कर्ज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कर्ज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


 “स्थानिक उद्योग व्यवसायांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असे अनेक उद्योजक व्यवसायिक दिसून येतील ज्यांना कर्जाची गरज आहे पण कोणीही कर्ज द्यायला तयार नाही पण त्यांच्यात क्षमता आहे कि त्यांना भांडवल भेटले कि ते परत उभे राहू शकतात तेव्हा अश्या कंपन्यांना जर तुम्ही एकट्याने किंवा समूहाने मिळून पैसे पुरवले योग्य व्याज दराने परतावा घेतला तर असे अनेक स्थानिक, छोटे उद्योजक व्यवसायिकांना तुम्ही नाव संजीवनी देवू शकतात.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही?



उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव
मराठी आणि परप्रांतीय मधील फरक
मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही?

एक परप्रांतीय मुंबई मध्ये येतो. त्याच्याकडे काहीही नसते. पोट भरायला आणि आपले कुटुंब चालवायला काहीतरी करणे गरजेचेच आहे.

एक मराठी मुंबई मध्येच राहतो, सर्व सुखसुविधा आहेत. पोट भरण्यासाठी तर बोलू शकत नाही पण नोकरी सोडून पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो.

परप्रांतीय धंद्यासाठी पैसे जमवण्याचा प्रयत्न करतो. जास्त व्याजावर पैसे घेतो. धाडस दाखवतो. जास्तीत जास्त काही हजारांसाठी त्याला जास्त व्याज द्यावे लागते.

मराठी धंद्यासाठी घरातून पैसे घेतो. काहीही व्याज द्यायची गरज नाही. घरचे मुलगा आयुष्यात जम बसवेल ह्याचे स्वप्न बघत बसतात.

परप्रांतीय गरीब आणि दिसायला बारीक पण (पण चे उत्तर खाली भेटत जाईल)

मराठी दिसायल सुखवस्तू कुटुंबातील धडधाकट पण (उत्तर खाली भेटत जाईल)

एक व्यवसायाच्या उदाहरणाने सांगतो

परप्रांतीय पाणीपुरीची घाऊक विक्रीसाठी असलेली गोनी विकत घेतो, टेबल कोणीतरी देतो, एक केटरिंग चा व्यवसायिक त्याला पाणीपुरी साठी लागणारा माल बनवून देतो. ह्यासाठी त्याने सुरवातीला थोडे पैसे दिलेले असतात कारण त्यालाच तितके पैसे व्याजाने भेटलेले असतात. दुकान भाड्याने घेवू शकत नाही म्हणून तो रस्त्यावर एका चार रस्त्याच्या कडेला जागा शोधून ठेवतो.

मराठी जास्त भाडे असलेली जागा विकत घेतो. पूर्ण चकाचक दुकान करतो. फर्निचर वर पैसे खर्च करतो. माल जास्त पैसे घेऊन विकत घेतो. सगळीकडे फक्त पैसा ओतत जातो.

आता खरी सुरवात होते.

परप्रांतीय पाणीपुरी १० रुपये प्लेट ने विकायला सुरवात करतो. बघता बघता माल संपतो. त्याच्याकडे पैसे येतात.

मराठी दुकानाचे उद्घाटन समारंभ करतो. लोकांना बोलावतो. लवाजमा गोळा करतो. गिर्हाईक तर नाही पण कुटुंबातील आणि परिचयातील लोक असतात. ह्यावरच जास्त पैसे खर्च होवून जातात. त्या दिवशी एकही गिर्हाईक येत नाही तर समारंभाला जास्त पैसे खर्च होतात. तिथे पाणीपुरी तो ३० रुपयांना ठेवतो. सगळीकडे फक्त शो असतो व्यवसाय दिसत नाही.

परप्रांतीय पाणीपुरी च्या जास्तीत जास्त प्लेट विकतो. बघता बघता नफा वाढू लागतो ते देखील काही दिवसातच. नेहमीचे गिर्हाईक देखील इतक्या कमी वेळात तयार होतात.

मराठी फक्त ग्राहकांची वाट बघत असतो. फक्त नवीन दुकान आहे म्हणून काही म्हणजे बोटावर मोजता येईल इतके ग्राहक येतात. पाणीपुरी च्या प्लेटी विकल्याच जात नाही. बघता बघता तोटा वाढत जातो, परत त्यामध्ये पैसे टाकले जातात, पण तोटा वाढण्याचे थांबत नाही. नेहमीचे ग्राहक तयारच होत नाही आणि असले तरी खूप कमी किंवा जे काही स्वस्तात भेटेल त्यासाठी किंवा जास्त वेळ बसायला भेटते म्हणून येतात.

परप्रांतीय व्यवसायिकामुळे अनेकांचे व्यवसाय चालतात. म्हणजे पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारे सामान व जे काही गरजेचे आहे ते सर्व व्यवसाय चालतात, त्यांचा माल खपायला लागतो, पैश्यांची देवाण घेवाण होते. त्याच्यासोबत सर्व उद्योग व्यवसायाची शृंखला सुरु होते. हफ्ते किंवा लाच देखील जायला लागते ज्यामुळे त्यांना देखील आर्थिक फायदा होत जातो.

मराठी मुळे फक्त एकदा सुरवातीला दुकान चकाचक करायला इतर व्यवसायिकांना फायदा होतो पण जो महत्वाचा खाद्य पदार्थाचा व्यवसाय आहे त्या शृंखलेला काहीही फायदा होत नाही. म्हणजे एकप्रकारे फक्त लघु कालावधी साठी फायदा होतो.

परप्रांतीय व्यवसाय करायला जितकी जागा लागते तशीच जागा शोधतो आणि तिथे कायमस्वरूपी आपले बस्तान बसवतो. मग ती जागा एखाद्या दुकानासमोरची का असेना. नफ्या तोट्याचे गणित तो योग्य मांडतो आणि नफा घेवूनच जातो.

मराठी फक्त मोठ मोठी जागा शोधण्यात गुंग असतो आणि पैसे असल्यामुळे तो बिनधास्त असतो पण हाच पैसा सतत भाडे भरून दुकान चकाचक करण्यात कधी निघून जातो तेच समजत नाही. म्हणजे व्यवसाय तर उभा राहतच नाही आणि फक्त पैसे जात असतात. त्यापेक्षा फिक्स डीपोझीट मध्ये टाकलेले किंवा स्वतःवर उडवलेले बरे.

नवीन परप्रांतीय जुन्या परप्रांतीयाचे बघून दुसऱ्या खाद्यपदार्थाचे तसेच टेबल रुपी दुकान मांडतो आणि त्याचा देखील व्यवसाय अगदी कमी पैश्यात चालायला लागतो.

नवीन मराठी पिढी परत सेम चुका करत मोठे दुकान भाड्याने घेवून चकाचक करते आणि ते देखील बंद होवून जाते.

परप्रांतियाचा व्यवसाय असाच दीर्घ कालावधीसाठी सुरु राहतो आणि समोर दुकान भाड्याने जाताना बघतो, पैसे खर्च होताना बघतो, बंद होताना बघतो.

मराठी नवनवीन दुकानाचा भाडेकरू येत जातो, तो समोर चालू असलेला परप्रांतीयाचा व्यवसाय बघतो आणि काही महिन्यानी तोट्यात त्याचा व्यवसाय बंद करतो.

परप्रांतीय आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा गावावरून नातेवाईक तरुणांना संधी देतो, आपल्याकडे काम करायला लावतो व तसेच एखादा उद्योग व्यवसाय सुरु करून देतो. म्हणजे अजून एक परप्रांतीय कुटुंब सेट होते.

मराठी स्वतःच इतकी धडपड करत असतो कि त्याच्या चुकीच्या निर्णयांना तो मानत नाही आणि बोलतो कि उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, हजारो लाखो आणि करोडो रुपयांची उलाढाल करणे हि मराठी समाजाचे काम नाही, तो फक्त नोकरी करू शकतो. तो स्वतः चुकांपासून शिकत नाही आणि इतर मराठी लोकांना देखील प्रोस्ताहित करत नाही. उलट तो त्यांना उद्योग व्यवसाय करण्यापासून रोखतो.

परप्रांतीयाचे दुकान म्हणजे कौटुंबिक व्यवसाय झाला ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब मदत करते.

मराठी दुकान म्हणजे जी व्यक्ती बसणारच तिचीच जबाबदारी असणार, बाकी मदत करणार नाही किंवा घेणार नाही.

परप्रांतीय भल्या पहाटे ते रात्री उशिरापर्यंत दुकान सुरु ठेवतो, धंद्यात जम बसला तरी तो कुठे जात नाही कारण तो व्यवसाय ग्राहकांसाठी करोत ना कि स्वतःसाठी ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास बसतो आणि त्याला कायमस्वरूपी ग्राहक आपोआप भेटत जातात.

मराठी उशिरा दुकान उघडतो आणि लवकर बंद ठेवतो, सर्व सन वर, लग्न कार्य वगैरे वगैरे करत जातो आणि हजारदा दुकान बंद ठेवून ग्राहक तोडून टाकतो. मग ग्राहक त्याच्याकडे जाने बंद करतात.

जास्तीत जास्त परप्रांतीय हे समजूतदार, आणि गोड बोलणारे असतात. अति झाल्याशिवाय भांडत नाही. म्हणून ह्यांचा नकली माल देखील विकला जातो ते देखील विना तक्रारी.

जास्तीत जास्त मराठी हे उद्धट बोलणारे रागावणारे आणि नीट न समजावणारे असतात. ह्यामुळे ह्यांचा उच्च दर्जाचा माल विकलाच जात नाही आणि ग्राहक देखिल येत नाही.

परप्रांतीय मुल जर शिकत असतील तर शिक्षण पूर्ण झाल्यावर वडील जो पर्यंत दुकान सांभाळत आहे तो पर्यंत कुठेतरी नोकरी करतात किंवा पार्ट टाइम दुकान सांभाळून वडिलांना मदत करतात. आणि जेव्हा वडील बोलतात कि दुकान पूर्ण वेळ सांभाळ तेव्हा ते नोकरी सोडून पूर्ण वेळ दुकान सांभाळतात व नोकरी पेक्षा जास्त पैसा कमावतात. हि लोक कामाला नाव ठेवत नाही.

मराठी मुल शिक्षण पूर्ण झाल्यावर दुकान बंद करायला लावतात, त्यांना दुकान हे कमी दर्जाचे काम वाटते. मग आपोआप तिथे परप्रांतीय संधी उचलतो किंवा त्याला दुकान भाड्याने दिले जाते आणि परप्रांतीय सेट होवून जातो. शेवटी भाडे घ्यायचा देखील कंटाळा येतो किंवा परप्रांतीयाच्या गोड बोलण्यात अडकून दुकान त्याला विकून टाकतो.

परप्रांतीय एकदा का दुकान भाड्याने घेतले कि परत दुसऱ्या परप्रांतीयालाच देतील पण मराठी माणसाला देणार नाही. तसेच राहतील, वाट बघतील आणि मराठी आला कि त्याला काहीतरी कारण सांगून किंवा मालकाला खास करून ते दुकान मराठी माणसाला देणारच नाही. मग परप्रांतीय भेटेल व त्याला तिथे व्यवसायाची संधी भेटेल जिथे अगोरच दुकान सुरु होते व ग्राहक देखील जमले होते.

मराठी कुणालाही दुकान भाड्याने देईल आणि जास्त विचार करणार नाही त्यामुळे आज परप्रांतीय उद्योग व्यवसायात तुम्हाला दिसत आहे आणि मराठी नाही.

लिहायचे खूप आहे पण काही महत्वाचे मुद्दे मांडले आहे. इथे कुठलाही भेदभाव करायची किंवा मराठी समजला कमी दाखवायचा प्रयत्न करत नाही तर जे वास्तव आहे ते सांगत आहे.

आमचा विक्रोळी परिसर हा मराठी समाजाची लोकवस्ती आहे पण परप्रांतीय उद्योग व्यवसायात आहे. मारवाडी मध्ये तुम्हाला एकही मराठी वाणी दिसणार नाही हि परिस्थिती आहे. ते आज वाघ आहे आणि आपण बकरे. एकच मराठी होता तो देखील सोडून गेला आणि लाईन मध्ये मारवाडी दुकानदार आहे आणि एकमेकांना सांभाळून घेतात.

मराठी परप्रांतीयांसारखे नाही काय?

आहेत. बोटावर मोजण्याइतके आहेत. मी फक्त त्यांच्याकडेच जातो. वागण्या बोलण्यात आणि कामामध्ये सरस. अश्याच मराठी लोकांसोबत रहा आणि जर नसतील तर परप्रांतीय लोकांसोबत रहा, तुम्ही १०० % उद्योजक व्यवसायिक बनालच.

अशीच परप्रांतीयासारखी प्रगती केलेले अनेक मराठी आहेत, ते तुमच्या आमच्या परिसरात देखील आहे म्हणजे ह्याचा अर्थ आपल्यात देखील गुण आहेत ज्यामुळे आपण उद्योग व्यवसायात मराठी लॉबी तयार करून उद्योग व्यवसाय सुरु करू शकतो.

जास्तीत जास्त परप्रांतीय ह्यांनी शिक्षण फक्त पदवीच्या कागदासाठी घेतले आहे आणि ते पैसे कमावण्याचे सर्व मार्ग ओपन ठेवतात. जास्तीत जास्त मराठी ज्याच्यात शिक्षण घेतले आहे तोच मार्ग काहीही झाले तरी निवडतात, पगार कमी भेटला तरी निवडतात.

म्हणून मी पहिले तपासून बघतो कि समोरच्या व्यक्तीची आर्थिक मानसिकता आहे कि नाही. जर आर्थिक मानसिकता असेल तर तो आरामात म्हणजे अगदी आरामात उद्योग व्यवसाय करू शकत आणि नसेल तर त्याने नोकरी केलेली बरी. पण असे अनेक मराठी भेटले जे लाखो रुपये द्यायला तयार आहेत फक्त त्यांना उद्योग व्यवसायात पैसे टाकायचे आहे ना कि आर्थिक मानसिकता घडवायची आहे. मग शेवट काय? पैसा गेलाच. मी जरी त्यांना अटेंड नाही केले तरी दुसरा कोणी तरी त्यांना अटेंड करतो, स्वप्न दाखवतो आणि त्यांना डबघाईला आणतो. मग शेवटी ते मला फोन करून मदत मागतात आणि मी अश्यांना मदत नाकारतो. पैसा असताना माझी आठवन नाही येत आणि गेल्यावर येते ह्याला काहीही अर्थच नाही. आयुष्यात परत संधी भेटत नाही. ती लोक शिकार झाली.

माझ्यासमोर अगदी ६ महिने ते जास्तीत जास्त २ महिन्यात अनेक मराठी लोकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अनेक चेहरा ओळख किंवा परिसरात राहतात म्हणून ओळखतो. त्यांचे कमीत कमी २ लाख ते जास्तीत जास्त ५० लाख हे दुकानात घुसले आणि शेवटी ते दुकान बंद करावे लागले. नुकसान मान्य आहे पण हा शुद्ध मुर्खपणा आहे, ह्याला मी आर्थिक आत्महत्या बोलतो.

आज माझे विद्यार्थी जे कोणी आहेत ते आर्थिक भावनिक साक्षर आणि सक्षम आहेत. ते परप्रांतीय देखील आहेत आणि मराठी देखील. आणि हे सर्व दीर्घकालीन आहेत ना कि वरील सांगितल्याप्रमाणे अल्प कालावधीसाठी.

मी देखील लोकांना लोकांना स्वप्न दाखवून त्यांना लुटू शकतो पण माझा मूळ उद्देश मराठी समाज श्रीमंत आणि समृद्ध बनवणे हा आहे. पिढीजात तो श्रीमंत आणि समृद्ध राहिला पाहिजे हा आहे. भले पैसे कमावण्याचा कुठलाही मार्ग का असेना मग तिथे मराठीच असला पाहिजे हा उद्देश आहे त्यामुळे मी कुणालाही प्रशिक्षणासाठी घेत नाही आणि ह्यामुळे दर्जा उंचावून आहे आणि दीर्घकालीन विद्यार्थी माझ्या सेवेचा लाभ घेतात व स्वतहून अनेकदा फी स्वरुपात जास्त पैसे किंवा इतर भेटवस्तू देवून जातात.

माझ्याकडे पैसे कमावण्याचे २ ३ मार्ग आहेत तर माझ्या विद्यार्थ्यांमुळे माझ्याकडे माझे दोन मार्ग पकडून १०२ मार्ग आहेत आणि ह्य सर्व मार्गातून आम्हाला पैसे येत जातात, फायदा होत जातो. म्हणून मी सांगत असतो कि समविचारी कृतीशील लोकांसोबतच रहा तरच फायद्यात रहाल.

आयुष्यात सर्वांना दुसरी संधी भेटत नाही.

श्रीमंत बनणे सोपे आहे. जर तुम्हाला देखील श्रीमंतीच्या आयुष्यात झेप घायची असेल तर आजच संपर्क कराल.

धन्यवाद
अश्विनीकुमार

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

पैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे?


पैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे?

पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग

संपत्ती किंवा पैसे कमावण्याचे मार्ग

वारसाहक्क

धार्मिक, सामाजिक नियमानुसार.

उद्योग पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.

व्यवसाय पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.

नोकरी

धोक्याची सूचना : नोकरी आता पारंपारिक पिढीजात राहिली नाही. कंपनीचा मालक त्याची कंपनी हि त्याच्या वारसांना किंवा सामाजिक संघटना असेल तर त्यांना देईल पण नोकरी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देवू शकत नाही. कितीही मोठे पद का असेना ह्यासाठी देखील अनेक कुटुंबे रांगेत असतात. हा थोडी हुशारी वापरून, धूर्तपणा, कपट आणि वाम मार्गांनी तुम्ही हि नोकरी पिढीजात करू शकता पण धोके हे राहणारच.

व्यवसायात साधे लहान दुकान आणि त्यासोबत सुरु असलेला व्यवसाय हा पुढच्या पिढीला देवू शकतो पण नोकरी नाही.त्यानंतर तुमचे संस्कार आणि पुढच्या पिढीचा निर्णय आहे कि तो व्यवसाय करायचा कि नाही आणि त्याला कमी लेखून त्यापेक्षा कमी पगाराची नोकरी करायची.

मराठी समाजाने सोडले ते परप्रांतीय समाजाने पकडले. संधी जो तिचा फायदा घेतो तीचीची असते ना कि सोडणार्यांची. म्हणून मुंबई मध्ये उच्चभ्रू वस्तीत परप्रांतीय जास्त आहेत आणि मराठी कमी. आणि त्याच उच्चभ्रू वस्तीत अनेक परप्रांतीय लघु व्यवसाय करून लाखोंमध्ये फायदा उचलत आहेत.

आपला नेता असणे, तो श्रीमंत असणे, काही मराठी राजकारणी श्रीमंत असणे म्हणजे मराठी समाज नाही. मराठी समाज तोच जो समृद्ध असेल, ज्याच्याकडे सर्वकाही असेल ना कि अपवाद राजकारणी किंवा धर्मकारणी.

जात, धर्म, राजकारण, इतिहास असेच चालत राहणार फक्त तुमचे आयुष्य सरासरी ६० ते १०० वर्षांचे आहे. तुम्ही ठरवा कि तुम्हाला तुमचे कुटुंब बघायचे आहे कि भूतकाळात जावून डिप्रेशन ह्या मानसिक आजाराने ग्रस्त व्हायचे आहे.

जर मुंबईत राहून तुम्हाला तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसे कमावता येत नसेल, किंवा श्रीमंत बनण्याच्या संधीचा फायदा घेता येत नसेल तर तुमच्यात आर्थिक मानसिकता नाही. हि मानसिकता निर्माण करावी लागते त्यानंतरच तुम्हाला संधी दिसायला लागतात.

तुमच्यात आर्थिक मानसिकता असेल, तुम्ही आर्थिक साक्षर असाल तर तर तुम्ही आज तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसा खेचत आहात आणि नाही तर तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचा प्रवाह हा नीट वाहत नाही. आयुष्य मस्करी नाही, हॉस्पिटल मध्ये जेव्हा घरची व्यक्ती एडमिट असते, जीवनमरणाचा प्रश्न असतो आणि लगेच पैसे उभे करायचे असतात तेव्हा महत्व समजते पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो.

भावनेला किंमत नाही. आर्थिक आयुष्य आणि इतर आयुष्य वेगवेगळे ठेवून जगावे लागते, जिथे जास्त वेळ द्यायची वेळ येईल तेव्हा पैश्यांना निवडा कारण आता जगण्यासाठी पैसा लागतो. पैसा असेल तेव्हा तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता आणि अजून जास्त पैसा असेल तेव्हा तुम्ही समाजसेवा करू शकता पण ह्यासाठी देखील पैसा पाहिजेच.

आर्थिक दृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनण्यासाठी मी २ कोर्स सुरु केले आहे, पहिला आहे मानसिकतेचा आणि दुसरा आहे पैसे सर्व मार्गांनी खेचून आणण्याचा.

जे फॉलोअर्स आहेत, जे समविचारी आहेत आणि ज्यांनी पैसे कमावण्याच्या आड येणारे सर्व मार्ग बंद केले असतील अश्यांचे स्वागत.

रिझल्ट येतो पण कोर्स कठीण आहे, त्यामुळे पूर्ण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असाल तरच पाउल उचला नाहीतर नाही. कमजोर लोक हि तोवर नैराश्य आणि हृदय विकार किंवा इतर तस्तम विकारांनी ग्रस्त होण्याची शक्यता असते.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

कुठल्या प्रकारची लोक श्रीमंत बनू शकतात? तुम्ही त्या प्रकारात येता का?



श्रीमंत बनायला लोकांनी किंमत मोजली, अनेक वर्षे धीर धरला, अनेक समस्यांना तोंड दिले आणि जे जगले ते आज श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगत आहत. हि लोक काही दिवस किंवा महिन्यात पैसे दुप्पट तिप्पट च्या मागे नाही लागले तर सरासरी ६० ते १०० वर्षांच्या आयुष्यात ते किती वर्षे येतात ज्यामध्ये योग्य पैसे गुंतवले तर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात परतावा मिळतो.

२००२ ते २००७ ह्या कालावधी मध्ये ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली त्या सोन्याचा भाव आता ३०,००० च्या पार आहे. २००२ ते २००७ अजून किती मोठा संधी असलेला कालावधी पाहिजे? ज्यांच्याकडे पैसे होते दूरदृष्टी होती त्यांनी तर सोन्यामध्ये गुंतवणूक केलीच पण ज्यांच्याकडे जेमतेम पैसे होते त्यांनी पोटाला चिमटा काढून गुंतवणूक केली त्यांचे बलिदान व्यर्थ नाही गेले.

० ते २ वर्षात श्रीमंत होणारे २ % पेक्षा कमी लोक असतात पण कमीत कमी ५ ते ३० वर्षात श्रीमंत होणारे ९८ % श्रीमंत लोक असतात असतात ज्यांनी हा प्रवास पूर्ण केला असतो.

हा जो अनेक वर्षांचा प्रवास असतो न श्रीमंत बनण्याचा हाच मजबूत पाया बनवतो व दीर्घ काळ श्रीमंती आणि समृद्धी चे फळे चाखायला मिळतात, एकदा का श्रीमंत झाले कि विषयच संपला, मग टिकवून ठेवणे सोपे आहे. आणि तोच टिकवून ठेवतो ज्याच्यामध्ये श्रीमंतीची हवा नसेल गेली. नाहीतर करोडपती पासून ते रोडपती होण्याची उदाहरणे देखील आहेत.

१०० पैकी ९९ क्षणिक कालावधी च्या यशापेक्षा एकच दीर्घकालीन यश गाठलेले चांगले, कारण ह्यानंतर नुसती यशाची मालिकाच सुरु होते. मग हि व्यक्ती जिथे नुसता एक इंच जरी खड्डा खोदेल तिथे तिला प्रत्येक वेळेस खजिना सापडेल.

अनेकांना वाटत असेल कि हा दीर्घ कालावधी आहे पण ह्या दीर्घ कालावधी मध्ये अनेक छोटेमोठे यश तुम्हाला भेटत जातात ज्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने अब्जोपती होत जातात, शिकत जातात व मानसिकता घडवत जातात जेणेकरून तुमच्या दीर्घकाळाने भेटणाऱ्या यशावर कुठलेही संकट येत नाही कारण तुम्ही अगोदरच लहान यश संपादित करण्याच्या नादात संकटांचा सामना करून त्यांना परतवले असते.

आता बोलू नका हा काळ वेगळा आणि तो काळ वेगळा म्हणून. ज्याला यशस्वी बनायचे आहे तो पुराण काळातही यशस्वी होईल, इतिहासातही, भूतकाळातहि, वर्तमानातहि आणि भविष्यातही.

असेच काही घराचे देखील होते, जमिनीचे देखील होते, विविध सरकारी आणि खाजगी कंपनी व खात्यांचे देखील होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसा हा कमी कालावधीत प्रचंड वाढत गेला मग तो पैसा सरळ मार्गाने कमावलेला असो किंवा गैरमार्गाने.

माझ्याकडे सतत समुपदेश, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी १०, १५ वर्षांपासून सातत्याने काही विद्यार्थी येत असतात. हे जर लिहिले आहे त्याचे जिवंत उदाहरण मी बघितले आहे, हि कुठलीही काल्पनिक कथा नाही कारण ह्यापैकी काही आज जिवंत नाही आहे पण मृत्युपूर्वी ते श्रीमन झाले होते. त्यांनी श्रीमंतीची आयुष्य जगले.

माझ्या अनेक विद्यार्थ्यांपैकी काही असे होते ज्यांना मी बोललो होतो कि तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, श्रीमंत होऊ शकत नाही पण माझ्या बाकीच्या लेखांचा त्यांच्यावर इतका सकारात्मक चमत्कारिक परिणाम होता कि जिद्दीने ते माझ्याकडे समुपदेशन, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घ्यायला येत होते, ऑनलाईन घेत होते. त्यांनी दाखवून दिले कि जग जरी तुमच्या बाजूने असले तरी तुम्ही कितीही मोठे यश का असेना ते गाठू शकतात.

अनुभवला पर्याय नाही. ह्यासाठी धाडस दाखवून कृती हि करावीच लागते. संकटांचा सामना करावा लागतो, किनारा सोडून खोल समुद्रात जाते लागते. हे बोलून नाही तर कृतीने होते. इथे कोणी तुमची पदवी नाही विचारत, संकटे सर्वांच्या आयुष्यात एकसारखेच येतात.

आणि एक समाधान देणारी गोष्ट म्हणजे हि क्षमता तुमच्यात जन्मजात आहे, ती तुम्हाला जागृत करायची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि श्रीमंत बनण्याच्या दीर्घकालीन प्रवासाला सुरवात करा, मी आहे तुमच्या पाठीशी. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे भले जग तुमच्या विरोधात का असेना तुम्ही तुमची ध्येय गाठू शकता, तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

आर्थिक समस्यांमुळे आलेला तणाव हा जीवघेणा ठरू शकतो



आर्थिक समस्यांमुळे आलेला तणाव हा जीवघेणा ठरू शकतो. ह्यामुळे अनेक आजारपण उद्भवू शकतात. ह्यामुळे होणारे आर्थिक नुकसान हे कोणीही भरून देवू शकत नाही कारण सरळ संबंध हा स्पष्ट होवून देखील कायदे किंवा नियमांनुसार मान्य केले जाणार नाही.

पीएमसी बँक वर निर्बंध लादण्यात आले त्याचवेळेस अनेकांना मानसिक समस्या ह्या निर्माण झाल्या असतील कारण सहसा इमानदारीने पैसे कमावणारे आपला पैसा इतरत्र हलवत नाही तर ते एकाच ठिकाणी ठेवतात.

जो मेहनतीने कमावलेला पैसा आहे तो अचानक निर्बंध आल्यामुळे काढू शकत नाही आणि सहसा मध्यम वर्गांचे दिवसाचे, महिन्याचे आणि वर्षाचे गणित ठरलेले असते ते संपूर्ण बिघडते.

पैसे कमावण्याचे मार्ग वापरून झाल्यावर जेव्हा निवृत्त होतो तेव्हा कुठलाही मार्ग नसतो आणि नाही शरीरात ताकद असते अश्यांना तर पहिले मानसिक आजार जडतो आन त्यामध्ये न ऐकणारी व्यवस्था असल्यामुळे हृद्य विकाराचा झटका येवून मनुष्य मृत पावण्याची शक्यता बळावते.

व्यवस्थेमुळे येणारे आलेले आघात ह्यावर कोणीही लक्ष्य देत नाही आणि ह्याचे दूरगामी परिणाम देखील होतात. नैसर्गिक आपत्ती कोणीही स्वीकारतो पण मानवनिर्मित कृत्रिम आपत्ती नाही. भीती कायमस्वरूपी जन्म करते. व्यक्ती फोबिया ने ग्रस्त होते.

आर्थिक तणावाची तीव्रता इतकी का असते?

ऐषारामाचे जगणे सोडा पण मुलभूत गरजा जसे कि अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध उपचार ह्याला पैसा लागतो ना कि बाकी काही. उद्या तुम्ही एक पोते धान्य देतो बोलला तरी तुमच्यावर कोणीही उपचार करणार नाही. पैसे हे लागतीलच. एक महिना फक्त सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल मध्ये घालवा तुम्हाला अनुभव येईल तो देखील कायमस्वरूपी.

जे जगण्याशी निगडीत आहे ते वित्त जर अडकून पडले तर काय होणार? दररोज चा खर्च तरी निघणार कसा? पूर्ण पैसे भेटणार की नाही? काही दिवसात ज्यांचे पैसे गेले ते नाही विसरणार पण ज्यांचे नाही गेले ते विसरून जातील.

१०० पैकी अनेकांना न्याय भेटणारच नाही. ह्यामध्ये आता सध्या पैसा महत्वाचा नसून तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळणे महत्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, निरोगी आहात तो पर्यंत तुम्ही आजारी पडून डॉक्टर किंवा हॉस्पिटल मध्ये जाणारा पैसा वाचवू शकता आणि जिवंत असल्यामुळे आयुष्याची अजून जोमाने अनुभवापासून शिकून सुरवात करू शकता.

इथे खरच तुमचे चुकलेले नाही पण असे घडतच जाणार त्यासाठी तुम्हाला हुशार, जागृत होणे गरजेचे आहे. बँक बंद होते किंवा निर्बंध येणे हे काही जात धर्म बघून येत नाही तर त्यामध्ये ज्यांचे ज्यांचे खाते आहे त्या सर्वांवर येते. सर्व जाती धर्मातील सामान्य जनता त्यामध्ये भरडून जाते. कोणीही सुटत नाही.

माझा मुद्दा फक्त आणि फक्त इतकाच आहे कि कुठलेही टोकाचे पाउल उचलू नका, कुठलेही आजारपण बळकावून घेवू नका. तुमचा जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी काही नाही. पैसा आज आहे उद्या नाही आणि जिवंत असला तर त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवू शकतो.

जगामध्ये कुठेही जा तुम्हाला शासन व्यवस्था अशीच काम करताना दिसेल. तुम्ही हुशार व्हा. नियम व कायदे सर्वसामान्य लोकांसाठी असतात ना कि सत्ताधारी, श्रीमंत आणि गुन्हेगारांसाठी.

जर तुम्हाला कुठल्याही आर्थिक समस्यांमुळे मानसिक ताण तणाव आले असेल, किंवा ह्या ताण तणावाचे हृदय विकार आणि इतर आजारांमध्ये रुपांतर झाले असेल तर आजच संपर्क करा. मानसिक समस्या लहान आहे तो पर्यंत आपण तिला लगेच मुळापासून काढून फेकू देवू शकतो.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

तुमची श्रीमंत, समृद्ध, उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार बनण्याची मानसिकता आहे का?



समजा प्रत्येकाला एक एक कोंबडी देण्यात आली.

७५ % लोक विचार करतील कि ह्या कोंबडीची भाजी झणझणीत आणि चविष्ट होईल. मग ते कोंबडीला मारतात व त्या कोंबडीपासून विविध प्रकारचे व्यंजन बनवून खातात. एक दिवस तर ढकलला पण पुढील दिवसांचे काय? दुसऱ्या दिवशी परत भूक लागते पण खायला कोंबडी नसते.

२४ % लोक कोंबडीला अंडी देण्याचा कारखाना समजतात. जो पर्यंत कोंबडी मरत नाही तोपर्यंत ते अंड्यांचा आस्वाद घेतात.

१ % लोक विचार करतात जर त्यांनी कुक्कुटपालन करायला सुरवात केली तर? मग ते अजून एका कोंबडीमध्ये गुंतवणूक करतात किंवा कर्जाने घेतात. मग पिल्ल होतात, ती मोठी होतात, सुरवातीला ते कर्जात बुडालेले असतात.

एक कोंबडी आणि गुंतवणुकीपासून ते अनेक कोंबड्या करतात, वेळ जातो, तो वेळ ते तग धरून बसतात, त्यांच्या आजूबाजूला कोंबडीचे विविध व्यंजन खाणारी अंडी खावून जगणारी लोक त्यांना दिसत असतात त्या मधून ते स्वतःवर ताबा मिळवतात, लक्ष्य आपल्या ध्येयावर ठेवतात, आणि पुढे वाटचाल सुरु ठेवतात.

उरलेली अंडी विकली जातील हा टप्पा ते गाठतात. आता मुबलक प्रमाणात कोंबड्या असतात जेणेकरून त्यांना अंडी हि जास्त मिळतात ब बाजारत विकण्यासाठी तयार असतात.

इथून नफा सूर होतो.

आता त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात कोंबड्यांचे देखील उत्पादन होते जेणेकरून ते कोंबडी देखील बाजारात विकायला सुरवात करतात.

इथून त्यांचा श्रीमंत होण्याचा प्रवास सुरु होतो. कालावधी किती लागला असेल तो बघा. ५ ते १० वर्षे. काय काय सहन करावे लागते हे त्याच व्यक्तीला माहिती असते.

आता हे झाले सर्वसामान्य लोकांना प्रोस्ताहित करण्यासाठी सांगण्यात येणाऱ्या लघु कथा.

आता रक्तरंजित, गुन्ह्याने भरलेली काळी बाजू देखील मांडतो.

सर्वांना एक एक कोंबडी तर भेटली पण सर्वच काही इमानदारीने गुंतवण्यासाठी पैसे नाही शोधत तर काही चोरी करतात, इतरांना लुटतात, व्यवस्थेला लाच देतात.

पकडले गेले तर न्याय व्यवस्थेला लाच देवून, साक्षीदारांना धमकी देवून किंवा मारून टाकून न्याय आपल्या बाजूने वळवतात.

लोकांना जात, धर्म, प्रांत, देश अश्या विविध भावनिक मुद्द्यात गुंतवून त्यांना मानसिक दृष्ट्या त्यामध्ये गुंतवून आपली पोळी भाजतात व त्यांच्या कडील कोंबड्या स्वतःकडे ठेवून स्वतः श्रीमंत होतात.

समूह बनवतात व दुसर्या समूहावर हल्ला करतात. मार्गावर कर लावतात, शासन व्यवस्था बनवतात, सामान्य लोकांकडून कर गोळा करतात आणि श्रीमंतांना वाटतात.

जे घडून गेले आहे आणि जे घडत आहे ते सर्व मांडले आहे, सर्व प्रकारच्या मार्गांनी यशस्वी झालेली लोक बघितली आहे आणि समाजाचा त्यांच्या विषयी असलेला दृष्टीकोन देखील बघितला आहे.

तुम्ही ठरवले तर गरीब विचारांपासून श्रीमंत विचारांकडे वळू शकतात. आर्थिक दृष्ट्या साक्षर बना, वास्तवात रहा आणि नंतर वाटचाल करा.

आर्थिक मानसिकता घडवण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि त्यामधील समस्या दूर करण्यासाठी विशेष, समुपदेशन, सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण उपलब्ध. ताण तणाव आणि नैराश्य दूर करण्यासाठी उपयोग होतो.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/chalaudyojakghadwuya/

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया