डिप्रेशन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डिप्रेशन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


 “उद्योग व्यवसाय आणि गुंतवणूक करतांना अतिविचार करू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल कि तुम्ही अति विचार करत आहात तेवढ्यात तज्ञांची मदत घ्या ते तुम्हाला मार्ग दाखवतील नाहीतर अतिविचाराचे रुपांतर हे डिप्रेशन मध्ये होईल. मानसिक दृष्ट्या जितके झेपते तितकाच मेंदूला ताण द्या.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0
https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :
https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

डिप्रेशन, मानसिक आजार घातक का आहेत?









जर शरीराला बाहेरून जखम झाली तर ती व्यक्तीला दिसून येते, ती व्यक्ती धावतपळत जावून उपचार करून घेते. जर आतमध्ये जखम झाली तर त्या व्यक्तीला अनेक समस्या निर्माण होतात, वेदना असह्य होतात मग डॉक्टर कडे जावून, एमआरआय, सिटी स्केन, एक्स रे काढून त्या आतील जखमेवर उपचार सुरु करून ती जखम बरी करतात.

जेव्हा व्यक्तीला मानसिक जखम होते तेव्हा ती जखम दिसून येत नाही, तिची तीव्रता समजून येत नाही. ती व्यक्ती बाहेरून हसत खेळत आयुष्य जगत असते पण जेव्हा एकट्यात असते तेव्हा आपल्या भावना रडून ओरडून किंवा स्वतःला त्रास देवून व्यक्त करते पण कुणाकडेही ती व्यक्त होत नाही.

मानसिक जखम जितकी खोल तितके तिचे परिणाम गंभीर. अश्या व्यक्ती स्वतःला गंभीर इजा, दुखापत करून घेवू शकतात पण त्या जखमा कपड्यांमध्ये झाकल्या जातात किंवा झाकून ठेवतात. सतत च्या नकारात्मक विचारांमुळे शारीरिक आजार बळावतात. त्या आजारांचे रुपांतर जीवघेण्या आजारात होते. उपचारांना प्रतिसाद देत नाही.

मानसिक आजार आहे हे केव्हा कळते जेव्हा ती व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते, उपचारांना प्रतिसाद देत नाही तेव्हा. जीव वाचला तर ठीक नाहीतर परत त्या व्यक्तीला संधी भेटत नाही. फक्त कुटुंबातील सदस्यांना माहिती असते पण बाहेरच्या लोकांना सामान्य व्यक्ती दिसून येते.

मानसिक आजार कायमस्वरूपी बरे करू शकतो का?

हो मानसिक आजार कायमस्वरूपी बरे करू शकतो. फक्त मान्य केले पाहिजे कि मानसिक आजार आहे आणि पारंपारिक घरगुती उपचारपद्धती काम करत नसेल तर लगेच तज्ञांची मदत घ्या. जितका जुना आजार तितका तो बरा व्हायला वेळ लागतो पण तो पूर्णपणे बरा होतो.

#अश्विनीकुमार

#मानसशास्त्र आणि #आकर्षणाचा सिद्धांत

#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

सवा कोटी मुंबई च्या लोकसंख्येत एकटेपणा का जाणवतो?



मुंबई ची लोकसंख्या सवा कोटी. उच्च पदावर कामाला. दररोज लोकांच्या संपर्कात. सर्व व्यवसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी तरीही एकटेपणा का जाणवतो? कोणीच आपल्याला समजून घेवू शकत नाही हि भावना का उत्पन्न होते? अशी कसली मानसिक अवस्था निर्माण होते ज्यामुळे एकटेपणा जाणवतो? हा एकटेपणा फक्त त्या व्यक्तीलाच का जाणवतो? इतर समजून घेण्यात कमी पडतात का?

असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. चला मानले कि इथे बाह्य स्वरूप म्हणजे सुंदरता महत्वाची असेल पण जे सुंदर आहेत जे देखणे आहेत त्यांना देखील एकटेपणा का जाणवतो?

मितभाषी असणे, कमी बोलणे, लोकांमध्ये न मिसळणे हा स्वभाव असेल आणि ती व्यक्ती स्वतःची कंपनी इंजोय करू शकत असेल तर काही समस्या नाही. हा स्वभावाचा भाग झाला पण चार चौघात मिसळून, राहून एकटेपणा जाणवणे, कोणी आपलेसे न वाटणे हा मानसिक आजार तर नाही पण त्या व्यक्तीला भावना व्यक्त करता आली नाही किंवा तिला जसे जगायचे आहे तसे जगता आले नाही किंवा भूतकाळात अशी काही घटना झाली असेल ज्यामुळे तिला अजून त्रास होत असेल हे जेव्हा समुपदेशन होईल तेव्हाच मी सांगू शकेन.

आताची जीवनशैली देखील अशी केली गेली आहे कि एकटेपणा शिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही. कारण जिथे काम करतो तिथे जर जवळीक निर्माण केली तर गैरफायदा उचलला जातो जसे एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लोक भीतीने कुणाच्याही अंगावरून पळून जाण्यास पाठी पुढे बघत नाही तशी स्पर्धा विनाकारण निर्माण केली गेली आहे. ह्यामुळे देखील एकटेपणा जाणवतो.

काहींचे संगोपनच असे गेले असते कि खूप कमी लोक त्यांच्या संपर्कात आलेले असतात, त्यांना चार चौघात किंवा जगात कसे वावरायचे ह्याबद्दल संस्कार भेटलेले नसतात त्यामुळे त्यांना एकटेपणा येतो.

ह्यापैकी काही लोकांचे असे असते कि चुकून कोणीही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांना वाटते कि जग असेच आहे. मग हळू ती ती व्यक्ती त्यांचे शोषण करायला लागते, त्यांना वाटते कि हे प्रेमात असे चालते, विश्वासात मैत्रीच्या नात्यात असे चालते, मग शोषण हळू हळू वाढत जाते आणि जेव्हा अतिरेक होतो तेव्हा ती लोक जागे होतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशी लोक नवीन नातेसंबंध नाकारतात.

मी वर स्पष्ट केल्याप्रमाणे स्वभाव असेल आणि त्याचा मानसिक शारीरिक आरोग्यावर काही परिणाम होत नसेल तर ठीक आहे कारण अशी लोक त्यांच्या स्वभावानुसार आयुष्य इंजोय करतात, त्यांना ते एकटेपणात जे काही करतात त्याच्यात आनंद वाटतो, किंवा नुसते झोपले तरी काही समस्या नाही.

पण जिथे अंतर्मनात मानसिक शांती नसते ती लोक काय करत असतील? ती लोक काही ना काही मनोशारीरिक आजार निर्माण करतात ज्यामुळे कारण मिळते व डॉक्टर कडे जावून आपले मन मोकळे करण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांना देखील त्यांच्या मानसिकतेची कल्पना नसते, ते उपचार करतात, थोडे बोलतात व विषय तिथे संपून जातो मग परत आजारपणाचे चक्र सुरु होवून जाते.

जर त्यांना वाटले कि डॉक्टर देखील लक्ष्य देत नाही, आपण सतत जात असतो म्हणून डॉक्टर देखील आपल्याला महत्व देत नाही असे त्यांना वाटते आणि हे स्वाभाविकच असेल कारण शारीरिक रोगांवर इलाज करणारे डॉक्टर असतात त्यामुळे त्याचे लक्ष्य हे शारीरिक आजार बरे करण्यावरच असते. मानसिक आजारांचे डॉक्टर वेगळे असतात आणि तिथे उपचार पद्धती हि वेगळी असते. मग ह्या गैरसमजेतून ते मनोशारीरिक आजाराचे शारीरिक आजारात रुपांतर करतात आणि आजारपण वाढवतात.

आपला मेंदू खूप काही करू शकतो त्यापैकी एक आजारपण देखील निर्माण करू शकतो. तुम्ही एकलेच असेल कि किती चांगला आनंदी व्यक्ती होता पण अचानक सोडून गेला? त्याचे मुख्य कारण मानसिकच होते, जर ह्या मानसिकतेवर वेळेवर उपचार झाले असते तर त्या व्यक्तीचा जीव वाचवता आला असता.

आता इथे देखील स्त्री पुरुष भेदभाव वाढला आहे. जो तो येतो तो स्त्रियांकडे लक्ष्य देतो आणि पुरुषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष्य केले जाते. अनेक अध्यात्मिक गुरु देखील स्त्रियांना महत्व देतात आणि पुरुषांकडे दुर्लक्ष्य करतात. हे भांडवलशाही युगात प्रमाण वाढले आहे. जर भर रस्त्यात स्त्री रडली कि सगळे तिचे अश्रू पुसायला जातात आणि पुरुष रडला कि हसतात, हो हा आपला सुसंकृत समाज आहे. स्त्रियांची सांत्वना करण्यास अनेक पुरुष आणि स्त्रिया पुढे सरसावतील पण पुरुषांची सांत्वना करण्यात कोणीही पुढे येणार नाही आणि आले तरी खूप कमी स्त्री पुरुष पुढे येतील.

तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखी मानसिक समस्या अनेकांना आहे फक्त ते तुम्हाला समजून येणार नाही. जेव्हा व्यक्ती माझ्याकडे येते आणि स्वतःला व्यक्त करते तेव्हा समजते कि ती किती मोठ्या मानसिक आणि शारीरिक समस्येने ग्रस्त आहे म्हणून नाहीतर त्यांचे बाह्य स्वरूप हे सामान्यच दिसून येते. असेच काही गुन्हेगारांचे देखील आहे,ते आपल्या आजूबाजूला असतात पण आपण ओळखू शकत नाही, जेव्हा ते आपली शिकार करतात तेव्हा आपल्याला त्यांचे खरे स्वरूप समजून येते.

मी हे नाही बोलत कि सतत चारचौघात रहा किंवा सर्व कार्यक्रम समारंभ अटेंड करा, माझे म्हणणे इतके आहे कि जो एकटेपणा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत आहे त्यामधून बाहेर पडा आणि नंतर तुम्हाला पाहिजे तसे आयुष्य जगा. जर तुम्ही समस्येत आहात तर हाच एकटेपणा जीवघेणा ठरू शकतो त्यापेक्षा नेहमी तज्ञांची मदत घेतलेली बरी. जरी कोणी नसले तरी तज्ञ तुम्हाला मदत करू शकतात.

जर आपण कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मानसिक समस्येतून जात असाल, किंवा तुमचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण झाले असेल तर बिनधास्त व्यक्त व्हा, मी जज करत नाही कारण मला वास्तव माहिती आहे आणि तुम्ही ज्या समस्येतून गेला आहात त्या समस्येतून अनेक लोक गेली आहेत किंवा जात आहेत. आणि अनेकांनी अश्या समस्यांमुळे निर्माण झालेल्या मानसिक आणि शारीरिक आजारांवर मात करत आयुष्यात नवीन सुरवात केलेली आहे.

कृपया hi hello किंवा good morning चे मेसेज पाठवू नका, सरळ विषयावर या.

लेख कृपया नावासकट शेअर करण्यात यावा. मी मनोरंजन आणि ग्राहक मिळवण्यासाठी लेख नाही लिहित आहे तर लोकांचे जीव वाचावे ह्यासाठी लिहित आहे, ह्याच लेखांमुळे अनेक आत्महत्या करणार्यांपैकी एक आत्महत्येचा विचार सोडून परत आपले आयुष्य पुनर्जीवित करत आहे. पैसा देखील महत्वाचा आहे पण जेव्हा व्यक्तीचा जीव वाचला जातो तेव्हा मिळणारे समाधान शब्दात नाही सांगू शकत. अनुभवला पर्याय नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

मानसिक आजार २ डिप्रेशन



मानसिक आजार २

डिप्रेशन

डिप्रेशन हे तणाव, नैराश्य, उदासीनता, नकारात्मक विचार, भावना आणि शोषित भूत किंवा वर्तमान काळ ह्याचे मिश्रण आहे. तपासल्याशिवाय डिप्रेशन चे मूळ कारण समजणार नाही. आपल्या भावना ह्या गुंतलेल्या असतात म्हणून जे काही पुस्तकात देतात त्यावरून अंदाजा लावू शकत नाही. निसर्गाने मनुष्य बनवला आहे आणि मनुष्याने शास्त्र. त्यामुळे फक्त नैसर्गिक शास्त्रच डिप्रेशन वर प्रभावी उपाय कार्य शकते ना कि इतर शास्त्र.

डिप्रेशन ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची लक्षणे कशी ओळखायची?

सहसा व्यक्ती डिप्रेशन ने ग्रस्त आहे हे तिच्या वागण्या, बोलण्या आणि चेहऱ्यावरून सांगू शकत नाही. ह्या सर्व थेअरी फेल गेलेल्या बघितल्या आहेत. हसत खेळत प्रगती करणारी लग्न करून घर बसवलेली व्यक्ती सुद्धा डिप्रेशन ने ग्रस्त असू शकते. त्यामुळे डिप्रेशन चे कारण शोधणे खूप आवश्यक आहे नाहीतर किंमत संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागते.

डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि नेहमी खिन्न आणि उदास चेहऱ्याने आयुष्य जगत असते?

नाही. ती सतत स्वतःला ती आनंदी आहे हे भासवत असते. ती सर्वांना मदत करत असते. ती तत्वज्ञान देखील सांगत असते. ती जोडीदारासोबत सामान्य आयुष्य जगत असते. ती लहान मुलांसोबत सामान्यपणे खेळत असते.

डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती सतत एकटे राहणे पसंद करते?

नाही. डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि मित्रांच्या समुहात देखील असू शकते. पार्टी आणि मौज मजा देखील करताना दिसेल. पण हे सर्व वागणे वरवरचे आहे ना कि अंतर्मनातील वागणे आहे.

विभक्त कुटुंबात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते का?

नाही. सयुंक्त कुटुंबात जास्त प्रमाणात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते.

डिप्रेशन फक्त तरून, वयस्कर लोकांना होते का?

नाही. आजकाल लहान मुलांना देखील डिप्रेशन होते. मी माझ्याच मित्राच्या मुलीचे उपचार केले होते आणि ती त्यावेळेस चौथीला शिकत होती. बदललेली जीवनशैली मुळे कोणीही डिप्रेशन ने ग्रस्त होऊ शकते.

डिप्रेशन फक्त नास्तिक विश्वास असलेल्या लोकांना होते का?

नाही. ह्याचा जास्त परिणाम हा आस्तिक लोकांमध्ये दिसून आला. पण इथे उपचाराला उत्तम प्रतिसाद नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांकडून जास्त आला.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, अध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ह्यांना डिप्रेशन होते का?

हो. माझ्याकडे सर्व क्षेत्रातील डॉक्टर, अध्यात्मिक गुरु कारण जेव्हा भय्यूजी महाराज ह्यांनी आत्महत्या केली तेव्हापासून मी अध्यात्मिक गुरूंना देखील अटेंड करायला लागलो. प्रशिक्षक, सर्व प्रकारचे वक्ते हे सर्व माझ्याकडे उपचारासाठी येतात. ज्योतिष, हीलर, रेकी मास्टर आणि इतर सलंग्न क्षेत्रातील व्यक्ती देखील येतात. काही क्षेत्रातील व्यक्तींना मी ह्यासाठी अटेंड नव्हतो करत कारण प्रसिद्धी पासून दूर राहून जास्तीत जास्त लोकांना मानसिक आजारापासून मुक्त करायचे होते पण जर भय्यूजी महाराज सारखी एक व्यक्ती गेली कि खूप मोठी पोकळी निर्माण होते व नकळत लोड हा येतोच. काही कडक नियम बनवून प्रसिद्ध व्यक्तींना अटेंड केले जाते.

डिप्रेशन म्हणजे वेड लागले आहे असे आहे का?

नाही. डिप्रेशन हा मानसिक आजार आहे आणि सर्वच मानसिक आजार म्हणजे वेड लागणे नाही. वेड्या व्यक्तीचा मेंदू आणि शरीरावर ताबा नसतो आणि डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्तीचा मन मेंदू आणि आयुष्यावर ताबा असतो.

डिप्रेशन वर उपचार होतात का?

हो. डिप्रेशन वर उपचार होतात फक्त योग्य तज्ञ व्यक्ती भेटली पाहिजे.

डिप्रेशन कायमचे बरे मारू शकतो का?

जर सुरवातीपासून डिप्रेशन चे मूळ सापडले कि डिप्रेशन कायमचे बरे करू शकतो.

डिप्रेशन बरा व्हायला किती कालवधी लागतो?

जितका जुना आजार तितका कालवधी जास्त. जर तज्ञ योग्य भेटला तर लवकर बरे करू शकतो. काही लगेच बरे होतात तर काहींना वेळ लागतो. कालावधी बघण्यापेक्षा उपचारावर लक्ष्य केंद्रित करावे.

डिप्रेशन वर वयक्तिक उपचार चांगला कि सामुहिक?

डिप्रेशन वर वयक्तिक उपचार नेहमी चांगला. सामुहिक उपचार होणे शक्य नाही कारण प्रत्येक व्यक्तीची समस्या हि वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. अति खाजगी किंवा लैंगिक समस्या ह्या समूहात बोलू शकत नाही. माझ्या मते तरी वयक्तिक उपचार केल्यास उपचार उत्तम होतो आणि रिझल्ट देखील जाणवतो.


महत्वाचे मुद्दे

वेळ आणि पैसा असल्यास आपण डिप्रेशन वर आरामात मात करू शकतो.

आता ऑनलाईन मार्गाने लगेच अटेंड केले जाते व भविष्यात होणारे नुकसान टाळले जाते.

काही वेळेस डिप्रेशनवर चौकटीबाहेर जावून उपचार करावे लागतात.

समोरच्या व्यक्तीचा जो विश्वास आहे त्यानुसार उपचार करावे लागतात.

व्यक्तीचा स्वभाव देखील उपचारा अगोदर बघावे लागते.

तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारख्या समस्या अनेक लोकांना असतात फक्त ते आपल्याला माहिती नसतात. अंतर्मुखी स्वभाव असणे हा गुन्हा नाही. माझ्याकडे अंतर्मुखी स्वभावाची लोक व्यक्त होतात, त्यांना विनाकारण बडबड आवडत नाही किंवा जबरदस्तीने बोललेले आवडत नाही.

जिथे भावना जुळतात तिथे एकटेपण जाणवत नाही पण जिथे भावना नाही जुळत तिथे एकटेपण जाणवते. जर तुम्ही सयुंक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहत असाल तरी तुम्हाला एकटेपणा जाणवेन.

कोणीही तुमच्यासोबत नसले तरी मी तुमच्या सोबत आहे. बिनधास्त आपले आयुष्य जसे पाहिजे जगा. बाकी पुढच्या पुढे बघून घेवू. आयुष्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

Image by Free-Photos from Pixabay