आपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते



कल्पना करा कि तुम्ही हिरा आहात.

तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले.

तुम्ही ९०० ते १३०० डिग्री तापमान सहन केले, म्हणजे संकटांचा सामना केला.

तुम्ही ४० ते ५० किलोबार म्हणजे पृथ्वीवर असलेल्या दबावाच्या ५०,००० पट जास्त दबाव तुम्ही झेलला, म्हणजे समस्यांना तोंड दिले.

इथे तुमचे हिऱ्यात रुपांतर झाले.

आता तुम्ही किंमती आहे का?

नाही.

अगोदर हिरा कुठे आहे त्याचा शोध घ्यावा लागतो.

(इथे आयुष्याची काळी बाजू दर्शवली होती ती काढून टाकण्यात आली.)

एकदा खोदकाम सुरु झाले कि तुम्हाला बाहेर बाजारपेठ निर्माण करावी लागते. त्या बाजारपेठेवर नियंत्रण मिळवावे लागते.

भावनिक जाहिरात करून हिऱ्याची किंमत वाढवावी लागते.

त्यानंतर जेव्हा तुम्हाला बाहेर काढता तेव्हा तुमचे स्वरूप असे नसते कि कोणीही तुम्हाला लगेच घेईल म्हणून. इथे तुमची किंमत ग्राहकात नाही तर उद्योजक जगतात असते.

हा टप्पा महत्वाचा आहे.

इथे जसे बाजारात विकले जाल त्याला महत्व आहे.

उद्योजक तुम्हाला पैलू पाडतो. तुम्हाला सुंदर आकार देतो, चमक देतो जेणे करून लोक तुम्हाला पसंद करायला लागतील.

ह्या वरच्या ओळीत तुम्हाला उत्तर भेटले असेल कि बाह्य स्वरूप देखील किती महत्वाचे आहे ते. फक्त बाह्य स्वरूप नाही तर जगानुसार देखील थोडे बदलावे लागते. म्हणून आपले कडपे, वागणे बोलणे हे जेव्हा लोकात मिसळाल तेव्हा मृदू, मितभाषी आणि आकर्षक ठेवाल.

मग व्यापाऱ्याकडे तुम्ही जातात. तिथून ग्राहक तुम्हाला विकत घ्यायला सुरवात करतात.

तुमची किंमत इतकी आहे कि तुमचा व्यापार हा कायदेशीर आणि बेकायदेशीर ह्या दोन्ही मार्गांनी होतो व जेव्हा देखील व्यवहार होतात ते शेकडोत नाही तर हजारो आणि लाखोत होतात. जर तुमच्या सारखे एकत्र आले कि थोडे मिळून करोडो पार करतात.

वरील नियम वापरा आणि ह्याच आयुष्यात स्वतःची किंमत वाढवून जगा जेणेकरून आयुष्याच्या प्रत्येक भागात तुम्हाला फक्त समृद्धी आणि अमर्याद अनुभवायला मिळेल.

९० ते ९९ % आत्मविकास आणि १० ते १ % बाह्यविकास तुमचे रुपांतर मौल्यवान हिऱ्यात करतो. हा माझा सिद्धांत आहे.

तुम्हाला देखील तुमची किंमत वाढवायची असेल तर आजच आपल्या ऑनलाईन सेवेचा लाभ घ्या व पुढील क्षणी बदल अनुभवा.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

आजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कसे करायचे किंवा त्याची तीव्रता कमी कशी करायची?



आजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कसे करायचे किंवा त्याची तीव्रता कमी कशी करायची?

मी सहज वृत्तपत्रावरून नजर फिरवत होतो तेव्हा एक बातमीने माझे लक्ष्य वेधून घेतले. हेडलाईन होती "निरंजनी आखाड्याच्या महतांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली." आत्महत्या करण्याचा अंदाजा हा वर्तवण्यात आला कि ते काही दिवसांपासून उच्च रक्तदाब आणि पोटाच्या आजाराने ग्रस्त होते.

अगोदर देखील अशीच एका अध्यात्मिक जगतातील प्रसिद्ध गुरु ने आत्महत्या केली होती त्यांचे नाव आहे भय्यूजी महाराज आणि त्यानंतर हि बातमी. ह्या जगात कोणीही जन्माला येवू दे त्याला जन्मजात निसर्गनियम हे लागू होतात म्हणजे होतातच मग ती व्यक्ती कोणी का असेना.

कोणीही कितीही बोलो कि त्याचा भावनांवर ताबा आहे वगैरे पण काही नैसर्गिक गरजा असतात त्याला सहसा ताब्यात ठेवू शकत नाही, अगदी नगण्य लोक असतील नैसर्गिक भावना ताब्यात ठेवणारे कदाचित एकप्रकारे जन्मजात काही दोष असू शकतात म्हणून असे शक्य आहे किंवा दोन चेहरे वावरून व्यक्ती जगत असेल तर शक्य आहे, चार भिंतींमध्ये कोण कोण काय काय करते हे कोणीही रेकोर्ड करत नाही. प्रत्येकाला खाजगीपणा जपण्याचा हक्क आहे.

हे बघा वास्तव सांगतो जे बोलतात कि आत्महत्या करणे हा काही मार्ग नाही त्यांना एकच सांगतो कि प्रत्येकाची मानसिक क्षमता वेगवेगळी असते, स्वतःच्या मानसिक क्षमतेतून तुम्ही समोरच्याला सल्ला देवू शकत नाही, आणि ज्याचे जळते त्यालाच कळते त्यामुळे अश्या कमेंट विरांपासून लांब रहा आणि तज्ञांची मदत घ्या.

साधे लहान न बरे होणारे आजार देखील खूप मानसिक ताण देवून जातात. व्यक्ती सतत त्याच विचारात असते व त्या आजारासोबत जगत जात असते. आणि जे मोठे आजार असतात त्यामध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास हा खूप होत असतो. पैसा असो किंवा नसो इथे हे महत्वाचे नाही तर जो मानसिक त्रास होत त्यावर लक्ष्य केंद्रित निकडीचे आहे.

आत्महत्या फक्त गरीब नाही तर जो समस्येमधून जात असतो तोच करतो मग ती गरीब असो किंवा श्रीमंत, मानसिक ताण जात धर्म, पंथ प्रांत राज्य आणि देश काही मानत नाही. मानसिक ताणाची तीव्रता एकसारखीच असते.

आता तुम्हाला तुमची क्षमता दाखवून देतो. तुम्हाला माहिती आहे का कि आपले शरीर हे अब्जो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर असे बनलेले आहे? तुम्हाला माहिती आहे का कि अजून संपूर्ण जमीन आपण पालथी घातली नाही, समुद्र तर अजून बघितलाच नाही जिथे अब्जो किंवा त्यापेक्षा अगोदरपासूनचे जीव राहत असतील जे आपण बघितलेले नाही, आणि ब्रम्हांड तर सोडूनच द्या. हीच क्षमता तुमची आहे ज्यामध्ये अनेक चमत्कारिक शक्य लपलेल्या आहे ज्या तुम्हाला पाहिजे ते साध्य करून देवू शकतात, आजारपण पण अगदी नगण्य आहे.

जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा जितका होईल तितका मेंदू शांत ठेवायचा, जितका तुमचा मेंदू शांत राहील तितकेच मेंदू आजार बरा करण्यासाठी प्रयत्न करेल. इथे तुम्ही मेंदू शांत ठेवल्यामुळे काय होते कि तुम्ही नकारात्मक विचार मेंदूकडे पोहचवत नाही आणि मेंदू ते विचार पुढे पोहचवत नाही जेणे करून आजरपण वाढत नाही किंवा त्याची तीव्रता जाणवत नाही ज्यामुळे तुम्ही आरामात दैनदिन जे काही काम असेल ते करू शकता.

त्यानंतर तुम्हाला ज्या काही नैसर्गिक तुमच्या गरजा आहे त्या पूर्ण करत जायच्या आहेत. तुमचा आहार एकसारखाच ठेवायचा आहे. वेळ पाळायच्या आहेत. जर जास्त काम असेल तर ते काम कमी करायचे किंवा दुसरे काम शोधायचे. तुमचे जिवंत राहणे हे काम करण्यापेक्षा महत्वाचे आहे. बंगल्यातून तुम्ही झोपडीत देखील राहू शकता जर जिंवत राहिलात तर आणि तिथून परत प्रगती करू शकता. अपयश इतकेही वाईट नाही आहे.

सकारात्मक विचारांमध्ये नकारात्मक विचारांमध्ये शक्ती जास्त असते त्यामुळे जितका तुम्ही सकारात्मक विचार कराल तितके लवकर तुम्ही बरे व्हाल किंवा आजाराची तीव्रता कमी कराल. हे सकारात्मक विचार औषधांसारखे घ्यायचे असतात आणि बाकी वेळ तुम्ही तुमच्या जीवनात पथ्य पाळून जगायचे. अगदी सोपे आहे, आज आता ह्या क्षणी तुम्ही प्रयत्न केला कि पुढील क्षणी तुम्हाला बरे वाटायला सुरवात होईल.

जरा प्रोस्ताहित करणाऱ्या पुस्तकांपासून लाबं रहा, वाचन वेगळे आणि जेव्हा जीवावर बेतते तेव्हा कृती करणे वेगळे. काही पुस्तके हि जास्त खरेदी होण्यासाठी लिहिली गेलेली आहेत जी लोकांनी विकत घेतली तरीही ते माझ्याकडे समुपदेशन, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपचारासाठी येतात. आणि जर पुस्तकांचा वाचून कोणी तुमच्यावर उपचार करत असेल तर कृपया स्वतःचा जीव सांभाळा, तुम्हे शरीर आणि आयुष्य काही प्रयोग करण्यासाठी नाही. माझ्या घरी देखील एक व्यक्ती आणि लाखो रुपये गमावून बसलो आहोत आम्ही. आयुष्यात पास नापास शेरा मारून गुणपत्रिका पहिली मिळते आणि नंतर शिकवले जाते.

माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे, जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी अनेक वर्षे प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये काम केलेले असते म्हणून मी प्रत्येक लेखात बोलत असतो कि अनुभवला पर्याय नाही आणि हाच अनुभव मी लोकांना अनुभवायला सांगतो जेणेकरून त्यांना भ्रम आणि वास्तव मधील फरक कळतो आणि त्यांचे आजरपण दूर होते व आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.

तुम्ही सुरवातीला घरी प्रयत्न करू शकता पण जर ३ महिन्यात बरे नसेल वाटत तर माझी मदत घेवू शकता. स्वतःच कुठेतरी मर्यादा घातलेली बरी. ८० वर्षांचे ज्येष्ठ नागरीक बघितले आहे जे विविध आजारांवर गोळ्या खात जगतात, अनेकदा हृदयाची शस्त्रक्रिया होवून जगतात आणि सर्व ताण तणावाची कामे आरामात करतात. हो हे वास्तव आहे, तुम्ही देखील कितीही मोठा न बरा होणारा आजार क असेना त्यासोबत आरामात जगू शकतात आणि तेही तुमचे ध्येय आणि स्वप्ने साध्य करून.

एकदा प्रयत्न करा. मी तुमच्या पाठीशी आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

तुमच्या घरात नकारात्मक घटनांची शृंखला तर सुरु झाली नाही ना?



अनेकदा हि नकारात्मक घटनांची शृंखला समजून येत नाही कारण आपण आपले आयुष्य जगण्यातच व्यस्त असतो. एका कुटुंबात जेव्हा त्याची आई मेली तेव्हाच हि शृंखला सुरु झाली होती पण ३ व्यक्ती गेल्यावर समजले कि नकारात्मक घटनांची शृंखला हि सूर झाली आहे. अनेकदा हि इतर नकारात्मक घटना नाही घडवत तर सरळ घरातील व्यक्तींचा जीव घेत जाते. मग कारण आत्महत्या का असेना.

एक वयामानानुसार मृत्यू झाला पण असे कुणालाच वाटले नव्हते,, चला ठीक आहे एक मृत्यू मान्य केला त्या पाठोपाठ तरून मुलगा, दोनदा योगायोग? ठीक आहे मान्य करू पण एक लहान मुलगा पण?

हे बघा जर नकारात्मक शृंखला जर आर्थिक असेल, किंवा इतर कुठलीही असेल ते मान्य आहे पण नकारात्मक शृंखला हि जीव घेत असेल तर ती नकारात्मकता हि खूपच खोलवर रुजली आहे आणि हि एकप्रकारे कौटुंबिक समस्या आहे, कुणा एकाच्या अंतर्मनाची, स्वप्नांची, कंपनाची किवा उर्जेची नाही तर संपूर्ण कुटुंब ह्यासाठी जबाबदार आहे.

आपण विविध जाळ्यांनी एकमेकांशी जुळलेलो आहोत, त्यातल्या त्यात जर जर कौटुंबिक असेल तर आपण त्या कौटुंबिक व्यक्तीला आपल्या अंतर्मनात, भावनेत, स्वप्नात, कंपनांत आणि उर्जेत स्थान देतो किंवा ते दरवाजे उघडे करतो पण सहसा बाहेरील लोकांसाठी हे असे काही करत नाही त्यामुळे बाहेरील उर्जा सहसा आपल्या आयुष्यात प्रवेश करून आपले आयुष्य उध्वस्त करत नाही.

मन मोकळेपणाने जगा पण ह्याचा अर्थ असा नाही कि बेसावध होवून जगा म्हणून. सर्वच समस्या ह्या दिसून येत नाही तर काही न दिसणाऱ्या समस्या आतमध्ये वाढत जावून शेवटी आयुष्य कायमचे उध्वस्त करतात. भले तुम्ही आज भाग्यशाली आयुष्य जगत असाल, चमत्कारिक आयुष्य जगत असाल पण जर एखादी समस्या अगदी आयुष्याच्या खोलवर रुजली असेल तर ती आनंदाने जगण्याच्या नादात आपण विसरून जातो मग शेवटी ती एकदाच आक्राळ विक्राळ स्वरूप घेवून डोके वर काढते आणि सर्व उध्वस्त करते.

जो पर्यंत आपण प्रेक्षक असतो तोपर्यंत आपल्याला अनुभव नसतो किंवा असला तरी हळहळ व्यक्त करतो पण जर जेव्हा स्वतःवर येते तेव्हा समजते कि काय तीव्रता असते ते आणि कसे हतबल असतो. सकारात्मक रहा बोलणे सोपे असते पण ज्याचे जळते त्यालाच कळते. आणि जेव्हा ह्यावर घरगुती उपचार केले जातात तेव्हा अनेकदा समस्या अजून वाढत जातात.

तुमची वर्तमान परिस्थिती तुमचे वास्तव आहे, तुम्हाला हॉस्पिटल, अपघात, न बरे होणारे आजार किंवा इतर संकटांचा अनुभव नाही किंवा तुमच्या संपर्कातील कुठल्याही व्यक्तीला अश्या समस्या आयुष्यात आल्या नसतील ह्याचा अर्थ असा नाही कि ह्या समस्या अस्तित्वात नाही म्हणून. जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा तुमचा एक भ्रम तुटला जातो आणि तुम्हाला दुसरे जग देखील दिसून येते जिथे दुख, संकटे आणि समस्या आहेत.

सर्वांचे अस्तित्व इथेच आहे. देव देखील इथेच आहे आणी दानव देखील. ज्याला ज्याचा अनुभव आला त्यासाठी ते वास्तव आहे आणि ज्याला नाही आला त्यासाठी नाही ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला अनुभव नाही म्हणून अस्तित्वच नाही. उलट तुम्ही ह्या अब्जोंच्या लोकसंख्येतील एक आहात, तुमच्या अस्तित्वाने कुणालाच काही फरक नाही पडत, प्रत्येकाला अस्तित्व असते ते प्रत्येकासाठी महत्वाचे असते.

आयुष्यात समस्या असणे वेगळे आहे समस्यांची शृंखला सुरु होणे वेगळे. समस्या एक येते, ती तात्पुरती, कायमस्वरूपी किंवा तुम्ही जो पर्यंत उपाय करत नाही तोपर्यंत राहते पण जर शृंखला असेल तर मग विचार करा कि ती किती नुकसान करू जाईल ते, आणी जर शृंखला हि सुप्त स्वरुपात असेल तर ति एकदाच म्हणजे वाढल्यावर डोके बाहेर काढते आणि सर्व संपवून टाकते.

मी दररोज अश्या समस्यांनी ग्रस्त लोकांच्या अध्यात्मिक आणि वैज्ञानिक मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्यामध्ये यश येते देखील त्यामुळे मला वास्तवाची चांगलीच जाणीव आहे. तुम्ही देखील समस्यांची शृंखला निर्माण होण्याअगोदर तिला कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यातून किंवा कुटुंबातून काढू शकता आणि जर समस्या सुप्त असेल, खोल वर रुजत जात असेल तिचे शृंखलेत रुपांतर होत असेल तर ती किंवा तश्या समस्या शोधून अगोदरच त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू शकता.

अश्या समस्यांमध्ये कृपा करून तज्ञांची मदत घेत जा, कारण अनेकदा लोक समस्या न बरी होई पर्यंत मोठी होते तेव्हा लोक धावपळ करतात मग अश्या वेळेस खूप कमी लोकांना यश येते बाकी उरलेल्यांना फरकच पडत नाही. आहे ते वास्तव सांगत आहे. जर काही अध्यात्मिक उपाय काम करत असतील तर ते करून बघा, पण मनापासून करा, जर वैज्ञानिक मार्गांचा अवलंब करत असाल तर तो देखील करू शकता, हे सर्व शास्त्र तुमच्या भल्यासाठीच बनलेले आहे.

मी जो पर्यंत समुपदेशन करत नाही, तपासत नाही तोपर्यंत काहीही बोलू शकत नाही, कारण समस्या एक असेल आणि उपचार अस्तित्वात नसलेल्या समस्येवर होत असेल तर ती नसलेली समस्या तर निर्माण होतेच पण सोबत असलेली समस्या देखील वाढलेली असते.

एक लक्ष्यात ठेवा कि तुमची क्षमता अमर्याद आहे, तुम्ही पाहिजे ते करू शकता, हि क्षमता तपासण्यासाठी तुम्हला विनाकारण संकटात पडण्याची गरज नाही तर तुम्ही हुशार बनून सर्वकाही ठीक असताना आत्मविकास करत येणाऱ्या सर्व समस्या ह्या टाळू शकता किंवा जर त्या निर्माण झाल्या कि मग कितीही मोठी समस्या का असेना तिच्या वर अगदी आरामात मात करू शकता. निर्णय तुमचा, आयुष्य तुमचे आणि जबाबदारही तुम्हीच.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

कुठल्या प्रकारची लोक श्रीमंत बनू शकतात? तुम्ही त्या प्रकारात येता का?



श्रीमंत बनायला लोकांनी किंमत मोजली, अनेक वर्षे धीर धरला, अनेक समस्यांना तोंड दिले आणि जे जगले ते आज श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगत आहत. हि लोक काही दिवस किंवा महिन्यात पैसे दुप्पट तिप्पट च्या मागे नाही लागले तर सरासरी ६० ते १०० वर्षांच्या आयुष्यात ते किती वर्षे येतात ज्यामध्ये योग्य पैसे गुंतवले तर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात परतावा मिळतो.

२००२ ते २००७ ह्या कालावधी मध्ये ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली त्या सोन्याचा भाव आता ३०,००० च्या पार आहे. २००२ ते २००७ अजून किती मोठा संधी असलेला कालावधी पाहिजे? ज्यांच्याकडे पैसे होते दूरदृष्टी होती त्यांनी तर सोन्यामध्ये गुंतवणूक केलीच पण ज्यांच्याकडे जेमतेम पैसे होते त्यांनी पोटाला चिमटा काढून गुंतवणूक केली त्यांचे बलिदान व्यर्थ नाही गेले.

० ते २ वर्षात श्रीमंत होणारे २ % पेक्षा कमी लोक असतात पण कमीत कमी ५ ते ३० वर्षात श्रीमंत होणारे ९८ % श्रीमंत लोक असतात असतात ज्यांनी हा प्रवास पूर्ण केला असतो.

हा जो अनेक वर्षांचा प्रवास असतो न श्रीमंत बनण्याचा हाच मजबूत पाया बनवतो व दीर्घ काळ श्रीमंती आणि समृद्धी चे फळे चाखायला मिळतात, एकदा का श्रीमंत झाले कि विषयच संपला, मग टिकवून ठेवणे सोपे आहे. आणि तोच टिकवून ठेवतो ज्याच्यामध्ये श्रीमंतीची हवा नसेल गेली. नाहीतर करोडपती पासून ते रोडपती होण्याची उदाहरणे देखील आहेत.

१०० पैकी ९९ क्षणिक कालावधी च्या यशापेक्षा एकच दीर्घकालीन यश गाठलेले चांगले, कारण ह्यानंतर नुसती यशाची मालिकाच सुरु होते. मग हि व्यक्ती जिथे नुसता एक इंच जरी खड्डा खोदेल तिथे तिला प्रत्येक वेळेस खजिना सापडेल.

अनेकांना वाटत असेल कि हा दीर्घ कालावधी आहे पण ह्या दीर्घ कालावधी मध्ये अनेक छोटेमोठे यश तुम्हाला भेटत जातात ज्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने अब्जोपती होत जातात, शिकत जातात व मानसिकता घडवत जातात जेणेकरून तुमच्या दीर्घकाळाने भेटणाऱ्या यशावर कुठलेही संकट येत नाही कारण तुम्ही अगोदरच लहान यश संपादित करण्याच्या नादात संकटांचा सामना करून त्यांना परतवले असते.

आता बोलू नका हा काळ वेगळा आणि तो काळ वेगळा म्हणून. ज्याला यशस्वी बनायचे आहे तो पुराण काळातही यशस्वी होईल, इतिहासातही, भूतकाळातहि, वर्तमानातहि आणि भविष्यातही.

असेच काही घराचे देखील होते, जमिनीचे देखील होते, विविध सरकारी आणि खाजगी कंपनी व खात्यांचे देखील होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसा हा कमी कालावधीत प्रचंड वाढत गेला मग तो पैसा सरळ मार्गाने कमावलेला असो किंवा गैरमार्गाने.

माझ्याकडे सतत समुपदेश, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी १०, १५ वर्षांपासून सातत्याने काही विद्यार्थी येत असतात. हे जर लिहिले आहे त्याचे जिवंत उदाहरण मी बघितले आहे, हि कुठलीही काल्पनिक कथा नाही कारण ह्यापैकी काही आज जिवंत नाही आहे पण मृत्युपूर्वी ते श्रीमन झाले होते. त्यांनी श्रीमंतीची आयुष्य जगले.

माझ्या अनेक विद्यार्थ्यांपैकी काही असे होते ज्यांना मी बोललो होतो कि तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, श्रीमंत होऊ शकत नाही पण माझ्या बाकीच्या लेखांचा त्यांच्यावर इतका सकारात्मक चमत्कारिक परिणाम होता कि जिद्दीने ते माझ्याकडे समुपदेशन, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घ्यायला येत होते, ऑनलाईन घेत होते. त्यांनी दाखवून दिले कि जग जरी तुमच्या बाजूने असले तरी तुम्ही कितीही मोठे यश का असेना ते गाठू शकतात.

अनुभवला पर्याय नाही. ह्यासाठी धाडस दाखवून कृती हि करावीच लागते. संकटांचा सामना करावा लागतो, किनारा सोडून खोल समुद्रात जाते लागते. हे बोलून नाही तर कृतीने होते. इथे कोणी तुमची पदवी नाही विचारत, संकटे सर्वांच्या आयुष्यात एकसारखेच येतात.

आणि एक समाधान देणारी गोष्ट म्हणजे हि क्षमता तुमच्यात जन्मजात आहे, ती तुम्हाला जागृत करायची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि श्रीमंत बनण्याच्या दीर्घकालीन प्रवासाला सुरवात करा, मी आहे तुमच्या पाठीशी. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे भले जग तुमच्या विरोधात का असेना तुम्ही तुमची ध्येय गाठू शकता, तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

"सकारात्मक सूर्यकिरणे आपल्या आयुष्यात येण्यासाठी नकारात्मक ढग बाजूला कसे सारायचे?"



कल्पना करा कि तुम्ही सकाळी फेरी मारण्यासाठी बाहेर पडला आहात. बाहेर अजून अंधार आहे. थोड्या वेळाने सूर्य उगवणार आहे, दिवस उजाडणार आहे. अर्ध्या तासाने दिवस उजाडला पाहिजे पण अजूनही अंधार आहे. मग तुम्ही आकाशात बघतात तिथे तुम्हाला ढग दिसून येतात. सूर्याचे दर्शन जिथे ढग नाही तिथे झाले आहे फक्त तुमच्याकडे नाही झाले.

सकारात्मकता म्हणेज सूर्य ज्याचा अब्जो वर्षांपासून नियम बदललेला नाही. ढग हे नकारात्मक ज्यांनी तुमच्या आयुष्यात अंधार करून ठेवला आहे पण बाजूची सकारात्मक व्यक्ती सूर्यप्रकाशाचा अनुभव घेत आहे.

आता हि नकारात्मक ढग बाजूला काढायची कशी?

जेव्हा आपण भावना व्यक्त करतो तेव्हा पाउस पडतो ज्यामुळे आपल्याला हलके वाटू लागते व आपण सकारात्मक विचार भावना कंपने आणि उर्जेची हवा निर्माण करून ती ढग पुढे ढकलून देतो व तुमचे आयुष्य सकारात्मक सूर्यप्रकाशाने न्हाऊन निघते.

पाउस पडल्यामुळे तुमच्या आयुष्याची जमीन हि सकस होते व नवीन आयुष्य तुम्ही त्यामधून निर्माण करायला सुरवात करता. आणि बघता बघता विविध सकरात्मक, भाग्यशाली आणि चमत्कारिक अनुभवांनी भरलेले आयुष्यरूपी जंगल तयार करता. आणि इथे फक्त सकारात्मक लोक आणि परिस्थिती आकर्षित होतात.

हो सकारात्मक आयुष्य आकर्षित करणे इतके सोपे आहे. अनुभव घ्यायचा असेल तर ऑनलाईन सेवेसाठी नोंदणी करा.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

प्रेमभंग ह्यामधून येणारे तणाव नैराश्य, न्यूनगंड आणि आत्महत्या



प्रेमभंग ह्यामधून येणारे तणाव नैराश्य, न्यूनगंड आणि आत्महत्या

अनेकदा मला अश्या प्रेमभंग झालेल्या लोकांचे फोन येतात, त्यांचे एकच म्हणणे असते कि आता गेलेला जोडीदार परत त्यांच्या आयुष्यात आला पाहिजे. किंवा ते त्यांच्यापासून जगू शकत नाही वगैरे वगैरे. इथे वयाची अट नाही, अगदी शाळेपासून ते ज्येष्ठ प्रेमात पडले होते आणि त्यानंतर त्यांचा प्रेमभंग झाला होता ते देखील फोन करत होते. अजून एक आश्चर्य म्हणजे लग्न होवून, मुले होवून मुले मोठी होवून देखील काहींचे फोन आले होते. लोकांचे बाहेरील चेहरे बघून आपल्याला माहिती नसते कि त्यांचे आयुष्य हे कसे चालू आहे म्हणून.

प्रेमभंग झाल्यावर किंवा आपल्याला एकतर्फी व्यक्ती आवडत असल्यास ती नाही बोलल्यास किंवा ती आपल्या आयुष्यात न आल्यास व्यक्ती इतके टोकाचे पाउल का उचलते?

ह्याचे उत्तर मनात अंतरमनात आणि हृदयात म्हणजे भावनांमध्ये दडलेले आहे. जेव्हा तुम्ही प्रेमात रहा किंवा एकतर्फी प्रेम करत रहा तेव्हा तुम्ही एक खूप मोठी चूक हि करता कि एकतर्फी वाहून जाता, भविष्य जे अस्तित्वात नाही त्याचे स्वप्न बघता, त्या स्वप्नात जगता, जर शाळा कॉलेज मध्ये शिकणारे किंवा अजून लग्न न झालेले जोडपे आपल्या मुलांची नावे ठेवायला सुरवात करतात, त्यामध्ये भर हि इंटरनेट ची जिथे कल्पनेचे चित्र चांगले रंगवले जाते आणि ते काल्पनिक चित्र आयुष्य खरे देखील वाटते त्यामुळे अजून विश्वास दृढ होत जातो कि भविष्य हे असेच असणार म्हणून आणि शेवटी ते दोघे वेगळे होतात.

ह्यामध्ये काही समजूतदार, वास्तवात राहणारे, भावनिक दृष्ट्या साक्षर आणि सक्षम असलेले प्रेम वीर असतात ते ब्रेकअप झाल्यावर हृदयभंग झाल्यावर आरामात समजून घेतात, एकतर कायमचे वेगळे होतात किंवा मैत्रीचे नाते ठेवतात. काही लोक दुसरीकडे लग्न करून देखील विवाहबाह्य संबंध ठेवतात.

आणि जे भावनिक दृष्ट्या कमजोर असतात निरक्षर असतात ते वेडेचाळे करायला लागतात जसे कि त्यांचा श्वासच बंद झाला कि काय. ह्याच वेडेपणामध्ये आत्महत्या देखील करायला जातात. काही लगेच सावरतात तर काहींना सावरायला अनेक दिवस, महिने आणि वर्षे लागतात. काहीतर सावरण्याचा प्रयत्नच करत नाही.

प्रेमभंग झालेल्यामध्ये एक न्युनगंड येतो. ते स्वतःला कमी समजू लागतात. त्यांना नवीन नातेसंबंध जुळवणे कठीण जाते, आणि जरी नवीन नातेसंबंध जुळवले तरी ते जास्त काळ टिकत नाही कारण ते भूतकाळात म्हणजे जुन्या नातेसंबंधांशी तुलना करत बसतात. त्यांना असे वाटते कि प्रेम परत दुसऱ्यांदा होऊ शकत नाही म्हणून पण ते हे विसरतात कि ज्या आई वडिलांचे एकापेक्षा जास्त मुले असतात ते त्या सर्व मुलांना एकसारखेच प्रेम करतात. प्रेमामध्ये पहिले दुसरे ह्याचे त्याचे असे काही नसते.

आकर्षणाचा सिद्धांत एकदम सोप्या नियमावर चालतो तो म्हणजे तुम्ही एक मागा तुम्हाला भरपूर मिळेल. उदाहरणार्थ जर तुम्ही एक बी पेरले तर जमीन हे नाही बोलणार कि तू एक बी पेरले तर तुझ्या झाडाला एकच फळ आणि एकदाच देईल म्हणून. तुम्ही जर प्रेम पेरत आहात तर तुम्हाला जास्त प्रमाणत प्रेम मिळेलच आणि त्यापैकी एकासोबत तुम्हाला लग्न करायचे आहे. काहींचे अनेक लग्न होतात किंवा लग्नानंतर देखील त्यांना प्रेम मिळत जाते हे सर्व समृद्धीचा भाग आहे. मनुष्याने निर्माण केलेले नियम निर्सग नियम आणि ब्रम्हांडाच्या नियमांना विचारत नाही.

जर निसर्ग, ब्रम्हांड इतका समृद्ध आहे तर लोक फक्त एक व्यक्ती सोडून गेली म्हणून आत्महत्या का करतात? किंवा त्याच व्यक्तीच्या नावाचे जप का जप्त बसतात? विविध व्यसने लावून का घेतात? काही स्वतःचे आयुष्य बरबाद का करतात?

कारण अश्या व्यक्तींना समृद्धी काय आहे हे माहिती नसते. ते टीव्ही वरील सिनेमे बघून मोठे झालेले असतात, त्यांना वास्तव काय आहे हे माहिती नसते. आयुष्य हे प्रेमावर नाही जिंवत राहण्याची धडपड करणे करत राहणे ह्यावर चालते. जो जगण्यासाठी धडपड करतो, जो वास्तवात आयुष्य जगतो तोच आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतो व भाग्यशाली आयुष्य जगतो.

आता तर परिस्थिती अशी आली आहे कि जी मुलं पौगंडावस्थेत आहेत, ज्यांना वास्तव आयुष्याचा अनुभव नाही, जे आई वडिलांच्या सहाय्याने आयुष्य जगतात ते टोकाची भूमिका घेतात. घर चालवायला पैसा लागतो, त्याचे रक्षण करायला शक्ती लागते आणि जे शाळा कॉलेज मध्ये आहेत त्यांच्याकडे असे काहीच नाही. ते सर्व आई वडिलांवर अवलंबून असतात मग चोरी, आत्महत्या असे प्रकार करतात.

प्रेम भावना आहे म्हणून ह्याचा परिणाम हा सर्वांवर होतो मग लहान काय आणि मोठे काय त्यामुळे सर्वांना समजून घेणे त्यांना वास्तवाची जाणीव करून देणे हे खूप महत्वाचे असते. स्वतःवर प्रेम करणे खूप महत्वाचे असते ना कि इतरांवर, जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो इतरांना प्रेम देवू देखील शकत नाही. एक व्यक्ती गेली कि दुसरी व्यक्ती आरामात आयुष्यात येवू शकते, १३५ करोड ची लोकसंख्या आहे. ज्याला स्वतःच्या जीवाची किंमत नाही त्याला कुणाचीही किंमत नाही. अश्या लोकांपासून लांब रहा.

तणाव नैराश्य सोडा आणि सुख समृद्धीने भरलेले आयुष्य जगा.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy