उद्योजक बनण्यासाठी तुमचा करू शकतो हा दृष्टीकोन
शिक्षण, ज्ञान, कौशल्य ह्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


जेव्हा तुम्ही
तुम्हाला जे आवडेल ते कराल
तेव्हा
रुपयांचा प्रवाह तुमच्या मागोमाग येईल.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

नव उद्योजकांनी गुंतवणुकदारांकडे जाण्या अगोदर काय काय खबरदारी घेतली पाहिजे हे व्हिडीओ मध्ये तज्ञांच्या मार्फत अतिशय सोप्या भाषेत समजावून सागितले आहे.




नव उद्योजकांनी गुंतवणुकदारांकडे जाण्या अगोदर काय काय खबरदारी घेतली पाहिजे हे खालील व्हिडीओ मध्ये तज्ञांच्या मार्फत अतिशय सोप्या भाषेत समजावून सागितले आहे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

गॉड नॉट डेड God's Not Dead



गॉड नॉट डेड हा हॉलीवूड सिनेमा २०१६ साली प्रदर्शित झाला, ह्यामध्ये पश्चिमेकडील शिक्षक कसे शिकवतात ह अधोरेखित केले आहे. एक क्षण सिनेमामधला असा होता जिथे शिक्षिका संदर्भाविना उदाहरण देते ज्यामुळे ते छोटेसे प्रकरण न्यायालयापर्यंत जाते.
तुम्ही विचार करा कि ज्यांच्या संपर्कात तुम्ही आहात किंवा ज्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेता ते खरच संदर्भ देवून सांगतात कि तुम्ही संशोधन न करता आहे तसे मान्य करता? जिज्ञासू आणि चीकीस्तक वृत्तीच समृद्ध आयुष्य देते.
जर नसेल तर तुम्ही तणावाचे आयुष्य जगत आहात आणि हेच जर तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत संस्कार देत नेले तर त्यांचे आयुष्य लहानपणापासून तणावात जाण्याची संभावना आहे, व पुढील आयुष्य फक्त ते गुलामांसारखे काही न प्रश्न करता जगतील मग ते उच्च पदावर असो, किंवा कुठेवी नोकरी करत जगत असतो.
ह्यावर उपाय एकच नेहमी चीकीस्तक जिज्ञासू वृत्ती ठेवा. मुक्त मनाने जगा, तश्याच लोकांसोबत नातेसंबंध ठेवा. विना संदर्भ कुठल्याही ऐकलेले, लिहिलेले ह्यावर विश्वास ठेवू नका. मुलांनाही हेच संस्कार द्या. मी तुम्हाला बोललो कि २० व्या मजल्यावरून विना पेरेशुट ने उडी टाका तर तुम्ही इतके शहाणे आहात कि तुम्ही उडी नाही टाकणार ह्यालाच म्हणतात जगण्याचा सिद्धांत जो निर्सगाने निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांमध्ये आहे, त्यामध्ये मनुष्य प्राणी देखील आलाच.
अश्विनीकुमार फुलझेले
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


तोच समाज किंवा व्यक्ती पुढे जाण्याची किंवा विकास साधण्याची शक्यता वाढते जे आपल्या ज्ञान संपादने वर जास्त गुंतवणूक करतात ना कि घर, गाड्या यासारख्या दुसऱ्या दिवशी किंमत कमी होणाऱ्या डेड इन्वेस्टमेंटवर.
दामोदर मल
रिटेल मार्केट तज्ञ
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
refrence Anita Pagare madam facebook wall

<! - ->

रेंट ए मोजो हि सेवा पुरवणारी कंपनी ग्राहकांना घरचे फर्निचर भाड्याने देते. खाजगी सरकारी कर्मचारी ज्यांच्यामध्ये उच्च पदावर काम करणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि त्याचा पगारही जास्त असतो आणि ज्यांची सतत कामानिमित्त देश किंवा विदेशात बदली होवून इथे येतात त्या ग्राहकांसाठी हि सेवा सुरु केली आहे.
सुरवातील त्यांनी फक्त मोठ्या शहरांसाठी हि सेवा सुरु केली आहे. कारण हा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात फक्त मेट्रो शहरांमध्येच सापडतो. हे ग्राहक जास्तीत जास्त काळानुसार बदलणारे असतात, त्यांना इंटरनेटचे उत्तम ज्ञान असते आणि कामाचा ताण इतका असतो कि त्यांना बाहेर जावून एखाद दुसरे सामान घेणे ह्यासाठी वेळच नसतो. ह्यांचे ग्राहक कार्यालय, इव्हेंट करणाऱ्या कंपन्या अशे व्यावसायिक देखील आहेत.
हा ग्राहक वर्ग जास्ती जास्त सेवा ह्या इंटरनेट च्या माध्यमातून शोधत असतो कारण ह्याच्यासाठी वेळ म्हणजे पैसा असतो. हा ग्राहक वर्ग त्याला जितके सोयीस्कर होईल अश्या नवीन आणि जुन्या व्यवसायांकडे आपोआप आकर्षित होतो.
ह्या कंपनीने बीज भांडवल एका युके (इग्लंड) येथील एका गुंतवणुकदाराकडून घेतले. सध्या त्यांनी १३ करोड रुपये हे आयडीजी वेंचर इंडिया आणि एसेल इंडिकेटिंग वेंचर केपिटल इव्हेस्टर ह्या गुंतवणुकदारांकडून घेतली आहे.
जुने व्यवसायही चालू आहेत आणि नव नवीन कल्पनानाही वाव आहे. फक्त करणारा पाहिजे. आहे हिम्मत तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवायची? आणि हो तुमच्या अगोदरपासून मराठी माणूस उद्योग व्यवसाय करत आहे आणि करोडोंची गुंतवणूक देखील करत आहे.
धन्यवाद,
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



कंपनीचे नाव : ओला
प्रकार : वाहतूक सेवा पुरवणे टेक्सी आणि वाहन भाड्याने देणे
१४-१५ चे वार्षिक उत्पन्न : ₹ ४१८.२५ करोड
१४-१५ चा वार्षिक नफा : ₹ - ७५४.८७ करोड
असेच उत्पन्न उबेर ह्या परदेशी कंपनीचे भारतात आहे. जर ह्या कंपन्या करोडो कमावू शकतात मग तुम्ही का नाही? स्पर्धेमध्ये उतरण्यापासून कोणीच कुणाला रोखू शकत नाही. जर तुमच्याकडे एक उत्तम कल्पना असेल आणि त्याला जर तुम्ही माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली तर तुम्हीही करोडो कमवू शकता.
स्वतःचे बीज भांडवल तर टाकावेच लागेल त्यानंतर तुम्ही जगभरातून कुठूनही गुंतवणूकदार उभा करू शकतात. आपल्याकडे वाहतूक सेवेची अनेक साधने आहे ती जर तुम्ही वापरलीत तर ह्या कंपन्यापेक्षाही जास्त नफा तुम्ही कमवू शकता. अनेक सामान्य अशिक्षित (शैक्षिणिक दृष्ट्या नव्हे तर व्यावहारिक दृष्ट्या) लोक ह्या व्यवसायात आहे. त्यांना गरज आहे फक्त एका लीडरची आणि एका दूरदृष्टीची.
स्थानिक पातळीवर तुम्ही हि सेवा सुरु करू शकता, जर तुमचे मित्र मंडळी हे परप्रांतीय असतील तर तुम्ही हा तुमचा व्यवसाय हा राष्ट्रीय पातळीवर देखील नेऊ शकतात. कारण जेवढी माहिती आपल्या देशाबद्दल आणि देशातील लोकांबद्दल आपल्याला आहे तेव्हढी माहिती परदेशी किंवा मोठ मोठ्या विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेल्या लोकांना सुद्धा नसते.
आराखडा तयार करा, खालून वर पर्यंत सुरवात करा, जे सध्या बाजारात व्यवसायिक आहेत त्यांनादेखील हाताशी घ्या. जबाबदारी घ्या, धाडस दाखवा, गाजावाजा न करता सुरवात करा, समोरच्या प्रतिस्पर्धीला तेव्हाच समजले पाहिजे जेव्हा हा व्यवसाय एका निश्चित ध्येयापर्यंत पोहचेल.
पैसा लोकांकडे आहे आणि ते खर्च हि करत आहेत जर कोणी नवीन असेल तर सुरवातीला संकोच करतात पण जस जसा विश्वास बसेल तस तसे ते आपल्याकडे खेचले जातात. आणि जिथे प्रादेशिक टच असेल तिथे ग्राहक आपोआपच खेचला जाईल.
उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूकदार फक्त धाडसी लोकच बनू शकतात जे सतत कृतीशील असतात.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



गरिबी मध्ये गौरव नाही आहे.
तुमच्यामध्ये गरीब माणूसही आहे आणि तुमच्यामध्ये श्रीमंत माणूसही आहे.
आणि प्रत्येक क्षणाला तुम्हाला श्रीमंत माणूस बनायची निवड करायची आहे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

पिंक हा सिनेमा समाजातील जळजळीत वास्तवावर प्रकाश टाकतो.



पिंक हा सिनेमा समाजातील जळजळीत वास्तवावर प्रकाश टाकतो. पहिली बाजू नामर्दांची पुरुष प्रधान संस्कृती, ज्यांचे बाहेर काही चालत नाही अशे आपल्या घरातील, शेजारील व समाजातील इतर स्त्रियांवर बंधने घालून देतो आणि हे हजारो वर्षांपासून चालू होते आणि आजही विकसनशील देशात हे चालू आहे.
दुसरी बाजू जात, धर्म, भाषा आणि प्रांत काहीही असो पोलीस, न्यायव्यवस्था कसे वागते हे जळजळीत सत्य देखील मांडले आहे मग तिथे सामान्य स्त्री असो किंवा पुरुष त्यांच्याशी पोलीस कसे वागतात, श्रीमंत, सत्ताधारी आणि ताकदवर लोकांसाठी कसे जलदगतीने काम केले जाते, आणि कसे त्यांच्यासाठी अतिशय मेहनतीने कायद्याच्या प्रत्येक कलमाचा वापर केला जातो हे उत्तम रित्या मांडले आहे.
समाजामध्ये काळी बाजू नेहमीच झाकून ठेवली जाते, का ते कारण अजून समजले नाही. सूर्यासमोर डोळे बंद केले तर रात्र होत नाही आणि सामान्य लोकांना लख्ख प्रकाशात दिसणारे सत्य बघवत नसते.
कितीही काहीही केले तरी तुम्हाला ह्याच वास्तवात रहायचे आहे, एकतर परिस्थितीनुसार बदला किंवा परिस्थिती तुम्हाला बदलेल.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


भीती हि ढगाळलेल्या
वातावरणासारखी असते,
निर्भयता हि सूर्यासारखी असते.
निर्भयतेचा सूर्य बघायला तुम्हाला
भीतीचे ढग पार करावे लागतील.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



रूपये बरोबर स्वतंत्रता

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



आजारपणात आरोग्यावर खर्च करण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी खर्च केलेला बरा.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



९७ % लवकर हार मानालेल्यांना
३ % जे कधीही हार मानत नाही
ते कामावर ठेवून घेतात.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


समस्या - विश्लेषण - उपाय
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


समाधानांचा भाग बनण्याचा प्रयत्न करा ना कि समस्यांचा.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत 
८०८०२१८७९७


अफवा द्वेशी मनुष्य घेवून फिरत असतो, आणि मूर्ख मनुष्य ते खरे आहे असे समजून त्यामधील सत्यता किती आहे हे न तपासून, आहे तसे स्वीकार करून पसरवत असतो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत 
८०८०२१८७९७


तुम्हाला यश मिळवण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी त्वचा गोरी करणाऱ्या क्रीम ची किंवा सौंदर्य प्रसाधनांची गरज नाही आहे.

अश्विनीकुमार

निर्वाणा आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत 
८०८०२१८७९७


उद्योजकामध्ये ज्वलंत इच्छाशक्ती असते. न तो कमेंट करत बसतो, नाही व्हास्टएप वर मेसेजेस करतो आणि केला तरी त्याला पत्ता विचारायचा असतो तेव्हा. तो किंवा ती फोन करतात, लवकरात लवकर आज किंवा उद्याची काहीही करून भेटण्याची वेळ घेतात, फी चे बोलले तरी ‘फी काहीही असू द्यात मी येतो’ असे बोलतात. ते जेव्हा आपल्या व्यवसायाबद्दल सांगत असतात तेव्हा त्यांच्यामधील आवड हि दिसून येते, समस्या कश्या सोडवत आहेत ह्यावरून त्यांचा धाडसीपना दिसून येतो. त्यांच्यामध्ये धीर धरायची क्षमता अफलातून असते. एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायला चालायची कृती करावी लागते तेव्हाच मनुष्य ध्येयापर्यंत पोहचतो. धाडसी मनुष्यच कृती करतो. जर तुमच्यामध्ये धाडसीपणा आहे तर तुम्ही उद्योग व्यवसाय सुरु करू शकता, जर नसेल तर उद्योग व्यवसाय नंतर सुरु करा, त्याअगोदर आत्मविकास करून घ्या. आजारपणात आरोग्यावर खर्च करण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी खर्च केलेला बरा.
आयुष्य तुमचे, निर्णय तुमचा, येणारा अनुभव पण तुमचाच आणि जबाबदार पण तुम्हीच.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



तुमच्याकडे पैसा आहे, उत्तम उत्पादनाची किंवा सेवेची कल्पना आहे पण तुमच्याकडे विक्री कौशल्य नाही मग तुमचे उत्पादन किंवा पुरवणारी सेवा हे कितीही दर्जेदार असू देत त्याला काहीही किंमत राहत नाही. विक्री कौशल्य असणार्याकडून लोखंडहि सोन्याच्या भावात विकले जाते, विक्री कौशल्य नसणाऱ्याकडून सोनही लोखंडाच्या भावात विकले जात नाही.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया 
८०८०२१८७९७



पैशांचा प्रवाह असा आहे जिथे त्याला वाटते कि फायदा आहे तिथेच तो वाहत जातो.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत 
८०८०२१८७९७


मला एक अजून समजले नाही कि जस जसे विज्ञान पुढे जात आहे, नव नवीन संशोधन होत आहे, मग आजारांची संख्या कमी झाली पाहिजे, बरोबर कि नाही? मग असे का होत आहे कि आजारांची संख्या वाढतच चालली आहे, ज्यांना कधीच आजार नव्हते ते अचानक इन्फेक्शन ने ग्रस्त होत आहे, लहान मुलांना साधे आजार होण्यापेक्षा मोठ मोठे आजार होत आहेत, अचानक आजारपनावरील खर्च देखील किती तरी पटीने वाढला आहे, रुग्ण मरण्याची संख्यादेखील वाढली आहे. जो आरोग्याबद्दल आत्मविश्वास होता त्याची जागा आता वातावरण बदलल्यावर रोग होणारच ह्या विश्वासाने घेतली आहे, असे का घडत आहे? ह्याचे उत्तर सोपे आहे, कॉर्पोरेट कसे चालते, गुंतवणूकदार काय बघून पैसा गुंतवतात, जगभरातली मोठ मोठ्या फार्मा कंपनीच्या केसेस मिडिया मध्ये का नाही आल्यात ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला तुमचे उत्तर भेटून जाईल.
अश्विनिकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

आपले शासन आणि न्यायव्यवस्था कशी चालते

आपले शासन आणि न्यायव्यवस्था कशी चालते
एका टीव्हीच्या वाहिनीवरील विनोदी कलाकाराची बातमी ऐकत होतो, त्याच्याकडून शासकीय कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याचे प्रकरण होते, त्या बातमीदाराने एका सामान्य भारतीय नागरिकाचे घर दाखवले होते ज्याची भिंत हि त्यांनी ८० वर्षांपूर्वी बांधली होती ती मुंबई महानगर पालिकेने पाडली होती. ते सामान्य मराठी होते, त्यांचे घर हे त्यांनी बंगल्यात रुपांतरीत केले नव्हते आणि त्यांच्या घराला लागुनच एका प्रसिध्द गायकाचे घर होते, पाठीमागचे तर सोडाच पण पुढून आणि वरून त्यांनी अनधिकृत बांधकाम केले होते, आता पालिकेचे ते अधिकारी तर इतके आंधळे तर नसणार, बरोबर ना. मग त्यांना ती लागुनच असलेल्या बंगल्याची भिंत का नाही दिसली?
ज्यांना सरकारी कार्यालयांचा उत्तम अनुभव आहे, ज्यांना आपले शासन आणि न्यायव्यवस्था कशी चालते ह्याचा दांडगा अभ्यास आहे त्यांना समजेल कि पैश्यांच्या पट्ट्यांनी लोकांना कसे आंधळे करायचे ते. तपासून घेत जा, आपला परिसर फिरा, माहितीचा अधिकार वापरा, सामाजिक संघटना ज्या मिडिया मध्ये येत नाहीत किंवा भांडवलशाही मिडिया त्यांची दखल घेत नाही अश्यांकडून माहिती गोळा कराल मग तुम्हाला समजेल कि वास्तव मध्ये जग असे चालते, आणि जर ह्या जगात आपल्याला जगायचे असेल तर कसे जगायचे हे तुम्हाला शिकून घ्यावे लागेल.
अश्विनुकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


विविध मार्गांनी यशस्वी होता येते.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

भारतीयाचे जगातील सगळ्यात उंच 'बुर्ज खलिफा' ह्या इमारतीमध्ये मध्ये तब्बल 22 फ्लॅट


जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘बुर्ज खलिफा’मध्ये जॉर्ज व्ही नेरियापाराम्बिल या भारतीय व्यावसायिकाचे तब्बल २२ फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे.
या भारतीय व्यावसायिकाने मेकॅनिक म्हणून सुरुवात केली होती. सध्या हा व्यावसायिक जीईओ नावाची कंपनी स्थापन करुन वातानुकूलन उद्योगात आपला जम बसवतो आहे.
“मी स्वप्न पाहणारा माणूस आहे, त्यामुळे मी स्वप्न पाहणे कधीही थांबवणार नाही. जर मला पटणाऱ्या किंमतीत अजून फ्लॅट मिळाले तर मी तेही विकत घेईन,” असं जॉर्ज व्ही नेरियापाराम्बिल यांनी सांगितले.
वयाच्या अकराव्या वर्षापासून वडिलांसोबत शेतमालाचा व्यापार करण्यासाठी जाणाऱ्या जॉर्ज यांना व्यावसायिक बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले. त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मॅकेनिक म्हणून दुबई गाठली. दुबईसारख्या देशात 'एसी'चा उद्योग चांगला चालेल हे जॉर्ज यांनी ७०च्या दशकातच हेरले.
१९७६ ला त्यांनी शारजा शहरात 'जीईओ' ही 'एसी'ची कंपनी सुरू केली आहे. मॅकेनिक ते एका कंपनीसह बुर्ज खलिफातील २२ फ्लॅटचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणाराच आहे.
१९८४ मध्ये त्यांनी दुबईत आपली कंपनी स्थापन केली त्यानंतर प्रॉपर्टी डिलिंगच व्यवसाय देखील सुरु केला. दुबईत जो कोणी येतो तो श्रीमंत होतो हे मी कधीतरी ऐकले होते आणि श्रीमंत होण्याची हिच ओढ मला दुबईत घेऊन आली असेही ते सांगतात.
२०१० मध्ये या इमारातीचा भव्य उद्घटान सोहळा होता. हा सोहळा पाहण्यासाठी आपल्या एका मित्रासोबत जॉर्ज गेले होते. ही आलिशान, टोलजंग इमारत पाहून जॉर्ज खुपच थकित झाले. तेव्हा त्यांच्या मित्रांने या इमारतीत राहण्याची तुझी लायकी नाही असे सांगून त्यांची खिल्ली उडवली होती. मित्राची हिच गोष्ट त्यांना खूप लागली आणि त्यानंतर फक्त सहा वर्षांत लागोपाठ व्यवसायातून आलेल्या पैशांची बचत करून त्यांनी आलिशान फ्लॅट खरेदी केली.
कधीही कुणालाही त्याच्या किंवा तिच्या आजच्या परिस्थितीनुसार किंवा बघत असलेल्या स्वप्नांनवर अविश्वास दाखवू नका. काळ हा खूप बलवान आहे.
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७


श्रीमंती म्हणजे स्वतंत्रता,
गरीबी म्हणजे गुलामी.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

आपल्या अंतर्मनातील तीन प्राण्यांची कथा



एक चित्रकार असतो, त्याला देवाचे चित्र बनवायचे असते. तो त्याच्या मित्राला विचारतो “मला एक परमेश्वराचे चित्र बनवायचे आहे, मी काय करू?”. त्याचा मित्र उत्तर देतो “एक ५ किंवा ६ वर्षांचा गोड मुलगा घे आणि त्याचे चित्र बनव.” चित्रकार ऐकतो आणि चित्र बनवायला घेतो आणि एक सुंदर चित्र बनवतो, ते चित्र खूप किमतीला विकले जाते. २० वर्षांनंतर पुन्हा त्याची इच्छा एका राक्षसाचे चित्र बनवायची इच्छा होते. तो त्याच्या मित्राल पुन्हा विचारतो, मित्र बोलतो कि “तू जेल मध्ये जा, तिथे तुला ज्यांनी गुन्हे केलेले आहे, खून, बलात्कार, चोरी, दंगली घडविलेले आहेत अश्या आरोपीला निवड आणि त्याचे चित्र बनव.” तो परवानगी घेवून जेल मध्ये जातो आणि तिथे दाढी, केस वाढलेला भयंकर दिसणारा, डोळे लाल असणारा असा आरोपी निवडतो आणि त्याला समोर बसवतो. त्याला समोर बसवून त्याचे चित्र बनवत असताना त्या गुन्हेगाराकडे पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहत असतात. चित्रकाराला आश्चर्य वाटते, हा इतका मोठा गुन्हेगार आणि तो रडत का आहे?, तो चित्रकार त्याला कुतुहलाने विचारतो “मी तुमचे चित्र बनवत आहे. तूमच्या डोळ्यातून अश्रू का वाहत आहे?” तो गुन्हेगार जे चित्रकाराला सांगतो ते आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे, चित्रकार महोदय २० वर्षांपूर्वी ज्या मुलाचे तुम्ही परमेश्वराचे चित्र बनवले होते तो मीच आहे. ह्या २० वर्षांमध्ये माझ्यातला देव हळू हळू मरत गेला आणि राक्षस हळू हळू मोठा होत गेला.
बोध:- आपल्या आतमध्ये ३ प्राणी दडलेले असतात, त्यापैकी २ प्राणी दररोज प्रत्येक क्षणाला देव – दानव, चांगले – वाईट, पाप पुण्याची अशी विविध रूपे घेवून लढत असतात, दोघांनाही आपणच पोसत असतो, दोघांनाही आपणच खायला घालत असतो. आपल्याला प्रत्येक क्षणाला ठरवायचे असते कि कुणाला खायला घालायचे कुणाला नाही. तिसरा हा निसर्ग निर्मित प्राणी असतो, त्यामध्ये अफाट क्षमता असते, तो जागृत करायचा असेल तर ह्या दोन प्राण्यांना खायला घालणे बंद करावे लागेल. ह्याच प्राण्याला अंतर्मन, देव, निसर्ग आकर्षणाचा सिद्धांत असे बोलतो, अमर्याद.
अश्विनीकुमार फुलझेले
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७



आपण का पडतो?
परत उठून उभे राहण्यासाठी.
आपण का अयशस्वी होतो?
परत यशस्वी होण्यासाठी.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

मसाला मराठी सिनेमा



रहावले नाही म्हणून लगेचच सिनेमा शेअर करावासा वाटला. जो सिनेमा ऑस्कर ला जायला पाहिजे होता किंवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये जायला पाहिजे होता त्या २०१२ च्या दर्जेदार मराठी सिनेमाविषयी मला २०१६ मध्ये समजले आणि जेव्हा सिनेमा बघत होतो तेव्हा कलाकारांचा कलेचा दर्जा जाणवला तो अप्रतिम होता. जर तुम्हाला कमर्शियल सिनेमे आवडत असतील तर अशे फक्त आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोस्तवात दाखवले जाणारे सिनेमे तुम्हाला रुचणार नाही, अर्थात ज्याची त्याची आवड.
ज्याला खरच उद्योग धंदा करायचा आहे, ज्याला आयुष्य कसे असते हे बघायचे आहे, ज्याला जगण्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल त्यांनी हा सिनेमा जरूर बघावा.
उद्योजक बनणे हे फक्त कारखाना किंवा व्यवसाय सुरु करून त्यामधून नफा काढत बसने नसून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित करून सतत काळानुसार बदलत, धाडस दाखवत जगणे होय.
व्यावसायिक, उद्योजकीय मनोवृत्तीचा, कमर्शियल सिनेमापेक्षा वास्तविक मराठी मनोवृत्तीच्या जगण्याची धडपड, महाराष्ट्रभर प्रवास, समजून घेण्यासाठी बघा.
http://www.hotstar.com/movies/masala/1000014536/watch

चला उद्योजक घडवूया
अश्विनुकुमार फुलझेले
८०८०२१८७९७



भीतीचे अस्तित्व तुमच्या मनात आहे, ह्या जगात नाही.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


आकर्षणाचा सिद्धांत देताना कधीच मोजून देत नाही, जे देतो ते अमर्याद देतो, मग ते यश असो किंवा अपयश, आरोग्य असो किंवा आजारपण, प्रेम प्रकरण असो किंवा नातेसंबंध, आनंद असो किंवा दुःख, श्रीमंती असो किंवा गरिबी. तुम्ही मागुही शकत नाही, जे काही तुमच्या अंतर्मनात चालू असते त्यानुसार आपोआप भेटत जाते, आणि ह्याला तुम्ही थांबवूही शकत नाही. आकर्षणाचा सिद्धांत तुमच्या अंतर्मनातील विचार म्हणजेच भावना ह्यांना प्रतिसाद देत असतात. ह्यावर कोणीच ताबा मिळवू शकत नाही, तुम्हाला तो अनुभव येणारच किंवा ते तुम्हाला मिळणारच.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७



सामान्य लोक डोळ्यांनी जग बघतात, असामान्य लोक मन, मेंदू आणि पंचेंद्रियांनी जग समजून घेत असतात.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


सर्वकाही ऊर्जा आहे, तुम्हाला जे पाहिजे त्या फ्रिक्वेंसिशी तुम्ही तुमची फ्रिक्वेंसि जुळवा आणि तुम्हाला ते भेटणारच. ह्याला काही दुसरा मार्ग नाही आहे. हे काही तत्वज्ञान नाही आहे. हे भौतिक शास्त्र आहे.
अलबर्ट आईन्स्टाईन
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७



रवींद्रनाथ टागोर, आनंदीबाई जोशी किंवा स्टीव जॉब 
ह्या सगळ्यांनी शिक्षण घरच्या घरी शिक्षण घेतले होते.

अश्विनीकुमार
बालक पालक
८०८०२१८७९७



मालविका जोशी, १७ वर्षांची तरुणी, घरीच शाळा शिकलेली, केवळ १२ वी उत्तीर्ण नाही म्हणून तिला IIT ने प्रवेश नाकारला, कंप्यूटर प्रोग्रामिंग मधील तिची बुद्धिमत्ता आणि गती लक्ष्यात घेता मालविकाला थेट अमेरिकेतील जगप्रसिद्ध विद्यापीठाने थेट प्रवेश दिला.
समजून घ्या आपल्या इथे उद्योजक, व्यवसायिक किंवा शास्त्रज्ञ तयार का होत नाही ते.

अश्विनीकुमार
बालक पालक
८०८०२१८७९७



एकदा का तुम्हाला तुमच्यामधील अमर्याद क्षमता समजली कि तुम्ही पाहिजे तसे तुमचे आयुष्य घडवू शकता.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

तुम्हाला माहित आहे का कि आपली नाश्ता करायची पद्धत बदलली आहे म्हणून?

तुम्हाला माहित आहे का कि आपली नाश्ता करायची पद्धत बदलली आहे म्हणून?
तुम्हाला माहित आहे का कि आपली नाश्ता करायची पद्धत बदलली आहे म्हणून?
भाजी, भाकरी, चपाती, पोहे, उपमा आणि इतर पदार्थ जे आपण नाश्त्यासाठी वापरायचो त्यांची जागा आता ब्रेड, बटर, मेगी सारखे नुडल्स, पास्ता अश्या अश्या विदेशी किंवा जे आपल्या वातावरणात शरीराला लागणार नाहीत अश्या डबाबंद पदार्थांनी घेतलेली आहेत?
तुम्ही कधी विचार केला आहे का कि आपण भारतासारख्या शेतीप्रधान देशात राहतो जिथे आरामात ताजा भारतीय नाश्ता दुकानात, हातगाडीवर किंवा घरपोच भेटू शकतो?
पिझ्झा वाले जर ३० मिनटात पिझ्झाची डिलिव्हरी देतात मग आपण का नाही देवू शकत? आपणच त्यांची फ्रेंचायझी चालवतो ना?
वडापाव खाताना मराठीत बोलतो आणि मॅकडोनाल्ड मधला बर्गर खाताना इंग्लिश शब्द कसे बाहेर पडतात? काय फरक आहे दोघांत?
आपला कमी आत्मविश्वास, नैतृत्व क्षमतेचा अभाव, गुलामगिरीची ची मानसिकता, आपापसात जात, धर्म, प्रांत, भाषा इतर विविध फालतू विषयांवरची भांडणे ह्यामध्ये इतके गुंतले होते कि परदेशी कंपन्यांनी ह्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि आपले पाय पसरवले. इंग्रजांनी आपल्यामध्ये फुट पडली नव्हती, आपणच अगोदरपासून फुटलेलो होतो.
परदेशी कंपन्यांनी धंदा करायला कधीच विरोध करायचा नाही कारण आपल्या कंपन्याही त्यांच्या इथे धंदा करतात, उद्या कदाचित तुमची कंपनीही वाढून तुम्हीहि त्यांच्या देशात पैसा गुंतवाल. स्पर्धेत उतरल्याशिवाय कोणीच प्रगती करू शकत नाही.
कोण बोलतो संधी नव्हत्या म्हणून? हार्ले डेव्हिडसन, बेंटली ५,००,००० ते ४०,००,००० लाखांपर्यंतच्या दुचाकी भारतात येवून विकल्याही जात आहेत, मग त्यावेळेस आपण काय करत होतो? होता का कुठला आपला ब्रँड?
आपण स्पर्धेतच नव्हतो कधीच हे कधी मान्य करणार?
साध उदाहरण घ्या, जो आत्मविश्वास आयफोन दाखवताना दाखवतो, जो आत्मविश्वास रोलेक्स घडी दाखवताना दाखवतो तो कधी भारतीय उत्पादन दाखवतांना दाखवतो का?
स्वतःचे आत्मपरीक्षण करा उत्तर आपोआप भेटेल. आजचा मराठी युवक आणि युवतीला लाचारीचे जगणे मान्य नाही, ना हि दुसर्याच्या हाताखाली नोकरी करत जगणे, त्यामुळे आजच्या तरुण पिढीमध्ये नैतृत्व क्षमता दिसून येते आणि हेच तरून मग मुलगा असो वा मुलगी धाडसाने पाउल उचलताना नैतृत्व करताना दिसून येतात.
धन्यवाद,
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले