बहुतांश लोकांचे दोन आयुष्य असतात : जे आयुष्य आता जगत आहे ते आणि जे आयुष्य त्यांची जगण्याची क्षमता आहे ते.

स्टीव्हन प्रेसफिल्ड (लेखक)

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

आपल्यामधील काही गैरसमज दूर करा


चूक - उद्योजक बनायला खूप मेहनत करावी लागते.
बरोबर - उद्योजक बनणे खूप सोपे आहे. फक्त आवड आणि इच्छाशक्ती लागते. काही एका प्रयत्नातच आणि मेहनत न घेत सुरवातीपासून उत्तम व भरभराटिचा व्यवसाय करतात, काही थोड्या प्रयत्नाने, काही अथक प्रयत्नाने व काही जे बनतच नाही पण प्रयत्न करतच असतात. हे मानसिकतेशी आणि स्वभावाशी संबधित आहे.

चूक - उद्योजक उच्चशिक्षित असतात आणि त्यांनी नावाजलेल्या विद्यापीठामधून पदवी घेतली असते.
बरोबर - उद्योजक शाळेबाहेर प्रत्यक्ष व्यवहारिक अनुभव घेवून तयार होतो.

चूक - गरीब लोक उद्योजक बनू शकत नाही.
बरोबर - उद्योजक बनणे हे संपूर्णपणे मानसिकतेशी निगडीत आहे त्यामुळे कोणीही, जगाच्या पाठीवर कुठेही उद्योजक बनू शकतो.

चूक - फक्त वाममार्गाने मोठा उद्योजक होऊ शकतो.
बरोबर - प्रत्येक माणूस हा आपल्या स्वभावानुसार राहतो व त्यानुसार त्याचा उद्योग चालवतो. आणि दोन्ही प्रकारचे मोठे उद्योजक आपल्याकडे आहेत, मी त्यांच्या नावाचा उल्लेख इथे करणार नाही.

चूक - उद्योजक बनायला १८ वर्षे पूर्ण असावी लागतात.
बरोबर - उद्योजक बनायला वयाची मर्यादा लागत नाही कारण हा संपूर्णपणे मानसिक खेळ आहे. जेवढे कमी वयाचे उद्योजक भारताबाहेर जगात आहेत त्यापेक्षा जास्त त्यांचे प्रमाण भारतात आहे हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष उद्योगाला सुरवात कराल तेव्हा अनुभवास येईल.

चूक - ज्यांनी उद्योग करायचा प्रयत्न केला ते आज भिकेला लागलेत किंवा रस्त्यावर आले आहेत.
बरोबर - अर्धवट अनुभव, केलेल्या चुका परत परत करणे, विरुद्ध दिशेने जाने, अनुभवी किंवा तज्ञ लोकांची मदत न घेणे, ध्येय नसलेल्या नकारात्मक मानसिकता असलेल्या लोकांच्या समूहात वावरणे व भविष्यात चांगले होईल ह्या भ्रमात राहून उद्योग चालू ठेवणे ह्या सध्या गोष्टींमुळे नवीन उद्योजक आपला उद्योग डबघाईला आणतात.

आपले आयुष्य सोपे असते. नकारात्मक विचार ते कठीण बनवतात व सकारात्मक विचार ते सोपे बनवतात आणि इथेच मदत करते ते आत्म विकास. जो स्वतःच्या अंतर्मनामध्ये बदल घडवत जातो तो प्रगतीच्या पथावर असतो. म्हणून प्राचीन काळापासून एक सुविचार आहे "जे आत आहे तेच बाहेर आहे"

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


जो दिवस तुमचे संपूर्ण आयुष्य
बिघडवू शकतो तोच
दिवस तुमचे
संपूर्ण आयुष्य
घडवूही शकतो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


ते तुमच्यावर हसतात कारण त्यांना तुमची क्षमता माहित नाही.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


मी शक्तिशाली आहे कारण
कधीकाळी मी कमजोर होतो.

मी आज निर्भय आहे कारण
कधीकाळी मी भित्रा होतो.

मी आज शहाणा आहे कारण
कधीकाळी मी मूर्ख होतो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

प्रोस्ताहन देणारी कथा राजा आणि दोन भिकारी


अनेक वर्षांपूर्वी एक महान राजा राज्य करत होता, आणि त्याच्या राजवाड्याच्या बाहेर मुख्य दरवाज्यापाशी दोन भिकारी दररोज भिक मागत असत.

राजाचे त्या रस्त्याने दररोज येणे जाने होत होते, पहिला भिकारी म्हणायचा “आशीर्वाद आणि कृपा त्याला लाभो ज्याची मदत राजा करेल.” त्यानंतर दुसरा भिकारी म्हणायचा “आशीर्वाद आणि कृपा त्याला लाभो ज्याला देव मदत करेन.”

राजा पहिल्या भिकार्याचे शब्द ऐकून आनंदित व्हायचा.

एके रात्री राजाने विचार केला कि जो भिकारी स्तुती करतो त्याला बक्षीस द्यायचे; राजा आपल्या स्वयपाक्याला आदेश देतो कि एक मिठाई बनव, त्यामध्ये सोने असले पाहिजे आणि त्याच्या आजूबाजूने मिठाईचे आवरण असले पाहिजे.

दुसऱ्या दिवशी तो त्याच रस्त्याने चालला असताना ती मिठाई जो भिकारी स्तुती करतो त्याला देवून टाकतो.

पहिल्या भिकार्याला पैश्यांची खूप गरज असते म्हणून तो ती मिठाई दुसऱ्या भिकाऱ्याला खूप स्वस्तामध्ये विकून टाकतो.

जेव्हा दुसरा भिकारी खाण्यासाठी त्या मिठाईचे दोन भाग करतो तेव्हा त्याला सोने दिसते, तो ते सोने विकून श्रीमंत मनुष्य बनून जातो.

मग तो दुसऱ्याच दिवसांपासून राजाच्या राजवाड्याबाहेर भिक मागायला जाने बंद करून टाकतो.

जेव्हा राजा मिठाई दिलेल्या दुसऱ्याच दिवशी त्याच रस्त्याने चाललेला असतो तेव्हा त्याला पहिला भिकारी पैश्यांसाठी भिक मागताना दिसून येतो. राजा थांबून त्याला विचारतो कि मी दिलेली मिठाई तू खाल्लीस का?

पहिला भिकारी नाही म्हणून उत्तर देत सांगतो कि ती मिठाई जो कालपर्यंत माझा शेजारचा भिकारी होता त्याला विकली, आणि आज तो काही मला दिसला नाही.
राजा अत्यंत निराशाने मान हलवत मनातल्या मनात बोलत मान्य करतो कि खरच कृपा त्याच्यावरच होते ज्याला देव मदत करतो.

आपल्या देवाला सर्वकाही माहिती असते. तो कधीच तुम्हाला विसरत नाही. देव योग्य वेळी मदत करतो. देवावर विश्वास ठेवा. त्याची करणी तुम्हाला समजणार नाही. एखाद दिवशी तुम्हाला समृद्ध आयुष्य जगायचा आशीर्वाद तुम्हाला देवाकडून भेटेल व ते आयुष्य तुम्ही जगायला लागाल. विश्वास ठेवा.

*****तुमची आताची परिस्थिती कोणती आहे?****

राजा सारखी, किंवा दुसऱ्या भिकार्यासारखी?
कि
पहिल्या भिकार्यासारखी?

****जर पहिल्या प्रश्नाचे उत्तर हा असेल तर तुमच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत काम करत आहे, तो फक्त तुम्हाला आत्मविकासाद्वारे सतत टिकवून ठेवायचा आहे.****

****आणि जर दुसऱ्या प्र्षांचे उत्तर हा असेल तर तुम्हाला तातडीने आत्मविकासाची गरज आहे.****

(देवाच्या जागी तुमचा ज्यावर विश्वास आहे ते समजून वाचाल. तिथे अंतर्मन किंवा आकर्षणाचा सिद्धांतही वापरू शकता.)

धन्यवाद
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

३७०० करोड रुपयांचा आणि ६ लाख ५० लोकांना फसवणारा फेसबुक लाईक घोटाळा उघडकीस आला

३७०० करोड रुपयांचा आणि ६ लाख ५० लोकांना फसवणारा फेसबुक लाईक घोटाळा उघडकीस आला
उत्तर प्रदेश पोलिसांनी ३७०० करोड रुपयांचा आणि ६ लाख ५० लोकांना फसवणारा फेसबुक लाईक घोटाळा उघडकीस पाडला. हा उघड झालेला भारतातील सर्वात मोठा इंटरनेट घोटाळा आहे.
मुख्य सूत्रधाराचे नाव आहे अनुभव मित्तल, वय फक्त २६ वर्षे, २०१२ ला कंपनीची सुरवात झाली होती आणि आज ३७०० हजार करोडच्या उलाढाली पर्यंत पोहचली. खाजगी इंजीनिअरिंग कॉलेज मधून शिक्षण घेतले, कॉलेज मध्ये आमीर खानच्या थ्री इडीयट मधील हुशार व्यक्तिमत्व त्याला फुनसुक वांगडू म्हणून ओळखले जात होते.
एबलेझ इन्फो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (Ablaze Info Solutions Pvt Ltd.) ह्या नावाने कंपनी नोएडा मध्ये कार्यरत होती आणि ह्याच्या वेबसाईट सध्याचे चे नाव आहे socialtrade . biz. हे सतत आपल्या वेबसाईटचे नाव बदलत असत.
हा भारतातील सर्वात मोठा उघड पडलेला घोटाळा ज्याची कार्यपद्धती हि एमएलएम सारखी होती म्हणजे जर एक मनुष्य जॉईन झाला तर त्याने कमीत कमी २ मनुष्यांना जॉईन करायचे. हि काम करायची पद्धत त्यांच्या ३ साथीदारांनी दिली ज्यांना पोलिसांनी ५०० करोड रुपयांसोबत दिल्लीमध्ये पकडले होते.
पोलीस सांगतात कि “ती काही लोकांना विश्वास बसण्यासाठी पैसे द्यायचे ज्यामुळे लोकांचा विश्वास बसायचा आणि त्यांचे बघून इतर लोक गुंतवणूक करत होते.”
जो मनुष्य ती वेबसाईट चालवत होता तो जे वेबसाईटला जॉईन झाले त्यांना हमी द्यायचा कि “जी लिंक तुमच्या मोबाईल वर येईल तिला क्लिक केल्यावर ५ रुपये भेटतील.” असे पोलीस सांगत होते.
अश्या पद्धतीने जेव्हा गुंतवणूकदार कंपनीच्या बँक अकाऊंट मध्ये हजारो रुपये टाकायचे तेव्हा त्यांना खोटी पैसे भरल्याची लिंक पाठवली जायची.
अनेक वर्षांपासून कंपनीचा हा घोटाळा सुरूच होता, पण जास्तीत जास्त पैसा हा कंपनीने मागील काही महिन्यात म्हणजे मागील वर्षी ऑगस्ट पासून कमावला, त्यानंतर ते काही पैसा हा ज्यांच्या कडून जास्त फायदा झाला अश्या काही हजार मूर्खांना देणार होते ज्यामुळे त्यांचे बघून अजून लाखो मूर्ख कंपनीला जॉईन झाले असते. (इथे मूर्खाच्या जागी शिवीचा वापर करू शकतात.)
जेव्हा पोलिसांनी नोएडा मधील कंपनीच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकला होता तेव्हा त्यांना तिथे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आणि सभासदांचे २५० पासपोर्ट आढळून आले ज्यांना चांगल्या कामाचे बक्षीस म्हणून ऑस्ट्रेलिया ची सहल देण्यात आली होती.
अजून मूर्खांना फसवण्यासाठी ते तिथे जे कर्मचारी आणि सभासद गेले त्यांचे मौज मजा करण्याचे व्हिडीओ बनवून ते मार्केटिंग साठी वापरणार होते.
ह्याच्या मुख्य सूत्रधाराने घोटाळ्याचे पैसे अनेक महागडे बंगले, महागड्या गाड्या आणि सेलिब्रिटी पार्टी वर खर्च केले.
तरीही काही लाभधारक ह्या कंपनीला सपोर्ट करत आहेत, त्यांना “बकरेकि मा कब तक खैर मनायेगी” हि हिंदीची म्हण माहित नाही. जगामध्ये कुठेही जा फक्त घोटाळे करू शकणारेच इतक्या जलद गतीने पैसे कमवू शकतात ना कि नवीन कल्पना घेवून येणारे.
हा घोटाळा इतका मोठा आहे कि पोलिसांना हा घोटाळ्याचा सर्व पैसा शोधून काढण्यासाठी बराच वेळ लागणार आहे, ह्यामध्ये काही बँक कर्मचाऱ्यांचा हि समावेश असण्याची शक्यता पोलीस नाकारत नाही. हे इतके मोठे काम आहे कि पोलिसांना इन्कमटेक्स आणि बाकी सरकारी खात्यांची मदत घ्यावी लागणार आहे.
सायबर क्राईम म्हणजे इंटरनेट वरील गुन्ह्यांचे भारत हे जगात दुसर्या नंबरचे माहेर घर झाले आहे, तीन वर्ष म्हणजे २०१४ पर्यंत सायबर गुन्ह्यात ३५० टक्क्यांनी प्रचंड वाढ झाली आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

पिढीजात समृद्धी खेचण्याचे मानसशास्त्र, विक्रीकला, मानसिक गुलामी


आपले अंतर्मन हे २४ तास जागे असते. ते कधीही झोपत नाही. तुमचे घोरणे जरी बंद असेल पण अंतर्मन हे जागेच असते.

टीव्ही सुरु असेल आणि आपण झोपले असू तरी आपले अंतर्मन हे झोपेमध्येही सतत माहिती मिळवत असते.

ते सगळे आवाज आपल्या अंतर्मनात रुजत असतात.

आणि जेव्हा तुम्ही उठतात किंवा जागे होतात तेव्हा तेव्हा तुम्ही ती वस्तू किंवा सेवा विकत घेतात जेव्हा तुम्ही झोपले होतात पण ज्याची जाहीरात हि टीव्ही वर सुरु होती.
हो. म्हणून तुम्ही ती वस्तू किंवा सेवा विकत घेतात ज्याच्या जाहिरातीचा दिवस आणि रात्र तुमच्यावर मारा सुरु असतो.

तुम्ही ती वस्तू आज जरी नाही घेतली तरी एक न एक दिवशी घेणारच.
जर तुम्ही लहानपणापासून आपल्या मुलांना सतत टीव्ही दाखवत असाल किंवा तुम्हाला ती सवय असेल तेव्हा तुमची लहान मुल हि एक मनुष्य म्हणून मोठ्यापनी नाही वावरणार, ती ग्राहक म्हणून वावरतील.

असे करून तुमच्या पिढ्या एकाच कंपनीचे उत्पादन किंवा सेवा विकत घेत जातील आणि तुमच्या पिढ्या ह्या अजाणतेपणे त्यांचे गुलाम होवून जातील.

कारण तुमच्या आई वडिलांनी जी उत्पादने किंवा सेवा वापरली होती त्याच सेवा आणि उत्पादने जवळपास तुम्ही आता वापरत असाल.

म्हणजे तुम्ही नाही म्हणत सुद्धा मानसिक गुलामासारखे वागत एकाच कंपनी किंवा सेवेचा लाखो किंवा करोडो रुपयांचा फायदा तर करूनच देतात त्यामध्ये अधिक भर म्हणून आपल्या मुलांनाही त्या उत्पादन किंवा सेवेचा गुलाम करत तुमच्या पिढ्या त्याच कंपनीचे उत्पादन मानसिक गुलामासारखे घेत जातात.

असेच तुम्हाला एखाद्या नेत्याची गुलामी करणारी पिढी, मालकाकडे नोकर म्हणून काम करणारी पिढी, पिढीजात व्यवसाय किंवा रोजगार करणारे अशी लोक दिसून येतील.
असेच तुम्हाला उच्च शिक्षित लोक आपल्या मालकांची गुलामी करतानाही दिसून येतील. त्यांची क्षमता कितीही प्रचंड असली तरीही ती गुलामीच करणार, फक्त फरक इकडे पैश्यांचा असतो, त्यांना पगाराच्या रुपात जास्त पैसा भेटत असतो.

जर कोणी व्यवसायिक किंवा उद्योगपती आला तर त्याचा उद्देश हा आपला नफा वाढवायचा असतो तेव्हा हेच मानसशास्त्राचे ज्ञान वापरले जाते आणि जेव्हा कोणी सामान्य नोकरदार मनुष्य येतो तेव्हा हेच ज्ञान तो स्वतःचे आर्थिक मनसिकतेच्या गुलामिमधून मुक्त होण्यासाठी आणि आपला आर्थक फायदा वापरण्यासाठी करतो.

आगीने आपणा जेवण बनवून कुणाची भूकही मिटवून त्याला जगवू शकतो आणि त्याच आगीने त्याचा जीवही घेवू शकतो.

क्षमता तुमच्यातही आहे गरज आहे ती जागृत करण्याची. आणि ह्याला पर्याय फक्त आणि फक्त आत्मविकासच आहे.

जागृत बना, ह्या मार्गांनी तुमच्या कडील समृद्धी हि तुम्ही समोरच्याला देत आहेत आणि त्याच्या पिढ्या ह्या समृद्ध आयुष्य जगत आहे.

धन्यवाद,
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

अनाथ, गुंडगिरी ते २० हजार करोड चा व्यवसाय



जोह्न पौल डीजोरिया यांना श्रीमंत आणि यशस्वी होण्या अगोदर कार मध्ये राहवे लागत होते.
डीजोरिया ह्यांचे बालपण हे खूप खडतर होते. ते दोन वर्षांचे असताना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला होता, त्यांना घर चालवण्यासाठी १० वर्षांचे होण्याच्या अगोदरच ख्रिसमस कार्ड आणि पेपर विकावे लागत होते. शेवटी नाईलाजाने डीजोरिया यांना लॉस एजेलीस येथील अनाथ आश्रमात पाठवण्यात आले.
सैनिकात भरती होण्याअगोदर ते गुंडांच्या टोळीतहि सहभागी होते. रेडकेन लेबोरेटरिज येथे कामच अनुभव घेतल्यानंतर ४७ हजार रुपये कर्जाऊ घेवून स्वतःची जोह्न पौल मिश्‍चेल सिस्टम्स नावाची कंपनी सुरु केली.
डीजोरिया स्वतः घरोघरी दारोदारी जावून आपले उत्पादन विकत होते, हे करत असताना त्यांना स्वतःच्याच गाडीमध्ये रहावे लागत होते. उत्पादनाचा दर्जा इतका चांगला होता कि कोणी नाकारू शकत नव्हते. आज जेपिएम सिस्टम्स ची उलाढाल हि २० हजार करोड (२,००,००,००,००,०००) इतकी आहे.
त्यांनी पेट्रोन टकीला नावाचा वोडकाचा ब्रांड निर्माण केला आहे आणि त्यासोबत हिरे ते मोबाईल फोन असे इतर विविध उद्योग हि त्यांचे आहेत.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



काही म्हणी काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलल्या पाहिजे.

जर आपण शून्यात असू तेव्हा
“वाकेन पण मोडणार नाही.”
हि म्हण लक्ष्यात ठेवायची.

आणि जर आपण शिखरावर असू तेव्हा
“मोडेन पण वाकणार नाही.”
हि म्हण लक्ष्यात ठेवायची.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

गरीबीचे बालपण ते ओरेकल कंपनीचा सहसंस्थापक लेरी इलीसन



प्रोस्ताहन देणारी वास्तव आयुष्यावर आधारित कथा
गरीबीचे बालपण ते ओरेकल कंपनीचा सहसंस्थापक लेरी इलीसन
इलीसन ह्याचा जन्म न्यू यॉर्क शहराच्या अतिपूर्व भागात झाला. तो बाळ असतानाच त्याला न्युमोनिया झाला होता, त्याची आई त्याची काळजी घ्यायला सक्षम नव्हती, संगोपनासाठी त्याला त्याच्या काका काकींकडे जे शिकागोच्या दक्षिणेकडे रहायचे तिथे पाठवून दिले. त्याने त्याच्या जन्मदात्या वडिलांना कधीच बघितले नव्हते आणि त्याला दत्तक घेतले आहे हे खूप वर्षांनंतर समजले होते.
१९७७ साली त्याने भागीदारासोबत सोफ्टवेअर डेव्हलपमेंट लेबेरोटरिज नावाची डाटाबेस मेनेजमेंट कंपनी सुरु केली त्यामध्ये तो सह संस्थापक होता. पुढे १९७९ साली कंपनीचे नाम बदलून रिलेशनल सोफ्टवेअर हे नाव ठेवले, पुढे हीच कंपनी ओरेकल म्हणून ओळखली जावू लागली.
आज ओरेकल चे वार्षिक उत्पन्न हे २५ अरब (२५, 00,00,00,00,000) रुपये इतके आहे. लेरी इलीसनची आजची संपत्ती हि ५२ हजार करोड रुपये (५२, 00,00,00,000) इतकी आहे. त्याच्या कडे ते सर्व आहे जे एका अब्जाधीश कडे असते जसे कि खाजगी विमाने, बोटी, अनेक बंगले आणि हवाईअन बेटामधील एक बेट सुद्धा त्याच्या मालकीचे आहे. त्याने सीइओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) चा पदभार २०१४ साली सोडला.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



श्रीमंत बनणे हे काही ध्येय नाही आहे. “तीन वर्षात एक करोड कमावणे” हे ध्येय आहे.

अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत. अज्ञानाने केलेला गैर वापर आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर झालेला दुष्परिणाम

आकर्षणाचा सिद्धांत. अज्ञानाने केलेला गैर वापर आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर झालेला दुष्परिणाम
तिशीतील तरून एकदा माझ्याकडे आत्मविकासाच्या समुपदेशनासाठी आला होता. त्याने सरकारी नोकरी हि आकर्षणाच्या सिद्धांताद्वारे मिळवली होती, आणि ह्यामध्येच त्याची सर्व मानसिक आणि शारीरिक उर्जा हो संपून गेली होती.

सरकारी नोकरी, पगार असून असून किती असेल? आणि वरची कमाईहि असून असून किती असेल? त्याहीपेक्षा जास्त कमावणारे आहत कि. जेव्हा आपल्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत काम करणार असतो ती वेळ किंवा तो क्षण हा कुणालाच माहित नसतो. नाही धर्मगुरूला आणि नाही मानसोपचार तज्ञाला. म्हणून ते सतत सांगत असतात कि नेहमी सकारत्मक आणि मोठा विचार करा म्हणून.

पण आपण ऐकणार कुठे? गर्व जागा झालेला असतो, जिद्दीने आंधळे झालेले असतो. नको त्या ठिकाणी हजारो आणि लाखो खर्च कराल पण आत्मविकासासाठी १ रुपयाही खर्च नाही करणार. मग काय स्वर्ग आणि नर्क इकडेच आहे, तुम्हाला जे पाहिजे तसेच आयुष्य भेटेल. आणि कोणीही काहीही करू शकत नाही, अगदी तुम्हीसुद्धा.

जे काही महिने आणि वर्ष त्या तरुणाने आत्मविकासाद्वारे आकर्षणाच्या सिद्धांताला जागृत करायला घालवले आणि तेही फक्त समृद्धीचा एक घटक असलेल्या पैश्याला आकर्षित करण्यासाठी. म्हणजे प्रचंड समृद्धीचा समुद्र समोर आहे तर त्यामध्ये करोडोंचा पैश्यांचा प्रवाह येईल अशी नहर खोदण्याऐवजी फक्त एक छोटासा पाईप टाकून फक्त काही हजारांचा प्रवाह हा आपल्याकडे घेतला आणि तोही कायमस्वरूपी.

ह्यामध्ये त्याच्या खाजगी आयुष्यामधील बाकीचे भाग जसे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, मानसिक आणि शारीरिक मुलभूत गरजा, जोडीदार म्हणजे बायको किंवा प्रेयसी, कौटुंबिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य हे संपूर्णपणे दुर्लक्षित केले गेले आणि आता ह्याचा परिणाम तो ह्या सर्व आयुष्यातील भागात अपयशी म्हणून जगत आहे.

मुर्खपणा करू नका. आपले आयुष्य काही मस्करी नाही आहे, एकदा जन्माला आला तर आलाच आणि एकदा मेलात तर मेलातच. इथे काही दुसरा मार्ग नाही आहे. म्हणून जेव्हाही विचार कराल, भावना व्यक्त कराल तेव्हा समृद्धीची व्यक्त कराल. समृद्धी मध्ये जीवनातील सगळे अंग येतात, एकही सुटत नाही. किंवा तुम्ही असे करू शकता कि फक्त ज्या अंगांची कमी आहे फक्त तितकेही घेतले तरी पुरेसे आहे.

आपल्या नैसर्गिक शारीरिक आणि मानसिक गरजा ओळखा. आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. ह्यामुळे तुमच्या आतील नकारात्मक उर्जेचे अडथळे जे भावनिक आणि वैचारिक स्वरुपात आहेत ते दूर होवून अध्यात्मिक उर्जा ज्याला आपण सकारात्मक किंवा आकर्षणाचा सिद्धांत बोलू ती वाहायला लागते.

आणि ह्यासोबतच तुमच्या आंतरिक बदलाबरोबर आजूबाजूची परिस्थितीही बदलत जाते. तुम्ही तुमच्या स्वप्नांचे आयुष्य अमर्याद स्वरुपात जगू लागतात.

आयुष्य तुमचे आणि जबाबदारही तुम्हीच.

घ्या आपल्या आयुष्याचा लगाम आत्मविकासाद्वारे आपल्या हातात.

धन्यवाद
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

बेघर परिस्थिती ते जगप्रसिद्ध सिने नायक, अभिनेता आणि श्रीमंत व्यक्तिमत्व सिल्वेस्टर स्टेलोन


प्रेरणादायी सत्य घटनांवर आधारित जीवनगाथा

हि कथा वाचूनही तुमचे रक्त सळसळले नाही तर ते रक्त नसून पाणी आहे.

आयुष्यामधील प्रचंड दुख संकट आणि दारिद्र्यापासून सुख समृद्धीचे साम्राज्य उभे केले.

सिल्वेस्टर स्टेलोन, जगप्रसिद्ध सुपरस्टार हॉलीवूड अभिनेता, २०१६ साली नमूद केलेली संपत्ती ४ बिलियन डॉलर म्हणजे भारतीय २४० खरब रुपये इतकी आहे. हि झाली सिल्वेस्टर स्टेलोन ची वर्तमान परिस्थिती.

भूतकाळात सिल्वेस्टर स्टेलोन काही चांदीचा चमचा घेवून जन्माला नव्हता आला. त्याने आयुष्याच्या प्रत्येक भागात संघर्ष केला. तो इतक्या आर्थिक अडचणीत होता कि त्याला त्याच्या बायकोचे दागिने हे चोरून विकावे लागले. परिस्थिती इतकी खालावत गेली कि तो शेवटी बेघर झाला. ३ दिवस तो न्यू योर्क च्या बस स्टेशन वर झोपला होता. परिस्थिती इतकी बिकट होती कि न तो घर भाडे भरू शकत होता आणि नाही जेवण विकत घेवू शकत होता.

आश्चर्याची गोष्ट हि होती कि ह्या परिस्थितीची परिसीमा गाठली तेव्हा गाठली जेव्हा तो त्याच्या कुत्रायालाही खाऊ घालू शकत नव्हता, त्यावेळेस दारूच्या दुकानाजवळ तो कुणाही अनोळखी व्यक्तीला कुत्रा विकायला तयार झाला होता. शेवटी त्याने तो कुत्रा १७०० रुपयांना विकला आणि रडत रडत तो तिथून निघून गेला.

२ आठवड्यानंतर जेव्हा सिल्वेस्टर स्टेलोन मुहोम्मद अली विरुद्ध चक वेपनर ह्यांचा बॉक्सिंग चा सामना बघितला होता, त्यानंतर त्याला रॉकी ह्या इतिहासातील प्रसिद्ध सिनेमाची कथा लिहायचे प्रोस्ताहन भेटले. त्याने २० तासातच सिनेमाची स्क्रिप्ट लिहून काढले. त्यानंतर जेव्हा सिल्वेस्टर स्टेलोन जेव्हा स्क्रिप्ट विकायला गेला होता तेव्हा त्याला १,२५,००० डॉलर (८५ लाख रुपये) इतकी ऑफरहि भेटत होती. पण त्याची एक अट होती कि त्याला त्या सिनेमामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करायचे होते.

पण प्रत्येक स्टुडीओ त्याला नाकारत होता कारण त्यांना मुख्य अभिनेता म्हणजेच त्या वेळचा प्रसिद्ध कलाकार घ्यायचा होता. ते त्याला म्हणत असत कि “तू दिसतोही जोकर सारखा आणि बोलतोही जोकर सारखा.” मग तो तिकडून आपली स्क्रिप्ट घेवून निघून यायचा. काही आठवड्यानंतर स्टुडीओ ने परत १,७०,००,००० रुपयांची ऑफर दिली सिल्वेस्टर ने तो ऑफरहि नाकारली. त्यानंतर त्यांनी २,३८,००,००० ची ऑफर दिली आणि तीही नाकारली गेली. त्याला त्या सिनेमामध्ये मुख्य अभिनेता म्हणूनच काम पाहिजेच होता.

शेवटी त्या स्टुडीओ ने स्क्रिप्ट साठी २४ लाख दिले आणि सिल्वेस्टर स्टेलोन ला मुख्य नायकाची भूमिकाहि दिली. बाकीचा इतिहास हा तुम्हाला माहितच आहे. तुम्हाला काय वाटते कि त्याने हे २४ लाख भेटल्यावर काय विकत घेतले असेल? जो कुत्रा त्याने विकला होता तो. हो, स्टेलोन आपल्या कुत्र्यावर खूप प्रेम करत होता. स्टेलोन ३ दिवस त्या दारूच्या दुकानाच्या बाहेर ज्या माणसाला कुत्रा विकला होता त्याला शोधत थांबला होता.

शेवटी तिसर्या दिवशी तो मनुष्य त्याच्या कुत्र्यासोबत येताना त्याला दिसला. त्याने त्या मनुष्याला तो कुत्रा का विकला हे कारणही समजून सांगितले आणि आपला कुत्रा परत मागितला, त्या मनुष्याने स्पष्ट नकार दिला. स्टेलोन ने त्याला ७००० रुपये देवू केले तेही त्या मनुष्याने नाकारले. ३४ हजार देवू केले तेही नाकारण्यात आले, ६८ हजार देवू केले तेही नाकारण्यात आले.

तुमचा विश्वास नाही बसणार पण शेवटी स्टेलोनने त्याला चक्क १० लाख २० हजार रुपये देवू केले त्याच कुत्र्यासाठी जो त्याने संकटात असताना फक्त १७०० ला विकला होता आणि स्टेलोनने आपला कुत्रा परत मिळवला.

तोच स्टेलोन जो रस्त्यावर झोपायला मजबूर झाला होता, ज्याने आपला कुत्रा फक्त त्याला खायला घालू शकत नाही म्हणून विकला होता तो आजच्या घडीला ह्या पृथ्वीतलावर इतिहासातील सर्वकृष्ट अभिनेता आणि एक श्रीमंत व्यक्ती म्हणून वावरत आहे.

बिकट परिस्थिती खूप वाईट असते. खरच खूप वाईट असते. कधी तुम्हाला स्वप्न पडले होते का? अद्भुत स्वप्न? पण तुम्ही इतक्या बिकट परिस्थितीत असतात कि त्यावर तुम्ही अमलबजावणी करू शकत नाही? ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला खूप शुद्र समजत आहात? स्वतःला कमी लेखत आहात? असे माझ्यासोबतहि अनेक वेळा झाले आहे.

आयुष्य खूप कठीण आहे. संधी अशी काय तुमच्या बाजूने निघून जाते कि तुम्ही कोणीच नाही आहात. लोकांना तुम्ही उत्पादनासारखे पाहिजे आहात, ना कि तुम्ही. जग खूप निष्ठुर आहे. जर तुम्ही प्रसिद्ध, श्रीमंत किंवा तुमची ओळख नसेल तर तुम्ही बिकट परिस्थितीत आहात.

तुमच्या तोंडावर दरवाजे बंद केले जातील. लोक तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळवतील, आणि तुमच्या आशा ह्या पायदळी तुडवतील. तुम्हाला कसे तरी धक्का देत देत पुढे जात जायचे आहे आणि तरीही काही नाही घडणार.

आणि मग तुमच्या आशा ह्या मावळल्या जातील. तुम्ही कोलमडून गेला असाल. पूर्णपणे कोलमडून गेला असाल. तुम्हाला जगण्यासाठी मिळेल ते काम करावे लागेल. तुम्हाला कदाचित पोटभर तर सोडाच पण एकवेळचे अन्न देखील मिळणार नाही. आणि हो कदाचित तुम्हाला रस्त्यावर झोपावेही लागेल.

तुमच्या स्वप्नांना कधीच म्हणजे कधीच संपू देवू नका. काहीही घडत गेले तरी स्वप्न बघने सोडू नका. तुमची आशा संपली असेल तरीही स्वप्न बघत रहा.

त्यांनी पाठ फिरवली तरीही स्वप्न बघत रहा.

त्यांनी दरवाजा बंद केला तरीही स्वप्न बघत राहा.

तुम्ही सोडून कुणालाच माहिती नाही कि तुमची क्षमता काय आहे ते. तुम्ही काय आहात आणि कोण आहात हे सामान्य लोक तुमच्या कपड्यांवरून म्हणजेच बाहेरील पेहरावावरून ओळखतील. पण कृपया करून आपली लढाई थांबवू नका, इतिहासात आपली जागा बनवण्यासाठी लढाई करा. आपल्या प्रतिष्ठेसाठी लढाई करा. कधी म्हणजे कधीच हार माणू नका.

भले तुमच्या अंगावर एकही कपडा नसू देत, भले मग तुम्ही रस्त्यावरील कुत्र्यांसोबत झोपत असाल, हे ठीक आहे, पण जो पर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही संपला नाही आहात, माझ्यावर विश्वास ठेवा.

सतत लढाई करत रहा. सतत तुमची स्वप्न आणि आशा ह्या जिवंत ठेवा. श्रेष्ठतेकडे वाटचाल सुरु ठेवा. प्रतिष्ठेकडे वाटचाल सुरु ठेवा.

अश्या आयुष्यात चमत्कार घडवणाऱ्या मराठी व्यक्तीमत्वानसोबत माझा दररोज चा संपर्क येत असतो.

सिल्वेस्टर स्टेलोन करू शकतो तर तुम्हीही करू शकता.
मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता.
जगामध्ये इतर कोणी करू शकते तर तुम्हीही करू शकता.

धन्यवाद
अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

सकारात्मक आणि नकारात्मक शब्दांचा परिणाम


७ वर्षांचा अजय हा सतत हस्त खेळत आनंदात राहणारा मुलगा एकदा बगीच्यात खेळायला आला होता. तो झाडावर चढत होता.

अजय काही पहिल्यांदाच झाडावर चढत नव्हता. तो वर जात जात ३० फुटापर्यंत त्या झाडावर चढून गेला.

त्याला त्याचा उस्ताह हा तब्यत ठेवता येत नव्हता. तो एक फांदी पकडून त्यावर हातांनी जोर जोरात मागे पुढे झुलू लागला.

तो त्याच्या खेळण्यात इतका मग्न होता कि त्याला कळतच नव्हते कि ती फांदी तुटूही शकते.

अजयचे बघून त्याचा चुलत लहान भाऊ सचिनही झाडावर चढू लागला, तोही जवळपास अजय च्या १० फुट खाली एका फांदीवर लटकू लागला.

अजय चे वडील आणि सचिन ची आई हे आप आपल्या मुलांवर लक्ष्य ठेवून होते. ते काही बोलण्याअगोदर जोर जोरात वारे वाहू लागले आणि ते झाड हेलकावे घेवू लागले,

“अजय घट्ट पकडून ठेव” अजयच्या वडिलांनी मोठ्याने ओरडून सांगितले.
“सचिन खाली पडू नको” सचिनच्या आईने घाबरून जावून मोठ्याने ओरडून सांगितले.

काही सेकंदानेच सचिनचा झाडाच्या फांदीला पकडलेला हात सुटला आणि तो तोल जावून खाली पडला. नशिबाने त्याला काही जास्त लागले नाही, आणि अजय आरामत सांभाळत झाडावरून खाली उतरत आला.

घरी गेल्यावर सचिनच्या आईने अजयच्या वडिलांना विचारले “मला आश्चर्य वाटले कि दोन्ही मुल हि एकाच झाडावर लटकलेली होती माझ्या मुलाचा हात निसटला आणि पडला पण तुमचा मुलगा नाही पडला, असे कसे झाले?”

अजय च्या वडिलांनी उत्तर दिले “मला नक्की नाही सांगता येत पण जेव्हा जोर जोरात वारे वाहू लागले होते तेव्हा तुम्ही घाबरलात आणि घाबरून मोठ्याने ओरडलात कि “सचिन पडू नकोस” आणि दुसर्याच क्षणी सचिन फांदी पकडून ठेवू शकला नाही आणि तो पडला.”

सचिन ची आई जेव्हा न समजल्याने परत आश्चर्याने बघू लागली तेव्हा अजय चे वडील स्पष्ट करून सांगू लागले “आपल्या मन मेंदूला आपल्या नकारात्मक आदेशावर कृती करायला कठीण जाते, आपले मन मेंदू हे गोंधळून जाते.
सचिन ची पहिली प्रतिक्रिया हि होती कि तो कल्पना करू लागला आहे कि तो पडला आहे म्हणून आणि त्याचे मन मेंदू हे त्याला पडू नको म्हणून सांगत होते.
जेव्हा अजय ने आपल्या मन मेंदूला आदेश दिला कि घट्ट पकडून ठेव तेव्हा त्याचा मेंदू लगेच घट्ट पकडून लटकण्याची कल्पना करू लागला आणि फांदी घट्ट पकडून ठेवायची हा आदेशही माणू लागला, व त्याने तसे केले.”

सचिनची आई हे उत्तर ऐकून चक्रावून गेली. कसे सकारात्मक विचार आणि शब्द हे आपल्या मन, मेंदू आणि आयुष्यात बदल घडवून आणतात हा विचार ती करत बसली.

ह्या लघु कथेमध्ये आपल्या संपूर्ण आयुष्याचा सारांश दडलेला आहे. ह्या परिस्थितीजागी तुम्ही तुमच्या आयुष्यातील कुठल्या अंगात समस्यांना सामोरे जात आहात किंवा गेला आहात ते ठेवा, तुम्हाला उत्तर आरामात भेटेल.

ह्यामधील ९० % समस्या ह्या समुपदेशनाद्वारे आपण आपल्या आयुष्यातून कायमस्वरूपी मुळापासून नष्ट करू शकतो, किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो.

प्रत्येक क्षणी सकरात्मकच विचार कराल, कारण आकर्षणाचा सिद्धांत आणि आपले मन मेंदू पाहिजे ते वास्तवात आणू शकते.

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक आणि कुटुंब
८०८०२१८७९७



कडवे सत्य

गरीब जेव्हा जमिनीवर बसतो तेव्हा त्याची ती लायकी असते.
आणि

जेव्हा श्रीमंत जमिनीवर बसतो तेव्हा तो त्याचा मोठेपणा असतो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आनि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



स्वतःवर विश्वास ठेवा.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७




अर्थ मंत्रा

माझ्याकडे नेहमीच गरजेपेक्षा जास्त पैसा असतो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


शांतता आणि मौन हे सोने आहे.
शब्द हि कंपने आहेत.
विचार चमत्कार आहे.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



गरीब आणि श्रीमंता
मधील फरक
गरीब :
मी कमी पैश्यात 
(पगार) तुमच्यासाठी
काहीही करेन.
श्रीमंत:
मी जास्त पैसे
बनवण्यासाठी तुझ्याकडून
काहीही करून घेईल.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


जर तुम्ही तणाव हाताळू शकत नाही तर तुम्ही यशही हाताळू शकत नाही.

जर तुम्ही द्वेष हाताळू शकत नाही तर तुम्ही प्रेमही हाताळू शकत नाही.

जर तुम्ही दुख हाताळू शकत नाही तर तुम्ही आनंदही हाताळू शकत नाही.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



गरीब हे कधी कधी श्रीमंतांपेक्षा जास्त हुशार असतात.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



गर्व निसर्ग
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



जर तुम्ही आर्थिक नुकसान हाताळू शकत नाही तर तुम्ही उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक आणि श्रीमंती हि हाताळू शकत नाही.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


जर तुम्ही अपेक्षा करत असाल कि तुम्ही चांगले वागत आहात तर जगानेही तुमच्याशी चांगले वागावे, म्हणजे तुम्ही अशी अपेक्षा करत आहात कि तुम्ही सिंहाला खात नाही म्हणून सिंहानेही तुम्हाला खाल्ले नाही पाहिजे.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



माझे “गरीब” वडील विचार करायचे कि पैसे कमावणे हे ध्येय आहे.
माझे “श्रीमंत” वडील विचार करायचे कि आपले स्वप्न पूर्ण करणे हे ध्येय आहे.
रोबर्ट कियोसाकी
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


“ब्रम्हांडाचा एक सामान्य नियम हा आहे कि इथे काहीच किंवा कोणीच परिपूर्ण नाही आहे. परिपूर्णता हि अस्तित्वातच नाही आहे... ह्या अपरिपूर्णते शिवाय तुम्ही किंवा मी अस्तित्वातच नसलो असतो.”

स्टीफन हॉकिंग

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



फरारीच्या संस्थापकाने ट्रॅक्टर कंपनीच्या मालकाचा अपमान केला होता. आज ती ट्रॅक्टर कंपनी लाम्बोर्गिनी ह्या नावाने जगप्रसिद्ध आहे. भारतामध्ये एका गाडीची किंमत हि ३ करोड पासून सुरु होते ते ४ करोडच्या घरात आहे.
यशस्वी होणे हाच सर्वोत्तम बदला आहे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



भितीशिवाय तुम्ही धाडसी नाही बनू शकत.

अपयशाशिवाय तुम्ही यशस्वी नाही बनू शकत.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



तोट्याशिवाय तुम्ही उद्योजक व्यवसायिक नाही बनू शकत.
आर्थिक नुकसानिशिवाय तुम्ही गुंतवणूकदार नाही बनू शकत.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया 
८०८०२१८७९७

" भडकवणारे " आणि " भडकणारे "

" भडकवणारे " आणि " भडकणारे "
तो एक तरूण...अत्यंत हुशार... सर्वांचा लाडका...

हा मुलगा एकदा पोलिसांनी पकडला, गाड्या फोडताना...
गेला तुरूंगात, लागली केस, वारी सुरू झाली कोर्टाची....

करिअर गेलं, वर्षे वाया गेलं, जामीन पण नाही, जवळ पैसे नाहीत, आयुष्यातुन उठला.....

का.....?????

का तर याला कोणीतरी कुणाच्या तरी विरोधात भडकवले...
आणि...हे घडले....

हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.

पण लक्षात ठेवा...

आज जगात दोन प्रकारचे लोक आहेत...

दुसऱ्याला भडकवणारे आणि भडकणारे .....

भडकवणारे
दारू विक्रेत्याप्रमाणे द्वेष विकतात...

आणि...

भडकणारे दारूप्रमाणे द्वेष पितात...

दारूची नशा लगेच उतरते, पण, द्वेशाची नशा चढत राहते...

आणि...

एक दिवस ज्याप्रमाणे दारू विकणारा बंगले बांधतो...

आणि...

दारू पिणारा भिकारी होतो...

तसे भडकवणारे मोठे होतात

आणि...

भडकलेले, बरबाद होतात...

आज आपला तंबाखू सारखा वापर करून घेतला जातोय...

यासाठी...

शिवाजी महाराजांचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेतले जाते...

त्यांच्या नावाने भडकावले जाते...

ज्याने भडकावले, त्याचा मुलगा स्टडीरूममधे...

आणि...

जे भडकले ते कस्टडी रूममधे...

ज्यांनी भडकवले त्याचा मुलगा अभ्यास करतोय...
आणि...
जे भडकले ते खडी फोडायचा अभ्यास करतेय...

ज्यानी भडकवले त्याचा पोरगा परदेशात शिकायला जातो...
आणि...
जे भडकले ते देशी प्यायला शिकतेय...

भडकवणाऱ्यांचा मुलगा फाड-फाड ईग्लिश बोलतो,
आणि...
भडकणारा, बघून घेतो, तंगडंच काढतो, नादाला लागू नको, वावर गेलं तरी पावर नाय गेली पाहिजे, असं बोलतोय...

भडकवणारे
परदेशातून विमानाने भारतात येतात...
आणि....
भडकणारे...
शिवाजीनगर-
१० रूपये...१० रूपये
संभाजीनगर -
५रूपरे... ५रूपये...
बसा ना...
ह्या बाजूला ...
त्या बाजूला ...
गाडी भरली, की
लगेच निघणार ...
१० रूपये ... ५ रूपये ...

भडकवणारे
विमानतळावर उतरतात...
भडकणारे गर्दीत घोषणा देतात...
...आमके तमके आगे बढो...
हम तुम्हारे साथ है...
बजाव.....
वन्सं मोर...
ढिंगच्यांग ढिच्यांग....

भडकवणाऱ्यांचा पोरगा पंचतारांकित हाँटालात ऐटीत बसतो...
आणि...
भडकणारे तिथं वेटर असतात...

कुठे गेली लाज...
कुठे गेला आत्मसन्मान...
छञपती शिवाजी महाराजांचे
नांव घेता..
डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे
नांव घेता..
पण स्वाभिमान माञ गहाण टाकलाय...
लाजाही वाटत नाही ...

अरे किती दिवस ...किती पिढ्यां....
आपल्या तरूणांना वाटत नाही कां...?
स्वतः काही तरी स्वाभिमान निर्माण करावा..
दुसऱ्याचे पाय चाटण्यापेक्षा स्वतःमधे आत्मविश्वास निर्माण करावा...
दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः मोठं व्हावे...
दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालण्यापेक्षा, स्वतः चे रोपटे लावले तर ते मोठं झाड होतं...कधी कळणार आम्हाला हे...???

आज आमच्या पोरांचा केवळ वापर करून घेतला जातोय...
कुणाच्या तरी विरोधात..भांडण करण्यासाठी ...मारामारी करण्यासाठी...
कसा होणार आमचा भारत देश महासत्ता....२१व्या शतकात आहोत.

पण आमची पोरं काय करतायेत....
वाद घालणे, भांडण करणे, मारामारी करणे...

हीच गोष्ट मनाला खटकत होती....वाईट वाटत होते...तळमळ वाटत होती...पण सांगणार कुणाला...???

एकमेकांशी वाद लावतोय, वापर करून घेतोय, स्वतःच्या पक्ष, संघटना वाढवतोय....

भावांनो,

वाद घालण्यापेक्षा स्वतःशी जर संवाद साधला तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही...

आपल्याला भडकावणाऱ्यांनी कधी स्वतःच्या मुलाला, भावाला, गाड्या फोडायला, मारामारी करायला लावले का ?

का नाही लावत...???

अरे, विचार करा...

आणि...

तरीही जर तुम्ही भडकवणाऱ्या लोकांचं ऐकत असाल तर
तुमचं भविष्य अंधारात आहे...

विचार करा...

कुणाच ऐकून का बरबाद होता...???

या लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या नोकरी, व्यावसाय, धंदा, शिक्षण, घर, संसार इ. कडे लक्ष द्या...

कोणी जर कुणा विरोधात भडकवले तर त्याला सांगा...

अगोदर स्वतःच्या मुलाला सांग...
त्याला गाड्या फोडायला लाव...

म्हणजे...

काम करायाला आम्ही आरामाला तुम्ही ...

बनवायला आम्ही खायला तुम्ही ....

रस्त्यावर आम्ही पेपरात तुम्ही ...

तुरूंगात आम्ही tv वर तुम्ही...

हे आता थांबले पाहीजे....

तरूणांनो

जागे व्हा....

दुसऱ्याला गुलाम म्हणणारे विचार करा...
आपण कुणाचे गुलाम नाही ना....???

आपला कुणी वापर करत नाही ना...???

विचार करा.

विचार पटले तर
मिञांना पाठवा.....!!!
धन्यवाद मंडळी

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबई मध्ये मराठी पाठोपाठ गुजराती लोकसंख्या जास्त का आहे?

महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबई मध्ये मराठी पाठोपाठ गुजराती लोकसंख्या जास्त का आहे?
कारण ते कोळी समाजापाठोपाठ गुजराती आणि पारसी हे समाज वसले गेले होते. गुजराती समाज हा धाडसी आणि उद्योग, व्यवसाय करणारा समाज म्हणून शतकानुशतके ओळखला जात आहे. जेव्हा इस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय हे सुरत वरून मुंबई ला हलवल्यावर अनेक गुजराती आणि पारसी उद्योजक आणि व्यवसायिक हे संधीच्या शोधात मुंबई ला स्थलांतरीत झाले.
जुने नाम बॉम्बे आणि आताचे मुंबई हे त्या काळापासून ते आतापर्यंत आर्थिक उलाढालीचे, उद्योग, व्यवसायिक शहर म्हणून ओळखले जाते. आणि गुजराती हे जिथे संधी आणि आर्थिक नफा हा जास्त असतो तिथे स्थलांतरीत होत असतात, भारताच्या विभाजनाअगोदर ते कराचीला सुद्धा स्थायिक झाले होते. गुजरात्यांची मोठी लोकसंख्या हि मुंबई मध्ये उच्चभ्रू वस्तीत राहते.
एनडीटीव्ही ह्या वृत्त वाहिनीच्या वेबसाईटवर २०१५ साली लिहिलेला लेख सापडला, त्यामध्ये मराठी लेखक मधु मंगेश कर्णिक हे म्हणतात कि “मराठी माणसांची लोकसंख्या हि मुंबई मध्ये झपाट्याने कमी होत चालली आहे. १९६० साली मराठी समाजाची लोकसंख्या हि ५२ टक्के होती ती आता २२ टक्क्यांपर्यंत कमी होत आली आहे. मराठी माध्यमांच्या शाळादेखील बंद होत चालल्या आहेत, जर असेच सुरु राहिल्यास येत्या २० वर्षात फक्त ५ टक्के मराठी बोलणारी लोक उरतील मुंबई मध्ये.”
इतिहास आणि आजची परिस्थिती ह्यावर मी प्रकाश टाकायचा प्रयत्न करत आहे. इतर समाजाला नावे ठेवून काही फायदा नाही, चुकत कुठे असू तर फक्त आणि फक्त आपणच. खरच आपण जिथे संधी आहे तिथे स्थायिक होतो का? आपल्या समाजाला आर्थिक विकासाचा इतिहास आहे का? आपल्या पिढ्या ह्या काय करत होत्या?
ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मुक्त मनाने शोधायची आहेत. जिथे पिढ्या ह्या उद्योग व्यवसायात असतात तिथे थोडे तरी कमी पडले जाणार आहोत, पण जर प्रयत्न केला तर नक्कीच तिसऱ्या पिढीनंतर समाजाचे चित्र हे बदलले दिसेल. त्यावेळेस मराठी हा एकमेकांना मदत करताना दिसेल.
म्हणून मी प्रत्येक लेख किंवा माझ्या विचारात सतत मानसिकता आणि संस्कार हे शब्द वापरत असतो त्याचे उत्तर हे तुम्हाला आता भेटले असेल. नोकरी करणार्यांच्या मानसिकतेमुळे दृष्टीकोन हाही तसाच होवून जातो, मग सगळीकडे त्याला फक्त आणि फक्त नोकर्याच दिसू लागतात, पण जर उद्योग, व्यवसाय किंवा आर्थिक विकासाची मानसिकता ठेवली कि फक्त आणि फक्त श्रीमंती आणि समृद्धीच दिसून येते.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

उद्योजक, व्यवसायिक आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत

उद्योजक, व्यवसायिक आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत ह्या प्रशिक्षणासाठी जे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार येवून गेले त्यामधील काही अपयशी झालेल्या लोकांचा अनुभव असा होता कि “आम्ही खूप कमी वेळेत यशस्वी झालो पण परत आम्ही यशस्वी होवूच शकलो नाही, कसे तरी आम्ही दिवस ढकलत आहोत.”
हे ऐकणे जरी सोपे असले तरी त्यांनी अनुभवलेले किंवा अनुभवत असलेले आयुष्य हे खरच खडतर आहे. आपले आयुष्य म्हणजे काय सिनेमा नाही कि इथे खोटे सुख दुख, जन्म मृत्यू, यश अपयश येते. इथे आकडा अनुभव आला कि काही वर्षे त्याची चटके सहन करावेच लागतात.
इथे जे यशस्वी झाले ते हे विसरले कि यश म्हणजे काही ध्येय नाही आहे, तो प्रवास आहे, ते ध्येयाला प्रवास संपला असे समजून चुकले आणि अपयशाच्या परतीला लागले. आणि ज्यांना यशाला प्रवास समजला त्यांनी यशाची नवनवीन शिखरे पदक्रांत केली.
इथे भावना खूप महत्वाच्या आहेत ज्या आपल्या विचारांना दिशा देतात आणि विचार कृती करवतात. जेव्हा तुम्ही ध्येय ठरवल्या बरोबर लगेच कमी कालावधीत साध्य केले तर तुमच्या मध्ये गर्वाची भावना वाढण्याची शक्यता हि ९९ टक्के असते, उरलेला १ टक्का हा वर्ग सतत, जन्मजात किंवा सतत च्या प्रयत्नाने आपल्या भावना ताब्यात ठेवतात त्यामुळे ते त्यांनी साध्य केलेले ध्येय टिकवून ठेवतात आणि नव नवीन ध्येय साध्यही करतात.
आयुष्य हे असेच असते. इथे पहिला निकाल दिला जातो त्यानंतर मनुष्य शिकतो. पण जो आत्मविकासाला महत्व देतो तो सततच्या अंतरमनाच्या निकालाने शिकत जात वास्तवात परीक्षा पास होत जातो. पुढचा ठेच मागचा शहाणा हि म्हण तर प्रत्येकला लागू होतेच पण ह्यासाठीही मन मेंदूने स्थिर असावे लागते.
हाच नियम तुमच्या खाजगी आयुष्यालाही लागू होतो. नियम सगळ्यांना एकसारखाच लागू होतो. ह्यामध्ये अनुभवी आणि विनानुभावी असा भेदभाव केला जात नाही.
कृती करा. तुमच्या कडे हाच क्षण आहे जगण्यासाठी. पुढच्या क्षणाला काय होईल ते सांगता येणार नाही. जगा आपल्या स्वप्नांचे आयुष्य.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७




समुद्र बनून काय फायदा
बनायच तळे बना, जिथे वाघ पण
पाणी पितो, तो पण मान झुकवून.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

महाभारतातील अभिमन्यू, गर्भ संस्कार, अनुवांशिकता आणि कौटुंबिक संस्कार भाग १



उद्योजक, व्यवसायिक, नोकरदार आणि इतर सामान्य लोक ह्यांनी आवर्जून वाचा आणि समजून घ्या हा लेख. कमी वयात यशस्वी होण्याचे रहस्य हि तुम्हाला समजेल, आणि ह्यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करून सिद्ध हि केले आहे.
अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रा हिचा मुलगा. अतिशय शूरवीर. १६ व्या वर्षांपर्यंत अर्जुनाने एक चांगला पिता व्हायचे निभावले होते, अर्जुनाने वडिलांकडून द्याचे संस्कार जसे धनुर्विद्या आणि इतर शस्त्र चालवायचे शिकवले होते. प्रत्येक वडिलांनी शिकण्यासारखे.
जेव्हा गर्भ पोटात वाढत असतो तेव्हा तो संपूर्ण आई वर अवलंबून असतो. खाणे पिणे, ऐकणे, बघणे, अनुभवणे ह्यामार्फत गर्भातच त्याचे शिक्षण सुरु होते. जे कायमस्वरूपी त्याला स्वभाव देऊन जातो जे कोणीही बदलू शकत नाही, अपवाद फक्त १ टक्का लोक.
अभिमन्यू जेव्हा गर्भात होता तेव्हा अर्जुन सुभद्राला कौरवांचे युद्ध कौशल्याचा एक भाग चक्रव्युव्ह कसे भेदायचे हे सविस्तर सांगत होता. आणि आईच्या मार्गे गर्भ शिकत जातो त्यामुळे अभिमन्यू हि शकत होता. अर्जुनाने चक्रव्युव्ह भेदून आत कसा प्रवेश करायचा हे पूर्ण सांगून झाल्यावर सुभद्राला झोप आली आणि ती त्या चक्रव्युव्हा मधून बाहेर कसे पडायचे हे ऐकू शकली नाही.
गर्भ हा संपूर्ण पणे आई वर अवलंबून असल्यामुळे आई झोपल्यामुळे गर्भातील अभिमन्यू हि चक्रव्युव्हा मधून बाहेर कसे पडायचे हे ऐकू शकला नाही, ह्यामुईल तो अर्धवटच शिकू शकला. आणि नंतर मोठे झाल्यावर त्याला अर्जुन, श्रीकृष्ण ह्यांना वेळ भेटला नाही.
हे इथपर्यंत ठीक होते, पण ह्याचे परिणाम भयंकर झाले. ज्यांच्या मुलांनी परिणाम भोगले असतील किंवा भोगत असतील त्यांनी त्याची पार्श्वभूमी समजून घ्यावी. आणि उद्योजक व्यवसायिक, गुंतवणूकदारांनीही समजून घ्यावी. अर्धवट शिक्षण नेहमीच घात करते. आता परिणामासाठी पुढे वाचा.
जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध सुरु होते तेव्हा कौरवांनी त्यांचे अभेद्य चक्रव्युव्ह रचले जे फक्त अर्जुन आणि कृष्णाला येत होते. अर्जुन आणि त्याचा सारथी कृष्ण हे दोघेही रणांगनापासून लांब लढाईत व्यस्त होते आणि ह्या कौरवांच्या चक्रव्युव्हामुळे पांडवांच्या सैन्याचे खूप नुकसान होत होते. हे बघून अभिमन्यू युधिष्ठीर ला चक्रव्यूव्ह भेदण्यासाठी परवानगी मागतो पण युधिष्ठीर सुरवातीला परवानगी देत नाही, सैन्याचे होणारे नुकसान आणि अभिमन्यूच्या हट्टामुळे त्याला परवानगी द्यावी लागते.
अभिमन्यू चक्रव्युव्ह भेदण्यास यशस्वी ठरला कारण त्याने आईच्या गर्भातच ह्याचे शिक्षण घेतले होते पण चक्रव्युव्हा बाहेर निघायचे शिक्षण तो मोठे झाल्यानंतरही घेवू शकला नाही आणि ह्यामुळे तो चक्रव्युहामध्ये अडकून पडला. शेवटी त्याचा अंत हा जयद्रथाच्या हातून झाला.
लहान मुल यांची शिकण्याची सुरवात हि गर्भापासून होते, त्यानंतर ते आई वडिलांची बघून ऐकून शिकतात, त्यानंतर ते कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक आणि ज्या समुहात राहतात त्यापासून शिकतात. चांगले संस्कार चांगला मनुष्य घडवते आणि वाईट संस्कार हे वाईट मनुष्य घडवते.
उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहार करताना अर्धवट ज्ञानासोबत कृती हि कधीही प्रचंड नुकसानीचे परिणाम घेवून येते, त्यापेक्षा ती कृती न केलेली बरी.
आयुष्यामधील उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, खाजगी आयुष्य ह्यामधील चक्रव्युव्ह तुम्ही आरामत भेदू शकता, ह्यामध्ये कृष्णाचा रोल हा नेहमी आत्मविकास प्रशिक्षक करत असतो. तज्ञांचे फायदे हे ह्याच लेखातील पुढील भागात स्पष्ट करेन.
(कृपया हा लेख कुठल्या विशिष्ट धर्माच्या दृष्टीकोनातून बघू नका, आप आपल्या विश्वासानुसार वरील लेखामधील नावे हि आप आपल्या विश्वासानुसार बदलून वाचाल, सर्वात महत्वाचा आशय आहे.)
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



सर्व पक्षी मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी आसरा शोधतात, फक्त गरुड हा मुसळधार पावसाला टाळण्यासाठी पावसाळी ढगांवरुन उडतो. फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

मुख्य मुंबई, पश्चिम मुंबई उपनगर आणि नवी मुंबई मधून उध्वस्त झालेला इमानदार, सरळ मार्गाने चालणारा मराठी

मुख्य मुंबई, पश्चिम मुंबई उपनगर आणि नवी मुंबई मधून उध्वस्त झालेला इमानदार, सरळ मार्गाने चालणारा मराठी
आजची भारतातील सगळ्यात श्रीमंत वसाहत हि मुख्य मुंबई मध्ये आहे. तिथे कधी काळी आगरी आणि कोळी ह्यांचे वास्तव होते ते आता अतिशय संकुचित होत गेले आहे.
कधी काळी मुंबई चा मुख्य रहिवासी हा कोळी आणि त्या पाठोपाठ आगरी हा दिसेनासा झाला आहे. राजकारणी सोडली तर ९८ टक्के मुंबईचा रहिवासी हा संपवण्यात आला आहे.
मनुष्याच्या अस्ताला तो च जबाबदार असतो, कारण जो हार मानतो तो रणांगण सोडून जातो, हा इतिहास आहे मनुष्य प्राण्याचा.
त्यानंतर गिरणी कामगार उध्वस्त झाला, मराठी मुख्य मुंबई मधून मुंबई उपनगरात जाऊ लागला, त्यानंतर मुंबई उपनगर सोडून तो ठाणे कल्याण ह्या ठिकाणी जावू लागला, त्यांतर पाठ दाखवत पळत तो खोपोली आणि गाव गाठायला लागला.
खरे म्हणजे पाठ दाखवत पळणे हे काही भित्रे पणाचे लक्षण नव्हते, त्याला चतुराईने पळवले गेले. त्यांच्या सरळ स्वभावाचा फायदा पूर्ण पणे उचलला गेला. त्याच्या भावनेशी खेळले गेले, धोके तर प्रचंड दिले आणि पाठीवर वरही खूप करण्यात आले.
हेच नवी मुंबई वसवण्यासाठी करण्यात आले. मोठ मोठे मराठी शेतकऱ्यांचे मोर्चे आणि नेते संपवण्यात आले. तिथला आगरी हा जवळपास आयसीयू वर आहे. जवळपास तो १० ते ३० वर्षात संपून जाईल.
जात धर्म आणि राजकारणात त्याला इतके व्यस्त ठेवण्यात आले कि दंगली मध्ये मुक्त अर्थ व्यवस्थेचा स्वीकार करत त्याचे परिणाम हे साल २००० नंतर दिसण्यात आले.
आता तर शेवट असा आहे कि कुणीच काहीही करू शकत नाही. जिथे मच्छी चा सुगंध यायचा तो शहरी संस्कृतीला तो घाण वास वाटू लागला आहे. कधी काळी कोळी आगरी लोकांची संस्कृती हि बंगले सोडून चाळी मध्ये आणि त्यापुढे झोपडीमध्ये तग धरू पाहत आहे.
मुंबई जवळून आलेली मराठी मंडळी हि परत कोकण, पुणे नाशिक अश्या ठिकाणी परत जात आहे. कुठेही गेले तरी स्वभाव तर बदलावाच लागेल. ज्या स्वभावामुळे माझे माझ्या पिढ्यांचे आणि मराठी समाजाचे नुकसान झाले तोच स्वभाव धरून आताच्या काळात चाललो तर शेवटचा मराठी उरायला काही वेळ लागणार नाही.
तुम्हाला पिढ्यान पिढ्यांचे नोकर बनायचे आहे कि पिढ्यान पिढ्यांचे मालक बनायचे आहे? श्रीमंत आपल्या मुलाला सांगतो : "ह्याचे वडील आपल्याकडे नोकर होते आणि आता त्यांचा मुलगा आपला नोकर आहे.", नोकर आपल्या मुलाला सांगतो : "ह्याचे वडील अगोदर हा उद्योग, व्यवसाय सांभाळायचे आता त्यांचा मुलगा हा मालक झाला आहे."
काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलतो तोच निसर्ग नियमानुसार टिकतो. आता पळणे बंद करा. पाण्यासारखे बना, कधी बर्फ तर कधी वितळलेले पाणी. कधी कोल्हा तर कधी वाघ, कधी कावळा तर कधी गरुड.
शत्रू जर बलाढ्य असेल तर लपून पाठून वार करा. हरा किंवा जिंका, मान्य करा आणि योजनेमध्ये बदल करत जा. ध्येय फक्त सोडू नका. अति विश्वास कुणावर टाकू नका. प्रत्यक ठिकाणी स्वतः जातीने लक्ष्य घाला.
जग तुम्हाला नाव ठेवेल ते मनावर घेवू नका. आपल्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा. कर भला तो हो भला हे अजून मला वास्तवात दिसले नाही, अशी अनेक उदाहरणे देवू शकतो कि वाम मार्गाने कमावलेल्या पैश्यांवर पिढ्या ह्या सुखी झाल्या आहेत आणि इमानदारीच्या पैश्यांवर जगणारे हे आपल्या पिढ्यांसाठी परत शून्य पासून सुरवात ठेवून गेले आहे. हि उदाहरणे तुमच्या जवळपास कितीतरी असतील, जास्त लांब जायची गरज नाही.
सिनेमा आणि वास्तव आयुष्य ह्या मध्ये खूप फरक आहे. लोकशाही च्या देशात अघोषित हुकुम शाही बघितली आहे. पैश्यांच्या जोरावर कायदे नियम मोडताना बघितले आहे. सामान्य लोकांचा पदोपदी अपमान होताना बघितले आहे आणि तीच लोक मिडिया समोर येवून इमानदारीच्या आणि लोकशाहीच्या मोठ मोठ्या बाता करताना बघितल्या आहेत.
नेते आपल्या मुलांसाठी पक्ष, त्याचे पद, संपत्ती आणि पावर ठेवून जातात, आणि कार्यकर्त्यांची मुल हि कोर्ट आणि पोलीस च्या केसेस घेवून असतात, नोकरी शोधतात किंवा छोटा मोठा व्यवसाय करत असतात.
मर्यादित, संकुचित आणि लाचारीची विचारसरणी सोडा. नैतृत्व करा. एकटे चाला. निर्णय घ्या, धोका पत्कारा, १० ते ६ नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देणारे बना. उंच उडी घ्या, धाडसी पालकांचे मुलच धाडसी बनतात. मुलांना आपण करत असलेली धडपड बघू द्या.
इतिहास साक्षी आहे कि धूर्त लोक हि पिढ्यान पिढ्या टिकून राहिली आहेत. कालही होती, आजही आहेत आणि भविष्यातही राहणार. तुम्हाला पदोपदी ह्यांचा सामना करावाच लागेल. आणि जो त्या क्षणी सक्षम तोच जगण्याचे युद्ध जिंकेल.
उत्क्रांतीचा सिद्धांत सुद्धा हेच सांगतो कि जो काळानुसार, परिस्थितीनुसार बदलतो तोच टिकतो. बाकी बदलाच्या ओघात संपून जातात, जसे मुंबई मधील इमानदार सरळ मार्गी चालणारा मराठी माणूस.
लवचिक बना. मानसिक दृष्ट्या कणखर बना.
पुढील लेखामध्ये मी अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


रामायणात दोन व्यक्ति अशा होत्या,

एक बिभीषण आणि दुसरी कैकयी.

रावणाच्या राज्यात राहूनही
बिभीषण बिघडला नाही,

श्रीरामाच्या राज्यात राहुन
कैकयी सुधारली नाही.

सुधारणे आणि बिघडणे व्यक्तिच्या
विचारावर आणि स्वभावावर
अवलंबून असते.

परिस्थितिवर नाही.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

प्रोस्ताहन देणारे व्यक्तिमत्व ओपरा विनफ्रे



अमेरिकेतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, प्रसारमाध्यमाची मालकीण, अब्जो रुपयांची मालकीण.

भूतकाळ संकट आणि समस्यांनी भरलेला. वयाच्या ९ व्या वर्षी लैंगिक अत्याचाराला बळी पडली, वयाच्या १३ व्या वर्षी फुटपाथ वर आली, १४ व्या वर्षी आपले बाळ गमावले.

ह्या सर्व भयंकर परिस्थितीतून बाहेर येत ती आज अब्जो रुपयांची मालकीण आहे आणि जगभरातील तरून तरुणींची आदर्श आहे.

वयाच्या ३२ व्या वर्षी ती अमेरिकेतील राष्ट्रीय दुरचित्र वाहिनीवरील पहिली निग्रो स्त्री आणि अब्जोपती आहे.

टाइम ह्या जगप्रसिद्ध मासिकाने केलेल्या जगातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व ह्या निवडणुकीमध्ये ओपरा विनफ्रे ला लोकांनी सतत निवडून दिले होते, ह्यामुळे ती २० व्या शतकातील जगातील सर्वात प्रभावी १०० व्यक्तीमत्वांमध्ये तिचा समावेश झाला आहे.

बोध :

तुमचा जन्म कुठलाही असू द्यात, तुम्ही तुमच्या आयुष्याला किती उंचीवर घेवून जाणार आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही स्वतःला परिस्थितीला दोष देत बसलात तर तुम्ही काहीच साध्य करू नाही शकणार. आणि हे नकारात्म युद्ध तेव्हाच संपेल जेव्हा तुम्ही संपवाल.

अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत

८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



हि समस्या जेव्हा तुम्ही लोक बोललेले प्रत्येक म्हणणे ऐकल्यावर उद्भवते.

अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



सामान्यतः मिळणारे पिढीजात संस्कार आणि फायदे
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

पाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO

पाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO
या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २१३ कोटी रुपयांचा नफा कमावला असून २१ कोटी रुपये कंपनीचे सीईओ असलेल्या 'दादाजीं'च्या खात्यात जमा झालेत.
त्यामुळे कमी शिक्षण हे कारण तुम्ही देवू शकत नाही. तुम्ही १०० करणे द्याल तर माझ्याकडे जगभरातील १००० कमी शिक्षित किंवा लहान उद्योजक व्यवसायिकांची यादी तयार असेल.
खालील मटा मधील लेख संपूर्ण वाचाल.

पाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO -Maharashtra Times

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई आपल्या स्वयंपाकघरात अनेक वर्षांपासून हक्काचं स्थान मिळवलेल्या एमडीएच मसाल्याच्या पॅकेटवर तुम्ही फेटावाल्या आजोबांचं चित्र पाहिलंच असेल ना?... किंवा मग टीव्हीवरच्या एमडीएचच्या जाहिरातीतील पीळदार मिशीवाले 'दादाजी' नक्कीच बघितले असतील?... ९४ वर्षांच्या या आजोबांनी बड्या बड्या उद्योगपतींना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
समुपदेशन, मार्गदर्शक, प्रशिक्षक

संपूर्ण जगामध्ये तुम्हाला ९ प्रकारच्या मानसिकतेची लोक भेटतीलच



संपूर्ण जगामध्ये तुम्हाला ९ प्रकारच्या मानसिकतेची लोक भेटतीलच
१) अब्जो खरबोंची संपत्ती असलेले श्रीमंत
२) पिढीजात श्रीमंत
३) द्वितीय पिढी आणि त्यापुढील श्रीमंत
४) नव श्रीमंत
५) उच्च मध्यम वर्ग
६) मध्यम वर्ग
७) कनिष्ठ मध्य वर्ग
८) गरीब
९) अतिगरीब
हे काही फक्त पैश्यान बाबतीत नाही आहे, जेव्हा तुम्ही ह्यांचा जवळून अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला जाणवेल कि हा जो उतरता क्रम लागला हा तो त्यांच्या मानसिकतेमुळे लागला आहे. वरील २ ते ५ क्रमांकातील लोकांशी माझा दररोज चा परिचय होत असतो, त्यांचे प्रमाण अंदाजे आपण ९० % पकडू आणि बाकी १० टक्क्यांमध्ये येतात.
जस जसा क्रम चढत जातो तस तसे विचार, भावनांची स्थिरता आणि सकारात्मक विचार हे वाढत जातात. आयुष्याचा प्रत्येक भाग ते अमर्याद जगत असतात. आणि जस जसा क्रम खाली खाली येत जातो तस तसे विचार, भावनांची अस्थिरता आणि नकारात्मक विचार वाढत जातात.
असेच काहीसे आरोग्याच्या श्रीमंती विषयी आहे, वरील १ ते ५ क्रमांकातील लोक हि रोग झाल्यावर उपचारांसाठी जास्त खर्च नाही करत, त्यांचा जास्तीत जास्त खर्च हा मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवणे ह्यावर जास्त भर असतो.
खालील ६ ते ९ क्रमांकातील लोकांचा औषध उपचारांवर जास्त खर्च असतो आणि आरोग्यावर खूपच कमी असतो.
१ ते ५ क्रमांकातील लोक शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्याला नेहमीच प्राधान्य देतात, ६ ते ९ क्रमांकातील लोक हि मानसिक आरोग्याकडे आत्मविकासाच्या दृष्टीकोनातून न बघता “मी काय वेडा आहे का?” असे बोलून ते टाळतात किंवा साफ दुर्लक्ष्य करतात.
१ ते ५ क्रमांकातील लोकांकडे स्वार्थी किंवा निस्वार्थी भावनेने बोला पण नातेवाईक आणि जवळच्या नात्यांचा लोकांचा जमवला हा खूप असतो आणि वेळ प्रसंगी जास्तीत जास्त ते कामालाही येतात. ६ ते ९ क्रमांकातील लोकांमध्ये जास्तीत जास्त भांडणे आणि एकमेकांचा हेवा हा दिसुन येतो. मदतीचे प्रमाणही खुप कमी असते.
१ ते ५ क्रमांकातील मुल हि लहानपणापासून तज्ञ लोकांच्या सहवासात प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रित्या वाढलेली असतात म्हणून ती जीवन जगायला सुरवात करतात तेव्हा लग्न, आणि मुलबाळ होवून लवकर आयुष्यात जम बसवतात. त्याउलट ६ ते ९ क्रमांकांना खूप मेहनत करावी लागते, लग्न मुलबाळ ह्यासाठी हि ते वेळ घेतात किंवा हि जबाबदारी उचलताना त्यांना प्रचंड त्रास होत असतो.
ह्या प्रत्येकांची एक मानसिक सीमा रेषा असते ज्यामुळे तो तसेच आयुष्य जगत असतो, जो पर्यंत त्यांच्या पिढीमधील कोणीतरी ती सीमारेषा तोडत नाही तोपर्यंत. मानवी समाजत हालचाल तर होते पण ती काही काही क्षणात नाही होत, काही पिढ्यांचा कालावधी किंवा शेकडो वर्षे द्यावी लागतात.
हा एका पिरेमिड सारखा आकार आहे, वर जस जसे जात जाल तस तशी लोकसंख्या खूपच कमी कमी होत जाईल आणि जस जसे खाली येत जाल तस तशी लोकसंख्या हि प्रचंड वाढलेली दिसेल. वरच्या मजल्यावरून खाली यायचे प्रमाण खूपच कमी आहे आणि खालच्या मजल्यावरून वर जायचे प्रमाण तर अगदी नगण्य आहे.
वरील १ ते ५ क्रमांका मधील लोकांना जीवनशैली फक्त टिकवून ठेवायचे आहे तर ६ ते ९ मधील लोकांना जीवन शैली निर्माण करून मगच टिकवून ठेवायची आहे. वरील १ ते ५ क्रमांकामध्ये जे असतात त्यांची मुले यशस्वी होतात व सतत मिडिया मध्ये देखील येत असतात. खालील ६ ते ९ मधीलहि यशस्वी होतात पण इथे यश हे आर्थिक स्वरुपात कमी प्रमाणात असते आणि भांडवलशाही ला पोषक नसते म्हणून ते मिडिया मध्ये येत नाहीत आणि आले तरी एखाद दुसरा चुकून.
हे पिरेमिड फक्त आणि फक्त मानसिकतेमुळे तयार झाले आहेत. एकदा का तुम्ही तुमची मानसिकता बदलली कि त्यामुळे दृष्टीकोन बदलतो आणि मग प्रत्येक संधीचे सोने करत मनुष्य आपल्याच पिढीमध्ये यशस्वी होतो.
जागृत मनोवृत्तीचा मनुष्य हे चांगलेच ओळखून आहे, समस्या होते ती सामान्य मानसिकतेच्या लोकांची. ते भावनेच्या भरात इतके वाहून जातात कि ते पैश्यांना महत्व देत नाही आणि मग ते नकारात्मकता, मानसिक, शारीरिक गरिबीमध्ये जगायला लागतात.
जागृत मनोवृत्ती ची लोक हि आपल्या शारीरक आणि मानसिक गरजा ह्या पैश्याने पूर्ण करून घेतात. ह्यासाठी अगोदर ते आत्मविकासा द्वारे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या दररोज किंवा वेळोवेळी स्वतःला मजबूत, सक्षम आणि साक्षर करून घेतात.
सामान्य मानसिकतेची लोक हि फक्त भावनेच्या भरत सतत इकडून तिकडे वाहत जातात. आणि इथे मानसिक आणि शारीरिक सक्षमतेच्या जागी आजार, अपघात त्यांच्या अनुभवास येतात. ह्यांच्या दररोजच्या पोटापाण्याचे कसे तरी भागून जाते त्यामध्ये ह्यांना छंद किंवा इतर आवडीचे करण्यासाठी वेळच नसतो.
जागृत मनोवृत्तीची लोक हि ध्येयाशी एकनिष्ठ असतात. ते पहिले महत्व ध्येयाला देतात व नंतर इतर बाबींना. त्यांना माहित असते कि आपल्यावर करोडो रुपये सांभाळायची जबाबदारी आहे, त्यासोबत अनेक कामगारांचे आणि त्यांच्या परिवाराचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या पोट भरायचे आहे. ह्यासाठी त्यांना आपल्या परिवारालाही वेळ देता येत नाही.
सामान्य मानसिकतेची लोक फक्त त्यांच्या जीवनशैलीकडे बघतात आणि बाकी वेळ हा त्याच्याच बद्दल चर्चा करत बसतात
उद्योजक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार बनने, श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगणे हि काही मोठी गोष्ट नाही आहे, ह्यासाठी सर्वात महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे धाडस, ह्या पाठोपाठ गुणांची एक शृंखलाच सुरु होते. त्यानंतर सर्वात महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे मर्यादा तोडताना परत पाठी न जाण्याची जिद्द, चिकाटी.
ह्या बरोबर सकारात्मक दृष्टीकोन, स्थिर, शांत आणि थंड मानसिकता, मधाळ भाषा शैली, धूर्तपणा (हा खूप महत्वाचा आहे, हा नसेल तर तुम्ही तुमचे स्वप्न किंवा ध्येय हे दुसर्यांना आरामत देवून टाकाल. जगही त्याच धुर्ताचे ऐकेल, ना की तुमच्यासारख्या इमानदाराचे.), परिस्थितीनुसार त्याच क्षणाला साम, दाम, दंड किंवा भेद ह्याचा वापर करणे, प्रचंड एकाग्रता आणि भावनांवर ताबा असे प्रमुख गुण असणे आवश्यकच आहे, त्यानंतर त्या मनुष्य प्राण्यानुसार आणि परिस्थितीनुसार वेगवेगळे असतात आणि गुण जाणून घेण्यासाठी तज्ञांची मदत घ्यावी लागते.
ह्या गुणांना पर्याय नाही आहे. हे तुमच्याकडे असलेच पाहिजे. सिनेमा आणि वास्तव आयुष्य ह्या मध्ये जमीन आसमान चा फरक आहे.
सुरवात करणारा काही सुरवातीलाच यशस्वी होत नाही आणि होतही असले तरी त्यांचे प्रमाण हे खूपच कमी आहे, सामान्यतः सुरवातीला जास्तीत जास्त लोक अपयशी होतात. त्यामधले तज्ञांची मदत घेतात ते कसे तरी किनारा गाठतात आणि हाच अनुभव त्यांना उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार बनवतो, बाकी बुडून जातात, म्हणजे परत आपल्या नोकरीच्या जुन्या मार्गाला लागतात, किंवा कमी धोके आहेत ते काम करतात.
जास्तीत जास्त उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणुकदार ह्यांना तुम्ही यशाचे रहस्य विचारले कि ते सगळीकडे पुस्तकात किंवा भाषणात एकसारखे रट्टा मारलेले मुद्दे सांगत बसत नाहि, ते एकच म्हणतील कि मला माहित नाही, मला हे काम करण्यात मजा येत होती, मला असे काही विशेष करावे लागले नाही, मला वाटले आणि मी करत गेलो आणि आज इथपर्यंत पोहचलो. जो अंतर्मनापासून काम करतो तो कधीच त्याला स्वतःला व्यक्त करू शकत नाही आणि तो खोटेही बोलू शकत नाही कारण त्याचे आयुष्य आणि तो करत असलेला उद्योग व्यवसाय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचा आवाज आणि त्याची देहबोली हे सर्वकाही बोलून जाते. मनुष्याच्या आयुष्याला आणि त्याच्या अंतर्मनाला कोणीच कागदावर उतरवू शकत नाही.
एक एक पाउल टाकायला सुरवात करा. पर्वताच्या शिखरावर पोहचल्यावरच तुम्हाला समजेल कि ते शिखर आहे ना कि पायथ्याशी बसून किंवा अर्धवट सोडून. एव्हरेस्ट चढणे हे खूप सोपे आहे पण त्यासाठी मनाला तयार करणे हे खूपच कठीण आहे, मानसिक क्षमतेची तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत चाचणी सुरु असते आणि जो हि चाचणी पार करतो तोच शिखर गाठतो.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



आपले ध्येय, स्वप्न आणि वास्तविक आयुष्य.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



हुशार मनुष्य हा आपल्या शत्रू कडूनही फायदा करून घेतो आणि मूर्ख मनुष्य हा आपल्या मित्रांकडूनही फायदा करून घेत नाही.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



ज्यांना प्रश्न पडला असेल कि काही माणसांच्या आयुष्यात यश आणि समाधान सतत येत असते, का काही लोक हे सतत खाजगी आणि व्यवसायिक आयुष्यात भाग्यशाली जगत असतात त्याचे उत्तर हे तुम्हाला खालील कथेमध्ये मिळेल.
खाजगी आणि व्यवसायिक जीवनात यश आणि पैश्यांचा प्रवाह हा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी हि कथा नुसती वाचू नका तर आत्मसात कराल.
आपल्या कमेंट्स खाली द्याल, किंवा जर काही समस्या असतील इमेल कराल.
एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...
तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,
भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?
काही त्याला शिकवा.
त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "
आणि
मोठ्याने हसू लागला ....
हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...
तो घरी गेला ....
त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते ..
तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!
मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...
रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे
मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो ..
त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात ....
राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..
आणि
मी चांदीचे नाणे उचलतो ..
त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ...
सार्यांना मजा वाटते .......
***असे रोज घडते*** (हे लक्ष्यत ठेवा ह्याचे उत्तर खाली भेटेल)
मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो
चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही
न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?
असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"
मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती ...
हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..
मुलगा म्हणाला
" ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल ..
त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या ..
पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "
सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...
प्लिज नक्की forward करा, खूप छान मेसेज आहे. 👍👍👍
इंटरनेट वरून साभार
"गुरुमंत्रा"
अश्विनीकुमार
आर्थिक आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



कुणाला श्रींमत व्हायचे आहे?
ह्या प्रश्नावर उत्तर म्हणून सर्व हा वरती करतील.
कोण आतापासून सुरवात करणार आहे?
आजपासून कृती करायला कोणीही हात वरती करणार नाही.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

मनुष्याची परिस्थिती इतिहास, वर्तमान आणि भविष्य



प्रत्येक जन आपआपल्या परिस्थितीनुसार इतिहास, वर्तमान आणि भविष्यात लिहून ठेवत असतो. जगामध्ये हा नियम सारखाच आहे.
मला नाही माहित कि मनुष्य प्राणी कधी पासून भेदभाव करायला लागला, पण इतके माहित आहे कि श्रीमन, मध्यमवर्ग, गरीब आणि अति गरीब हे पुरातन काळाच्या ग्रंथामध्येहि उल्लेख केलेला आढळतो.
मुंबई मध्ये ढोबळ मानाने मनुष्य प्राण्याचे वर्गीकरण केल्यास गर्भ श्रीमंत, श्रीमंत, उच्च मध्यम वर्ग, मध्यमवर्ग, गरीब आणि अति गरीब असे आढळून येते. वरील तीन वर्ग जिथेही जातील तिथे ते त्यांच्याच वर्गाशी मिळत्या जुळत्या लोकांमध्ये उठणे बसने करतील.
परदेशातून येणारा प्रवासी हा जर श्रीमंत असेल तर तो मुंबई ला आल्यावर ताज, ओबेरॉय अश्या सप्त आणि पंचतारांकित हॉटेल मध्येच थांबेल. त्याचा घरापासून ते हॉटेल पर्यंतचा प्रवास हा सुखकारकच असेल.
तोच प्रवास हा जस जसे तुम्ही खाली याल तस तसे बदलत जाईल आणि थोडा थोडा त्रास दायक होत जाईल. आणि जर ह्या वर्गांपैकी जो कोणी लेखक असेल तो लिहिताना त्या त्या पद्धतीच्या अनुभवाप्रमाणे लीहीत जाईल.
वर्तमानच इतिहास आणि भविष्य बनत असतो. मला जर कोणी बोलले कि इतिहासात सोन्याचा धूर निघत होता आणि भविष्यात सोन्याचा धूर निघणार आहे तर त्याला बोलतो कि मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही आहे, आता दाखव, मी जिवंत असे पर्यंत मला बघायचा आहे, जर नाही दाखवू शकत तर सांगायची काही गरज नाही.
अश्या अतिरेकी वक्तव्य करणाऱ्या लोकांपासून लांब रहा, स्वर्ग आणि नर्क इकडेच ह्याच क्षणात आहे, तो आप आपल्या दृष्टीकोनात आहे. तुम्ही ह्या क्षणाला जसे आयुष्य जगत आहात तेच तुमचे वास्तव आहे. आणि हे वास्तव बदलायला तुम्हाला हाच क्षण आहे.
वेळ हे सतत चालणारे चक्र आहे, जो योग्य वळणावर वळवून परत आपल्या ध्येयाच्या स्वप्नाच्या दिशेने नेतो त्याला ते प्राप्त होते. जो नाही नेत त्याला हे चक्र भरडून टाकते. कोणीही अमरत्व घेवून आलेले नाही हे इतिहासात मोठ्या लोकांच्या उदाहरणावरून दिसून येईल. नाहीतर ते वर्तमानात आपल्या सोबत असले असते.
श्रीमंत - गरीब, सभ्य - असभ्य, चोर, डाकू - पोलीस, राजा - रंक, मित्र - शत्रू, चांगले - वाईट, रोगी निरोगी हे सर्व वर्णन इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत आहे आणि भविष्यातही ते राहणार आहे.
मी समोर येणाऱ्या मग तो स्त्री असो किंवा पुरुष ह्याला मनुष्य प्राण्याच्याच नजरेने बघतो. बाकी भेदभाव हे समाजात जरी असतील तरी माझ्या आयुष्यात नाही आहे. आम्हाला निसर्गानेच (आपला आपला विश्वास जो असेल त्याने) निर्माण केले आहे. आमच्या नैसर्गिक भावनिक आणि शारीरिक गरजा एकसारख्याच आहे.
जर आयुष्य पूर्ण जगायचे असेल तर वर्तमानातच जगा. जर वर्तमानात तुम्ही तुमचे लक्ष्य विचलित केले तर इतिहास तर जाऊ द्याच पण संपूर्ण भविष्य हे अंधकारमय करून टाकाल.
मी जे आता सांगितले आहे त्याला अनुभवाशिवाय पर्याय नाही. अनुभव मनुष्याला हुशार बनवतो. विना अनुभवी मनुष्य हा त्याच्या बोलण्यावरूनच ओळखून येतो.
लक्ष्य फक्त वर्तमान काळावर आणि आपल्या ध्येय, स्वप्नांवर ठेवा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७