरी, सतत परीक्षा, काय करावे ते समजत नव्हते, खाजगी नोकरी करत नव्हती, विश्वास जागृत झाला आणि आज सरकारी नोकरी करत आहे.

करोडो रुपयांची कंपनी, उलाढाल, गुंतवणूक, चांगल्या वाईट मार्गाने जमवलेला पैसा आणि संपत्ती हि सांभाळायची कशी? एक कंपनी बंद पडली तर मालक तर जावू द्या पण किती तरी कंपनीत काम करणारे कामगार, कंपनीमुळे चालणारे इतर लघु उद्योग व्यवसाय आणि त्यामधील कामगार ह्या सर्वांना फटका बसतो. मालक विविध उपाय करतो, लाखो रुपये ह्यासाठी टाकतो ज्यामुळे शेकडो करोडो अब्जो रुपये वाचले जावे आणि सर्व कामगारांची नोकरी वाचावी, कंपनीची प्रगती व्हावी ज्यामुळे अजून कामगार रुजू होतील व त्यांचे कुटुंब देखील चालेल.

म्हणून मालक सतत धार्मिक व अलौकिक विधींवर लाखो रुपये खर्च करत असतो आणि त्याचा त्यांना फायदा देखील होतो. नुसती त्यांना समस्या दूर होण्यासाठी दिलेली एक अंगठी त्यांच्यातील विश्वास जागृत करते आणि तो विश्वास चमत्कार घडवत त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्या दूर करून टाकतो.

मला मार्गांशी काहीही घेणे देणे नाही, फक्त ध्येय एकच कि समोरच्या व्यक्तीची समस्या हि दूर झालीच पाहिजे आणि हाच माझ्यातील विश्वास सोबत समोरच्या व्यक्तीने माझ्यावर दाखवलेला विश्वास ह्यामुळे कितीही मोठी समस्या किंवा संकटे का असेना ते दूर होतातच.

तुम्हाला माझी काय कुणाचीच गरज नाही आहे इतकी प्रचंड क्षमता तुमच्यात आहे, जी क्षमता देवात आहे तीच तुमच्यात आहे, जी क्षमता निसर्गात आहे तीच तुमच्यात आहे, जी क्षमता ब्रम्हांडात आहे तीच तुमच्यात आहे. बस तीच क्षमता, तोच तुमच्यातील विश्वास जागृत करा आणी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवा. जर ३ महिन्यात समस्या दूर होत नसेल तर लगेच तज्ञांची मदत घ्या, वेळ घालवला तर समस्या आक्राळ विक्राळ स्वरूप घेवू शकते. आयुष्याशी मस्करी करू नका, सर्वांना परत संधी मिळत नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy