मराठी लोकांचे व्यवसाय होते पण ते एका क्षणात कमी झाले नाही तर अनेक दशकांचा प्रवास होता तो

 

मुंबई मध्ये वडापाव च्या व्यवसायात मराठी जास्त प्रमाणात होते, खानावळ च्या व्यवसायात मराठी जास्त प्रमाणात होते.


ह्यापुढील टप्पा हा फ्रेंचायझी किंवा हॉटेल मध्ये परिवर्तीत व्हायला पाहिजे होता तो जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या प्रमाणात झाला नाही.


सेलिब्रेटी चे सोडून बोलत आहे, कृपया इमेज मार्केटिंग नको.


मुंबई आंतरराष्ट्रीय शहर, इथून मराठी खाद्य पदार्थ हे जगभरात पसरायला पाहिजे होते जसे पंजाबी आणि दक्षिण भारतीय पसरले तसे, हे झाले नाही.


ह्या नंतर रस्त्यावरील खाद्य पदार्थ हे मराठी खाद्य व्यवसायिकांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होते, जसे कि दक्षिण भारतीय पदार्थ इडली वडा वगैरे, फ्रेन्की, मोमोज, मंच्युरीयन, वगैरे.


नंतर असे दिसून आले कि उत्तर भारतीय दक्षिण भारतीय पदार्थ विकतांना दिसले, पण मराठी नाही.


चायनीज मध्ये देखील उत्तर आणि दक्षिण भारतीय दिसून आले, पण मराठी चा टक्का प्रचंड कमी झाला.


आता मराठी व्यवसायात आहे पण अनेक ठिकाणी पार्टनर म्हणून. जसे कि हॉटेल, बार व इतर व्यवसायात.


एक समजले कि मराठी लोकांचे व्यवसाय होते पण ते एका क्षणात कमी झाले नाही तर अनेक दशकांचा प्रवास होता तो.


एक नाही तर अनेक व्यवसाय आहेत जिथे मराठी कमी होत गेले व आता नामशेष होण्याच्या मार्गावर किंवा पार्टनर म्हणून.


कारणे शोधणे खूप महत्वाचे आहे. कारण हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कृपया मुंबई मध्ये येवून प्रत्यक्ष अनुभव घ्याल.


कारण जर पुण्यात अशी परिस्थिती निर्माण झाली तर उर्वरित महाराष्ट्र हातातून जायला वेळ लागणार नाही.


आणि हे फक्त खाद्य पदार्थाच्या व्यवसायाबद्दल नाही तर अनेक व्यवसायातून मराठी जवळपास हद्दपार झाले आहेत.


माझ्या समोर मराठी किराणा व्यवसायिकाचे दुकान बंद होतांना बघितले आहे.


परप्रांतीय उद्योग व्यवसाय बंद होतो तिथे परत परप्रांतीय उद्योजक व्यवसायिक येतो, आणि मराठी उद्योग व्यवसाय बंद होतो तिथे जास्त प्रमाणात परप्रांतीय उद्योजक आणि व्यवसायिक येतात, मराठी खूपच कमी


मराठी चायवाले देखील होते जे टपरी चालवायचे ते देखील गायब होत गेले.


उद्योग, व्यवसाय करणे काही रॉकेट सायंस नाही आहे, शांत डोक्याने विचार केला आणि अनुभवी लोकांची साथ मिळाली तर परत जसे जुना काळ होता त्यामध्ये आपण जावू.


धन्यवाद

अश्विनीकुमार


फेसबुक : चला उद्योजक घडवूया


#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #रिअलइस्टेट #आर्थिकमानसिकता #फ्रीलांसर #कौशल्य


 संकटं टाळता येत नाहीत, पण त्यावर मात करता येते.


अश्विनीकुमार

सल्ला, प्रशिक्षण, मार्गदर्शन