विवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची कारणे



जेव्हा जोडपे त्यांच्या समस्या घेवून येतात तेव्हा मी अगोदर त्यांना वेगवेगळे अटेंड करतो ज्यामुळे त्यांना व्यक्त होता येतात मग एकत्र. जेव्हा ते एकटे असतात तेव्हा ते मनमोकळे पणाने बोलतात व्यक्त होतात आपल्या भावना व्यक्त करतात.

जेव्हा जोडीदार एकता असताना त्यांच्या आयुष्याबद्दल सांगतो तेव्हा असे आढळून आले कि आजच्या धकाधकीच्या जीवनात, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आणि ऑफिस किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर वेळ घालवल्यामुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात. आता हे प्रमाण वाढत चालले आहे.  जोडीदाराबद्दल च्या भावना जर कमी होत असतील किंवा नसतील तर आपण समजू शकतो पण त्यामध्ये लहान मुलांचा काहीही दोष नाही.

असे अनेक वैवाहिक जोडीदार बघितले जे कामात आणि करिअर मध्ये इतके व्यस्त असतात कि ते घरीच मुल झोपल्यानंतर येतात. काही तर कामानिमित्त भ्रमंतीवर असतात. त्यांना सेक्स केला कि नाही हे देखील माहिती नसते आणि मुल कुणाची आहे हे देखील. त्यांचे काम असते पैसा कमावणे आणि घरी खर्चासाठी मुलांना क्रेडीट कार्ड देणे.

अगोदर हे प्रमाण जे उच्च पदावर होते, जे मालक होते त्यामध्ये दिसून येत होते पण जस जसे कामगार कायदे शिथिल झाले, कामाचे तास वाढले, नोकरीची शास्वती राहिली नाही आणि कार्यालयापासून लांब घर असल्यामुळे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण हे मध्यम वर्ग आणि गरीब लोकांमध्ये देखील वाढले. आता कुणाला फुरसतीचा वेळ उरला नाही आणि नाही इतरांच्या आयुष्यात झाकू शकतात. एकाच इमारतीमध्ये एक सकाळी कामाला जातो तर दुसरा दुपारी आणि तिसरा संध्याकाळी. सुट्टी देखील रविवारची नाही तर कधीही दिली जाते त्यामुळे शेजार संबंध जुळूनच येत नाही.

स्थानिकांचे प्रमाण कमी झाले आणि परप्रांतीयांचे प्रमाण वाढले जे इथे पैसा कमावण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी आलेले असतात. त्यांना ओळखणारे कोणी नसते त्यामुळे ते विवाह झाला असला तरी विवाहबाह्य संबंध ठेवतात. त्यांना माहिती असते कि मुंबई मध्ये ते पैसे कमवायला आलेले असतात व इथे काहीही झाले तरी ते त्यांच्या मूळ राज्यात परत जावू शकतात. एक स्त्री किंवा पुरुष किती वेळा नाही बोलेल? शेवटी काही त्यांच्या जाळ्यात फसतातच.

विवाहबाह्य संबंधामध्ये आता वयाची देखील अट राहिली नाही त्यामुळे नक्की काय चालले आहे ते देखील समजून येत नाही. कॉलेज च्या मुलामुलींचे देखील विवाहित लोकांसोबत संबंध आहेत. वय नातेसंबंध हे सर्व बाजूला सारले गेले. जोडीदार भेटत नाही म्हणून नात्यांमध्ये लग्न झालेली काही उदाहरणे आढळून आली.

नात्यांमध्ये देखील विवाहबाह्य संबंध आढळून आले. हे सहसा समजून येत नाही आणि उघडकीस देखील येत नाही. कारण सर्वांना ते एकमेकांचे नातेवाईक आहेत असाच भास होतो. सम वय किंवा थोडेफार वयामधील अंतर असते, भाऊ बहिण आहेत असे सांगतात किंवा इतर जे काही नाते असेल ते पण त्यांचे प्रेमप्रकरण सुरु असते. तेव्हा जोडीदाराला जास्तच मानसिक धक्का बसतो जेव्हा त्याला समजते कि आपल्या वैवाहिक जोडीदाराचे त्याच्याच ज्याला किंवा जिला ते भाऊ बहिण मानत असतात त्यांच्यासोबत संबंध आहेत.

पुरुष हेट्रोसेक्शुल जरी असाल तरी तो सहसा समलिंगी संबंध ठेवत नाही किंवा त्यांचे तसे करण्याचे प्रमाण कमी असते पण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात भले ते हेट्रोसेक्शुल असले तरी समलिंगी आकर्षण दिसून येते. अनेकदा स्त्रिया ह्या जेव्हा मैत्रिणीकडे वेळ घालवतात तेव्हा काही स्त्रिया ह्या समलिंगी संबंध ठेवतात किंवा आकर्षित होतात. नवरा जेव्हा पकडतो तेव्हा त्याला वाटते कि त्याची बायको हि समलिंगी आहे पण असे नसते, नैसर्गिक आहे, कारण स्पष्ट नाही. अनेकदा अश्या प्रकारचे विवाहबाह्य संबंध देखील निर्माण होतात.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. विवाहबाह्य संबंधांची कारणे हि बदलत जातात. ह्यामध्ये मुख्य कारणे शारीरिक आणि मानसिक गरज पूर्ण न होणे हे आहे. सोबत पैसा देखील महत्वाचा आहे. आताच्या काळात स्त्रियांकडे पैसे देखील आहे व ते त्यांच्या पायवर देखील उभ्या आहेत त्यामुळे अनेकदा त्या स्वतः निर्णय देखील घेतात. धाडस देखील दाखवतात. अनेकदा स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त धाडसी दिसून आल्या आहेत आणि त्या नैसर्गिक आहेत देखील कारण मुलांना सांभाळायचे काम देखील त्यांचेच असते म्हणून त्यांना निसर्गाने धाडसी बनवले आहे.

माझे म्हणणे इतकेच आहे कि कुणाचा जीव ह्या अश्या संबंधामुळे जाता कामा नये आणि मुलांची फरफट होता कामा नये, बाकी निर्णय तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीने घेतलेला बरा. कृपया अश्या नाजूक संबंधांच्या वेळेस तज्ञांची मदत घेत जा, समुपदेशन करत जा ह्यामुळे आपण टोकाचे पाउल उचलत नाही व योग्य निर्णय घेतला जातो.

लोक अनेक समस्यांमधून जात असतात आणि त्यांना वाटते कि ते एकटेच आहे पण असे काही नसते, तुमच्यासारख्या समस्या ह्या अनेकांना आहेत फक्त तुम्हाला महिती नाही कारण चार भिंतीच्या गोष्टी कधीही बाहेर येत नाही किंवा आणत नाही पण मनातल्या मनात झुरत जातात. असे झुरण्यापेक्षा त्या भावनांचा निरचा केलेला बरा. इथे समुपदेशन आणि आकर्षणाचा सिद्धांत खूप प्रभावशाली काम करतो, तुम्हाला अश्या समस्यांमधून बाहेर काढतो आणि सोबत संमोहनाचे उपचार घेतले तर अजून प्रभाव पडतो.

अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : Balak Palak Children Parents

आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करून शस्त्रक्रिया यशस्वी कशी करायची व पुढील शस्त्रक्रिया आरोग्यदायी जीवनशैलीने कसे टाळायचे व आपले लाखो रुपये कसे वाचवायचे?



आताच्या काळात तुम्ही बघितले असेल कि एकदा का आजारपण झाले कि लाखो रुपये कसे निघून जातात तेच समजत नाही. आणि जर परत आजारपण झाले आणि शस्त्रक्रियेची गरज पडली कि ते संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येण्याची शक्यता नाही तर शास्वती असतेच, प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थिती वर अवलंबून आहे. पैश्याचे सोंग कोणीही घेवू शकत नाही. विश्वास नसेल तर कधी सरकारी हॉस्पिटल मध्ये काही दिवस घालवा तेव्हा समजेल.

ठीक आहे व्यक्ती चुकते, ती स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष्य देत नाही, किंवा जगण्याच्या दगदगीमुळे तिला वेळ भेटत नाही म्हणून तिला आजरपण बळावतो व शेवटी डॉक्टर बोलतो कि ऑपरेशन ला पर्याय नाही. तुम्हाला इतके लाख रुपये जमा करावेच लागतील आणि ज्या गरिबांसाठी स्कीम्स असतात तिथे गर्दी बघाच तेव्हा तुम्हाला वास्तव समजेल.

ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना काही लाख रुपये गेल्यावर काहीही फरक पडत नाही, ज्यांच्याकडे लाखो करोडो रुपयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे त्यांना काही फरक पडत नाही पण अश्या लोकांना तणाव, नैराश्य आणि चिंता ग्रासते कारण त्यांच्याकडे पैसा असला तरी ते मनुष्य प्राणीच आहेत, फक्त पैश्यांमुळे त्यांचे शरीर आणि भावना ह्या बदलत नाही. निसर्गाला आणि आजारपणाला सर्व समान आहे, ते जात, धर्म, भाषा, प्रांत आणि इतर मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले भेदभाव मानत नाही, नियम सर्वांना एकसारखेच.

डॉक्टर आपल्याला आजारी पाडत नाही तर आपण अनेकदा आपल्या चुकीमुळे किंवा नकळत झालेल्या चुकीमुळे आजारी पडतो. त्यामधून आपण बरे देखील होऊ शकतो किंवा आपले आयुष्य वाढवू शकतो.

पण अंतरमनाची शक्ती इतकी प्रचंड आहे कि ती चमत्कार घडवू शकते.

मानसिक दृष्ट्या सक्षम बनणे, म्हणजे ध्यान, मंत्र साधना ह्यांचा वापर करणे, ह्यामुळे आपण आपली मानसिक शक्ती वाढवतो व आपला मेंदू शरीराला रोग बरे करण्याचा आदेश देतो. व्यायाम मग तो कसलाही असो त्याचा देखील आपण वापर करतो. पथ्य पाळणे म्हणजे नैसर्गिक खाण्याच्या सवयी लावून घेणे व आपल्या जिभेवर ताबा ठेवणे ह्यामुळे देखील प्रचंड फायदा होतो. आरोग्याविषयी चे सर्व तज्ञ हाच सल्ला देतात.

कृपया सर्व साधना ह्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा, घरगुती उपचार करू नका नाहीतर तुम्ही अजून समस्या वाढवाल.

हिलिंग चा वापर करून आपण आपले तेजोवलय वाढवू शकतो. आपला औरा सक्षम करू शकतो. ह्याचा फायदा देखील होतो ज्यामुळे तुम्ही डॉक्टर कडे गेल्यावर तुम्हाला बरे वाटायला लागते हा झाला डॉक्टरांचा औरा आणि त्याचा परिणाम. डॉक्टर अजाणतेपणे तुमची हिलिंग करत असतात व सोबत शस्त्रक्रिया देखील करत असतात ज्यामुळे आपण ठणठणीत होतो.

अनेकदा रुग्ण बोलतात देखील कि मी आता वाचणार नाही पण ते ठणठणीत होवून बाहेर येतात. ह्याला बोलतात प्राणउर्जेची शक्ती. प्राणउर्जा तुम्हाला जिवंत ठेवत असते. कितीही मोठ्या आजारपणामध्ये तुम्हाला जिवंत ठेवते व तुमचे शरीर ठीक करण्याचा प्रयत्न करत असते.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह हे आजार आपल्याकडील पैसा तर काढतोच पण सोबत प्रचंड मानसिक शारीरिक ताण तणाव देखील देतो ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हे तणाव आणि नैराश्यात जाते. पैसा तर जाणारच असतो पण आपण पैसे कमावण्यासाठी जे काम करतो त्यामध्ये देखील लक्ष्य लागत नाही आणि ह्यामुळे पैसे येण्याच्या मार्गात देखील अडथळे निर्माण होतात. दोन्ही बाजूंनी कोंडी होते.

आकर्षणाचा सिद्धांत वैज्ञानिक आणि अध्यात्मिक मार्गाने वापरता येतो, ह्याचा फायदा फक्त रुग्णांना नाही तर त्यांच्या कुटुंबालाही होतो. कुटुंबातील सदस्य देखील घरी आजारपन बघून स्वतः मनोशारीरिक आजार निर्माण करतात व त्याचे रुपांतर शारीरिक आजारात करतात. इथे जर योग्य उपाय किंवा उपचार केले तर सर्वांना त्याचा फायदा होतो.

अंतरमन बोला निसर्ग बोला किंवा आत्मा हा आपल्याच शरीराचा एक भाग आहे. हाच आपल्या शरीरातील एक भाग आपले शरीर सुदृढ करतो व त्याचा आपल्याला फायदा होतो. फक्त आर्थिक नाही तर सर्वांगीण आयुष्य सुखकर करून टाकतो.

कुठलीही उपचार पद्धती असू द्या तिचा उद्देश हाच असतो कि काहीही करून तुम्हाला बरे करणे त्यामुळे तुमच्या चालू असलेल्या वैद्यकीय उपचारासोबत तुम्ही इतर उपचार पद्धतीचा वापर करू शकता.

समुपदेशन, ध्यान, स्पर्श चीकीस्ता आणि संमोहन ह्या उपचार पद्धतीचा लोकांना प्रचंड फायदा झाला आहे. अनेकांना सकारात्मक रिझल्ट्स आले आहेत. अनेकांचे पैसे वाचले आहे. ह्याचा फायदा फक्त रुग्णांनी नाही तर डॉक्टर, रुग्णांचे कुटुंबीय ह्यांनी घेतलेले आहेत.

मी घरगुती उपचार ह्यासाठी नाही बोलत कारण अनेकांनी घरगुती उपचार करून त्यांच्या समस्या वाढवल्या आहेत व शेवटी त्यांना हॉस्पिटलमध्ये भारती व्हावेच लागले, काही हजारांसाठी त्यांनी त्यांचा लाखोंचे आणि शरीराचे नुकसान करून घेतलेले आहेत.

जर तुम्ही देखील अश्याच समस्यांमधून जात असाल तर आजच संपर्क करा.

धन्यवाद

अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक :

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या कारणांनी लोक आकर्षित केली तेच जर कारण नसेल तर ती लोक तुम्हाला सोडून जातात मग ती घरची असो किंवा बाहेरची.



जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांनी लोकांना आकर्षित केले ती लोक तेव्हा तुम्हाला सोडून जातात जेव्हा भावना ह्या दुभंगतात, अडथळे निर्माण होतात, भावनांची गरज संपते तेव्हा लोक तुम्हाला सोडून जातात.

जेव्हा तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ते तुम्हाला तेव्हा सोडून जातात जेव्हा तुम्ही कंगाल होता, कुठल्या आर्थिक संकटात सापडतात किंवा त्यांची गरज संपते तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात.

जेव्हा तुम्ही तुमच्या यशाने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातात जेव्हा तुम्ही सपशेल अपयशी होतात किंवा त्यांची गरज संपते.

जेव्हा तुम्ही सुंदरतेने देखणेपणाने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातात जेव्हा तुम्ही सपशेल अपयशी होतात किंवा त्यांची गरज संपते.

तुम्ही कुठल्याही कारणांनी आकर्षित केलेले असाल किंवा ते झालेले असतील तर ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातील जेव्हा त्या आकर्षित गुणांमध्ये समस्या निर्माण झालेली असेल किंवा त्यांची गरज संपली असेल.

संकटात सापडल्यावर सोडून जाणार्यांमध्ये घरच्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. कुठलेही नातेसंबंध तोडायला पाठीपुढे बघत नाही.

जे गरजेपुरते आकर्षित झालेले असतात ते जर जास्त वापर न करता निघून गेले तर ठीक आहे पण जर पार तुमचा आणि तुमच्या आयुष्याचा चोथा करून टाकला असेल तर कोणीही काहीही करू शकत नाही.

ज्यांच्या आयुष्याचा लोक वापरून वापरून चोथा करतात त्यांना आयुष्यभर गुरु किंवा तज्ञ लोकांच्या सानिध्यात रहावे लागेल, जर ५० % आयुष्याचा चोथा झाला असेल तर गुरु किंवा तज्ञ ह्यांची दीक्षा घ्यावीच लागेल. कुठलाही पर्याय नाही.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज :

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

मराठी समाज श्रीमंत होण्यासाठी किंवा श्रीमंत समाजात गणना करण्यासाठी तरुणांनी कुठल्या उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात उतरले पाहिजे?



मुकेश अंबानीच्या श्रीमंतीचे काही रहस्य नाही आहे. खालील पहिल्या १० क्रमांकाच्या कंपन्या बघा (वर्ष २०१८) :

१) कंपनीचे नाव - इंडियन ऑईल कार्पोरेशन
मालकी हक्क - भारत सरकार
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल - ४,२४,३२१ करोड

२) कंपनीचे नाव - रिलायन्स इंडस्ट्रीज
मालकी हक्क - मुकेश अंबानी
उद्योग क्षेत्र - विविध (मुख्य ऑईल आणि गॅस रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल)
महसूल - ४,१०,२९५ करोड

३) कंपनीचे नाव - ऑईल एंड नेचरल गेस कार्पोरेशन
मालकी हक्क - भारत सरकार
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल - ३,३३,१४३ करोड

४) कंपनीचे नाव - स्टेट बँक ऑफ इंडीया
मालकी हक्क- भारत सरकार (६१.२३)
उद्योग क्षेत्र - बँकिंग आणि फायनान्स
महसूल - ३,०६,५२७ करोड

५) कंपनीचे नाव - टाटा मोटर्स
मालकी हक्क - टाटा समूह
उद्योग क्षेत्र - ऑटोमोबाईल
महसूल - ३,०१,१७४ करोड

६) कंपनीचे नाव - भारत पेट्रोलियम
मालकी हक्क- भारत सरकार (५४.९३)
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल - २,३८,६३८ करोड

७) कंपनीचे नाव – हिंदुस्तान पेट्रोलियम
मालकी हक्क - भारत सरकार (५१.११)
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल – २,२१,६९३ करोड

८) कंपनीचे नाव – राजेश एक्सपोर्ट
मालकी हक्क – राजेश आणि प्रशांत मेहता
उद्योग क्षेत्र – खाण उद्योग
महसूल – १,८७,७४८ करोड

९) कंपनीचे नाव – टाटा स्टील
मालकी हक्क – टाटा समूह
उद्योग क्षेत्र – स्टील आणि लोह खनिज उद्योग
महसूल – १,४७,१९२ करोड

१०) कंपनीचे नाव – कोल इंडीया
मालकी हक्क – भारत सरकार
उद्योग क्षेत्र – कोळसा खाण उद्योग
महसूल – १,३२,८९७ करोड

वरील यादी हि जास्त महसूल असणाऱ्या उद्योगांची आहे. इथे सरकारी आणि खाजगी दोन्ही उद्योग आहेत. जे खाजगी उद्योजक आहेत त्यांनी जे क्षेत्र निवडले आहे ते जगभरामध्ये ज्या उद्योग क्षेत्रांचा दबदबा आहे ते निवडले आहे, जास्त पैसा देखील तिथेच आहे आणि फक्त पैसा नाही तर पावर देखील तिथेच आहे.

मराठी तरुणांनो वाळवीसारखे ह्या सरकारी कंपन्यात घुसा. उच्च पदे आपल्या हातात घ्या. मराठी लॉबी तयार करा. कुठलाही भेदभाव ठेवू नका जेणे करून फोड आणि झोडा तंत्र वापरून आपल्याला परत पाठी खेचले जाईल. वेळ पडल्यास स्वतःची राजकीय पार्टी स्थापन करा जेणेकरून ह्या उद्योगासंदर्भातील सर्व शासकीय यंत्रणा आपल्या हातात येईल. उत्तर, दक्षिण, जात आणि धर्म ह्यामध्ये मराठी समाजाला भरडू देवू नका.

वर जे दोन तीन खाजगी उद्योजक आहे त्यांचा आदर आहेचच पण इतिहास साक्ष आहे कि प्रत्येकाला राज्य स्थापन करायचा आणि आपल्या राज्याचा विस्तार करायचा अधिकार आहे. सर्वांनाच परप्रांतीयांची गुलामी मान्य नाही. काल आपले राज्य होते, आज त्यांचे आणि उद्या परत आपले येईल जेव्हा आपण त्या दिशेने प्रयत्न करू.

इथे भावनेला थारा नाही. त्यांच्यासाठी इतर सर्व मार्ग उपलब्ध आहे. फक्त आणि फक्त समविचारी लोक. भावनेचा आदर करा. इथे कोणी कुणाला रोखत नाही आहे. तुम्ही तुमचे आयुष्य जगा आम्ही आमचे आयुष्य जगू.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज :

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

गणेशोत्सव मुळे तुमच्या शरीरात, घरात, कार्यालयात आणि परिसरात निर्माण झालेली सकारात्मक उर्जा हि जतन करून ठेवा



गणेशोत्सव मुळे तुमच्या शरीरात, घरात, कार्यालयात आणि परिसरात निर्माण झालेली सकारात्मक उर्जा हि जतन करून ठेवा. सकारात्मक उर्जा तुमच्या अनेक समस्या दूर करते आणि नवीन येणाऱ्या संकटे आणि समस्यांना थोपावते किंवा नष्ट करते.

नकळत मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते, कौटुंबिक वाद विवाद निवळले जातात, नातेसंबंध सुधारतात, शैक्षणिक प्रगती होते, वैवाहिक आयुष्य सुधारते, वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात, आर्थिक समस्या दूर होतात, उद्योग व व्यवसाय भरभराटीला येतात, कोर्ट कचेरी मधील समस्या दूर होतात, विवाहासाठी मनासारखा जोडीदार भेटतो, वंध्यत्वावर मात करता येते, लैंगिक समस्या दूर होतात, असे अगणित सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात होतात.

मूळ मुद्दा हा आहे कि हि सकारात्मक उर्जा पुढील गणेशोत्सव पर्यंत टिकवून ठेवायची कशी? बाकीचे देखील सन येतात त्यांचे काय?

आपण फरफटत सर्व सणांच्या मागे जात राहिलो तर आपण त्या सणातून निर्माण होणारी सकारात्मक उर्जा हि साठवून ठेवत नाही, आपण सुरवातच करत नाही. तिचा लगेच वापर करून संपवून टाकतो व नंतर नकारात्मक उर्जा प्रवेश करते.

कुठेतरी साठवणूक करायला त्यावर लक्ष ठेवायला सुरवात तर केली पाहिजे. कारण जर एखाद्या सणापासून तुम्ही सकारात्मक उर्जा साठवायला सुरवात केली आणि जेव्हा जेव्हा बाकी सण येत जातील तस तसे साठवण्याचे सोडून तुम्ही सतत किती उर्जा आहे हे बघत जाल तर ती उर्जा नकारात्मक होते व एकप्रकारे तुमच्यात देखील नकारात्मक भावना निर्माण व्हायला लागते.

एकदा का तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली कि कुठलेही उपाय तुमच्यावर काम करत नाही, भले मग तुम्ही अघोरी उपाय का करेनात.

आपल्याला स्वतःला असे तयार करायचे आहे कि कुठलेही उपाय केले तरी त्याचा सकारात्मक परिणाम होईल. त्यासाठी निसंदेह विश्वास लागतो. मी इथे अंधश्रद्धा नाही बोलत कारण अंधश्रद्धा ठेवली तर विज्ञानाचा वापर करून कोणी तुमची किडनी देखील चोरू शकतो, प्रत्येक वेळेस अध्यात्मिक गुरूंना लक्ष्य करू शकत नाही.

जसे जिथे देव असतो त्या मंदिरात गेल्यावर आपल्याला बरे वाटते तसेच देव घरी आल्यवर देखील वाटते. मंदिराचा परिसर आणि आणि आपले घर हे दोन्ही एकसारखे होवून जाते.

आपण सकारात्मक राहण्यासाठी, घर, ऑफिस, येथील वातावरण फक्त सणासुदीला सकारात्मक करू शकत नाही, बाकी चे दिवस देखील जगायचे आहे मग ते सकारात्मक का जगू नये?

परत नकारात्मक आयुष्यात का जायचे? घरी नकारात्मक वातावरण का निर्माण करायचे? परत १ वर्ष वाट का बघावी? हेच चक्र सतत सुरु ठेवायचे कि ह्यामध्ये बदल घडवायचे?

त्यापेक्षा सकारात्मक चक्र सुरु का ठेवू नये?

तुम्हाला फक्त एकदा ह्या सकारात्मक चक्राला धक्का देवून सुरु करायचे आहे त्यानंतर त्याला मध्ये मध्ये थोडी गती देत जायची आहे. जो पर्यंत चक्र आपो आप चालत नाही तो पर्यंत गती देत जायची आहे. तुमच्या समस्येनुसार चक्र आपोआप चालू व्हायला ३ महिने देखील लागू शकतात किंवा ३ वर्षे देखील पण नंतर तुम्ही जे काही आयुष्य जगाल ते सकारात्मकच असेल.

ध्येयाची साधी व्याख्या आहे कि जी व्यक्ती ध्येयाशी एकनिष्ठ असते, ध्येय साध्य होईल ह्यावर संदेह घेत नाही, तन, मन धन अर्पण करते त्या व्यक्तीला ध्येय प्राप्त होतेच. जर तुमची मानसिकता आणि कृती अशी असेल तरच तुम्ही तुम्हाला पाहिजे ते म्हणजे अगदी पाहिजे ते साध्य करू शकता.

कोणी कोणी काय काय साध्य केले आहे ह्याचे उदाहरण देत बसणार नाही. तुम्ही अनुभव घ्या, त्या परिस्थितीत जगा. इतरांनी साध्य केले आहे त्याचे फळ त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटेल ना कि तुम्हाला.

उर्जा शास्त्र हे खूप शक्तिशाली आहे. कृपया घरी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जे काही करायचे असेल ते करा. उपाय सोपे आणि प्रभावशाली आहे. नाही बोलले तरी अनेकांना पुढच्या क्षणी बदल जाणवायला लागले आहे.

मी इथे उपाय काय करायचे ते सांगत नाही आहे. त्यासाठी तुम्ही व्हास्टएप कराल. शुल्क लागू असतील. तुम्हाला लवकर करावे लागेल कारण गणपती गेल्यानंतर आपल्याकडे ठराविक कालावधी उरतो त्यामध्ये आपल्याला सर्वकाही करायचे आहे. इथे आळशीपणा घातक ठरू शकतो.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

धन्यवाद

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay 

सामान्यतः जगभरातील लोकांमध्ये आढळून येणारे १० प्रकारचे फोबिया (अकारण भीती)



१०) मायसोफोबिया (Mysophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये धूळ आणि घाणीमध्ये असणारे किटाणू जीव जंतू ह्यामुळे आजारी पडू शकतो म्हणून ती व्यक्ती सतत स्वतःला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते, त्या धुळीमध्ये असणाऱ्या जीवजंतू ची इतकी भीती जडलेली असते कि ती व्यक्ती अनेकदा हात धूत बसते.

९) अ‍ॅगोराफोबिया (Agoraphobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्यांना घराबाहेरील ठराविक ठिकाणांचे वातावरण हे असुरक्षित वाटते. हे सहसा घरी राहणे पसंद करतात आणि बाहेर गेले तरी सतत ते भीतीच्या छायेखाली वावरत असतात.

८) सोशल फोबिया (Social Phobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला समाजात चार चौघात वावरण्याची भीती वाटत असते म्हणून हि व्यक्ती सहसा चार चौघात मिसळत नाही. चार चौघात वावरताना लाज आणि भीतीच्या ओझ्याखाली दबलेली असते. तिला प्रकाशझोतात यायला किंवा येण्याची भीती वाटत असते. चार चौघात आल्यावर आपल्याकडून अशी कृती घडेल ज्यामुळे लाजिरवाणे वाटेल किंवा समोरच्या व्यक्ती ह्या अपमान करतील ह्या भीती च्या छायेखाली ते वावरत असतात. लाजाळूपणा, दरदरून घाम फुटणे, तोतडे बोलणे आणि थरथर कापणे हि लक्षणे ह्या लोकांमध्ये दिसून येतील. काही परिस्थिती मध्ये भीतीचा झटका देखील येवू शकतो.

७) ट्रिपानोफोबिया (Trypanophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारात व्यक्तीला अश्या वैद्यकीय प्रक्रियेची भीती वाटते ज्यामध्ये इंजेक्शन आणि सलाईनच्या च्या सुयांची भीती वाटते. ट्रिपानोफोबिया आजाराची सीमा तेव्हा गाठली जाते जेव्हा त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचाराची सक्त गरज असते आणि ती इंजेक्शन घ्यायला, सलाईन लावायला नकार देत असते. दरदरून घाम फुटणे, मळमळने, हृदयाचे ठोके वाढणे आणि अति टोकाचे लक्षण म्हणजे बेशुद्ध होणे हे आहे.

६) एस्ट्रोफोबिया (Astraphobia) - ह्या मानसिक भीती मध्ये व्यक्तीला कडकडणारी वीज आणि ढगांचा गडगडांची भीती वाटते. मनुष्य प्राणी आणि इतर प्राण्यांमध्ये देखील हि भीती आढळून येते. कुत्रे आणि मांजरीमध्ये ह्या भीतीचे जास्त प्रमाण आढळून येते. धोका कमी असला तरी व्यक्तीमध्ये मळमळने, रडणे, भीतीने थरथर कापणे दरदरून घाम फुटणे, सतत लघवीला येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे हि लक्षणे दिसून येतात. जेव्हा व्यक्ती एकटी असते तेव्हा त्या ह्या आजारपणाची तीव्रता अजून वाढून येते. ढगांच्या गडगडातीत सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला तरी ते कानावर हात ठेवून डोके खाली ठेवून बसून जातात. घरी असतील तर ते पलंगाखाली लपून बसतात. घराबाहेर निघण्यापूर्वी ते हवामानाचा अंदाज घेतात. विजेचा आणि ढगांच्या गडगडाटाच्या सतत संपर्कात येवून प्रतिकारशक्ती निर्माण होते.

५) सायनोफोबिया (Cynophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला कुत्र्यांची भीती वाटते. कुत्र्यांचा फोटो बघून देखील भीती वाटते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्या भीतीचे प्रमाण जास्त आढळून येते. मोठ्यांमध्ये हा आजार जेव्हा ते लहान असतात तेव्हा जडला जातो. अनेकदा कुत्रा चावल्यामुळे किंवा तश्या कथा ऐकल्यामुळे देखील हा आजार निर्माण होतो.

४) एरोफोबिया (Aerophobia) - ह्या मानसिक आजारामध्ये व्यक्तीला विमानप्रवासाची भीती वाटते. विमान किंवा हेलिकॉप्टर ने प्रवास करायचा आहे हे फक्त ऐकल्यावरच त्यांना चिंता आणि भीती ग्रासते. ते अवकाशातून प्रवास करायचे टाळतात. ह्या आजाराच्या तीव्रतेची लक्षणे हि उलटी, भीतीचा झटका हि आहेत. जेव्हा विमानाने कुठे जायचे ठरवले कि ते चिडचिड करतात अस्वस्थ होतात. सततच्या विमानप्रवासाने एरोफोबिया ह्या भीतीच्या मानसिक आजारावर मात करता येते. संमोहनाने देखील ह्या आज्रावर मात करता येते.

३) अ‍ॅक्रोफोबिया (Acrophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला उंचीची भीती वाटते. ह्या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती हि जेव्हा एखाद्या उंच ठिकाणी जायचे बोलल्यास चिंता आणि भीतीने ग्रासून जाते. जरी जास्त उंच जागा नसली तरी ह्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला जास्त भीती वाटू शकते. पडण्याच्या विचारामुळे भीती वाटायला सुरवात होते, जेव्हा जमिनीवर येतात तेव्हा सगळे सर्वसामान्य होवून जाते. जेव्हा ह्य मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती हि उंच ठिकाणी असते तेव्हा तिच्यात दरदरून घाम फुटणे, भीतीचा झटका येणे, हृदयाचे ठोके वाढणे हि लक्षणे तर आदळतात पण जीव जाण्याचा देखील धोका असतो. संमोहन, स्पर्श चीकीस्ता आणि समुपदेशन ह्याद्वारे ह्या आजारावर मात करता येते.

२) ओफिडिओफोबिया (Ophidiophobia) - ह्या मानसिक आजारामध्ये सापांची भीती वाटते. त्यांना साप चावण्याची भीती वाटत असते. हि भीती सर्वसामान्यपणे जास्त लोकांमध्ये आढळून येते. तीन पैकी एक व्यक्ती हि ओफिडिओफोबिया ने ग्रस्त आहे. ह्या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती हि फक्त खरा साप बघून घाबरत नाही तर व्हिडीओ फोटो बघून देखील ती व्यक्ती घाबरते. हि भीती लहान मुलांपेक्षा वयस्कर लोकांमध्ये जास्त आढळून येते. लहान मुल तर सापांसोबत खेळताना आढळून येतील.

१) अ‍ॅरेनोफोबिया (Arachnophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला कोळी ची भीती वाटते, फक्त कोळी नाही तर त्याप्रकारातील जीव प्राणी म्हणजे विंचूची देखील भीती वाटते. हि भीती देखील सर्वसामान्य आहे. कोळी किंवा त्या प्रजातीतील जीव दिसल्यास भीतीचा झटका, बेशुद्ध पडणे, दरदरून घाम फुटणे, रडणे आणि ओरडणे हि लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणात फक्त चित्र बघितले तरी भीती वाटायला लागते. घर जाळण्यापर्यंत देखील त्यांची मजल जाते किंवते पावले उचलतात. अशी व्यक्ती कोळींना टाळण्यासाठी लांब पल्ल्याचा रस्ता देखील पकडेल. संमोहन आणि स्पर्श चीकीस्तेद्वारे आपण ह्या आजारावर मात करू शकतो.

भीती हि सर्वसामान्य आहे आणि नैसर्गिक देखील आहे. आपल्यामध्ये कुठला तरी भीतीचा आजार आहे ह्यामुळे न्यूनगंड बाळगायचे काही कारण नाही. झुरळ, उडते झुरळ आणि गोम ह्यांच्याशी माझा छत्तीस चा आकडा आहे. आणि हे सर्वांना माहिती देखील आहे त्यामुळे कोणी चिडवले असेल असे मला आठवत नाही. ह्यावरून एकदा ब्रेकअप देखील केला होता.

भीतीचा मानसिक आजार आपल्याला केव्हा जडतो जेव्हा आपण भीतीने गांगरून जातो, शरीरात बदल होतात तेव्हा आपण समजू शकतो आपल्याला भीतीच्या आजाराने ग्रासलेले आहे. तेव्हा तुम्हाला त्या भीतीच्या आजारावर मात करण्यासाठी उपचार घ्यावे लागतील. संमोहन आणि स्पर्श चीकीस्ता ह्यामध्ये उत्तम काम करताना आढळून येते.

भीती फक्त हीच नाही तर विविध प्रकारच्या भीती आहेत त्यामध्ये आपण मात करू शकतो. जर तुम्ही देखील भीतीच्या आजाराने ग्रस्त असाल तर आजच संपर्क कराल, आपण तो आजार आरामात दूर करू शकतो आणि हे मी ज्यांच्यावर उपचार केलेले आहेत त्यांच्या अनुभवावरून बोलत आहे.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

नकारात्मक आई वडील आणि नकारात्मक वातावरणात वाढणाऱ्या मुलांना कश्या प्रकारे त्रास सहन करावा लागतो?



आपल्या भारतात आई वडिलांना देवाची उपमा दिलेली आहे आहे देवाचा दर्जा देखील पण लोक हे विसरतात कि ते देखील मनुष्यच आहे.

जी मुलं लहानपणापासून आई वडिलांचे सकाळ दुपार आणि संध्याकाळ भांडणे बघत असतात त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

काही घरात जोडपे आपल्या लहान मुलांसमोर मारामारी करतात, एकमेकांना शिव्या देतात तेव्हा मुलांवर काय प्रभाव होत असेल?

घरी मुल किंवा मुले असून देखील ते दुर्लक्षित राहतात त्यांच्यावर काय प्रभाव होत असेल?

मानसिक आणि शारीरिक छळ तर सामान्य आहे पण काही घरात लैंगिक छळ देखील केला जातो तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

स्वतःच्या मुलांना टाकून बोलले जाते आणि नातेवाइकांच्या, शेजाऱ्यांच्या मुलांना डोक्यावर घेतले जात असेल तर त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

काही घरात तर असे आढळून आले कि आई वडील दोन्ही किंवा दोन्हीपैकी एकाला मुलं नको असते तेव्हा अनेकदा त्यांना बोलून दाखवले जाते आणि ते देखील कोवळ्या वयात, अश्या वेळेस मुलांवर किती खोल आघात होत असेल?

काही आई वडील तर न एकूण घेता रागवायला सुरवात करतात. ह्यामुळे न्युनगंड निर्माण होतो, भीती निर्माण होते, तणाव नैराश्यात जातात, नवीन काही करायला घाबरता. अशी मुल त्या घरात कशी वाढली असतील?

जर मानसिक रुग्ण असतील तर त्यांनी आपल्या मुलांना कसे वाढवले असेल?

अति राग, अति काळजी किंवा कुठल्याही भावनांचा अतिरेक हा मानसिक आजारच आहे आणि ह्या सर्व नकारात्मक रुपात आपल्या मुलांवर काढल्या जातात तेव्हा विचार करा कि त्या घरात मुलं कशी वाढत असतील?

मुलांसमोर विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवले जातात, मुलं बाहेर गेल्यावर सभ्यतेचा बुरखा पांघरलेला समाज हा त्यांना चिडवत असतात, टोमणे मारतात, अश्लीश शब्द वापरतात तेव्हा त्या मुलांवर कसा परिणाम होत असेल?

मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळ होत असून देखील त्यांना शेजाऱ्यांच्या घरी, नातेवाइकांकडे किंवा ओळखीच्या व्यक्तीकडे सोडून जातात व आल्यावर मुलांची विचारपूस देखील करत नाही अश्या मुलांची मानसिकता कशी झाली असेल?

लहान किंवा मोठ्या भावंडांमध्ये घरी राजकारण चालत असेल आणि ज्याची चूक नसेल तरीही त्यालाच शिक्षा दिली जात असेल तर त्याच्या मानसिकतेवर किती मोठा आघात होत असेल?

घरचे सोडून जात, धर्म, इतिहास आणि राजकारण करत बसत मुलांकडे दुर्लक्ष्य करतात आणि सर्व दोष इतर जात, धर्म आणि राजकीय पार्टीला देत बसतात. त्यांना इतिहास माहिती असतो पण मुलांना काय पाहिजे हे माहिती नसते.

दुसऱ्या जातीधर्माचे कधी घरी आले नाही आणि वाईट केले नाही, स्वतःच्या चुकीच्या निर्णयांचे खापर त्यांच्यावर फोडले जाते आणि घरी मुलांना देखील लक्ष्य केले जाते मग त्या मुलांना कसे वाटत असेल?

मुलांना जन्म द्यायचा कि नाही हे सर्वस्वी आई वडिलांवर अवलंबून असते. कारण ते मोठे असतात अनुभव आलेला असतो. नंतर जन्माला आलेले बाळ हे सर्वस्वी आई वडील व कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून असते.

स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे अनेक प्रकार आहेत आणि काही परिस्थिती नुसार लवकर देखील पायावर उभे राहण्याचा पर्यंत करतात म्हणून तुम्हाला अनेकदा गरीब लहान मुले काम करताना दिसून येतात. पण मध्यम वर्गात शिक्षण पूर्ण होवून पायावर उभे राहता येते. तोपर्यंत मुलं हि आई वडिलांवर अवलंबून असतात.

पायावर उभे राहण्यासाठी फक्त पैसा आणि नोकरी नाही तर मानसिकता देखील तशी घडवावी लागते आणि हे सर्व संस्काररूपाने आपल्याला मिळते. त्यामुळे आपण मुलांना दोष देवू शकत नाही.

साधे उदाहरण ज्या घरात सर्वकाही उत्तम चालू आहे अश्यांचे घ्या. इंटरनेट च्या काळात आता घरगुती हिंसाचार हे लपून राहणार नाही. खूप कमी मुलं हि सुख समाधानाने आयुष्य जगतात आणि बाकी विविध प्रकारचे मानसिक आजार जसे तणाव, नैराश्य, चिंता, भीती आणि इतर नकारात्मक भावना घेवून आयुष्य जगतात व तशी परिस्थिती निर्माण करतात.

आयुष्य म्हणजे मस्करी नाही आणि मुलांना जन्माला घालणे देखील मस्करी नाही. मुलं जन्माला घालण्यासाठी फक्त सेक्स करावा आणि आणि कुठलाही लैंगिक दोष नसावा लागतो पण नंतर दिले जाणारे संस्कार ह्याबद्दल काय? मुलं आई वडिलांचे बघून शिकत असतात व कायमस्वरूपी अंतर्मनात रुजवत असतात.

अनुभव अमर्यादित आहे. ते सर्व लेखांच्या स्वरुपात मांडू शकत नाही. तुमचे जर बालपण हे नकारात्मक वातावरणात गेले असेल तर तुम्हाला उपचाराची सक्त गरज आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे भविष्य हे अंधकारमय होण्यापासून वाचवू शकता व आयुष्य पुनर्निर्मित करू शकता.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

स्पर्श चिकित्सा

हिलिंग, औरा, एनर्जी थेरपी (भारतीय अध्यात्मिक, आयुर्वेदिक आणि पुरातन उपचार पद्धतीवर आधारित)



शरीर स्पर्श :- शरीराला स्पर्श करून चिकित्सा केली जाते. इथे व्यक्ती प्रत्यक्षात हजर लागते.

उर्जा स्पर्श :- शरीर स्पर्श ते कितीही लांबून हि चिकित्सा केली जाते. अपवाद वगळता व्यक्ती हजर असण्याची गरज नाही.

देव स्पर्श :- जर अध्यात्मिक कारणांमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या दूर होतील.

अघोरी स्पर्श :- वाईट शक्तींचा वापर करून जर समस्या निर्माण केल्या गेल्या असतील तर अघोरी स्पर्श चिकित्सा वापर केला जातो. हा सर्वात शेवटचा मार्ग आहे.

फायदे : 

मानसिक ताण तणाव आणि आजारांपासून मुक्ती, शारीरिक आजार, ताण तणाव पासून मुक्ती, विना औषध उपचार किंवा जे तुम्ही वैद्यकीय उपचार घेत आहात त्याला उर्जा देवून लवकरात लवकर बरे करणे, हृदय विकार आणि मधुमेह बरा करणे किंवा जे उपचार करत आहात त्याला शक्ती देणे, शरीरातून नकारात्मक उर्जा काढणे व सकारात्मक उर्जा भरणे.

वस्तू दोष, कुंडली दोष दूर होतात.

अपघातामुळे अवयवामध्ये समस्या निर्माण झाल्यास त्यावर उपाय करणे, जर बरे होण्याच्या स्थितीत असेल तर बरे करणे, फिजीयोथेरपि ला सकारात्मक प्रतिसाद देणे.

उद्योजक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार ह्यांच्या मधील आर्थिक उर्जेला रिचार्ज करणे व नफा मिळवणे, कर्ज किंवा इतर आर्थिक समस्या आणि संकटातून बाहेर येणे, ग्राहक व गुंतवणूकदार अशी योग्य लोक आकर्षित करणे.

कोर्ट कचेऱ्या, कायदा व न्यायव्यवस्था संपत्तीचा वाद, घटस्फोट केसेस ह्यामध्ये तुमच्या बाजूने निर्णय येण्यास मदत मिळते.

नोकरी मिळणे, बढती मिळणे, पगारवाढ होणे, नोकरीतून पैसे कमावण्याचे विविध मार्ग काढणे, खाजगी नोकरीत आपले स्थान कायम करणे, ऑफिस मधील राजकारण ह्यापासून मुक्ती मिळवणे, ऑफिस मधील संबध हे मैत्रीपूर्ण करणे.

शाळा, कॉलेज, पदवी आणि उच्च शिक्षण ह्या कालावधी मध्ये निर्माण होणार्या खाजगी व शैक्षणिक समस्या दूर होतात.

गर्भधारणेच्या वेळेस गर्भाची उर्जा हि वाढवली जाते सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी प्रयत्न केला जातो.

मुलांचे संगोपन, शिक्षण, मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे सुधारते. मुल ऐकायला लागतात.
खाजगी आयुष्य हे सुखकर होते, नातेसंबंध सुधारतात, जर नातेसंबंध सुधारण्याच्या पलीकडे गेले असतील तर नकारात्मक नातेसंबंध तुटून सकारात्मक नातेसंबंध जुळून येतात.

स्थूलपणा आणि बारीक असणे ह्या समस्येवर मात करता येते.

प्रेम संबंधात ताण तणाव, लग्न न होणे, घटस्फोट, दुसरे लग्न ह्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपाय.

सर्व प्रकारच्या लैंगिक समस्या दूर होतात. वंध्यत्वावर मात करता येते.

हि विद्या शिकवण्यासाठी उपलब्ध नाही आहे आणि नाही कुणाला प्रशिक्षित केले गेले आहे. कृपया कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका.

कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाही. एका सोबत अनेक समस्या दूर होतात.

उपचार मुंबई मध्ये उपलब्ध. वयक्तिक, जोडीदार वैवाहिक प्रेमी लिव्ह इन रिलेशनशिप, कौटुंबिक, कार्यालये अश्या समुहात देखील उपलब्ध, ठिकाण मुंबई. मुंबई, मुंबई पूर्व पश्चिम उपनगरे, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात तुमच्या जागेवर भेट देण्याची सुविधा उपलब्ध.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/HpCCkyIUenlLxP5BvY8GP5 

अश्विनीकुमार 
(हीलर, स्पर्शीक)

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

https://www.pexels.com/sv-se/foto/1926796/

भविष्यात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींची वर्तमान काळातील लक्षणे



तुम्ही देखील कुठची व्यक्ती यशस्वी होईल हे भविष्य वर्तवू शकतात. खूप सोपे आहे. काही रहस्य वैगैरे नाही. तुम्ही स्वतःला देखील तपासू शकता.

आपण ज्या लोकांच्या सहवासात राहतो आपण त्यांच्यासारखेच बनतो.

तुम्ही कोणासोबत राहता हे तपासा. तुम्हाला त्यांचे कुठले गुण आवडतात आणि कुठले नाही हे लिहून ठेवा. तपासल्यानंतर तुम्हाला समजून येईल कि तुम्ही कोठे चालला आहात ते.

मनुष्य हा समुहात राहणारा प्राणी आहे. सामाजिक प्राणी आहे. आपण ज्या समुहात राहतो, त्यांचे प्रत्येकाचे नियम असतात ते आपण आचरणात आणत असतो. नकळत आपल्या अंतरमनात हे सर्व आचरण कायस्वरूपी बसते व नकळत आपण दररोज तशी कृती करत जातो.

तुम्हाला यशस्वी बनायचे आहे?
यशस्वी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे आहे?
आनंदी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे आहे?
निरोगी आयुष्य जगणाऱ्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला धाडसी बनायचे आहे?
धाडसी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा आहे?
आत्मविश्वासू लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला अंतर्मनाची शक्ती जागृत करायची आहे?
ज्यांची अंतर्मनाची शक्ती जागृत झाली अश्यांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला भाग्यशाली आयुष्य जगायचे आहे?
भाग्यशाली लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला गरुडझेप घायची आहे?
गरुडांच्या समुहात रहायला सुरवात करा.
गरुड कबूतरांसोबत उडत नाही आणि राहत देखील नाही.

तुम्ही जास्तीत जास्त वेळ कुणासोबत घालवता त्यावरून तुम्ही घडत जाता व तुम्ही तशी परिस्थिती देखील निर्माण करतात.

जर तुम्हाला यशस्वी लोकांचा सहवास भेटत नसेल तर तज्ञांच्या सहवासात रहा.

वेळ हि वाळूसारखी निसटून जात असते त्या सोबत तुमचे आयुष्य देखील. जो काही निर्णय घ्यायचा तो आज घ्या. वेळ कुणासाठीही थांबत नसते.

तुमच्या परिसरातील ऑफलाईन समविचारी आणि कृतीशील लोक भेटत नसतील तर ऑनलाईन त्यांना शोधा व त्यांच्या संपर्कात रहा.

सकारात्मक भावना आणि कंपने जुळण येणाऱ्या लोकांसोबत रहा आणि नकारात्मक भावना आणि कंपने जुळून येणाऱ्या लोकांपासून लांब रहा.

ऑनलाईन कमी आणि ऑफलाईन जास्त आयुष्य जगा.

लवकरच समविचारी कृतीशील लोकांचा समूह बनवण्यात येईल. ह्या समुहात येण्यासाठी मागील सर्व नकारात्मक पूल तोडावी लागतील व परतीचा मार्ग बंद करावा लागेल.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत