केफे कोफी डे चे मालक, संस्थापक आणि अध्यक्ष, ८००० करोड संपत्ती चे मालक व्ही. जी. सिद्धार्था ह्यांनी कर्जबाजरी झाल्यामुळे आत्महत्येचे पाउल उचलत नदीत उडी टाकून आपले आयुष्य संपवले.



केफे कोफी डे चे मालक, संस्थापक आणि अध्यक्ष, ८००० करोड संपत्ती चे मालक व्ही. जी. सिद्धार्था ह्यांनी कर्जबाजरी झाल्यामुळे आत्महत्येचे पाउल उचलत नदीत उडी टाकून आपले आयुष्य संपवले.

लक्ष्यात ठेवा कि आर्थिक फसवणूक करणे आणि आणि आर्थिक अपयशी होणे ह्यामध्ये फरक आहे.

अजून एक फरक लक्ष्यात ठेवा कि ज्याची जितकी सहन करण्याची मानसिक क्षमता असते तितकी तो सहन करू शकतो. जर सहन करण्याच्या पलीकडे गेले तर ती व्यक्ती नैराश्येत जाउन आत्महत्या करते.

आता इंटरनेट, सोशल मिडिया ची अजून एक काळी बाजू अशी आहे कि ज्यामध्ये काहीही माहिती नसताना तिखट मीठ लावून बातमी ट्रोल केली जाते ज्याचे प्रचंड मोठे नुकसान हे कंपनीच्या ब्रांड आणि मालकाला उचलावे लागते.

ट्रोल हा एक प्रकारे मानसिक रोग, विकृती आहे. अश्या मानसिक रोगी आणि विकृतांपासून लांब रहा. मग ते वाईट बोलणारे असो किंवा चांगले कारण त्या दोघांनी त्या वेळेस तुम्हाला संपर्क केला असतो जेव्हा तुमची एक चुकी बघितली जाते.

महाराष्ट्रात देखील अशी उदाहरणे बघितली आहे जिथे महापुरुष, राजे महाराजे, देव देवता आणि संतांचे फोटो लावून ट्रोल करत बसतात. ते जिथे जीव जातो तिथे देखील जे झाले ते योग्यच झाले हे सांगण्याचा प्रयत्न करतात, इतक्या खालच्या पातळीपर्यंत ट्रोल करणारे जातात.

ज्याची ८००० करोड ची संपत्ती आहे जरुरी नाही कि तो प्रत्येक समस्येला तोंड देवू शकतो. आयुष्यात असे दिवस येतातच जिथे आपण हतबल होवून जातो व शेवटी आपण आपले आयुष्य संपवतो. असे अनेकदा मानसिक दृष्ट्या सक्षम असलेल्यांसोबत देखील घडते.

मानसिक आजारांचे कृपया घरगुती उपाय करत जावू नका, तज्ञांची मदत घ्या. सतत आत्मविकास करत रहा ज्यामुळे तुम्ही कुठल्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार रहाल. यशाची हवा डोक्यात शिरून आत्मविकास बंद करू नका नाहीतर आयुष्य खूप जोरदार तुम्हाला जमिनीवर आपटेल, इतक्या जोरात आपटेल कि परत तुम्ही उभे राहू शकणार नाही. नेहमी स्वतःला शिष्याच्या स्वरुपात ठेवा. गर्वाच्या जागी स्वाभिमान ठेवा.

जो ८००० करोड संपत्ती कमवू शकतो, जो ४००० करोड ची उलाढाल करू शकतो आणि जो ६००० करोड च्या कर्जत बुडू शकतो किंवा नुकसान करू शकतो त्याची पात्रता, लायकी आणि क्षमता हि १८००० करोडची आहे. मी इथे ६००० करोड चे कर्ज, नुकसान बोलत आहे ते उद्योग व्यवसायात झालेले आहे ना कि घोटाळा केलेला आहे, इथे दोघांची तुलना करू नका.

यशस्वी उद्योजकांपेक्षा अयशस्वी, कर्जात बुडालेले उद्योजक व्यवसायिक जास्त आहे मग काय ते यशस्वी नाही? हो ते देखील यशस्वी आहेत, जो प्रयत्न करतो तो तो यशस्वी आहे आणी जो नाही करत तो अयशस्वी. पण बोलबाला फक्त आणि फक्त यशस्वी लोकांचा केला जातो, सत्कार देखील त्यांचाच केला जातो, हि समाजाची काळी बाजू आहे. म्हणून मी बोलत असतो कि गर्दीपासून लांब रहा आणि समविचारी, समकृतीशील, वेळेला धावून येणार्यांसोबत रहा.

लोकांचा, समाजाचा विचार करू नका. तुम्ही जेल मध्ये गेला तरी चालेल पण आत्महत्या करू नका. तुम्ही जिवंत रहाल तर तुमच्यापासून लोकांना शिकायला भेटेल. तुम्ही लोकांना जेल मध्ये राहून देखील मदत करू शकता. तुमची क्षमता आणि लायकी जी करोडो आणि अब्जोंची आहे तीच राहील ना कि कमी होईल. जे कधी तुमचे नव्हते ते तुम्हाला नाव ठेवणारच, मग ते कोणीही असो.

सांगायचे तात्पर्य इतकेच कि तुम्ही अपयशी होत असाल तर अपयशाच्या खोल दरीत पडताना घाबरू नका, बिनधास्त तळ गाठा, हात पाय गेले तरी चालतील फक्त काहीही करून डोके वाचवा कारण ह्याच डोक्यातील मेंदू चमत्कार करतो आणि हे मी अनुभवातून बघितले आहे. नंतर त्या खोल दरीतून तुम्ही जी झेप घेता ती तुम्हाला यशाच्या अमर्याद अंतराळात घेवून जाते.

एका व्यक्तीचा जीव गेला आहे त्यामुळे हा लेख कुठलाही तज्ञ म्हणून नाही तर निर्सगाने निर्माण केलेला एक मनुष्य प्राणी ह्या नात्याने लिहित आहे.

व्यवसायिक अपयशामुळे आत्महत्येचे विचार येत आहेत तर आजच संपर्क करा.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

परप्रांतीय कमी खर्चात करत असलेला इडली चा कौटुंबिक व्यवसाय व त्यामधून मिळणारा नफा


धारावीत दिवसाला ३ लाख इडली वडे बनवले जातात व मुंबई च्या रस्त्यावर दुपारी २ वाजेपर्यंत सर्व च्या सर्व माल विकला जातो.

वेळ रात्री २ वाजून ४५ मिनिटे. ३५ वर्षाचा नवरा आणि २९ वर्षाची बायको हे दोघे मिळून १० बाय १० च्या खोलीत  इडली वडे बनवत होते. ती खोली भले जुनाट वाटत असली तरी बऱ्याच प्रमाणात स्वच्छ होती. पैश्याचे सोंग घेवू शकत नाही.

बायको इडली वडे बनवते आणि नवरा ते विकतो.

एका मोठ्या पातेल्यात इडली वडे ठेवतात व वर दोन स्टील च्या डब्यात सांबार आणि चटणी भरलेली असते.

तामिळनाडू मधील दुष्काळी भागातून स्थलांतरित झालेली हि कुटुंबे आहेत जी जगण्यासाठी जो पैसा लागतो ते कमावण्यासाठी धडपड करत आहेत.

जिथे काही तमिळ लोक हि दुष्काळामुळे आपली शेती सोडू इथे आले होते तर काही लोक हि जेव्हा सरकार ने जेव्हा मुंबई मध्ये दारू बंदी जाहीर केली होती तेव्हा धारावीतील एक कृप्रसिध्द गुंड दारूची तस्करी करत होता तेव्हा त्याने अनेक तमिळ लोकांना तस्करीसाठी कामाला ठेवले होते. ह्या कामासाठी देखील अनेक लोक तमिळ मधून स्थलांतरित होऊन मुंबई मध्ये पैसे कमावण्यासाठी आले होते.

इडली आणि वडे हे बनवण्यासाठी सोपे आहेत आणि सोबत त्यांची चव हि जवळपास सर्वांना आवडते. जवळपास २५० च्या घरात काहींचे दररोजचे ठरलेले ग्राहक आहेत. अधिकतर इडली विकणारे फेरीवाले हे दिवसाला ५०० ते १००० रुपये हे घरी घेवून जातात. पावसाळ्यात त्यांना मंदी चा सामना करावा लागतो.

इडली फक्त ग्राहकांना विकत नाही तर काही सरळ होलसेल मध्ये हॉटेल, केटरिंग सर्व्हिस, पार्टी आणि लग्नात देखील सप्लाय करतात. जर एका परिसरात २ ३ इडली वाले असतील तरी त्यांच्यात वाद होत नाही, कारण प्रत्येक जन ठराविक प्रमाणात इडली वडे घेवून येत असतो व जवळपास सर्वांचा माल हा संपून जातो. इथे स्पर्धा नाही, प्रत्येक इडलीवाला आपला माल संपवून घरी जातो.

नवरा बायको दोघे मिळून हा व्यवसाय चालवतात. जे उद्योजक व्यवसायिक आहेत त्यांनी लग्नासाठी जोडीदार निवडताना हि अट ठेवा.

नाही बोलले तरी ह्या व्यवसायात ३० % नफा आहे आणि माझे जे हॉटेल व्यवसायिक विद्यार्थी आणि मोटर आहे त्यांच्यानुसार ५० % पर्यंत नफा जातो. हा कौटुंबिक व्यवसाय जर २५०० रुपयांचे चे इडली वडे विकले गेले तर ७५० रुपये तरी निव्वळ नफा देतो.

आठवड्याचे ६ किंवा ७ दररोज न चुकता ते तुम्हाला व्यवसायाच्या जागी दिसतील. ह्यामुळे जे कामाला जाणारे आहेत ते कधीही उपाशी पोटी कामाला जात नाही. ह्याला बोलतात विश्वास जो गरज आणि कृतीतून निर्माण होतो.

व्यवसायाची वेळ रात्री ३ ते दुपारी २. सर्वच व्यवसाय काय सकाळी ९ ते रात्री १० च्या वेळापत्रकानुसार चालत नाहीत.

मुंबई मध्ये भाषेवरून कट्टरता नाही आहे म्हणून त्यांचा व्यवसाय हा तेजीत चालायला लागला. एक वास्तव हे आहे कि मी जेव्हा इडली चे पार्सल घ्याला जायची तेव्हा मी मराठीत बोलायचो तर समोरील विकणारी व्यक्ती हि तुटके फुटके हिंदी बोलायची पण मराठी नाही. आम्ही जर इतकी माणुसकी दाखवतो तर त्या बदल्यात परतफेड मराठी भाषा शिकणे काहीच नाही.

माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना मला काय सांगायचे आहे ते समजले असेल. अजून भर म्हणून मी हे सांगतो कि असे कुठले मराठी पारंपारिक पदार्थ आहे जे इडली वड्याची जागा घेतील? असे कुठले मराठी पारंपारिक पदार्थ आहे जे इतक्या सोप्या पद्धतीने बनवता येतील? असा कुठला पारंपारिक मराठी पदार्थ आसे ज्याची चव हि सर्वांना आवडेल अशी असेल? ह्याबद्दल संशोधन कराल. थोडे बदल करावे लागले तर ते देखील कराल.

अनेक मराठी लोक हे गरीब वस्तीत राहतात ते देखील असे प्रयोग करू शकतात. सुरवातीला सर्व अपयशी होतात तसे तुम्ही देखील व्हाल, हार माणू नका, प्रयत्न करत रहा, यशाचे शिखर तुम्ही गाठलाच हि अपेक्षा नाही तर खात्री आहे माझी.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

मुंबई मध्ये लक्षणीय रित्या मराठी दुकानदारांची संख्या कमी का होत आहे?



मुंबई मध्ये लक्षणीय रित्या मराठी दुकानदारांची संख्या कमी झाली आहे. एक काळ होता जेव्हा गुजराती, मारवाडी आणि इतर परप्रांतीय समुहांची दुकाने कमी प्रमाणात होती आणि मराठी माणसांची दुकाने हि जास्त प्रमाणात होती. नंतर मराठी माणूस हा स्वतः दुकान चालवायचे सोडून भाड्याने द्यायला लागला, घरी मुलांना नीट संस्कार न भेटल्यामुळे मुलांनी देखील दुकानाकडे दुर्लक्ष्य केले आणि शेवटी ते दुकान मारवाडी ह्याने विकत घेतले.

एकदा का दुकान मारवाड्याकडे गेले मग ते त्यांच्याच समाजात फिरत बसते आणि मराठी दुकान गेले, घर गेले व मुंबई च्या बाहेर ठाणे कल्याण दहिसर आणि वाशीच्या पुढे रहायला गेला. आज परिस्थिती अशी आहे कि लाईनीत मारवाड्यांची किराणामालाची, स्टेशनरी ची, मेडिकल ची महत्वाची दुकाने आहेत जिथे काही ग्राहकांना दिवसातून एकदा हे जावेच लागते आणि हे न संपणारे नफ्याचे चक्र आहे. म्हणून मारवाडी आज श्रीमंत आहेत. त्यांनी आपल्यावर मात नाही केली तर आपण मागे हटलो. इतरांना दोष देवून काहीही फायदा नाही.

पुढचा ठेच, मागचा शहाणा.

भावनिक मुद्द्यांपासून, लोकांपासून लांब रहा आणि सर्व लक्ष्य हे आर्थिक प्रगतीकडे केंद्रित करा. हि मी जिथे सुशिक्षित मराठी राहतात तिथली परिस्थिती मांडली आहे, ज्या गावच्या जमिनी परप्रांतीयांनी घेतल्या आहेत त्याचे काय? त्याची तर माहिती आम्हाला भेटत नाही. जी माहिती भेटते ती फक्त वादविवादाच्या मुद्द्यांची.

गुजराती आणि मारवाड्यांना मारामारी करता ये नव्हती आणि नाही तरीही ते मुंबई सारख्या ठिकाणी जिथे कधी काळी गुंड आणि स्मगलर्स ह्यांचे वास्तव्य होते अश्या वेळ पासून आपले दुकान चालवत आहेत. त्या वेळेस मराठी लोकांचा दबदबा देखील होता पण शेवटी आज परिस्थिती अशी आहे कि जिथे मराठी लोकांनी जागा काबीज केल्या होत्या त्या कालांतराने त्या परप्रांतीयांच्या घश्यात गेल्या.

काही सत्य उदाहरणे अशी आहेत जिथे झोपडपट्टी होती ती जागा एका युपी च्या व्यक्तीने काबीज करून ठेवली होती, अनेक वर्षे गेली आणि आज तिथे मोठी इमारत उभी राहिली कारण जवळपास तिथली सर्व जागा हि त्याच्या नावे होती. आज तो २० ३० वर्षांनी करोडपती झाला. अशी उदाहरणे मुंबई मध्ये खूप आहेत.

ते कुणाच्या ना अध्यात ना मध्यात, काही झाले तरी दुसऱ्यांना हाताशी धरून आपले काम काढून घेतात. जे शहराचे कायदा व सुव्यवस्था सांभाळतात, जे शहराचे व्यवस्थापण बघतात त्यांच्या कर्मचार्यांना आणि अधिकार्यांना सतत चिरीमिरी देवून आपले खास बनवून घेतात.

जिथे मारवाड्यांचे दुकान असते त्या समोरच्या नाक्यावर स्वतः ची रूम असलेली मराठी तरून मुल उभे असतात, त्यांचे विषय हे संपूर्ण पणे वेगळे असतात. दारू, मुली, सन, उस्तव, जयंती ह्यापुरते त्यांचे अस्तित्व असते आणि शेवटी जस जसे वय वाढत जाते तस तसे ते मुंबई बाहेर फेकले जातात.

जर कुठल्या मारवाड्याची बायको किंवा मुलगी सुंदर असेल तर त्या ग्रुप मधील काही मुल तिला पटवण्याचा प्रयत्न करत बसणार आणि नाही जमले तर तिची बदनामी करणार. शेवटी हातात काही लागत नाही.

इथे नाक्यावर मराठी मुल तर समोर मारवाड्याचा मुलगा हा दुकान सांभाळत असेल, जेव्हा दुपारचा खाली वेळ भेटेल तेव्हा मारवाड्याचा मुलगा हा त्या मुलांसोबत थोडा वेळ घालवेल आणि जेव्हा गिऱ्हाईकांची गर्दी वाढेल तेव्हा तो परत जावून दुकान सांभाळेल.

नवीन जोडपे येते तेव्हा ते दुकान घेतात, तिथेच दिवसरात्र राहतात, तिथेच नवरा बायकोचा शरीर संबंध प्रस्थापित होतो, तिथेच मुल जन्माला येते, मुल मोठे होवून शाळेत जायला लागते, दुकानातील गिर्हाईक वाढत जातात, प्रगती होते, जवळच एक खोली भाड्याने किंवा विकत घेतात व आपल्या कौटुंबिक यशाचा आनंद घेतात.

मराठी दुकानदारांसाठी इतकेही नैराश्याचे क्षण नाही कारण मला असे मराठी दुकानदार भेटले जे गुजराती, मारवाड्यांच्या तोडीस तोड आहेत पण त्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी आहे. जास्तीत जास्त मराठी दुकानदारांचे अनुभव हे वाईट आले.

गुजराती आणि मारवाड्यांच्या मुलांकडे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात तर मराठी मुलांकडे फक्त नोकरी. गुजराती आणि मारवाड्याची मुल लहानपणापासून व्यवहार शिकतात तर मराठी मुल हि खेळ. गुजराती आणि मारवाड्याची मुल हि भावनेला ताब्यात ठेवतात तर मराठी मुल हि वाहून जातात.

शेवटी लक्ष्यात ठेवा कि पैसाच कामी येतो. ज्याचे कोणी आयसीयु मध्ये भरती आहे आणि त्याच्याकडे पैसा नाही अश्यांची काय अवस्था होत असेल तो विचार करा. अनेकांकडे साधे दररोज चे पोट भरण्यासाठी देखील पैसे नाही आहेत ते कसे दिवस काढत असतील, नुकत्याच जन्म झालेल्या आईला अन्न भेटत नसल्यामुळे दुध येत नसेल तर ती कशी करत असेल?

मुलभूत गरजांकडे लक्ष्य ठेवा आणि ते पूर्ण करा, फक्त तुमच्या कुटुंबापुरते तुम्ही बघितले तरी चालेल कारण एक तरी मराठी कुटुंब हे पैश्यांअभावी गरीबित खितपत तर नाही पडले हीच माझ्यासाठी आनंदाची बाब झाली.

आपण प्रत्येकाला बदलू नाही शकत पण आपण बदललो कि आपले बघून इतर देखील बदलतील, वेळ प्रसंगी आपण त्यांना थोडी मदत देखील करू शकतो.

लिहायचे खूप आहे पण इथेच थांबवतो. अजून इतर समाजाची काळी बाजू हि मी मांडली नाही ती तुम्हाला अनुभवाने शिकायची आहे. इथे लोक भावनिक आहे आणि कल्पनेत रमतात त्यामुळे त्यांना आपला आयुष्यातील काळी बाजू बघण्यात काहीही रस नसतो कारण त्यांना जागे व्हायचे नसते अश्यांना झोपून राहू द्या, तुम्ही फक्त जे प्रगती करत आहेत जे कृतीशील आहे अश्यांसोबातच रहा.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.



नोकरी करणार्यांनी उद्योजक व्यवसायिक ह्याबद्दल विनाकारण प्रोस्ताहित होवून आपली नोकरी सोडून उद्योग व्यवसाय सुरु करू नका. हा फक्त गाजावाजा आहे. उलट ८ तास कामाचे तास आणि कामापासून ३ किलोमीटर च्या परिसरात घर ह्या तुमच्या मुलभूत गरजा आहेत. तुमच्या हक्कांवर, पगारातील पैश्यांवर अनेकांनी गदा आणत ते श्रीमंत उद्योजक आणि व्यवसायिक झाले. ज्याची स्वतः ची कंपनी असेल तो ८ काय ४८ तास देखील काम करेल तो त्याचा स्वतःचा निर्णय आहे पण जर कर्मचार्यांना थांबवून काम करून घेत असेल तर ते चुकीचे आहे. उद्योग व्यवसायाच्या काळ्या बाजूमध्ये कामगारांचे शोषण देखील येते पण हे दाबून ठेवले जाते.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया



जेव्हा पहिले १० उद्योगांची यादी बघतो तेव्हा असे दिसून येते कि भले मुख्य कार्यालय हे मुंबई मध्ये का असेना पण त्यांच्या मालकांचा जन्म हा महाराष्ट्राच्या बाहेर झालेला असतो. भले सर्व च्या सर्व १० मराठी नको पण कमीत कमी १ तरी उद्योजक त्या यादीत असा पाहिजे ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला असावा आणि त्याचे आडनाव देखील मराठी असावे. म्हणजे २०१९ मध्ये देखील आपण मागे आहोत. पुढील १० वर्षांचे लक्ष्य ठेवले कि मी खात्रीशील सांगू शकतो कि एका तरी मराठी उद्योजकाचे नाव हे भारतातील १० श्रीमंत उद्योजकांच्या यादीत येईल. हे नाव तुमचे देखील असू शकते, तुम्ही एक पाउल तरी उचला. सर्वकाही शक्य आहे.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

मराठी तरून तरुणींना "कुठला व्यवसाय करू?" "कुठली नोकरी करू?" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर


मराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटेल तिथे ओळख काढून उद्योग व्यवसाय सुरु करतात किंवा नोकरीला सुरु करून दिवसाला किंवा महिन्याला पगार मिळवायला सुरवात करतात आणि आश्चर्याची गोष्ट हो असते कि त्यांच्याकडे रहायला घर देखील नसते म्हणजे विचार करा जर आपण मुंबई मध्ये राहून आपले घर असून आपण कमी का कमावतो? कमावण्याचे इथे मी फक्त कायदेशीर मार्गांबद्दल बोलत आहे ना कि बेकायदेशीर मार्गांबद्दल.

अनेकांना वाटते कि भ्रष्टाचार हा फक्त सरकारी नोकरी मध्ये होतो ना कि खाजगी. हा साफ खोटा गैरसमज आहे. माझ्या संपर्कात अशी लोक होती ज्यांचा पगार कमी पण कंपनीला आणि त्यांच्या ग्राहकांना फसवून त्यांनी प्रचंड पैसे कमावले व स्वतःचे घर देखील घेतले. इथे नियम एकच लागू होतो तो म्हणजे जो पकडला गेला तो चोर.

मी जेव्हा नोकरीला होतो तेव्हा मी एक एक पैश्यांचा हिशोब मालकाला द्यायचो आणि तुटपुंजा पगार घेवून घरी यायचो आणि त्याच कंपनीत माझा जो परप्रांतीय मित्र होता तो लेडीज बार मध्ये पैसे उडवत बसायचा. तरीही शेवटी थोड्याश्या अनबन मुळे मालकाने मला काढून टाकले आणि तो परप्रांतीय मुलगा अजून देखील त्याच कंपनीमध्ये कामाला आहे.

भ्रमात राहू नका. लोक कुठकुठच्या मार्गांनी पैसे कमावतात हे मला बिलकुल माहित नव्हते पण जस जसे परप्रांतीय संपर्कात आले, मराठी लोकांशी संपर्क थोडा कमी झाला तस तसे मला विवध मार्ग दिसू लागले आणि जेव्हा एक मार्ग वापरून बघितला त्यातील पैसे कमावणे किती सोपे असते हे बघितले तेव्हा समजले कि परप्रांतीय इतके पैसे कसे कमावता ते.

जर तुम्ही धाडसाचे बोलत असाल तर कोण बोलते कि मराठी तरुणांमध्ये धाडस नाही आहे म्हणून? पण त्यांना असे संस्कार दिले जातात कि ते फक्त आणि फक्त गुलाम म्हणून जगले पाहिजे. नोकरी केली तरी मालक जे शोषण करून पगार देत असतो त्यामध्ये समाधान मानायला सांगतात मग मालक काय शोषण करतच बसतो. मी जेव्हा काम करायचो तेव्हा मला वाटायचे कि मी इमानदारीने काम करतो आणि मालक देखील पण जेव्हा त्याने मला सी ए कडे त्याची फाईल घेवून पाठवले तेव्हा कळाले त्याची कमी किती आणि तो पगार किती देतो.

फक्त पैसे कमवत आहे म्हणून ती व्यक्ती चांगली असा अर्थ होत नाही. राजकारणी लोक सोडून जर कोणी मराठी पैसे कमवत असेल तर लोकांना ते बघवत नाही आणि तिथेच परप्रांतीय घोटाळे करून करोडोची संपत्ती जमवत असेल तर ते त्याची चर्चा करत बसतील. हे जे वास्तव सांगत आहे ते के बघितले आहे पुराव्यानिशी ते सांगत आहे. तरीही एक प्रश्न यायचा कि मग इन्कमटॅक्स आणि इडी ह्या खात्यातील कर्मचारी काम करतात तरी काय? नंतर ह्या प्रश्नाचे विचार करणे सोडून दिले.

महत्वाची बाब म्हणजे जे परप्रांतीय आहे त्यापैकी काही बिलकुल मारा मारी करत नाही, आणि ह्यामध्ये तर मराठी तरून पुढे होता. तरीही त्यांचे धाडस इतके असते कि ते ब्लेकमेल करायला पाठी पुढे पाहत नाही. ते प्रयत्न करतात जर हा घाबरला तर मला पैसे देईल आणि नाही तर धमकी देवून सोडून देईल, जास्तीत जास्त मारेल पण मारून टाकणार नाही म्हणून १०० पैकी ५ तरी त्यांच्या जाळ्यात फसतातच.

वास्तव आयुष्यात जगायला शिका. सिनेमा वेगळा आणि त्या सिनेमामध्ये कोणा कोणाचे पैसे लागले तो देखील एक संशोधनाचा भाग आहे. वास्तव आयुष्यात जर तुम्ही संधी चा फायदा नाही उचलला तर दुसरा ती संधी घेवून जाईल. संधी प्रत्येक ठिकाणी असते तुम्हाला ती फक्त शोधायची आहे, नसेल तर निर्माण करायची आहे जसे माझ्या ऑफिस मधील मित्राने निर्माण केली तशी, पगार कमी वर कमाई जास्त.

तुम्ही आणि तुमचे पैसे कमावण्याचे मार्ग हे गुप्त ठेवा. खासकरून जर तुमचा जास्तीत जास्त संपर्क हा मराठी लोकांसोबत येत असेल तर, आणि सहसा परप्रांतीय लोकांसोबत चर्चा करताना देखील तुमचे पैसे कमावण्याचे मार्ग उघड करू नका हा पण ते कुठ कुठल्या मार्गाने पैसे कमावतात हे त्यांच्या काढून जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

फक्त आणि फक्त समविचार आणि सम कृतीशील लोकांसोबतच रहा. समविचारी लोकांसोबत राहिल्यामुळे तुम्हाला सतत विरोधाचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे तुम्ही नैराश्यात जाणार नाही. सम कृतीशील म्हणजे जिथे लोक भावनिक सणांच्या सुट्ट्या घेत असतील तिथे तुम्ही तुमच्या साथीदारासोबत नवीन संधी साधण्यासाठी कामावर जात असाल.

म्हणून मी माझ्या प्रत्यके लेखामध्ये बोलत असतो कि जर आर्थिक मानसिकता, साक्षरता आणि भावनिक दृष्ट्या सक्षम असाल तरच उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक किंवा मोठ मोठ्या आर्थिक व्यवहारात उतरा, धाडस दाखवा नाहीतर पहिले आर्थिक दृष्ट्या साक्षर व्हा, सक्षम व्हा, मानसिक दृष्ट्या समक्ष आणि साक्षर व्हा त्यानंतरच मोठ मोठ्ये आर्थिक व्यवहारांकडे वळा.

श्रीमंत बनण्याच्या वाटेवर भले तुमची गाडी कितीही मोठी असली तर तुम्हाला एकट्यानेच प्रवास करायचा आणि आणि अश्या अनेक गाड्या त्या मार्गाने जात असतात. प्रत्येक जन आपल्या कामात व्यस्त असतो कोणीही बाहेर बघत नाही.

जागृत झाला असाल तर बिनधास्त मोठी झेप घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.


धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया


संस्कृती मध्ये फक्त धर्म आणि अध्यात्म नाही तर आपली उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीची संस्कृती देखील येते. विदेशी औद्योगिक संस्कृती च्या नादाला लागल्यामुळे आपले स्थानिक शेती शेती निगडीत व सूक्ष्म, लघु, मध्यम हा धोक्यात आले व काही वर्षात तो संपूर्ण कुण्या एका मोठ्या कंपनीच्या हातात जाईल. आता देखील वाटचाल त्याच दिशेने चालली आहे. राजकारणी, धर्म कारणी आणि समाज कारणी ह्यांच्या नादि लागू नका कारण एकदा का कुण्या एका मोठ्या कंपनीने बाजारपेठ काबीज केली कि अनेक वर्षे ती शोषण करूनच सोडेल.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

ब्लॉग लिंक : http://www.udyojakghadwuya.com/2019/07/blog-post.html

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

तुमची निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे?



दिवसभरात तुम्ही जे निर्णय घेतात त्यापैकी विनाकारण वेळ वाया घालवणारे निर्णय किती घेता?

तुमचा वेळ आज कुठले कपडे घालू ह्याचा विचार करण्यात तर नाही जात आहे ना?

उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार ह्यांना वेळेचे फार बंधन असते. उद्योजकांना कधीही कुठेही जावे लागते त्यासाठी त्यांना तश्या प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक असते आणि महत्वाचे म्हणजे आज कुठले कपडे घालू ह्या नको त्या तोट्याच्या विचारात वेळ घालवू शकत नाही.

फक्त उद्योजकच नाही तर तुम्ही कोणीही असा फक्त एक लक्ष्यात ठेवा कि तुम्ही विनाकारण तुमचा बहुमुल्य वेळ विविध डिझाईन चे कपडे खरेदी करण्यात तर घालवत नाही ना?

वेळ हि न भरून निघणारी संपत्ती आहे. आज तुम्ही शाळेत किंवा कॉलेज मध्ये आहात पण बघता बघता हे दिवस निघून जातील व तुम्ही अश्या ठिकाणी पोहचाल जिथे तुम्हाला वेळेचे महत्व समजून येईल.

जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल तर तुम्ही डिझाईन आणि स्टाईल ह्यावर लक्ष्य केंद्रित न करता तुम्हाला गणवेशासारखे कपडे घालावे लागतील ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ कुठले कपडे घालु ह्या मध्ये न घालवता तुम्ही तुमच्या ध्येयावर वर्तमानातील कामावर लक्ष्य केंद्रित करू शकता.

आता आपण यशस्वी उद्योजकांचे उदाहरण घेवू ज्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ वाचवता येईल व त्याचा वापर करून तुम्ही तो वाचलेला वेळ हा आत्मविकासासाठी वापराल.

स्टीव्ह जॉब : काळ्या रंगाचा टरटल नेक टी शर्ट आणि निळी जीन्स.

मार्क झुकसबर्ग : राखाडी टी शर्ट आणि निळी जीन्स.

मतील्डा काह्ल (आर्ट डायरेक्टर सोनी कंपनी) : सफेद ब्लाउज आणि काळी पेंट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा : राखाडी किंवा निळ्या रंगाचे सूट.

हा लेख फक्त उद्योजकांसाठी नाही तर ज्यांना ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे, ज्यांना विनाकारण वेळ वाया न घालवता ध्येय साध्य करण्यासाठी आपले आवडीचे काम करण्यासाठी ज्यांना वेळ हवा आहे त्यांना त्या सर्वांसाठी आहे. वेळ हि कधीही न भरून निघणारी संपत्ती आहे, त्याचा योग्य वापर करा, आज जिवंत आहोत पण उद्या किंवा पुढच्या क्षणी नसू म्हणून जे कामाचे आहेत त्यावरच लक्ष्य केंद्रित करा आणि ते निर्णय घेण्याची सवय लावून घ्या.

यशावर कुणाची मक्तेदारी नाही आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. यशाचे नियम सर्वांना एकसारखेच आहे. जो ते नियम वापरेल तो यशस्वी बनेल जसे भौतिक शास्त्राचा गुरुत्वाकर्षणाचा नियम.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

https://www.flickr.com/photos/scobleizer/5179395448/in/photostream/
https://www.flickr.com/photos/acaben/541326656