सर्व आदर लोक जेव्हा सांगतात कि ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा कार्यालयात काम करतात तेव्हा देतात. पण एक मुख्य मुद्दा विसरलात कि जग नोकरीच्या पलीकडे खूप मोठे आहे त्यामुळे तुम्ही देखील तुम्ही करत असलेला उद्योग व्यवसाय अभिमानाने सांगा.


"मी रिक्षाचालक आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी वडापाव विक्रेता आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी दुकानदार आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी खानावळ चालवतो आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."


तुमचा जो काही व्यवसाय आहे तो कमेंट टाकून अभिमान व्यक्त करा. कळू दया लोकांना कि नोकरी सोडून देखील असे अनेक क्षेत्र आहेत जिथे प्रचंड संधी उपलब्ध आहेत. किती दिवस संकुचित मर्यादेत रहायचे? अशी अनेक लोक संपर्कात आली ज्यांनी छोट्यापासून सुरुवात केली मग ते रिक्षावाले ते रस्त्यावर विक्री करणारे आज श्रीमंत झाले आहेत.


इथे मुद्दा कोण किती श्रीमंत झाला हा नाही तर इथे मुद्दा आहे कि नोकरी सोडून असे अनेक क्षेत्र आहेत जिथे स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आणि हे शाळेत शिकवले पाहिजे ना कि पदवी देवून नंतर बेरोजगारांची फौज तयार केली पाहिजे. जर शिक्षण चांगला रिक्षावाला, वडापाव वाला, दुकानदार, खानावळ चालवणारा, गेरेज वाला नसेल बनवत तर असे शिक्षण काय कामाचे? म्हणजे शिक्षण भेदभाव करते.


तुम्ही तुमचे जीवन जगण्यासाठी, आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी जे जे काम करत आहात त्याचा आदर आहे.


धन्यवाद
अश्विनीकुमार

 

Previous
Next Post »
0 आपले विचार