स्थानिक स्वदेश उद्योजक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार तयार करा.


 गुंतवणूक स्थानिक उद्योजक व्यवसायात करा.


शेअर बाजारपेक्षा जास्त नफा स्थानिक उद्योजक व्यवसायिक निर्माण करू देतील.


ज्ञान जागतिक ठेवा व त्याचा वापर स्थानिक पातळीवर करा.


विदेशी प्रोस्ताहनला बळी पडू नका.


हजारो कोटी उलाढाल करणारा उद्योजक व्यवसायिक निर्माण करण्यापेक्षा लाखोंची उलाढाल करणारे हजारो उद्योजक व्यवसायिक निर्माण करा.


धन्यवाद

अश्विनीकुमार


सर्व आदर लोक जेव्हा सांगतात कि ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा कार्यालयात काम करतात तेव्हा देतात. पण एक मुख्य मुद्दा विसरलात कि जग नोकरीच्या पलीकडे खूप मोठे आहे त्यामुळे तुम्ही देखील तुम्ही करत असलेला उद्योग व्यवसाय अभिमानाने सांगा.


"मी रिक्षाचालक आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी वडापाव विक्रेता आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी दुकानदार आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी खानावळ चालवतो आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."


तुमचा जो काही व्यवसाय आहे तो कमेंट टाकून अभिमान व्यक्त करा. कळू दया लोकांना कि नोकरी सोडून देखील असे अनेक क्षेत्र आहेत जिथे प्रचंड संधी उपलब्ध आहेत. किती दिवस संकुचित मर्यादेत रहायचे? अशी अनेक लोक संपर्कात आली ज्यांनी छोट्यापासून सुरुवात केली मग ते रिक्षावाले ते रस्त्यावर विक्री करणारे आज श्रीमंत झाले आहेत.


इथे मुद्दा कोण किती श्रीमंत झाला हा नाही तर इथे मुद्दा आहे कि नोकरी सोडून असे अनेक क्षेत्र आहेत जिथे स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आणि हे शाळेत शिकवले पाहिजे ना कि पदवी देवून नंतर बेरोजगारांची फौज तयार केली पाहिजे. जर शिक्षण चांगला रिक्षावाला, वडापाव वाला, दुकानदार, खानावळ चालवणारा, गेरेज वाला नसेल बनवत तर असे शिक्षण काय कामाचे? म्हणजे शिक्षण भेदभाव करते.


तुम्ही तुमचे जीवन जगण्यासाठी, आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी जे जे काम करत आहात त्याचा आदर आहे.


धन्यवाद
अश्विनीकुमार

 


 “उद्योग व्यवसायात उतरण्याची काहींचे वय हे ८ वर्षे, १२ वर्षे, १५ वर्षे, १८ वर्षे ते ७० वर्षे आहे. उद्योग व्यवसायात कुठेही आडकाठी नाही, ज्याला जे करायचे तो ते करू शकतो. तुम्हाला स्पर्धा अश्या सर्वांसोबत करायची आहे प्रत्येकाचा अनुभव हा दांडगा आहे, काहींनी ४, ५ उद्योग व्यवसायात प्रयत्न करून ६ व्यात यश मिळवले तर काहींनी सपशेल अपयश तर काहींनी साहिंच्या साही मध्ये यश. इतके विविध अनुभव घेतले आहे कि तोडच नाही. हे सर्व दिसायला सामान्य वाटतात पण ह्यांच्याकडे असलेले ज्ञान हे तुम्हाला जगातील कितीही मोठ्या विद्यापीठात मिळणार नाही. म्हणून सांगतो स्वतःला कमी समजू नका, तुमच्यात देखील क्षमता आहे आणि बाजारपेठेत ती तुम्ही आरामात दाखवू शकता, आम्हाला पण एका उद्योजक व्यवसायिकाची गरज आहे. बाजारपेठेत मागणी हि सतत सुरूच असते.”

अश्विनीकुमार

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने Byju वर विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे क्रमांक घेवून धमकी वजा सूचना देत त्यांचे कोर्सेस विकतात हा आरोप केला आहे.




Byju's ऑनलाईन शैक्षणिक सेवा पुरवणारी कंपनी आहे. मी मध्यंतरी अश्या सर्वांवर किंवा अश्या लोकांवर किंवा अश्या लोकांचे सुविचार टाकणे बंद केले कारण मला माहिती होते कि ह्यांची माझ्याकडून नकळत मार्केटिंग होईल, माझे फेसबुक पेज वाढत जाईल, कोणीतरी पालक Byju's चे महागडे कोर्सेस घेईल व व स्वतःच्या मुलांवर दबाव टाकेन.


Byju's चा मालक त्याच्या जीवनावर देखील मी एक लेख लिहिणार होतो पण जेव्हा शिक्षण शैक्षणिक क्षेत्राची काळी बाजू समजले तेव्हापासून हात जोडले. जे जे प्रोस्ताहन देणारे आहेत, अब्जो कमावलेले आहेत, त्या सर्व पैसे देवून मार्केटिंग करण्यात आले आहे नाहीतर आमच्या काळापासून ते आता पर्यंत का नाही चांगले शिक्षक यशस्वी झालेत? ज्यांना मार्केटिंग जमले आणि ज्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा जास्त चिंता हि त्यांच्या पालकांकडे असलेल्या पैश्यांवर होते तेच कसे पुढे गेले?


शिक्षण किती मुलांसाठी घातक होत गेले हे आपण आता समजून घेवू


"NCPCR" हि सरकारी संस्था "National Commission for Protection of Child Rights" मराठीत "राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग" हा तिचा फुलफोर्म, ह्या संस्थेचे काम काय आहे माहिती आहे काय? ह्यावरून तुम्हाला समजले पाहिजे कि हे प्रकरण किती गंभीर आहे ते. हि संस्न्था लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करते. म्हणजे विचार करा कि ह्या संस्थेला मध्यस्थी करावी लागली ते.


राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग Byju's ला हजर राहण्याचा हुकून बजावला. Byju's वर आरोप काय करण्यात आले? काहीतरी असेल म्हणून तर हुकुम बजावण्यात आला. त्यांच्यावर आरोप malpractice म्हणजे व्यावसायिक सेवेतील निष्काळजी, गैर किंवा बेकायदेशीर वर्तन; गैरव्यवहार, दुराचार चा करण्यात आला. विचार करा शैक्षणिक संस्था आणि तिच्यावर असले आरोप.


आरोप काय आहे तर कोर्स, क्लास म्हणजे शिकवणी विकत घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जातो, चुकीची माहिती दिली जाते, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे फोन क्रमांक विकत घेतले जातात, जर त्यांचे कोर्सेस क्लासेस म्हणजे शिकवण्या नाही घेतल्या तर मुलांचे भविष्य उध्वस्त होईल अशी भीती घातली जाते. भारतातील सामाजिक व्यवस्था अशी होती कि काहींना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण तेच इंग्रजांनी निर्माण केलेल्या शिक्षण व्यवस्थेत होता मग अशे पालक जसे कि कमी शिकलेले, किंवा ज्यांची पहिली किंवा दुसरी पिढी १० वी, १२ वी , १५ वी किंवा उच्च शिक्षण पूर्ण नाही करू शकले अश्यांना टार्गेट केले जाते.


आयोगाला जेव्हा काही वृत्तपत्रातील बातम्या अश्या दिसून आल्या कि ज्यामध्ये पालक सांगत होते कि मुलांच्या उज्वल भविष्याचे आमिष दाखवून त्यांचे कोर्स विकत घेण्यात भाग पाडत होते, काही पालकांनी आर्थिक शोषणाची तक्रार केली तर काहींना फसवण्यात आले आणि ह्याप्रकारे पालकांची कठीण परिश्रमाने मिळवलेले, बचतीचे पैसे देखील कोर्स क्लास च्या नावाखाली उकळण्यात आले. ह्यामध्ये असे आढळून आले कि फी परत करण्याचे सांगून पालकांना फी परत केली जात नव्हती.


शिक्षण चांगले आहे कि वाईट हा भाग आणि वाद वेगळा झाला, मी तर आपली इंग्रजांनी दिलेली शिक्षण व्यवस्था मानतच नाही, गुरुकुल पद्धत जिथे प्रात्यक्षिक देखील करून घेतले जायचे आणि त्यासोबत आधुनिक वैज्ञानिक पद्धत जिथे सर्वांगीण विकासाभर भर देण्यात येईल अश्या शिक्षण पद्धती आवडतात. पण इथ मुद्दा येतो तो पालक आपल्या मुलांवर टाकत असलेल्या दबावाचा आणि 


ह्या अगोदर सुद्धा Byju संस्थेचा मालक रविंद्रन ह्याला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग संस्थेने हजर राहण्याची नोटीस बजावली होती. आणि Byju चा मालक रविंद्रन ह्याचे अनेक प्रोस्ताहित करणारे व्हिडीओ नेट वर उपलब्ध आहेत. त्याची महती सांगत आहेत ते सर्व पेड मार्केटिंग आहे असे समजा.


६० पैकी पहिल्या ५ मध्ये काही मुले सतत वर्गात पहिली येतील उच्च शिक्षण पर्यंत पहिली येतील मग बाकींच्या मुलांचे काय? त्यामुळे अश्या जंजाळात अडकू नका, ह्या जगात संस्कार आणि अनुभवापेक्षा दुसरे शिक्षण कुठलेही नाही, बाकी निर्णय तुमचा.


धन्यवाद

अश्विनीकुमार

 

“आपण आरामात स्थानिक लघु उद्योग व्यवसाय वाचवू शकता ते देखील विना बँकेची मदत घेता. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ १३ कोटी पकडू, जरी एक एक रुपया काढला तरी एखाद्या स्थानिक उद्योजक व्यवसायिकाला आपण कर्जातून बाहेर काढू शकतो, नवीन लघु उद्योजक व्यवसायिक निर्माण करू शकतो, शेतकऱ्यांची आत्महत्या पूर्णपणे थांबवू शकतो. हे स्थानिक पातळीवर जरी सुरु केले तरी आपण मदत योग्य आणि गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवू शकतो जेणेकरून आपल्या पैश्यांचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही. मी फक्त १ रुपया बोललो पण असे नेक आहेत जे १० ते जास्तीत जास्त आपण १००० रुपये मर्यादा जरी ठरवली तरी अनेक लघू उद्योजक व्यवसायिक आपला उद्योग व्यवसाय हा वाचवून परत भरारी घेवून आपले पैसे परत ते परत करतील.”


अश्विनीकुमार


 दाक्षिणात्य खाद्य पदार्थ हे जगभरात प्रसिद्ध आहेत तर त्या पाठोपाठ पंजाबी खाद्य पदार्थ, हे असे का? कारण ते भाषा आणि त्यांची खाद्य संस्कृती जपून आहे सोबत त्यांचे बाहेरगावी कामे करण्याचे प्रमाण देखील जास्त आहेत त्यामुळे ते प्रसिद्ध आहेत पण जेव्हा मराठी हाच मार्ग अवलंबतील तेव्हा आपले खाद्य पदार्थ, मराठी संस्कृती हि आपोआप प्रसिद्ध होते जाईल, आता जो न्यूनगंड भरवला होता तो आता खूप प्रमाणात कमी झाला आहे. जगाच्या पाठीवर बिनधास्त मराठी बोला समोरचा तुमची भाषा तर शिकेलच सोबत आपली संस्कृती देखील त्याच्या पर्यंत पोहचेल.


 “काही व्यवसाय करतांना त्या त्या व्यवसायाकरिता लागणारी जागा खूप महत्वाची आहे इथे कधीही पैसे वाचवण्यासाठी तडजोड करू नका आणि जरी मोक्याची जागा नाही भेटली तर त्या आसपास तुमच्या आर्थिक स्थिती नुसार जागा निवडा व बाकी पैसा हा जाहिरात करण्यासाठी वापरा ह्याला दुसरा पर्याय नाही पण ह्या अगोदर तुम्ही तयार असले पाहिजे म्हणजे त्या क्षेत्रातील अनुभव तुम्हाला पाहिजे, व्यवसायिक गुण तुमच्यात पाहिजे जे अनुभवानेच येतील.”


अश्विनीकुमार


 “कुठलाही उद्योग व्यवसाय हा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नाही तर कमीत कमी ३ प्रयत्न तरी करावे लागतात हे अनेक यशस्वी लोकांच्या अनुभवावरून सांगत आहे. त्यामध्ये असे देखील उद्योजक व्यवसायिक भेटले जे पहिल्या प्रयत्नात यशस्वी आहेत पण अश्यांची संख्या खूप कमी आहे म्हणजे अपवाद त्यामुळे जेव्हा देखील उद्योग व्यवसाय सुरु करायचा विचार करत असाल तर हा अलिखित नियम लक्ष्यात ठेवा आणि जर तुमची मानसिकता नसेल आणि आर्थिक स्थिती नसेल तर सहसा उद्योग व्यवसाय करण्याच्या भानगडीत पडू नका. प्रोस्ताहन देणारे व्हिडीओ बनवणे सोपे आहे पण वास्तव खूप वेगळे आहे म्हणून अनुभवला महत्व आहे.”


अश्विनीकुमार

 

“उत्पादन करणे आणि विक्री करणे हे दोन्ही उद्योग व्यवसाय वेगवेगळे आहेत. जर उत्पादन क्षमता वाढवण्यावर जोर दिला असता तर महाराष्ट्र व मराठी समाज हा प्रचंड श्रीमंत झाला असता पण झाले उलटे, सर्व महत्व हे विक्री करणाऱ्यांवर देण्यात आले आणि त्यामुळे माल हा चीन वरून मागवण्यात येतो. एकप्रकारे बोलू शकतात कि दलाल श्रीमंत पण उद्योजक आणि ग्राहक त्रस्त फायदा हा चीन ला कारण विक्री करणारा हा स्वस्तात माल शोधणारच, त्यांचा व्यवसाय तर उत्तम सुरु आहे. जे भारतीय नागरिक उष्ट्या सफरचंदाचे लाखो रुपये देतात ते भारतीय उत्पादनाचे लाखो रुपये नाही देणार? बाजारात तरी उतरवा.”


अश्विनीकुमार


 “फेसबुक मध्ये असे खूप जास्त लेख आहेत जे भारतीय उद्योजक व्यवसायिक आहेत आणि जे करोडपती झाले पण असे लेख नाही जिथे करोडोंच्या खाली म्हणजे लाखो किंवा हजारो मध्ये उलाढाल करता व अनेक नोकऱ्या उपलब्ध करून देतात. तुम्ही फेसबुक च्या बाहेर आपले स्थानिक जग बघा किंवा तुम्ही जिथे जिथे कुठल्याही संदर्भात फिरायला जातात तेथील स्थानिक उद्योजक व्यवसायिक बघून त्यांना प्रसिद्ध करा ना कि एखाद दुसरा करोडपती होतो त्यांचे लेख फोरवर्ड करा. आपण आपल्याला मदत करणार आहोत ना कि कोणीतरी करोडपती त्याच्या बंगल्यातून येवून आपल्याला मदत करेन.”

अश्विनीकुमार


 “लोका चायवाला वडापाव वाला रिक्षावाला वगैरे बोलून कमी पण दाखवायचा प्रयत्न करतात पण जिथे एमबीए चायवाला, इंजिनिअर चायवाला असे शब्द दिसले कि त्याला डोक्यावर घेतात व त्याचे गुण गान करतात. म्हणजे एका ठिकाणी तुच्छता आणि दुसरीकडे आदर दाखवतात हि शोकांतिका आहे. ह्याच एमबीए आणि इंजिनिअर च्या कॉलेज मध्ये कमी शिकलेल्या लोकांना धडे द्यायला बोलावता ते देखील कधी जेव्हा ते करोडपती होतात तेव्हा नाहीतर नाही. शाळा कॉलेज च्या शिक्षणात यशस्वी होण्यापेक्षा आयुष्याच्या शाळेत यशस्वी व्हा इथे पदवी बघून यश दिले जात नाही तर तुमची मानसिकता आणि मेहनत बघून दिले जाते.”


अश्विनीकुमार


 “माझ्या मित्राने त्याच्या दुकानावर बोर्ड लावला तो मित्र परप्रांतीय आहे हे मी अगोदरच तुम्हाला सांगत आहे. जेव्हा बोर्ड बघितला तेव्हा आठवले कि ह्या अगोदर दुकानाला बोर्ड होता तेव्हा आम्ही दुकानदाराच्या मालकाच्या नावाने त्या ठिकाणी जायची ना कि बोर्ड बघून, अशीच विक्रोळी मधील नावे आठवून मग शेवटी चितळे हे नाव आठवले, चितळे ह्यांनी काही इतर कुठलेही नाव ठेवले नाही तर स्वतःचे आडनाव ठेवले आणि आज ते जग प्रसिद्ध आहेत. चितळेची भाकरवडी, चितळेचे दही आम्ही मुंबई उपनगर मध्ये आवर्जून मागतो, गोकुळ अजून उपलब्ध का नाही ते माहिती नाही. हे सर्व ब्रांडचे थोतांड हे विदेशातून आले आहेत त्यामुळे त्यांच्या नादी लागून ब्रांड बनवण्याकडे लक्ष देवू नका, सतत कर्म करा तुमचे नाव किंवा आडनावाचा ब्रांड बनून जाईल, विनाकार उष्टा खाल्लेल्या सफरचंद च्या नादी लागू नका. ज्ञान जागतिक ठेवा पण स्थानिक उत्पादन सेवा हि उत्कृष्ट ठेवा.”


अश्विनीकुमार


“एखाद्या कमी शिकलेल्या किंवा कुठल्याही सामान्य शाखेतून पदवी घेतलेल्या तरुणाने छोटा व्यवसाय सुरु केला तर त्याची दखल कोणीही घेत नाही पण त्याविरुध्द डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए पीएचडी धारकाने कुठल्याही लघु व्यवसायात उडी घेतली तर सर्व त्यांची मुलाखत घेत बसतात हे आपल्या इथले दुर्दैव आहे. नेहमी पदवी बघून नाही तर त्यांच्या सातत्याचा, उत्पादन किंवा सेवेचा दर्जा बघा आणि मगच महत्व द्या. आपल्या इथे लाखो उच्च शिक्षित लोकांचे त्यांच्यापाडून पैसे घेवून पदवीधरांची निर्मिती होते एखाद्या कारखान्यासारखे त्यामुळे किती व्हिडीओ बनवणार त्यांचे? शेवटी वीट येईल. आपण चहा घेतांना विचारत नाही कि तुझी पदवी काय आहे? चहा घेतो आवडला तर स्तुती करतो आणि नाही आवडला तर नावे ठेवतो पण महत्वाचे हे आहे कि ती व्यक्ती सातत्याने व्यवसाय करते कि नाही? मेहनत करणारे आणि कष्टकरी ह्यांना सर्वच अन्न गोड लागते, सध्या पोट भरते ना? उद्या कोणीतरी चांगले खाद्य पदार्थ बनवणारा तयार झाला कि त्याच्याकडे जातील पण तोपर्यंत तरी ते उपाशी झोपत नाही ना? महत्वाचे काय आहे ते लक्ष्यात ठेवा आणि उद्योग व्यवसायात उतरा, अनुभव घेत घेतच तुम्ही यशस्वी व्हाल.”


अश्विनीकुमार



 “गरीब मध्यम वर्गीय लोकांसाठी घर हे स्वप्न असते तर श्रीमंत लोकांसाठी घरे हि गुंतवणूक असते. बांधकाम क्षेत्राचे कायदे व नियम बनवतांना गरीब मध्यम वर्गीयांच्या भावना लक्ष्यात ठेवल्या जात नाही तर श्रीमंत लोकांच्या गुंतवणुकी लक्ष्यात ठेवल्या जातात. फायदा गरीब मध्यम वर्गीयांना कसा होणार हे बघितले जात नाही तर श्रीमंतांना फायदा कसा होणार हे बघितले जाते.”


अश्विनीकुमार


 जर तुमचा व्यवसाय हा तोट्यात चालला आणि तुम्हाला नैराश्य आले असेल तर खालील वाक्य स्वतःसोबत बोलाल.


“मी समस्येवर मात करेल. हे पण दिवस निघून जातील. मला विश्वास आहे.”


अश्विनीकुमार

एका बँकेच्या सरकारी अधिकारीने घडविलेला सकारात्मक बदल.

एका बँकेच्या सरकारी अधिकारीने घडविलेला सकारात्मक बदल.

मी राहतो विक्रोळी ला, तिथे एसबीआय मध्ये एक अधिकारी आली. जेव्हा माझे काम होते तेव्हा देखील गर्दी कमी दिसली होती पण थोडी अव्यवस्थितच होती. काल मित्र एसबीआय शाखेत त्याचे काम करायला गेला व अर्ध्या तासात काम करून बाहेर आला. त्याच्या सोबत मित्र गेले होते पण जेव्हा अधिकारी येवून बाहेर सर्वांना काय काम आहे हे विचारत होते तेव्हा ते स्वतः बाहेर निघून गेले, त्या अधिकारीने बाहेर काढले नाही. ग्राहकांनी व त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.


मेनेजर हि केबिन मध्ये फक्त बसून नव्हती तर तर बाहेर येवून देखील काम करत होती. ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करत होती, टोकन घेतले कि नाही, काय काम आहे हे सर्व विचार होती. एका सरकारी बँकेत खाजगी बेंकेच्या वेगाने काम होते हे दाखवून दिले. ह्यासाठी खाजगीकरण ची नाही तर योग्य लोकांना संधी देण्याची गरज आहे. जात धर्म प्रांत ह्यापलीकडे चांगले अधिकारी आहेत जे कामाने बदल घडवून आणून देतात.


माझे आई वडील सरकारी नोकरी करत होते म्हणून मी काही बाजू घेत नाही आणि खाजगीकरण करून जे दरवाढ करण्यात आली, सेवा सुमार दर्ज्याची देण्यात आली, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण बघितले, कामगार कायद्याचे उल्लघन बघितले म्हणून त्याचा विरोध करत आहे. कामगार कायदे पाळा, जसे अगोदर कामगार नेत्यांचे वापर करून कंपन्या बंद पडल्या गेल्या अश्या सामान्य लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करू नका मग बघा सरकारी आणि खाजगी कंपन्या कसे काम करतात ते.


जे एक मेनेजर हा बदल घडवून आणू शकते मग तिच्या सारख्या क्षमता असलेल्यांचे शोध घेण्याचे काम त्या संबंधित खात्याचे आहे. कोणीही कितीही सरकारी अधिकाऱ्यांवर नोकरदारांवर चिखलफेक केली तरी त्यामधून चांगले काम करणारे अधिकारी आणि नोकरदार हे त्यांची चांगली कामे सुरूच ठेवतील.


पण ह्याला पर्याय निवडला गेला तो खाजगीकरणाचा, आणि इथेच श्रीमंत आणि गरिबांची दरी वाढत गेली. लोक इतिहास जाती धर्म आणि राजकारणाचे विषय लक्ष्यात ठेवतात पण कधी त्यांच्या जवळ सरकारी खात्यात असलेल्या चांगल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नावे लक्षात ठेवतात का? इतकेच जर सरकारी कर्मचारी आणि अधिकारी वाईट असेल तर मग राजकारणी जे शासन व्यवस्था चालवतात ते कसे काय चांगले? त्यांना कोणी कामावरू का नाही काढून टाकत किंवा त्याचे खाजगीकरण का नाही करत?


हा मंत्री योग्य नाही तर हि कामे देखील खाजगी कंपन्यांना दिली पाहिजे, मग खाजगी कंपनी एक एका खात्याचा कारभार चालवत जाईल. पण असे होणार नाही, मंत्री आहे तिथे राहतील बदलतील ते सरकारी कर्मचारी आणि अधिकारी, बंद होतील त्या सरकारी कंपन्या किंवा खाजगी कंपन्यांना चालवायला देतील.


अनेक वर्षांपासून फक्त महाराष्ट्रात कौशल्य काढले तर अमेरिका आणि चीन ला मागे टाकतील इतके कौशल्य मराठी तरुणांमध्ये आहेत, मला दिसते पण त्यांची जिथे गरज आहे तिथे त्यांना संधीच दिली जात नाही. इतक्या सरकारी जागा कमी केल्या कि अनेकांच्या नोकरीच्या संधीच काढून घेतल्या आणि दिल्या त्या कंत्राटी नोकरी, आज ६ महिने असेल तर पुढील ६ महिने असेल. ते देखील २५००० पगारावर सही करून रोकड मध्ये ७, ८ हजार पगार हातात दिला जातो.


सरकारी खाते देखील खाजगी कंपन्याच्या पेक्षा चांगल्या चालवल्या जावू शकतात हे अनेकदा सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांनी सिध्द करून दाखवले आहेत पण हे लोकांना दिसणारच नाही, लोकांना काय दिसणार ते इतिहास, जात धर्म, राजकारण क्रिकेट आणि सिनेमा.


मला तर विश्वास होताच पण आता बघितले सुद्धा कि चमत्कार घडू व्ह्क्तो ते, मला माहिती नाही कि ती अधिकारु गेल्यावर काय होईल ते पण आता बोलू शकतो कि सरकारी बँका आणि कंपन्या सुद्धा खाजगी पेक्षा जास्त तोडीस तोड चालू शकतात. त्या मेजर चा मी आभारी आहे.


अश्विनीकुमार 


 “कधी कधी तुमच्याकडे एकच पर्याय असतो, घाबरून जा किंवा धाडस दाखवा, यश मिळेल कि नाही ह्याची हमी नाही, ह्यालाच आयुष्य म्हणतात.”


अश्विनीकुमार


 “मध्यम वर्गीय अर्थव्यवस्थाच उत्तम आहे ना कि श्रीमंत आणि गरिबांची अर्थव्यवस्था. मध्यम वर्गीय जूणे कपडे पुसायला वापरतात व जे देण्यासारखे असतात ते भांडेवाल्याला देतात. पैसा जपून वापरतात व जेव्हा कुणाला गरज असते तेव्हा द्यायला कमी करत नाही. पैसा योग्य वापरला जातो. गरीब अर्थ व्यवस्था त्यांच्या कमाईनुसार कर्जबाजारी असते तर श्रीमंत अर्थव्यवस्था हि स्वतःचे विचार करणारी असते.”


अश्विनीकुमार


 “ह्या २०२२ मध्ये देखील मुलांवर नोकरीसाठी शिक्षण घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जातो. नंतर तेच पालक स्टेशनरीच्या दुकानात जावून समान घेतात, वाण्याच्या दुकानात जावून किराणा घेतात, कपड्यांच्या दुकानात जावून कपडे घेतात. संधी प्रचंड आहे पण स्वतः मराठी पालक सर्व रस्ते बंद करून एकच रस्ता सुरु ठेवतात. अश्याने मुलांचे कौशल्य सीमित केले जाते. कुठेतरी मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे.”


अश्विनीकुमार


 “तुम्ही मोठे झाला म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही दारू सिगरेट प्यायला लागला, प्रेम प्रकरण करायला लागला, कोणी किती सोबत शरीर संबंध ठेवले, कोणी कुणाला मारले, मित्रांना दाखवण्यासाठी गाडी महागडे मोबाईल घेतले वगैरे, तुम्ही मोठे झालात म्हणजे घरची जबाबदारी घेतली, पैश्यांची बचत करायला शिकले, पैसे गुंतवायला शिकले, नाते संबंध टिकवायला शिकले असे होते. तुमच्या मुलांना दुसऱ्या मार्गाने मोठे करा ना कि पहिल्या मार्गाने.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #मराठी #udyog #vyapar #marathiudyojak #marathiudyogpati #चलाउद्योजकघडवूया


 “ऑनलाईन शॉपिंग प्रचंड प्रमाणात ग्राहकांना सवलत देत आहेत, ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये परदेशातील गुंतवणूक आहे. ह्यांचे मुख्य टार्गेट हे ग्राहकांना स्वस्तात माल देण्याचे नसून स्थानिक लहान दुकानदारांना संपवण्याची आहे. एकदा का लहान दुकानदार संपले तर ह्या ऑनलाईन कंपन्या चढ्या दराने ग्राहकांना माल विक्री करतील व जसे जिओ ने केले तसे उत्पादनाचे दर वाढवत नेतील. लाखो लहान दुकानदार संपवून फक्त काही मोठ्या कंपन्या राहिल्या पाहिजे ह्यावर भर आहे. ह्यामुळे विविधता देखील संपून जाईल. स्थानिक दुकानदार देखील सवलत देतात, कृपया त्याचा लाभ घ्या. एखाद दुसरा वाईट दुकानदार असेल ह्याचा अर्थ असा नाही कि सर्वच वाईट दुकानदार आहे म्हणून.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #मराठी #udyog #vyapar #marathiudyojak #marathiudyogpati #चलाउद्योजकघडवूया


 उद्योग, व्यवसाय करतांना मानसिक ताण तणाव हा येतोच त्यासाठी एकतर तुमची मानसिकता हि जन्मजात, अनुवांशिक आर्थिक पाहिजे नाहीतर ती तुम्हाला निर्माण करावी लागेल. ह्याला दुसरा पर्याय नाही आणि उद्योग, व्यवसायाच्या सुरुवातीला आर्थिक मानसिकता विकसित करणे हा सोपा मार्ग आहे, त्यांनंतर तुम्हाला वेळ भेटणार नाही.


 “शेतकरी कर्जात असेल व त्याला मदतीची गरज असे व त्याने जर फेसबुक पोस्ट केली तर आताचे फेसबुक अल्गोरिदम ती पोस्ट आपल्यापर्यंत पोहचवणार नाही तर मनोरंजन आणि राजकारणाच्या पोस्ट आपल्यापर्यंत पोहचवणार. तुम्हाला ऑफलाईन काम करत अश्या आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकरी, उद्योजक व्यवसायिकांपर्यंत पोहचायचे आहे व व्हास्टएप चा वापर करत लोकांपर्यंत माहिती पोहचवायची आहे जेणेकरून आपण आरामात एखाद्या शेतकऱ्याला, उद्योजक व्यवसायिकाला आत्महत्या करण्यापासून रोखू शकतो व आर्थिक मदत पोहचवू शकतो.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #मराठी #udyog #vyapar #marathiudyojak #marathiudyogpati #चलाउद्योजकघडवूया


 “पैसे कमावणारा कसाही पैसे कमावून जातो मग ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन. माझ्याकडे ह्या इंटरनेट च्या काळात असे देखील तरून तरुणी आहेत, आयटी मध्ये काम करणारे आहेत जे फेसबुक, इंस्टाग्राम वापरत नाहीत आणि यशस्वी आहेत. त्यांचा संपर्क देखील दांडगा आहे. त्यामुळे तुम्ही आत्मविकास करा आणि तुमचा आत्मविकासच हा इंटरनेट पेक्षा वेगाने पसरतो. यशस्वी लोक इंटरनेट वर कमी आणि स्वतचे ध्येय पूर्ण करण्यावर, स्वप्ने पूर्ण करण्यावर काम करतात त्यामुळे ते चमत्कार घडवतात.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #मराठी #udyog #vyapar #marathiudyojak #marathiudyogpati #चलाउद्योजकघडवूया

उद्योजक व्यवसायिकांच्या आत्महत्या कश्या थांबवायच्या?

उद्योजक व्यवसायिकांच्या आत्महत्या कश्या थांबवायच्या?

आता एक बातमी वाचत होतो जिथे एका कपड्याच्या व्यापाऱ्याने आत्महत्या केली, ती बातमी भारतातील प्रसिद्ध ऑनलाईन वृत्तपत्रात आली आणि त्या वृत्त पत्राचे नाव आहे टाईम्स ऑफ इंडिया.


त्या व्यापाऱ्याचे वय ४७, गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबात त्याची बायको आणि दोन मुले आहेत. बायको जेव्हा मंदिरात गेली होती तेव्हा मोहनानी ह्यांनी आत्महत्या केली.


आताचा मुद्दा मुख्य आहे. तो समजून घ्या, आणि आत्महत्येची लेखाच्या शेवटी आत्महत्या रोखणाऱ्या संस्थांचे क्रमांक देवून मस्करी कशी केली जाते हे तुम्हाला समजून येईल.


व्यापाऱ्यावर कोरोना मुले आणि त्या कालावधी मध्ये ३० ४० लाखांचे कर्ज झाले होते, आता हे सामान्य व्यापारी, बँक काही उभे करणार नाही कारण अश्या व्यापाऱ्यांची संख्या खूप आहे. बोलणे सोपे असते पण जो परिस्थिती मधून जात असतो त्यालाच माहिती असते कि किती उठाठेव करावी लागते ते. मग कर्ज घेतले ते दुसऱ्या एका व्यापाऱ्याकडून, सतत पैसे परत देण्याचा तकादा पैसे उसने दिलेला व्यापारी हा लावतच असेल आणि काही केल्याने बाजारात उठाव नाही म्हणून पैसे देवू शकत नसेल आणि हे वास्तव आहे अनेक व्यापारी करोडोंची उलाढाल करायचे पण ह्या कोरोना कालावधी चा फटका असा पडला कि जास्तीत जास्त व्यापाऱ्यांचे उद्योग व्यवसाय बंद झाले, उरलेले कर्जात गेले, आणि काही उठावच नसल्यामुळे कितीही काहीही करून देखील त्यांचा उद्योग व्यवसाय हा नफ्यात नाही आणू शकले आणि ह्यांचाच व्यवसाय हा कोरोनाच्या आधी उत्तम सुरु होता. आयुष्य असे देखील पूर्ण बदलते, कोणीही काहीही करू शकत नाही. कौशल्य सर्व पण तरीही कोणीही काहीही करू शकत नाही, ह्यालाच आयुष्याची शिकवण म्हणतात.


चला ज्याने पैसे उसने दिले तो व्यापारी पैश्यांची मागणी करत असेल पण प्रकरण मोहनानी ह्यांची बदनामी करेपर्यंत गेले. ह्याची अजून पुष्टी नाही. मोहनानी ह्यांची बदनामी होईल असे व्हिडीओ हे सोशल मिडिया मध्ये पसरवण्यात आले. आता हे प्रकरण तर आत्महत्या करायला लावण्यासारखेच आहे. जे सरळ मार्गाने जगणारे आहेत जे भावनिक दृष्ट्या हळवे आहे तेच आत्महत्या करतात. कारण हा स्वभावाचा भाग झाला आहे आणि अश्या लोकांना वाचवण्यासाठीच कायदा आणि न्याय व्यवस्था बनवली आहे.


आता इथे समस्या काही आत्महत्या थांबवण्यासाठी बनवलेल्या समाजसेवी संघटनांची येत नाही कारण अश्यांना फोन करून देखील बघितले काहीही फायदा नाही, महाराष्ट्र महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग तर सरळ हात वरती करतात, काडीची मदत नाही, आत्महत्या करण्यास अप्रत्यक्ष प्रवृत्त करतात.


आता इथे मुख्य भूमिका येते ती पोलिसांची. तिथे तक्रार करण्यास गेल्यास कधी कधी असे वाटते कि अजून अपमान करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. ठरलेले वाक्य, आम्ही काय करू, तुम्हाला पैसे भरावे लागतील, आम्हाला हेच काम आहे काय?, आणि हेच शब्द खाजगी कर्मचार्यांनी त्यांच्या ऑफिस मध्ये वापरले तर त्यांना कामावरून सरळ काढून टाकतात पण पोलिसांना हा नियम लागू नाही त्यामुळे असे बोलू नका कि भारतात लोकशाही आहे म्हणून, हे साफ खोटे आहे. मोहनानी वर जावून विचारावे लागेल. सर्व खेळ कायद्याच्या पळवाटा आणि गैरवापर ह्यावर आहे. अश्या लाखो केसेस दाखवेल जिथे काही गुन्हा नसतांना पण जेल झाली आहे.


आता पुढे उपाय सांगतो.


वकिलाचा सहारा घ्या, जर कोणी लोन सेटलमेंट करून देणारा असेल तर त्याची मदत घ्या, ह्यामुळेच आत्महत्या थांबतील ना कि फक्त समुपदेशनाद्वारे. पैसे तर द्यायचेच आहे त्यासाठी योग्य ती पाउले उचला मग तुम्हाला फरक जाणवून येईल. सगळ्यात मोठी शोकांतिका हि आहे कि जाती धर्माचे ठेकेदार कमी येणार नाहीत. तुम्हाला योग्य व्यक्तींद्वारेच ह्या समस्यांवर मात करावी लागेल. जर कोणी समाजसेवी वकील असेल जो सुरुवातीला मोफत सल्ला देवू शकेल, मदत करू शकेल, लोन सेटलमेंट करून देणारी व्यक्ती असेल तर त्यांनी कृपया मला संपर्क करावा जेणेकरून आपण मिळून अनेकांचा जीव वाचवू शकतो व अनेक आत्महत्या टाळू शकतो. सुरुवातीला कदाचित पैसे मिळणार नाही पण जेव्हा कर्जदार आर्थिक सुस्थितीत येतील तेव्हा नक्की ते तुम्हाला तुमची फी देवू करतील, कृपया ती फी घ्यावी कारण तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही अजून लोकांना मदत करू शकता.


ज्या लोकांचा कर्ज वसूल करणारे मानसिक छळ करत असतील तर त्यांनी मला मेसेज करे, काही समाजसेवी वकील आहेत त्यांचे क्रमांक तुम्हाला देईल व तुम्ही ह्यामधून बाहेर पडाल. समस्या असतील तर त्यावर योग्य उपाय मिळाले किंवा झाले तरच आत्महत्या थांबतील नाहीतर नाही.


जवळील मानसोपचारतज्ज्ञ कडून तुम्ही समुपदेशन करू शकता, लवकरच त्यांना भेट दया कारण जितके तुम्ही अम्न्सिक दृष्ट्या शांत रहाल, जितक्या भावना व्यक्त होतील तितके तुम्ही समाधानाचे नव नवीन मार्ग काढाल. जर माझ्याकडून ऑनलाईन समुपदेशन पाहिजे असेल तर लिंक खाली देत आहे.


https://bit.ly/3Qmvxdl


धन्यवाद

अश्विनीकुमार



“आर्थिक विकास करण्यासाठी कटू शब्द ऐकण्याची सवय लावून घ्या कारण ज्ञान त्यामधूनच मिळेल. इथे प्रोस्ताहनापेक्षा पुढचा ठेच आणि मागचा शहाणा हि म्हण कामी येते.”


अश्विनीकुमार


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

 


 “जेव्हा एखादा उद्योजक व्यवसायिक महिन्याला २० २५ लाख कमावतांना दिसत असेल तर त्याची जवळपास करोडोच्या घरात गुंतवणूक असते त्यामध्ये कर्ज देखील आले, सोबत अनधिकृत व्यवहार देखील असतात तेव्हा कुठे जावून हातात कमीत कमी २ ते जास्तीत जास्त ५ लाख येतात, सोबत करावी लागणारी उठाठेव वेगळी. जर तुमच्यात मानसिक क्षमता आहे तरच उद्योग व्यवसायात उतरा नाहीतर योग्य गुंतवणूक करून थोडे पैसे घेवून देखील सुखी समाधानी आयुष्य जगता येते. प्रोस्ताहन देणे सोपे आहे पण प्रत्यक्षात जेव्हा उतरता तेव्हा चित्र वेगळे असते.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

 

“उद्योग असो, व्यवसाय असो किंवा गुंतवणूक, चंद्र बघून पाय पसरा नाहीतर कर्जात तरी जाल आणि कर्ज वसूल करणाऱ्यांचा तकादा तुमच्या, तुमच्या कुटुंबाच्या मागे लावून घ्याल.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “उद्योग व्यवसाय आणि गुंतवणूक करतांना अतिविचार करू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल कि तुम्ही अति विचार करत आहात तेवढ्यात तज्ञांची मदत घ्या ते तुम्हाला मार्ग दाखवतील नाहीतर अतिविचाराचे रुपांतर हे डिप्रेशन मध्ये होईल. मानसिक दृष्ट्या जितके झेपते तितकाच मेंदूला ताण द्या.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0
https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :
https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “फेसबुक चा वापर करतांना योग्य करा. जर पोस्ट शेअर करण्याच्या झाल्यास स्थानिक उद्योजक, व्यवसायिकांच्या करा जेणेकरून त्यांच्या उद्योग व्यवसायाला मदत होईल.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “जगातील १० मोठ्या कंपन्या कुठल्या असे जेव्हा गुगल सर्च मध्ये टाकतो तर प्रथम क्रमांकावर वालमार्ट आणि एमेझोन आहे. वालमार्ट म्हणजे मोठे ऑफलाईन दुकान तर एमेझोन म्हणजे मोठे ऑनलाईन दुकान. एमेझोन तर भारतात आहेतच सोबत त्याने अनेक लहान मोठी दुकाने बंद करून टाकली किंवा त्यांचा धंदा बंद केला. दुसरीकडे एमेझोन मध्ये जे लघु दुकानदार होते त्यांच्यावर अल्गोरिदम द्वारे लक्ष ठेवून स्वतः उत्पादने काढून स्वस्तात विकू लागला. म्हणजे जास्तीत जास्त नफा का कंपनीकडे आणि तिथून अमेरिकेत जावू लागला. एकप्रकारे बोलायला गेल्यास मधला व्यवसायिक ज्याला आपण दलाल बोलतो ते दोघे आज जगातील सर्वोच्च कंपन्या आहेत आणि जे मेहनत करून उत्पादने बनवतात त्यांना कुठेही स्थान नाही. अश्या कंपन्यांचा आदर्श घेवू नका, त्या फक्त नफ्याकडे लक्ष देतात. अजून त्यांची काळी बाजू देखील आहे ती जगासमोर असूनदेखील त्याच्यावर इतकी चर्चा केली जात नाही. स्थानिक उद्योग व्यवसायांवर भर द्या, एक अरबोपती उद्योजक, व्यवसायिक तयार करण्यापेक्षा १०,००० लखपती उद्योजक आणि व्यवसायिक निर्माण करा. भ्रमात फसू नका.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “एक श्रीमंत व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडली तर नियम बनवण्यात आले. श्रीमंत व्यक्ती अपघात करते तर नियम मोडण्यात येतात. श्रीमंतासाठी नियम बनवले देखील जातात व मोडले देखील जातात पण दंड हा फक्त गरीब आणि मध्यम वर्गासाठी बनवला जातो.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “अनेक खाजगी कंपन्यांनी कर्मचारी निवृत्तीचे अघोषित वय हे ४० केले आहे, जर तुमची लघु उद्योग किंवा व्यवसाय असेल तर तुम्ही अश्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल व उद्योग व्यवसाय भरभराटीस नेण्यास मदत होईल.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “स्थानिक उद्योग व्यवसायांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असे अनेक उद्योजक व्यवसायिक दिसून येतील ज्यांना कर्जाची गरज आहे पण कोणीही कर्ज द्यायला तयार नाही पण त्यांच्यात क्षमता आहे कि त्यांना भांडवल भेटले कि ते परत उभे राहू शकतात तेव्हा अश्या कंपन्यांना जर तुम्ही एकट्याने किंवा समूहाने मिळून पैसे पुरवले योग्य व्याज दराने परतावा घेतला तर असे अनेक स्थानिक, छोटे उद्योजक व्यवसायिकांना तुम्ही नाव संजीवनी देवू शकतात.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


 “मित्रांचा एक समूह कुठेही उद्योग व्यवसायाची सुरुवात करू शकतो व तो वाढवत नेवू शकतो. एकदा का समविचारी मित्र एकत्र आले कि सर्व प्रगती करतात, एकमेकांना पुढे नेतात. उद्योग व्यवसाय वाढवतात नाहीतर एकपासून अनेक उद्योग व्यवसाय सुरु करतात.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


 “शेअर बाजारात पण गुंतवणूक करा पण आपल्या आजूबाजूला देखील बघा कुणाला गुंतवणुकीची गरज आहे कि नाही. तुमच्या एक गुंतवणुकीमुळे एक लहान उद्योग व्यवसाय परत सुरु होऊ शकतो आणि परतावा हा १०० % असतो. हि लोक पैसे घेवून पळून जात नाही तर जाणीव ठेवून परत करतात. १०० पैकी ५ पळून जातील, ३५ ह्या नाहीतर त्या कारणांनी अपयशी होतील पण ६० % यशस्वी होतील. इतका परतावा तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि हे छोटे उद्योजक व्यवसायिक अनेक स्थानिक उद्योग व्यवसायाला हातभार लावतात व स्थानिक ग्राहकांना उत्तम दर्ज्याच माल देतात किंवा सेवा पुरवतात.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


 “९ ते ५ नोकरी हा प्रकार उरला नाही, महागाई प्रचंड वाढली, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च वाढला ह्याचा फायदा घेवून काही लोक नोकरी सोडून उद्योग व्यवसाय सुरु करण्याच्या जाहिराती करतात व सामान्य नोकरदार वर्ग त्यामध्ये फसून पैसे वाया घालवतो. अश्या जाहिरातींच्या मायाजालात फसू नका, बचत आणि योग्य गुंतवणूक करा, मुलांना लहानपणापासून आर्थिक आयुष्याचे धडे द्या मग बघा कसे चमत्कारिक रित्या तुम्ही तुमच्या आर्थिक संकटातून बाहेर पडता व आर्थिक आयुष्यात झेप घेतात ते.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


 “चितळे व इतर उद्योजक व्यवसायिक हे गुगल येण्याच्या अगोदरपासून प्रसिद्ध होते व भले ते ऑनलाईन रजिस्टर जरी नसले तरी ग्राहकांना काही फरक पडत नाही कारण त्यांची जाहिरात हि प्रवासी लोक म्हणजे ग्राहकांपासून होते, आपल्याकडे येते ते पण पूर्ण अनुभव घेवून अनेकदा तेथून विकत घेवून घरी नेले जाते, नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांना दिले जाते, इथे कुठेही फुकट वितरण केले नाही तरीही जाहिरात उत्पादनासह झाली. हा नियम फक्त मोठ्या उद्योजक व्यवसायिकांना नाही तर लहान उद्योग व्यवसायिकांना देखील लागू होतो. प्रवासी ग्राहक त्यांची सुद्धा जाहिरात करत असतात. ऑनलाईन ला इतके महत्व देवू नका आणि उद्योग व्यवसाय सुरु करा, प्रचंड यशस्वी व्हाल.”


अश्विनीकुमार

बॅबिलोनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडून 9 मुख्य आर्थिक धडे

 









१) प्रथम स्वत: ला पैसे द्या.
२) भविष्यातील उत्पन्न सुनिश्चित करा.
३) सामान्य आयुष्य जगा.
४) तुमच्या पैशाचे रक्षण करा.
५) तुमचे पैसे गुंतवा.
६) अधिक बचत करा!
७) आपली पैसा कमावण्याची क्षमता वाढवा.
८) तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवा.
९) पैश्यांना तुमच्यासाठी काम करायला लावा.

धन्यवाद
अश्विनीकुमार