प्रयत्न केल्यावरच फळ भेटेल. जर फळ भेटत नाही तर तुम्ही प्रयत्न करण्यात कमी पडत आहात किंवा तुमच्या प्रयत्नांची दिशा हि चुकली आहे. परत जोमाने प्रयत्न करा किंवा दिशा बदलून बघा. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ हे भेटणारच.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

९८ % उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूकदार हे पहिल्या प्रयत्नात अपयशी का होतात?



सर्वच काही पहिल्या प्रयत्नात यशस्वी होत नाही .

आपण काही पहिल्या प्रयत्नात चालायला नाही लागलो.

पहिल्याच प्रयत्नात सर्वच शालेय, कॉलेज च्या परीक्षेत पास होत नाही.

पहिल्याच प्रयत्नात सर्वांना नोकरी लागत नाही.

पहिल्याच प्रयत्नात सर्वांना जोडीदार भेटत नाही.

बालमृत्यू दर बघता सर्वांना जन्माला आल्यापासून जगण्याची संधी भेटत नाही.

मला आशा आहे कि तुम्हाला उत्तर भेटले असेल.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज :

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

घरगुती निर्माण होणारे ताण तणाव व त्यामुळे होणारे गंभीर गुन्हे - भाग १



पतीने दारूच्या नशेत पत्नीचा खून केला आणि कारण होते कि पत्नी मुलाची शाळेची फी भरण्यासाठी पती कडे पैसे मागत होती.

हे कारण शुल्लक वाटत आहे पण ह्यामागे स्वभाव आणि सवय देखील लपलेली आहे.

पती रिक्षाचालक आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. लग्नाला ११ वर्षे होवून गेली. पती सर्व पैसे दारूत घालवायचा. घरखर्चाला पैसे देत नव्हता. पैश्यांवरून इतकी वर्षे भांडणे होत होती.

खुनाच्या अगोदर जेव्हा पती दारू पिऊन घरी आला तेव्हा पत्नी ने मुलाच्या शाळेच्या फी साठी पैसे मागितले व ह्यावरून परत भांडण सुरु झाले. पती ला राग अनावर झाला व त्याने पत्नी चा गळा आवळून खून केला.

पतीला काही पश्चाताप नाही झाला, उलट त्याने हत्येला आत्महत्येत बदलण्याचा प्रयत्न केला, मृतदेह हा छताला लटकवून फरार झाला.

शेवटी सत्य हे बाहेर आलेच, शवविच्छेदनात मृत्यूचे खरे कारण समोर आले आणि पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पती पत्नी मध्ये भांडणे होतात व नाही देखील, असा काही नियम अहि कि लग्न झाल्यावर भांडणे हि झालीच पाहिजे, हे प्रेमाचे प्रतिक आहे वगैरे, हा शुद्ध मुर्खपणा आहे.

जर वरील घटनेतील स्त्री ने स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवत वेगळे रहायचा निर्णय घेतला असता तर तिला आयुष्याची ११ वर्षे वाया घालवावी नसती लागली.

पती ना परमेश्वर असतो, ना पत्नी लक्ष्मी आणि ना हि विवाह कायमस्वरूपी बंधन असते. हे सर्व मानसिक बंधने, आणि खोटे विश्वास असतात.

शेवटी पत्नील जीव गमवावाच लागला ना? जिवापेक्षा महत्वाचे काहीही नाही. आणि किती वर्षे भांडण करण्यात घालवायचे? मग जगायचे कधी? ह्यालाच आयुष्य बोलतात का? कोणी समाज तरी आला का जीव वाचवायला? समाजानेच कठोर नियम बनवले आहे ना?

स्त्रियांसाठी कठोर कायदे बनवले आहे पण त्याचा दुरुपयोग जास्त होतो आन ज्यांना गरज आहे अश्या स्त्रियांना न्याय देखील भेटत नाही आणि उशिरा न्याय भेटल्याचा काहीही फायदा नाही.

हे गरीब ते श्रीमंत अश्या सर्व घरात आढळून येते, एड्स सारखे विचार करू नका कि एड्स फक्त विशिष्ट वर्गांच्या लोकांना होतो असे बोलत गरीब, मध्यम वर्ग आणि श्रीमंत एकमेकांकडे बोट दाखवत बसतात.

लग्नानंतर ३ महिने ते ३ वर्ष पुरेसी आहेत निर्णय घ्यायला, आणि मुल होण्याच्या अगोदर जो निर्णय घ्यायचा तो घ्यायचा, कारण एकदा का तुम्ही मुल वाढवण्यात व्यस्त झालात तर अजून काही वर्षे भुरकन उडून जातात व समस्या हि आक्राळ विक्राळ रूप घेते.

दारू तर अनेक लोक पितात पण सर्व काही बायकोला मारत नाही किंवा खून करत नाही, जर व्यक्ती खुनशी स्वभावाची असेल तर तर ती खून करणारच.

११ वर्षे पती चा अत्याचार सहन करण्याची क्षमता होती तर मग वेगळे होवून तीच सहनशक्ती आयुष्य परत सुरु करण्यासाठी का नाही वापरली? उलट तुमच्या आयुष्याची नवीन सुरवात चांगली झाली असती.

स्त्रियांनी मानसिक गुलामीतून बाहेर पडणे गरजेचे आहे. जग तुमच्यासाठी बनलेले आहे, तुम्ही रपत सुरवात करू शकता, अश्या अनेक स्त्रिया आहे ज्यांना नवर्यानी सोडले पण त्यांनी प्रगती केली. चौकटीतून बाहेर पडा.

वैवाहिक जोडीदार फक्त पुरुष नाही तर महिला देखील स्वभावाने वाईट असू शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या परिस्थिती नुसार अदलाबदल करून लेख वाचू शकतात, नाण्याच्या दोन्ही बाजू बघत जा.

ज्या स्त्रिया अश्या किंवा इतर कुठल्याही मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात आहे त्यांच्यासाठी विशेष समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध आहेत, ह्याचा फायदा घेवून स्त्रिया नकारात्मक आयुष्यातून बाहेर पडून आपले नवीन आयुष्य घडवू शकतात.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

तुम्ही पिंजऱ्यात कैद केलेले वाघ आहात कि जंगलातल्या मुक्त वातावरणात राहणारे वाघ आहात?



मनुष्य हा निसर्ग नियमांविरुद्ध वागत आहे. जंगलात जिथे चालायला लागल्यावर प्राणी आपल्या पिल्लांना, बछड्यांना शिकार करायला शिकवतात तिथे मनुष्य प्राणी हा चार भिंतींच्या शाळेत आपल्या मुलांना पाठवतो.

सर्कस मधील पिंजऱ्यात जन्माला आलेल्या वाघाच्या बछड्याला स्वतंत्र काय असते हे माहिती नसते तसेच मनुष्य प्राण्याच्या मुलाला देखील माहिती नसत कारण ते पिंजऱ्यात जन्माला आलेले असतात.

सर्वच मनुष्य प्राण्याची मुल हि पिंजऱ्यात वाढतात का?
नाही.

काही मनुष्य प्राण्याची मुल हि परिस्थिती मुळे, स्वभावामुळे किंवा संस्कारामुळे चार भिंतींच्या बाहेर आयुष्य जगतात किंवा दुहेरी आयुष्य देखील जगतात जिथे ते शाळा आणि घर ह्या पिंजऱ्यात आयुष्य जगतात आणि त्याबाहेर देखील.

जिथे जास्तीत जास्त मुलांचे आयुष्य हे पिंजर्याबाहेर मुक्त जंगलरुपी बाजारपेठेत २० ३० वर्षानंतर सुरु होते तिथे काहींचे आयुष्य हे २० किंवा १० वर्षांच्या आत बाजारपेठ रुपी जंगलात सुरु होते.

जी मुलं हि जास्तीत जास्त वेळ पिंजऱ्यात राहिली त्यांनी फक्त घरच्यांची शाळेची काळी बाजू बघितली असेल पण जी मुलं पिंजर्याबाहेर मुक्त बाजारपेठेत वाढली त्यांनी आयुष्याची काळी बाजू बघितलेली असते.

पिंजऱ्याच्या आत वाढलेल्या मुलांना संकटाचा सामना कसा करायचा, जीवन मृत्यू ह्या क्षणाच्या वेळेस लढा कसा द्यायचा हे नैसर्गिक गुण जागृत न झाल्यामुळे ते अनेकदा शिकार होतात, इथे जर एकदा जीव गेला तर ठीक आहे पण जेव्हा सतत सतत त्यांना संकटांचा सामना करायला लागतो तेव्हा ते दररोज जखमी होतात व ते घाव जास्तीत जास्त प्रमाणत मानसिक असतात ते काही भरत नाही. मग तणाव आणि नैराश्याने भरलेले आयुष्य जगतात.

पिंजर्याबाहेर वाढलेल्या बछड्यांना संकटांचा, जीवन मृत्यू चा चांगलाच अनुभव आलेला असतो त्यामुळे ते मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या सक्षम झालेले असतात, त्यांना शिकारी पासून वाचता येते, जीवन मृत्यू चा त्यांनी अनेक वेळेस सामना केलेला असतो, त्यामुळे त्यांना भीतीवर मात आरामात करता येते.

पिंजर्याबाहेर वाढलेले बछडे हे आत्मविश्वासाने भरलेले असतात तर पिंजऱ्यात वाढलेले बछडे ह्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव जाणवून येतो.

तुम्ही कितीही सुरक्षित पिंजऱ्यात वाढा पण शेवटी तुम्हाला यायचे आहे ते बाजारपेठेच्या जंगलातच जिथे, वाघ सिंह, चित्ता, कोल्हे, जंगली कुत्रे, विषारी साप आणि गरुडासारख्या पक्षांचा सामना करायचा आहे. इथे दुसरा पर्याय नाही.

पिंजऱ्यात वाढलेल्या बछड्यांनी पुस्तकांची कागदे बघितलेली असतात तर पिंजर्याबाहेर वाढलेल्या बछड्यांनी पैश्यांची कागदे बघितलेली असतात. आत्मविश्वास मध्ये देखील फरक असतो. फक्त आत्मविश्वास आणि स्वकमाई पैश्याने भरलेला खिसा असेल तेव्हाचा आत्मविश्वास ह्यामध्ये जमीन आसमान चा फरक आहे.

आयुष्य म्हणजे मस्करी नाही. ज्यांनी आयुष्याची काळी बाजू बघितली त्यांना चांगलेच माहिती आहे कि कशी दोन तोंडाची लोक इथे वावरता तर काहींनी सभ्यतेचा, उच्च शिक्षणाचा आणि पदाचा बुरखा पांघरलेला असतो.

निसर्ग सर्वांना समान संधी देतो पण मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले नियम नाहीत. इथे तुम्हाला अजून हुशारीने धूर्तपणे वावरावे लागते.

तुम्ही शिका किंवा नका शिकू पण जगायचे तर सर्वांना आहे. शिक्षणाचे महत्व सांगून सर्वांना शाळेत पाठवायला लागले, भावना शाळेपासून जुळवल्या आणि नंतर शिक्षण महाग केले.

शाळा सोडलेला भाजीवाला उच्च शिक्षित कर्मचाऱ्यापेक्षा जरी जास्त कमवत असला तरी त्याला लग्नासाठी मुलगी दिली जात नाही किंवा त्याच्या घरात मागणी घालायला कोणीही जात नाही. कारण तो एक भाजीवाला आणि दुसरा उच्च शिक्षित कंपनीत काम करणारा. एक मालक तर दुसरा नोकर.

भले कैदखाण्यातील एखाद्या जोडीदारासोबत लग्न नाही झाले तरी चालेल पण जे चार भिंतीबाहेर वाढले अश्यांना आपला जीवनसाथी बनवा, तोच तुम्हाला संकटात साथ देईल व तुम्हाला संकटातून बाहेर काढेल.

एक खात्रीने सांगतो कि जास्तीत जास्त शिकार पिंजऱ्यात वाढलेल्या मुलांचा केला जातो आणी शिकारी असतात पिंजर्याबाहेर वाढलेली मुलं.

परिस्थिती मुले एखादा वयाच्या १० व्या वर्षी कमवायला सुरवात केली असेल आणि दुसरा वयाच्या २५ व्या वर्षी म्हणजे तब्बल १५ वर्षांचा फरक आहे. विचार करा ह्या १५ वर्षांत ते कुठपर्यंत गेले असतील ते.

जर तुम्हाला शिकारी बनायचे असेल, जर तुम्ही पिंजऱ्यात वाढला असाल तर तुम्हाला आत्मविकासाची सक्त गरज आहे. कारण एकदा का तुमची शिकार झाली कि कोणीही काहीही करू शकत नाही.

निर्णय तुमचा आयुष्य तुमचे आणि जबाबदारही तुम्हीच.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

तुमची श्रीमंत, समृद्ध, उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार बनण्याची मानसिकता आहे का?



समजा प्रत्येकाला एक एक कोंबडी देण्यात आली.

७५ % लोक विचार करतील कि ह्या कोंबडीची भाजी झणझणीत आणि चविष्ट होईल. मग ते कोंबडीला मारतात व त्या कोंबडीपासून विविध प्रकारचे व्यंजन बनवून खातात. एक दिवस तर ढकलला पण पुढील दिवसांचे काय? दुसऱ्या दिवशी परत भूक लागते पण खायला कोंबडी नसते.

२४ % लोक कोंबडीला अंडी देण्याचा कारखाना समजतात. जो पर्यंत कोंबडी मरत नाही तोपर्यंत ते अंड्यांचा आस्वाद घेतात.

१ % लोक विचार करतात जर त्यांनी कुक्कुटपालन करायला सुरवात केली तर? मग ते अजून एका कोंबडीमध्ये गुंतवणूक करतात किंवा कर्जाने घेतात. मग पिल्ल होतात, ती मोठी होतात, सुरवातीला ते कर्जात बुडालेले असतात.

एक कोंबडी आणि गुंतवणुकीपासून ते अनेक कोंबड्या करतात, वेळ जातो, तो वेळ ते तग धरून बसतात, त्यांच्या आजूबाजूला कोंबडीचे विविध व्यंजन खाणारी अंडी खावून जगणारी लोक त्यांना दिसत असतात त्या मधून ते स्वतःवर ताबा मिळवतात, लक्ष्य आपल्या ध्येयावर ठेवतात, आणि पुढे वाटचाल सुरु ठेवतात.

उरलेली अंडी विकली जातील हा टप्पा ते गाठतात. आता मुबलक प्रमाणात कोंबड्या असतात जेणेकरून त्यांना अंडी हि जास्त मिळतात ब बाजारत विकण्यासाठी तयार असतात.

इथून नफा सूर होतो.

आता त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात कोंबड्यांचे देखील उत्पादन होते जेणेकरून ते कोंबडी देखील बाजारात विकायला सुरवात करतात.

इथून त्यांचा श्रीमंत होण्याचा प्रवास सुरु होतो. कालावधी किती लागला असेल तो बघा. ५ ते १० वर्षे. काय काय सहन करावे लागते हे त्याच व्यक्तीला माहिती असते.

आता हे झाले सर्वसामान्य लोकांना प्रोस्ताहित करण्यासाठी सांगण्यात येणाऱ्या लघु कथा.

आता रक्तरंजित, गुन्ह्याने भरलेली काळी बाजू देखील मांडतो.

सर्वांना एक एक कोंबडी तर भेटली पण सर्वच काही इमानदारीने गुंतवण्यासाठी पैसे नाही शोधत तर काही चोरी करतात, इतरांना लुटतात, व्यवस्थेला लाच देतात.

पकडले गेले तर न्याय व्यवस्थेला लाच देवून, साक्षीदारांना धमकी देवून किंवा मारून टाकून न्याय आपल्या बाजूने वळवतात.

लोकांना जात, धर्म, प्रांत, देश अश्या विविध भावनिक मुद्द्यात गुंतवून त्यांना मानसिक दृष्ट्या त्यामध्ये गुंतवून आपली पोळी भाजतात व त्यांच्या कडील कोंबड्या स्वतःकडे ठेवून स्वतः श्रीमंत होतात.

समूह बनवतात व दुसर्या समूहावर हल्ला करतात. मार्गावर कर लावतात, शासन व्यवस्था बनवतात, सामान्य लोकांकडून कर गोळा करतात आणि श्रीमंतांना वाटतात.

जे घडून गेले आहे आणि जे घडत आहे ते सर्व मांडले आहे, सर्व प्रकारच्या मार्गांनी यशस्वी झालेली लोक बघितली आहे आणि समाजाचा त्यांच्या विषयी असलेला दृष्टीकोन देखील बघितला आहे.

तुम्ही ठरवले तर गरीब विचारांपासून श्रीमंत विचारांकडे वळू शकतात. आर्थिक दृष्ट्या साक्षर बना, वास्तवात रहा आणि नंतर वाटचाल करा.

आर्थिक मानसिकता घडवण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि त्यामधील समस्या दूर करण्यासाठी विशेष, समुपदेशन, सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण उपलब्ध. ताण तणाव आणि नैराश्य दूर करण्यासाठी उपयोग होतो.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/chalaudyojakghadwuya/

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीने आपल्या १८ वर्षाच्या प्रियकराच्या मदतीने प्रेमाला विरोध करणाऱ्या ४५ वर्षीय वडिलांचा खून केला



नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीने आपल्या १८ वर्षाच्या प्रियकराच्या मदतीने प्रेमाला विरोध करणाऱ्या ४५ वर्षीय वडिलांचा खून केला

आपल्या मुलांवर लक्ष्य ठेवा, फक्त डोळ्यांनी नाही तर त्यांच्या भावनिक दृष्टीवर देखील लक्ष्य ठेवा. ह्या १५ वर्षांच्या मुलीने पहिले वडिलांना झोपेच्या गोळ्या दिल्या, त्यानंतर तिने तिच्या प्रेमिला बोलावले आणि दोघांनी मिळून चाकूचे अनेक वार करून मारून टाकले. ते इथेच नाही थांबले, त्यांना शरीर कुठे नष्ट करायचे ह्यावरून भीती वाटली तर त्यांनी शक्कल लढवली आणि बाथरूम मध्ये त्या मुलीने स्वतःच्या वडिलांचे शरीर जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

वडिलांचे वय काय तर ४५, पेशाने व्यवसायिक, ह्यांचे देखील समजावण्यामध्ये चूक झाली, त्यांनी पहिले समजून घेतले पाहिजे कि त्यांची मुलगी प्रेमात आंधळी तर झाली नाही ना? हे आंधळेपण भावनिक असते पण दुधारी असते, एकतर कमजोर करते किंवा इतके धाडस देते कि कुणाचा जीव घ्यायला देखील कमी करत नाही. खरे म्हणजे अश्या केसेस उघड झाल्या पाहिजे पण बदनामी होईल म्हणून कोणीही आपल्या घरच्या समस्या ह्या उघड करत नाही व तेव्हाच समजते जेव्हा कुठला गुन्हा घडतो.

अजून किती समाजाच्या दबावाखाली रहायचे? मरेपर्यंत? शेवटी गेलाच ना जीव? समाज काय आहे तिथेच अब्जो वर्षे राहील पण तुमचे आयुष्य सरासरी ६० ते १०० वर्षांचे समजा, मग महत्वाचे काय समाज कि तुमचा जीव?

इथे आडनाव जैन आहे, फक्त विशिष्ट समाजातून ती व्यक्ती येते म्हणून काय त्यांना समस्या नसतात काय? जैन असो, पाटील असो, कुलकर्णी असो किंवा कांबळे प्रत्येकाच्या घरात काही ना काही समस्या आहेत प्रत्येक जन कौटुंबिक हिंसाचाराचा शिकार झालेला आहे. ह्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हि जवळच्या पोलीस स्टेशन किंवा कोर्टात केस चालू असताना भेटेल ती देखील पुराव्यासकट.

जात धर्म किंवा प्रांत अश्या तार्किक विचारांच्या समुहात तुम्ही राहत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही पण जेव्हा समविचारी, समकृतीशील, समभावना, सम भावनिक आणि शारीरिक गरजा असलेल्या लोकांसोबत राहिलात तर तुम्ही सुखी, समाधानी श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगू शकाल, प्रत्येक क्षण हा चमत्काराने भरलेला असेल, अश्या नकारात्मक घटनांपासून तुम्ही लांब रहाल किंवा त्यामधून लगेच बाहेर पडाल नाहीतर नाही.

वडिलांचे वय ४५ वरून व्यवसायिक, जर त्यांनी व्यवसायातील हुशारी देखील वापरली असती तरी त्यांना जीव गमावण्याची गरज पडली नसती. १५ आणि १८ वर्षांच्या मुलांच्या हातून मरण्याची वेळ आली नसती.

प्रत्येकाची एक मानसिक मर्यादा असते आणि एकदा का ती पार झाली तर त्या व्यक्ती शरण पत्करतील किंवा वार करतील. नुकतेच वयात आलेल्यांना कसे समजवायचे? त्यांच्या हातात मोबाईल आहे, त्यावर बघणाऱ्या मालिका आणी सिनेमावर वर विश्वास ठेवून ते त्याला वास्तव मानतात, गुन्हे करतात, आणि पोलीस लगेच पकडतात. खूप कमी लोक पोलिसांपासून पळू शकतात. श्रीमंत, सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय असतो ती गोष्ट वेगळी.

समजावून, थोडा वेळ देवून अनेकांना सुधारताना बघितले आहे पण जर तुम्ही विरोध करत असाल तर तुम्हाला देखील विरोधाचा सामनाच करावा लागेल, दररोज टोमणे मारणे, ओरडणे, मारणे ह्यामुळे तुम्हाला अजून वाईट परिस्थिती चा सामना करावा लागेल. आणि इज्जत काय फक्त मुली आणि स्त्रियांनी राखायची नसते तर पुरुषांनी आणि मुलांनी देखील राखायची असते.

मी स्वतः शेवटच्या बाकावर बसणारा मुलगा होतो, काळ सर्वकाही ठीक करते, जास्तीत जास्त लोकांचे चांगले होताना बघितले आहे. वयात मस्ती करण्याची देखील एक मर्यादा असते ती कधीही ओलांडायची नाही आणि कुठलेही वय हे मस्तीचे नसते, निसर्ग नियमानुसार आपले काम आहे जगण्यासाठीची धडपड करणे पैसा कमावणे त्यामुळे अश्या क्षणिक सुखाच्या मागे धावू नका.

हे आकर्षण आणि सेक्स फक्त क्षणिक सुख आहे, भले सेक्स हि मुलभूत नैसर्गिक गरज असली तरी इतर सर्व नैसर्गिक गरजांपैकी हि एक गरज आहे. सरासरी ६ मिनटे सेक्स चा कालावधी आहे, म्हणजे आपण सर्वकाही सांभाळून सेक्स साठी देखील वेळ देवू शकतो त्यामुळे इतके काही खून वैगरे करण्याची गरज नाही. आणि काळानुसार तुमची आवड देखील कमी कमी होत जाते.

सिनेमा वेगळा आणि वास्तव आयुष्य वेगळे, समाजाचे नियम घराबाहेर वेगळे आणि घरात पाळले जाणारे वेगळे, तुम्ही ह्या पृथ्वीवर काही क्षणासाठी आला आहात त्यामुळे आपल्या आयुष्यावर लक्ष्य केंद्रित करा, आपल्या कुटुंबावर लक्ष्य केंद्रित करा, प्रत्येक समस्येला उत्तर आहे, शांत मनाने नाही तर शांत भावनेने विचार करा आणि मार्ग काढा म्हणजे मार्ग निघेलच.

जर तुमच्या घरी देखील समस्या असतील तर आजच संपर्क करा, आपली सेवा हि ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज :

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

Image by Maret Hosemann from Pixabay 

रात्री, एकांत अश्या ठिकाणी जिथे मनुष्यांची गर्दी नसते तिथे चित्र विचित्र भास किंवा अनुभव का येतात?



रात्री, एकांत अश्या ठिकाणी जिथे मनुष्यांची गर्दी नसते तिथे चित्र विचित्र भास किंवा अनुभव का येतात?

दोन प्रकारच्या उर्जा सतत कार्यरत असतात
१ सजीव उर्जा
२ निर्जीव उर्जा (मृत)

सजीव उर्जा जेव्हा दिवसा कार्यालये सुरु असतात तेव्हा ते संपूर्ण कार्यालय हे सजीव उर्जेने भरून गेलेले असते जिथे निर्जीव उर्जा हि थांबू शकत नाही तेव्हा त्यांचा वास हा एकांत ठिकाणी असतो जिथे सजीव उर्जेची नगण्य प्रमाणात किंवा शून्य असते.

अनेकांना दिवसा देखील अद्भुत शक्तींचा अनुभव येत असतो ते देखील अश्या एकांत ठिकाणी जिथे सजीव उर्जेचे वास्तव्य नसते तिथे.

सजीव आणि निर्जीव उर्जा एकमेकांवर हल्ला ह्यासाठी करतात कारण प्रत्येकाला आपले घर हे जपायचे असते. प्राणी देखील त्यांच्या हद्दी कोणी आला तरी ते हाकलून देतात किंवा हल्ला करतात असेच मनुष्य प्राण्याचे देखील आहे, इथे फक्त पोलीस बोलवावे लागतात.

जेव्हा सजीव उर्जा जिथे निर्जीव उर्जेचे वास्तव्य आहे तिथे जाते तेव्हा तिच्यावर हल्ला चढवला जातो किंवा त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केला जातो. ह्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो.

आपण ह्या उर्जांना आत्मा असे नाव देवू शकतो किंवा तुमच्या अंतर्मनाने तयार केलेले उर्जा, कंपने ह्याचे शरीर असे देखील म्हणू शकतो. जसे झोपेत आपल्याला आपण शरीर सोडून बाहेर आलो आहोत आणि जग बघत आहोत असा अनुभव येतो तो.

सजीव म्हणजे चांगले आणि निर्जीव म्हणजे वाईट. सजीव उजेडात वास्तव्यात असतात तर निर्जीव अंधारात किना घनदाट सावलीत अस्तित्वात असतात. ज्यांचे अस्तित्व जास्त ते जिंकतात.

जेव्हा आपण सकारात्मक विचार करत असतो तेव्हा सजीव उर्जा आपल्या शरीरात प्रवेश करून आपल्याला बळ देते व १००० पटीने आपली क्षमता वाढवते. निर्जीव उर्जा नकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करते व आपली प्राण उर्जा शोषून घेऊन आपली उर्जा निर्जीव करून टाकते ज्यामुळे विविध प्रकारची संकटे, समस्या तुमच्या आयुष्यात निर्माण होतात.

काही लोक अशी देखील निघाली कि ज्यांनी सजीव उर्जेचा वाईटासाठी आणि निर्जीव उर्जेचा चांगल्यासाठी वापर केला. उर्जा हि तिचा जो नियम आहे त्यानुसार काम करते, वापर करणाऱ्यावर सर्वकाही अवलंबून आहे.

जी मोठ मोठी कार्पोरेट ऑफिसेस आहेत तिथे सर्व पातळी घसरवून राजकारण चालते, लोक जीव घ्यायला देखील कमी करत नाही अश्या एक ऑफिसमध्ये एकाला आवाज एकू आले आणि उर्जा हि स्त्री च्या रुपात दिसली. तेव्हा तो प्रचंड घाबरलेला होता व तिथून पळाला होता.

कोण होती ती?

एका कार्यालयात काम करणारे, प्रेम होत, लग्न करतात, ती नवऱ्यापेक्षा उच्च पदावर असते, पद सोडते, ते पद नवऱ्याला मिळते, मुलं होतात, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ सूर होतो, सासरचे सून मानत नाही, नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतात, व शेवटी कळते कि फक्त पद भेटावे, बढती भेटावी म्हणून प्रेमाचे नाटक करण्यात आले, शेवटी असह्य झाल्यावर आत्महत्या केली.

मुंबई ची लोकसंख्या अडीच करोड, आकड्यात २,५०,००,०००. कोण कोण कुठल्या समस्या मधून जात आहे हे आपल्याला कसे कळणार? टीव्ही, किंवा शासनमान्य जे काही मार्ग आहे त्याद्वारे मिळणारी माहिती हि त्यांच्या फायद्याची असते ना कि सर्वसामान्य लोकांच्या फायद्याची. पोटापाण्यासाठी इथे व्यक्ती धावपळ करत असतो, कधी कधी असे घडते कि बाजूला वाईट होत असेल तर घाईगडबडीत लक्ष्य जात नाही.

समस्या आहे तिथे समाधान देखील आहे, उपाय देखील आहेत, लोक मरण्याच्या दारातून परत आलेली आहेत जिथे डॉक्टर सुद्धा बोलले होते कि काहीही होऊ शकत नाही. तुमच्या प्रत्येक समस्येचे माझ्याकडे समाधान आहे कारण मी तुमच्या दृष्टीकोनातून तुमचे आयुष्य बघतो.

आपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या शक्त्यांचे अस्तित्व आहे मग त्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी का नाही करावा? जिथे वाईट काम करायचे असते तिथे लोक विचार न करता कृती करतात व ह्या शक्त्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेतात, चांगली लोक फक्त विचार करतात व वाईट लोकांच्या कृतीला बळी पडतात.

जे अनुभव आहेत तेच वास्तव आहे. अनुभव नाही ते वास्तव नाही. कुठलेही शास्त्र परिपूर्ण नाही, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार शस्त्रांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचा आहे. इथे मी समजावत बसणार नाही कारण माझे संपूर्ण लक्ष्य हे सर्वसामान्य लोकांना सर्व मार्ग वापरून समस्यांमधून बाहेर काढून त्यांना सुख, समृद्धी च्या मार्गांनी घेवून जायचे आहे.

फेसबुक पेज :

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

समुपदेशन : मानसिक, शारीरिक आरोग्यावर होणारे फायदे आणि सर्वांगीण विकास



आयुष्यात अनेकदा आपण अडकतो तिथे कुठलाही मार्ग दिसत नाही, आपण दररोज एकसारखे आयुष्य जगण्यात अडकून पडतो, सतत नकारात्मक, निराशाजनक विचार मनात येतात, तणाव, नैराश्य आणि डिप्रेशन ने ग्रस्त होतो आणि हीच नकारात्मक मानसिकता नंतर विविध प्रकारची समस्या घेवून येते.

ह्या नकारात्मक मानसिकतेमुळे आपण आपल्या नकारात्मक विचारांना मनोशारीरिक आजारात रुपांतरीत करतो त्यानंतर त्या आजाराचे शारीरिक आजारात रुपांतर होते.

हे असे का होते?

कारण तुम्ही जे वैचारिक पातळीवर नकारात्मक विचार करत होता त्याचे रुपांतर तुम्ही आजारात करता पण त्या आजाराला उर्जा हि विचारातूनच मिळते. पण जेव्हा तुम्ही भावनेच्या स्तरावर आजार घेवून जाता आणि त्यानंतर पेशीस्तरावर आजार घेवून जाता तेव्हा त्या आजाराला पेशीपासून उर्जा भेटते आणि इथे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भारती होवून ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

जेव्हा कुठलाही आजार हा सुरवातीच्या पायरीवर असतो तेव्हाच त्यावर उपचार करून घेणे चांगले आहे, तुमचा कौटुंबिक डॉक्टर आरामात त्या आजारावर उपाय करून तुम्हाला बरे करून टाकतो, हे स्वस्तात होते पण जेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांमुळे त्या आजाराला उर्जा देता, डॉक्टरचे औषध काम करत नाही त्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती होता तेव्हा जास्त पैसे भरून तुम्ही बरे होता.

आपल्या खाजगी आयुष्याचे देखील असेच आहे, मुलांमध्ये निर्माण झालेले नकारात्मक विचार हे पालक काढून टाकत नाही त्यामुळे शेवटी मुल हि नकारात्मक आयुष्य जगायला लागतात, त्यांचे अभ्यासत लक्ष्य लागत नाही, वाईट वळणावर जातात, पदवी पूर्ण झाली तरी नोकरी लागत नाही, आणि लग्न देखील होत नाही.

व्यवसायिक आयुष्य किंवा इतर कुठलेही आर्थिक आयुष्य किंवा जो तुमचा पैसे कमावण्याचा मार्ग आहे तो, ह्या आर्थिक आयुष्यात देखील समुपदेशन हे खूप कामी येते, उद्योजक व्यवसायिकाला नैराश्यातून बाहेर काढते, त्याला नवसंजीवनी देते, आर्थिक घडी सुधरू लागते, ग्राहक यायला लागतात आणि उद्योग व्यवसाय परत भरभराटीला येतो. अनेकांच्या संपत्तीच्या समस्या, कर्ज, आणि इतर समस्या ह्या दूर होतात व ते भरभराटीच्या, श्रीमंती आणि समृद्धी च्या मार्गाला लागतात.

वैवाहिक जीवनाच्या समस्या सुटतात, जोडीदारासोबत नातेसंबंध सुधारते, कौटुंबिक, सासरी, माहेरी अश्या सर्व समस्या दूर होवून नातेसंबंध प्रस्थापित होतात. दररोजची भांडणे कमी होतात, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, नकारात्मक वैवाहिक आयुष्यातून बाहेर पडण्याची हिंमत येते, एक नाही अश्या अनेक समस्या सुटतात.

लैंगिक समस्या दूर होतात, जोडीदारासोबतचे संबंध सुधारतात, आत्मविश्वास वाढतो, लोकांमध्ये प्रभाव पडायला सुरवात होते आणि हे सर्व होते फक्त ते समुपदेशनामुळे.

भीती फोबियावर मात करता येते. आत्मविश्वास वाढतो. चार चौघात मिसळून राहण्याची हिम्मत आणि विश्वास वाढतो. लक्ष्य केंद्रित होते, नकारात्मक विचार आणि भावनांवर ताबा मिळवता येतो. राग, मस्तर द्वेष लोभ अश्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवता येतो. लैंगिक समस्या दूर होतात.

समुपदेशनात नक्की होते तरी काय? लोकांना बोलते केले जाते, त्यांच्या भावना ह्या बाहेर काढल्या जातात, समस्येचे मूळ पकडले जाते व त्यानुसार सल्ला दिला जातो, मार्गदर्शन केले जाते आणि गरज पडली तरच उपचार केले जातात.

मी जेव्हा समुपदेशन करतो तेव्हा त्यांचा को मूळ स्वभाव आहे तो त्यांना दाखवायला सांगतो आणि आश्चर्य म्हणजे लोक त्यांचा मूळ स्वभाव दाखवून देतात आणि मूळ भावना देखील व्यक्त करतात. ह्याच मूळ स्वभावामध्ये सर्वकाही दडले आहे. कारण हा कुठल्याही मनुष्य प्राण्याने निर्माण केलेल्या कायदे व नियमांना जुमानत नाही, ह्यावर ताबा ठेवू शकतो पण हा मूळ स्वभाव बाहेर येतोच. आणि एकदा हा व्यक्त झाला कि अनेक समस्या ह्या टाळल्या जातात.

माझ्याकडे भेदभाव केला जात नाही. गरीब असो किंवा श्रीमंत ह्या सर्वांना एकसाखीच वागणूक मिळते, हो फक्त फी मध्ये तफावत असू शकते पण समुपदेशनात नाही. निसर्ग भेदभाव करत नाही, देव भेदभाव करत नाही तसे मी देखील करत नाही.

आता इंटरनेट मुळे समुपदेशन करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहे, तुम्ही त्या मार्गांचा वापर करून तुमच्या समस्या लगेच सोडवून घेवू शकता, ह्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. व्हास्टएप, फेसबुक फोन ह्या सर्व मार्गांचा वापर तुम्ही करू शकता.

जर तुम्ही देखील समस्यांनी ग्रस्त असाल तर आजच संपर्क करा.

फेसबुक :

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

Image by mohamed Hassan from Pixabay

मोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार हे उशिरा बाजारपेठेत पाय का रोवतात? कौशल्य महत्वाचे कि रणनीती?

मोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार हे उशिरा बाजारपेठेत पाय का रोवतात?


कौशल्य महत्वाचे कि रणनीती?




मोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार हे उशिरा बाजारपेठेत पाय का रोवतात?

कौशल्य महत्वाचे कि रणनीती?

सिंह आणि चित्ता.

दोघे हिंसक प्राणी.

दोघांची क्षमता वेगवेगळी.

सिंहाची ताकद शक्ती तर चित्त्याची ताकद वेगाने पळणे.

अनेकदा सिंह हा दबा धरून बसतो. चित्त्याला शिकार करू देतो. चित्ता जेव्हा शिकार करतो त्याच वेळेस सिंह धावून येतो व चित्ते सिंहाला बघून पळून जातात. सिंहाला आयती शिकार नाही भेटत तर हा त्याच्या रणनीती चा भाग आहे.

हि रणनीती खाजगी आयुष्यात देखील लागू होते बर का?

पुढे जाण्या अगोदर वरील कथेनुसार मोठी कंपनी कुठची आणि छोट्या कंपन्या कुठच्या हे कमेंट मध्ये सांगाल. 

(ट्रोलर्स ला ब्लॉक करण्यात येईल. मी ह्याला एक मानसिक रोग समजतो.)

आता पुढे जाऊ.

लहान मोठे उद्योजक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार हे सुरवात करतात, ज्या ज्या समस्या येतात त्याचा सामना करतात, त्यामधील त्रुटी दूर करतात. म्हणजे सुरवातीला को खराब रस्ता असतो तो पूर्ण साफ करतात व फक्त डांबर टाकून हायवे बनवण्याइतपत काम करून ठेवतात.

इथे घोडं कुठे अडल?

समजा एखाद्याला एका अवयवाची प्रत्यारोपणाची गरज आहे. जे त्या व्यक्तीला तो अवयव ठराविक काळात नाही भेटला तर ती व्यक्ती दगावण्याची शक्यता असते, आणि त्या अवयवाची देखील कालमर्यादा असते ज्यामुळे जर ती कालमर्यादा पार झाली तर तो अवयव देखील निकामा होतो.

हा वरील नियम उद्योग व्यवसाय आणि गुंतवणुकीला देखील लागू होतो. एका ठराविक कालावधी मध्ये सर्व कल्पना, उस्ताह संपतो, ह्या सोबत पैसे देखील संपतात आणि कर्जबाजारी होतात ह्यामुळे कोणीही पैसे द्यायला तयार होत नाही.

भेदभाव कसा होतो ते सांगतो.

एक जर लघु उद्योजक व्यवसायिक नवीन कल्पना घेवून बाजारपेठेत उतरला तर त्या नव कल्पनेला कोणीही महत्व देत नाहीत. पहिले ते कुठच्या विद्यापीठातून शिकले आहे हे तपासले जाते. जर जग प्रसिद्ध किंवा पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ असेल तर कर्ज काय आपल्या घरातील मुलामुलींसोबत लग्न देखील लावून देतील. जर गावातून असेल तर गावठी समजून दुर्लक्ष्य करतील आणि तेच शहरातून असेल तर विश्वास ठेवतील, आणि विदेशातून असेल तर त्यांचे पाय धुवून पाणी पितील व गुंतवणुकीला दुपट्टीने पैसे देतील ते देखील कुठलीही वस्तू गहाण न ठेवता.

तुम्हाला समाजाची, समुहाची काळी बाजू माहिती नाही म्हणून सांगितले, नंतर संकटात कुणाची मदत मागायला नको, स्वतः सामना केलेला बरा. जात, धर्म, प्रांत देश कुठलाही असो इथे काळी बाजू सर्वांची एकसारखी असते.

जे मोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार असतात त्यांच्याकडे तज्ञांची एक फौज असते जी सतत बाजारपेठेवर लक्ष्य ठेवून असते. मग ते मालकाला एखादा उद्योज व्यवसाय किंवा गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात जिथे लघु उद्योजक आणि व्यवसायिकाने अगोदरच काम करून ठेवलेले असते. मग सिंहासारखे मोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार उतरतात आणि बाजारपेठ काबीज करतात.

म्हणजे ह्या मोठ मोठ्या आर्थिक उलाढाल करणाऱ्यांसाठी जो रस्ता सर्व सपाट करून दिला असतो तो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यवसायिकांनी जिथे तुम्हाला मोठा हायवे दिसत आहे.

प्रोस्ताहन एका बाजूला आणि वास्तव एका बाजूला. आपले आयुष्य काही सिनेमा नाही अगोदरच कथा लिहून ठेवली किंवा नंतर बदल करू शकतो म्हणून. गरीब मध्यम वर्ग आणि श्रीमंताना वेगवेगळा न्याय असतो आणि त्यांच्या यशाचा प्रवास देखील वेगवेगळा असतो. जितकी मेहनत गरीब आणि मध्यम वर्गांना करावी लागते तितकी श्रीमंतांना करावी लागत नाही.

चित्ते म्हणजे गरीब आणि मध्यम वर्ग आणि सिंह म्हणजे श्रीमंत.

आता समजलेच असेल कि बाजारपेठ कशी काम करते ते?

जेव्हा तुम्ही वास्तव बाजारपेठ बघाल तेव्हाच तुमचे कौशल्य, अनुभव आणि रणनीती कामी येईल नाहीतर व्यर्थ.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप व कॉल वर फक्त फी भरल्यावर तारीख आणि वेळ निश्चित केली जाईल व त्या दिवशी तुम्हाला अटेंड केले जाईल. कृपया समस्या सांगण्यास सुरवात करू नका, अश्या वेळेस फोन कट केला जाईल व नंबर ब्लॉक केला जाईल.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/chalaudyojakghadwuya/

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

ब्रँड च्या मायाजाल पासून लांब रहा



नव उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक ह्यांनी ब्रँड च्या जाळ्यात फसू नका.


जो तो येतो तो हे बोलतो कि आपल्या उत्पादनाचा किंवा व्यवसायाचा एक ब्रँड बनवून घ्या, ज्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. आणि ह्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, वेळ जातो, पैसा जातो आणि मानसिक ताण येतो तो वेगळा,  इथे फक्त चार भिंतींमध्ये किंवा काही दिवस मार्केट चा अभ्यास ह्यामध्ये वेळ जातो.


साधे उदाहरण घ्या, भाकरवडी = चितळे, पहिले म्हणजे उत्पादनाचा दर्जा होता त्यावरून उद्योजक कसा आहे हे समजले आणि ते नाव स्थानिक प्रसिद्ध झाले आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गेले. आपली भारतीय बाजारपेठच इतकी मोठी आहे कि परदेशात जायची गरज नाही, म्हणून परदेशी गुंतवणूकदार भारतात येतात.


अशी स्थानिक नावे किती सांगू? माझेच उदाहरण घ्या, चला उद्योजक घडवूया = अश्विनीकुमार, इथे माझे ध्येय मराठी समाज समृद्ध आणि शासनकर्ते बनवायचा आहे त्यामुळे चला उद्योजक घडवूया = मराठी समाज असे जगाच्या लक्ष्यात आले पाहिजे ह्या दिशेने प्रयत्न सुरु आहे. जसे ठराविक परप्रांतीय बघितले तर आपण कसे लगेच बोलतो कि हा नक्की उद्योजक व्यवसायिक असेल तसे.


भारताला, महाराष्ट्राला परदेशातून उद्योग व्यवसाय कसा करावा हे शिकायची गरज नाही, त्यांना भारतात पाठवा, आपण त्यांना विना ब्रँड चे उद्योग व्यवसाय यशस्वी करा करायचा हे शिकवू. हे मी असेच नाही बोलत तर थोडा अभ्यास केला तर तुम्हाला देखील माझे म्हणणे पटेल, आणि त्यामध्ये महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या समृद्ध असल्यामुळे इथल्या लोकांना स्थलांतरित करण्याची गरज पडली नाही, हा कधी काळी प्रचंड दुष्काळ किंवा पूर आला असेल त्यामध्ये स्थलांतरित झाली असतील मराठी लोक.


विनाकारण कोणीही स्थलांतरित करत नाही, शिक्षण, उद्योग व्यवसाय, भ्रमंती आणि अनुभव ह्या कारणांसाठीबाहेर जाने ते वेगळे.


जे तुम्ही पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करत आहात त्यांनी तिथले स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय हे बंद पाडले आहेत व ठराविक बोटावर मोजता येणाऱ्या कंपन्यांना त्यांचे उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोस्ताहन दिले गेले आहे. म्हणून बघा जेव्हा कोणी परदेशातील अनुभव घेवून इथे उद्योग व्यवसाय करतो त्याच्या मध्ये आणि महाराष्ट्रात, भारतात अनुभव घेवून उद्योग व्यवसाय करतो ह्यामध्ये फरक जाणवतो.


परदेशातून आलेल्याला एका चित्राची गरज पडते, त्याला आपण लोगो म्हणू, त्यानंतर अतिशयोक्ती जाहिरातीची गरज पडते त्यानंतर तो ग्राहक खेचू शकतो. जो महाराष्ट्रीयन आहे स्थानिक आहे त्याचे नाव, काम आणि सर्वकाही समोरच असल्यामुळे ह्या स्थानिकाचा प्रभाव हा जास्त पडतो. परदेशी असोत तो खूप पैसा खर्च करतो आणि जो महाराष्ट्रीयन आहे तो कमी गुंतवणुकीत उद्योग व्यवसाय मोठा करतो.


जे मोठ मोठे ब्रँड आहेत ते कामगारांना नीट वागवतात का? कंत्राट पद्धतीचा ते किती गैरवापर करतात ह्याबद्दल कोण बोलणार? ज्या भारतात जे उत्पादन बनवणारे कामगार होते त्यांना कंत्राटी पद्धतीवर ठेवण्यात आले आणि १२ १२ तास आठवड्याची सुट्टी न देता काम करायला भाग पाडत आहे आणि ह्याविरुद्ध मालकाचे कंपनीचे चित्र यशस्वी म्हणून रंगवले जात आहे, त्यांच्याकडे पैसा जात आहे. नावावर जावू नका, वस्तव काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करा.


जागतिक मंदी आली होती तेव्हा ह्या अतिशुक्ष्म, शुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसायांमुळेच आपली अर्थव्यवस्था हि टिकून राहिली होती ना कि कुठल्या मोठ्या ब्रँड किंवा कंपनीमुळे.


उद्योग व्यवसायाला एक पैसे कमावण्याचे मार्ग समजा, जिथे नोकरीमधून तुम्ही पन्नास हजार पगार घेत असाल तिथे तुम्ही उद्योग व्यवसाय करून एक लाख रुपये कमवाल. दुप्पट जास्त का? कारण इथे तुम्ही धोका पत्कारलेला असतो, आणि नोकरी मध्ये जे काम दिले ते करावे लागते त्यामुळे कमी पण फिक्स पगार भेटतो.


बिना ब्रँड चे कितीतरी उद्योग व्यवसाय मी दाखवू शकतो आणि बघितले आहेत. माझे म्हणणे इतकेच आहे कि जर उद्योग व्यवसाय करायचा असेल तर सुरवात करा, सर्वच काही करोडोंची गुंतवणूक करत नाहीत, त्याच्या आत देखील अनेक उद्योग व्यवसाय सुरु होतात, ५ लाख ते १ करोड चे असे कितीतरी उद्योग व्यवसाय दाखवू शकतो, आणि ५ हजार ते ५ लाखांपर्यंत देखील शेकडो हजारो उद्योग व्यवसाय सुरु आहेत. कुठे नाव दिसते? ब्रँड दिसतो? तरीही ग्राहक कसे जातात?


दिसण्यावर जावू नका. श्रीमंत शेतकरी आला होता, सफेद शर्ट खाकी पॅंट, चप्पल आणि सर्वसाधारण वापरात येणारा मोबाईल, एक स्त्री, साधा पंजाबी ड्रेस, साधा मोबाईल आणि दोघांच्या बोलण्यात ना गर्व ना काही पण उलाढाल ह्या करोडोच्या. महाराष्ट्रात फिरा, विना ब्रँड अनेक प्रसिद्ध उद्योजक व्यवसायिक भेटतील, ज्यांची उत्पादने, सेवा आणि ते स्वतः त्यांच्या परिसरात आणि क्षेत्रात प्रसिद्ध आहे.


भारतात देखील उत्पादनांवर संशोधन केले जाते, दर्जा वाढवायचा प्रयत्न केला जातो पण ते का हि अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून त्यांचे उत्पादने विकत नाहीत. नाहीतर परदेशी कंपन्या १० ची वस्तू १००० रुपयांची करून विकतात, आणि आपल्या कडे ठराविक मानसिकता परदेशी ते सर्व सोने अश्या मानसिकतेमुळे आपल्या भारतीय उत्पादनांवर नाके मुरडून बघितली जातात.


भारतातील उद्योजक व्यवसायिकाने जर हेरफार केली तरी तो पैसा हा भारतातच वापरला जाणार पण विदेशातील लोकांनी हेरफेर केली तर तो पैसा त्यांच्या त्यांच्या देशात जाणार.


किर्लोस्कर हे कधीही किर्लोस्कर चा क कसा असला पाहिजे ह्याच्या नादी लागले नव्हते, त्यांचे लक्ष्य हे फक्त उत्पादनावर होते, त्याच्या दर्ज्यावर होते, ग्राहकांवर होते.


पैसे कमावणे आणि फक्त पैसे कमावणे ह्यामध्ये फरक आहे.


काळानुसार बदलावेच लागते पण काळ काही स्थानिक उद्योजक व्यवसायिकांना मोठे करत नाही तर ते त्यांच्या स्थानिक ठिकाणी प्रसिद्धच असतात.


सांगण्याचा उद्देश इतकाच कि कृती करायला घ्या, पुढे काळानुसार आणि गरजेनुसार आपण निर्णय घेवू शकतो. ब्रँड ना चांगले आहे ना वाईट, तुम्ही ब्रँड निर्माण देखील करू शकता किंवा विना ब्रँड चा देखील उद्योग व्यवसाय करू शकता. महत्वाचे एकच आहे कि उद्योग व्यवसायाला सुरवात करणे आणि त्यामध्ये टिकून राहणे. बाकी सर्व बाबी नगण्य आहेत.


#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.


फेसबुक : https://www.facebook.com/chalaudyojakghadwuya/posts/2417228371669937?__tn__=K-R-R


चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5


धन्यवाद

अश्विनीकुमार



चला उद्योजक घडवूया



फोटो क्रेडीट : https://www.flickr.com/photos/rooreynolds/1981313654

शारिरीक जखमा भरता येतात, मात्र मानसिक जखमा या सहजासहजी भरत नाहीत, आणि त्या भरल्या नाहीत की अशा (आत्महत्येच्या) घटना घडतात. त्यामुळे मानसिक छळ हा जास्त भयानक असतो



'शारिरीक जखमा भरता येतात, मात्र मानसिक जखमा या सहजासहजी भरत नाहीत, आणि त्या भरल्या नाहीत की अशा (आत्महत्येच्या) घटना घडतात. त्यामुळे मानसिक छळ हा जास्त भयानक असतो'.
उच्च न्यायालय मुंबई
डॉक्टर पायल तडवी आत्महत्या खटला

हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हंटले आहे. मानसिक जखमांचे स्वरूप किती घातक असू शकते ह्याकडे लक्ष्य वेधले आहे. मानसिक जखमा देणारे सर्व जाती, धर्मात, प्रांतात, समाजात आणि देशात असतात.

एका विद्यार्थ्याला मानसिक जखम होते ती शाळेत, खाजगी शिकवणीत, घरी किंवा परिसरात कुणाकडूनही होऊ शकते. एक कर्मचारी मग तो खाजगी, सरकारी, निमसरकारी किंवा कंत्राटी असो त्याला देखील होते. वैवाहिक जोडीदाराकडून देखील होते. मित्रांच्या समुहात देखील होते. अनोळखी व्यक्तींकडून देखील होते.

इथे मुख्य मुद्दा हाच आहे कि जर एखाद्या व्यक्तीला सतत मानसिक जखमा कोणी देत गेले आणि त्यावर उपचार नाही केले गेले तर त्याचे परिणाम हे तो स्वतःचा जीव घेण्यापर्यंत म्हणजे आत्महत्या करेपर्यंत होतो.

कोर्टात खोट्या केसेस दाखल करणे, कर्ज देताना गोड गोड बोलणे आणि वसूल करताना शिव्यांची लाखोली वाहने, त्याच्या घरी जावून मुलाबाळांसमोर अपमानित करणे, इमारतीतील इतर रहिवाश्यांसमोर अपमानित करणे.

मुलींना छेडणे, विनयभंग करणे, तिच्या शरीरावरून अश्लील बोलणे, विधवेला अविवाहित महिलेला, गरीब महिलेला, पाश्चिमात्य कपडे घालणाऱ्या मुली आणि स्त्रियांना, रात्री फिरणाऱ्या, धुम्रपान आणि मद्यपण करणाऱ्या मुली आणि स्त्रियांना पातळी सोडून अपमानित करणे.

मालकाकडून, वरिष्ठांकडून सतत अपमानित करणे, कंत्राटी कामगारांना नोकरासारखे वागवणे, नोकरी जावू शकते ह्यामुळे अपमानास्पद वागणूक सहन करणे असे विविध प्रकारे लोकांना सतत मानसिक जखम दिली जाते आणि देणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही, मग त्यांनी करायचे तरी काय?

त्यांचे पायल तडवी होवून जाते.

पायल तडवी प्रत्येक व्यक्तीमध्ये असते पण जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या जातात आणि कुठूनही मदत भेटत नाही तेव्हा करायचे काय? आपले आयुष्य काय सिनेमा नाही कि ३ तासात तुम्ही तुमचे आयुष्य बदलाल, इथे जर विरोधात श्रीमंत, सत्ताधारी आणि प्रस्थापित असेल तर त्याला काहीही फरक पडत नाही फरक पडतो तो फक्त तुम्हाला.

मानसिक आजार हा दिसून येत नाही, तो आपल्या आत जखम करत जातो, आयुष्य बेरंगी करून टाकतो. त्याला न्याय भेटत नाही, त्याला समजूतदारपणा दाखवायला सांगतात आणि जो गुन्हेगार असतो त्याच्याकडे दुर्लक्ष्य करून त्याला प्रोस्ताहन दिले जाते.

शारीरिक जखम असो किंवा मानसिक ती काय जात धर्म बघून नाही होत, सर्व जाती धर्म आणि पंथांच्या व्यक्तींना मानसिक जखमा झाल्या आहे आणि त्या अनेकदा जवळच्या किंवा परिचयातील व्यक्तीकडून देण्यात आल्या आहेत म्हणजे एकाच जाती धर्माच्या व्यक्तीने स्वतःच्याच जातीधर्माच्या व्यक्तीला मानसिक जखम दिली आहे आणि त्या व्यक्तीला आत्महत्येसाठी मजबूर केले गेले.

वास्तवात रहा, जवळच्या पोलीस स्टेशन आणि कोर्टामध्ये मध्ये तुम्हाला अधिक पुराव्यासकट माहिती भेटेल. सत्य तुम्ही लपवू शकत नाही.

मानसिक दृष्ट्या कमजोर असणे गुन्हा नाही, सर्वांची मानसिकता वेगवेगळी असते त्यानुसार इतर व्यक्तींनी देखील समजूतदारपणा दाखवला पाहिजे, थोडी तडजोड केली पाहिजे.

समाज बोला किंवा व्यवस्था बोला हि काही बदलणार नाही त्यामुळे तुम्ही बदला, जर सतत मानसिक छळ होत असेल तर समुपदेशन करा व ती वेळ निभवून नेण्याचा प्रयत्न करा. तुमचे काहीही करून जिवंत राहणे हे महत्वाचे आहे.

वास्तवात रहा.

जर तुम्ही देखील अश्या कुठल्याही मानसिक जखमा झाल्या असतील किंवा होत असतील, आत्महत्येचे विचार मनात येत असतील तर तुम्ही आजच संपर्क करा.

समुपदेशन, मार्गदर्शन आणि उपचाराने खूप फायदा होता.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

सकारात्मक विचार आजारपण बरे करण्यासाठी प्रभावी पद्धतीने काम करते



माझ्या मैत्रिणीचा दवाखाना आहे. मी जेव्हा बाहेर बसून होतो तेव्हा पेशंट सोबतचे संभाषण एकू येत होते.

नकारात्मक पेशंट : डॉक्टर काहीही फरक पडत नाही आहे, आजारपण वाढले आहे. ह्या औषधाने फरक पडेलना? सर्व डॉक्टर फिरले. असे ते नकारात्मक बोलत असतात. इथे नकारात्मक पेशंट चे दोन भाग येतात. पहिला भाग ते मानसिक दृष्ट्या नकारात्मक असतात, आणि दुसरा भागी जिथे त्यांना योग्य डॉक्टर भेटत नाही किंवा योग्य इलाज होत नाही. जे पहिल्या भागातील लोक आहेत ती नकारात्मक आहे आणि जो दुसरा गट आहे ते नकारात्मक अनुभवामुळे आणि परिस्थिती मुळे नकारात्मक झाले.

ह्या पेशंट ना औषधांचे साईड इफेक्ट होतात, ह्यांची नकारात्मकता पेशी स्तरांपर्यंत रुजली असल्यामुळे औषधे हि जास्त पावरची घ्यावी लागतात, स्पेशालीस्ट कडे जावे लागते, ५० रुपयांच्या जागी ५०० रुपये द्यावे लागतात आणि सोबत साईड इफेक्ट वाल्या गोळ्या घ्याव्या लागतात. म्हणजे ह्यांनी शरीराला तसे करण्यास भाग पाडलेले असते.

जिथे आजारपण दोन दिवसात गेला पाहिजे तिथे २ महिने ते अनेक वर्षे घेतात. मानसिक दृष्ट्या सक्षम नसतात, आणि भावनिक दृष्ट्या तर खूपच हळवे असतात. प्रत्येक घटनेला ते नकारात्मक घेतात, दुर्लक्ष्य करत नाही आणि त्याचे रुपांतर हे मनोशारीरिक आजारात करतात. निर्लज्ज सदा सुखी का आहे हे माहित नसते त्यांना. छोटी छोटी घटना मनाला लावून घेत बसतात.

ह्या नकारात्मक विचारसरणी मुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते, मानसिक व शारीरिक आजारपण निर्माण होतात. हॉस्पिटल मध्ये जास्त वेळ घालवतात.

ह्याला थोडक्यात आपण नकारात्मक जीवनशैली बोलू.

सकारात्मक पेशंट : डॉक्टरांसोबत सकारात्मक वार्तालाभ करतात. ह्यांच्यावर गोळ्यांचा उत्तम फरक पडतो, जर फरक पडला नाही तर ते तसे डॉक्टरांना सांगतात व डॉक्टर जेव्हा गोळ्या बदलून देतात तेव्हा त्यांना फरक पडायला लागतो. ह्यांच्या सकारात्मक विचारांमुळे आजारपण विना औषधाचे देखील बरे होते. ह्यांना कधीही स्पेशालिस्ट कडे जायची गरज पडत नाही. ह्यांच्या सकारात्मक मानसिकतेमुळे जीवशैली हि आरोग्यदायी असते. ध्यान न करता देखील ते लक्ष्य केंद्रित करू शकतात व नकारात्मक विचारांवर मात करू शकतात.

ह्यांना कितीही मोठे आजारपण झाले तरी ते आरामात बरे करतात. प्रत्येक औषधाला ह्यांचे शरीर प्रतिसाद देते. सहनशक्ती देखिल जास्त असते त्यामुळे जास्त वेदना सहन करून ते आपले विचार नकारात्मक न करता संपूर्ण लक्ष आजार बरा होण्यावर ठेवतात व ते ह्यामध्ये यशस्वी देखील होतात. हे हॉस्पिटल मध्ये कमी वेळ घालवतात.

आता तुम्ही बघा कि तुमची विचारसरणी कशी आहे ते. सकारात्मक आहे कि नकारात्मक. जर सकारात्मक असेल तर उत्तम आणि जर नकारात्मक असेल तर लवकर त्यावर काम करायला घ्या.

आजारपण बरे करण्यासाठी आकर्षणाचा सिद्धांत उत्तम काम करते. आकर्षणाचा सिद्धांत आरोग्य आकर्षित करते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आजाराचे योग्य निदान होते, कितीही मोठा आजार का असेना तो बरा होतो, उपचारांना आपले शरीर सकारात्मक प्रतिसाद देते. हॉस्पिटल मधून आपण लवकर बरे होवून येतो. ह्या सकारात्मकतेमुळे आजू बाजूचे २ ४ पेशंट बरे होतात व ते देखील तुम्हाला आशीर्वाद देतात ज्यामुळे तुमची आकर्षणाची शक्ती अजून वाढते.

आकर्षणाच्या सिद्धांताची जी उपचार पद्धती आहे त्यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. आता करत असलेल्या उपचारासोबत देखील तुम्ही आकर्षणाच्या सिद्धांताचा उपचार सुरु ठेवू शकता. कृपया घरगुती आकर्षणाच्या सिद्धांताचा घरगुती उपचार करू नका नाहीतर तुम्ही आजारपण अजून वाढवाल.

माझ्याकडे आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी, आजारपण बरे करण्यासाठी आकर्षणाचा सिद्धांत वैचारिक उपचार, स्पर्श चीकिस्ता (हिलिंग), तेजोवलय (ऑरा), संमोहन चीकीस्ता, पंचमहाभूत चीकीस्ता आणि अघोरी चीकीस्ता पद्धती उपलब्ध आहे. ह्या उपचार पद्धतींचा उपयोग फक्त आजारपण बरे होण्यासाठी नाही तर आयुष्यातील विविध समस्या, संकटे दूर करण्यासाठी देखील होतो.

खाजगी, व्यवसायिक, आर्थिक, लैंगिक, शैक्षणिक, वैवाहिक, कौटुंबिक आणि मुलांच्या सर्व प्रकारच्या समस्या वरील चीकीस्ता पद्धतीद्वारे दूर होतात. निर्जीव जसे कि सर्व प्रकारच्या वास्तू मधील समस्या दूर केल्या जातात मग ते घर असो, ऑफिस, कारखाना किंवा कुठल्याही प्रकारची मालमत्ता.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे कर्जाच्या बोझ्याखाली दबलेले पालक आणि संपूर्ण कुटुंब. कर्ज घेवून शिक्षण घ्यायचे कि उद्योग व्यवसाय करायचा?



मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे कर्जाच्या बोझ्याखाली दबलेले पालक आणि संपूर्ण कुटुंब
कर्ज घेवून शिक्षण घ्यायचे कि उद्योग व्यवसाय करायचा?

मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे पालक आणि पूर्ण कुटुंब हे कर्जबाजारी होत आहे. जर मुलांना शिकवायचे असेल तर त्यांना कमवा आणि शिका ह्या तत्वावर शिक्षण घेऊ द्या, जर तुम्ही कर्ज काढत असाल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी हि मुलांना उचलू द्या. जर मुलं मानसिक दृष्ट्या सक्षम असतील तरच ते जबाबदारी उचलू शकतील, विनाकारण त्यांच्यावर दबाव टाकू नका.

बँक काही तुमचा नातेवाईक नाही आहे, तो पैसे वसूल करणारच. तुम्ही सरळ मार्गाने जगणारे आहात आणि बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा ती तिचा सभ्य चेहरा समोर आणते पण जेव्हा वसूल करते तेव्हा ती तिचा वाईट चेहरा हा आउटसोर्स च्या नावाखाली पैसे वसून करणाऱ्या कंपनीला देते जिथे तुम्हाला शिव्या एकाव्या लागू शकतात.

उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार बनायला शिक्षण चार भिंतीमधील नाही तर चार भिंतीच्या बाहेरचे लागते. इथे तुम्हाला दर्जेदार शिक्षण भेटेल. जिथे चार भिंतीमध्ये तुम्ही शाळेत जितके शिकू शकणार नाही तिथे चार भिंतीबाहेर एका क्षणात शिकाल.

ज्या परप्रांतीयांची दुकाने आहेत ती मुल शाळा देखील शिकतात व घरी आल्यास दुकानावर उद्योग, व्यवसाय कसा करावा हे देखील शिकतात. आणि मराठी घरात शिक्षण देवून बोलतात कि काम कर, कुठे हे दुकान वगैरे सांभाळतोय. ह्यासाठी पदवी उच्च पदवी घेतली का? असे बोलून दुकान भाड्याने देतात किंवा परप्रांतीयांना विकून टाकतात.

परप्रांतीयांची मुलं हि शिक्षणात नापास झाली तरी त्यांना टेन्शन नसते कारण नोकरी नसली तरी ते त्यांच्या पिढीजात दुकान, उद्योग आणि व्यवसाय करतात.

परप्रांतीयांनी शिक्षण घेतले तरी त्याचे कारण हुंडा असू शकते जिथे त्यांना पदवीचा फायदा होतो किंवा ती पदवी असली तरच ते एखादा काळानुसार नफा देणारा उद्योग व्यवसाय करू शकतात, नाहीतर ते पदवीला महत्व देत नाही.

नोकरी असो वा उद्योग व्यवसाय शेवटी तुम्हाला पैसेच कमवायचे आहे. उच्च शिक्षण घेऊन कोणी समाजसेवा करणार नाही. समजा जर डॉक्टर बनण्याचा खर्च हा २५ लाख ते करोड च्या घरात गेला तर त्या डॉक्टरांनी करायचे तरी काय?

दोष व्यवस्थेत आहे, कृत्रिम व्यवस्था निर्माण करून पैसे काढण्याचे नाही तर उकळण्याचे काम सुरु आहे.

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि सुरक्षा ह्यासारख्या मुलभूत गरजांसाठी पैसा लागतो त्यामुळे पैश्याला महत्व द्या. तरी देखील पैश्याला महत्व देता येत नसेल तर गरीब म्हणून आयुष्य जगा, तुम्हाला समाजाची काळी बाजू निदर्शनात येईल.

शिक्षण झाल्यावर तुम्हाला लगेच नोकरी भेटेल ह्याची शाश्वती काय? जोपर्यंत कर्ज फेडत नाही तोपर्यंत तुम्ही जिथून कर्ज घेतले त्यांचे गुलामच राहणार आहात. म्हणजे शिक्षण घेताना देखील गुलाम आणि घेतल्यावर देखील गुलाम, अशी किती वर्षे तुम्ही गुलामीत काढाल? आणि जर घर दार जमीन जुमल्यावर शिक्षणाचे कर्ज घेतले असेल तर?

जिथे फायदा आहे तिथेच बँक कर्ज देते.

मग कर्ज हे उद्योग, व्यवसायासाठी का नाही घेत? जर तुम्हाला कर्जच घ्यायचे आहे तर उद्योग व्यवसायासाठी का नाही?

शैक्षणिक कर्जातून तुम्हाला पदवी भेटेल व त्यानंतर नोकरी आणि पगार. उद्योग व्यवसायातील कर्जातून तुम्हाला जी रक्कम गुंतवली त्याचा परतावा सुरु होईल.

नाही शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच तुम्हाला नोकरी लागते आणि नाही उद्योग व्यवसाय सुरु केल्या केल्या तुम्हाला फायदा व्हायला सुरवात होतो.

शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी लागण्याचा जो कालावधी असतो त्यामध्ये तुम्ही तितकी वर्षे उद्योगातील नफ्या तोट्यामुळे, अनुभव गाठीशी घेवून नफा मिळवायला सुरवात करता.

काही संस्थांमधून तुम्हाला पदवी भेटल्या भेटल्या किंवा शिकतानाच गलेगठ्ठ पगार भेटेल पण ह्या विद्यार्थ्यांची संख्या हि खूप कमी असते, सर्वसामान्य विद्यार्थ्यांची संख्या हि जास्त असते त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल बोलू. असेच काही लोक उद्योग व्यवसायात लवकर जम बसवतात पण हि अपवादाची उदाहरणे झाली, सरासरी इतक्या लवकर कोणी उद्योग व्यवसायात जम बसवून नफा कमवू शकत नाही.

आपले आर्थिक निर्णय हे आपल्या आर्थिक कुवतीनुसार आणि तुम्हाला फायदा होईल असेच घ्या ना कि महागडे शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि बँक ह्यांना फायदा पोहचवा.

जर तुम्ही अश्या समस्येमधून जात असाल तर आजच संपर्क करा, कारण एकदा पैसा गेला कि गेला आणि कर्ज चालू झाले कि व्याजासकट हफ्ते हे भरावेच लागतील. त्यानंतर मी देखील काहीही करू शकत नाही.

जो काही निर्णय घेणार तो विचारपूर्वक घ्या. त्यानंतर सर्व जबाबदारी हि तुमचीच असते. पैश्याचे सोंग कोणी घेवू शकत नाही.

कुठल्याही प्रकारच्या आर्थिक व्यवसायिक समस्येमुळे तणाव, नैराश्य अति चिंता आणि आत्महत्येचे विचार येत आहेत तर आजच संपर्क करा.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.


धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

झेप समृद्धीकडे

पाणी ह्या पृथ्वीतलावर घडलेला प्रत्येक क्षण आपल्या स्मृतीत साठवून ठेवते




पाण्याला स्मृती असते. जर तुम्ही अध्यात्मिक असाल तर तुम्हाला पाण्याजवळ गेल्यावर किंवा किनार्यालगत राहिल्यावर अनेक चित्र विचित्र अनुभव येतील. पाणी हे उत्तम वाहक आहे फक्त भौतिक शास्त्रानुसार नाही तर अध्यात्मिक शास्त्र ह्यानुसार देखील पाण्याला महत्व आहे.

मी इथे भौतिक शास्त्राचा नाही तर अध्यात्मिक शास्त्र ह्याचा वापर करून उत्तर देत आहे. विषयाला वेगळे वळण नको म्हणून अगोदरच स्पष्ट केले आहे.

साधे उदाहरण देतो जे तुम्ही भय पटात बघितले असेल. व्यक्ती पाणी प्यायला उठते आणि पाणी पिऊन झाल्यावर तिला भास होतात. असे का होते? दिवस रात्र पाणी हि आजू बाजूच्या होवून गेलेल्या अगदी हजारो वर्षांपासून ते मागील क्षणापर्यंत च्या सर्व स्मृती स्वतः मध्ये साठवून ठेवते. जिथून पाणी येत जाते तेथील सर्व म्हणजे जवळपास सर्व स्मुर्ती स्वतः मध्ये साठवून ठेवा. त्यामुळे जेव्हा व्यक्ती पाणी पिते तेव्हा तिला अनेकदा अलौकिक अनुभव येतात आणि कधी कधी ते तिला वास्तवाची जाणीव देखील करून देतात.

भयपट वेगळे आणि वास्तवात येणारे अनुभव वेगळे. वास्तवात येणारे अनुभव हे थरकाप उडवून देतात. भले ते अनुभव सकारात्मक का असेना मग विचार करा कि नकारात्मक अनुभव किती भीतीदायक असतात ते. माझी अनेक वर्षांची साधना आहे आणि त्या वातावरणात राहिलो आहे म्हणून आता सवय झाली आहे पण जेव्हा पहिला अनुभव मी घेतला होता तो अक्षरक्ष अंगावर काटा आणणारा होता.

पाण्याचा आणि सजीव श्रुष्टी चा जवळचा संबंध आहे, संबंध नाही तर सजीव श्रुष्टी हि पाण्यामुळे निर्माण झालेली आहे. आपले शरीरात देखील ७५ % पाणी आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपल्या शरीरातील पाणी हे स्थिर होवून आपल्या अंतर्मनातील तळ आपल्याला दिसू लागतो व आपल्याला आपली क्षमता समजते आणि जेव्हा आपण ती क्षमता बाहेर आणतो व तिला बाहेरील पाण्याचा संपर्क होतो तेव्हा ती क्षमता तुमच्या आयुष्यात पाण्याचा वापर करून त्या क्षमतेला अनुसरून परिस्थिती निर्माण करते. अर्थातच तुम्हाला ती परिस्थिती टिकवून ठेवता आली पाहिजे नाहीतर त्याच पाण्यात ज्यांनी संधी चा फायदा नाही उचलला ह्यांच्या देखील स्मृती आहेत.

हि स्मृती आपण ज्याला बोलतो ती खरच स्मृती आहे कि वास्तव आहे हे देखील ओळखायला हवे नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणण्याची संधी हुकून बसाल.

पाण्यातील स्मृती काळानुसार काम करते. उदाहरणार्थ जर भूतकाळात एखादी व्यक्ती हि श्रीमंत असेल तर तिच्याकडे त्या काळानुसार ज्या जय श्रीमंतीच्या वस्तू होत्या ती ते अनुभवत होती असेच ह्या काळात ज्या ज्या वस्तू आहेत मानसिकता आहे ती ती अनुभवायला येईल.

अध्यात्मिक लोकांना आत्मा परमात्मा, चांगले वाईट अलौकिक शक्तींचे अनुभव हे पाण्यामधील असलेल्या स्मृती मुळेच येतात.

हे झाले अध्यात्मिक लोकांसाठी. विज्ञान असू द्या किंवा अध्यात्म जो पर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तो पर्यंत काहीही फायदा नाही. अनुभवला पर्याय नाही. अनुभव असेल तर ह्या मार्गाने चला आणि नसेल तर तुम्ही दुसर्या मार्गाचा अवलंब करा.

शक्तिशाली पंचमहाभूते ह्यापैकी एक पाणी. ह्या पाण्याच्या शक्तीचा वापर करून अनेकांच्या समस्या दूर केल्या आहेत. आर्थिक समस्या दूर झाल्या आहेत, घरातील वाद संपुष्टात आले आहे, शिक्षणातील समस्या दूर झाल्या आहेत, जोडीदार भेटले आहे, लैंगिक समस्या दूर झाल्या आहेत आणि इतर अनेक समस्यांवर प्रभावीपणे काम केले आहे.

प्रश्न एक असेल तर माझ्या कडे त्या प्रश्नाचे अगणित उत्तरे आहेत.

पंचमहाभूत साधना : फक्त अनुभवी लोकांसाठी (साधनेचे नियम व अटी पाळणे बंधनकारक राहील त्यामुळे ज्यांना कठोर साधनेचा सराव आहे त्यांनीच संपर्क करावा.)

पंचमहाभूत उपचार उपलब्ध.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.


धन्यवाद

अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत