“एखाद्या कमी शिकलेल्या किंवा कुठल्याही सामान्य शाखेतून पदवी घेतलेल्या तरुणाने छोटा व्यवसाय सुरु केला तर त्याची दखल कोणीही घेत नाही पण त्याविरुध्द डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए पीएचडी धारकाने कुठल्याही लघु व्यवसायात उडी घेतली तर सर्व त्यांची मुलाखत घेत बसतात हे आपल्या इथले दुर्दैव आहे. नेहमी पदवी बघून नाही तर त्यांच्या सातत्याचा, उत्पादन किंवा सेवेचा दर्जा बघा आणि मगच महत्व द्या. आपल्या इथे लाखो उच्च शिक्षित लोकांचे त्यांच्यापाडून पैसे घेवून पदवीधरांची निर्मिती होते एखाद्या कारखान्यासारखे त्यामुळे किती व्हिडीओ बनवणार त्यांचे? शेवटी वीट येईल. आपण चहा घेतांना विचारत नाही कि तुझी पदवी काय आहे? चहा घेतो आवडला तर स्तुती करतो आणि नाही आवडला तर नावे ठेवतो पण महत्वाचे हे आहे कि ती व्यक्ती सातत्याने व्यवसाय करते कि नाही? मेहनत करणारे आणि कष्टकरी ह्यांना सर्वच अन्न गोड लागते, सध्या पोट भरते ना? उद्या कोणीतरी चांगले खाद्य पदार्थ बनवणारा तयार झाला कि त्याच्याकडे जातील पण तोपर्यंत तरी ते उपाशी झोपत नाही ना? महत्वाचे काय आहे ते लक्ष्यात ठेवा आणि उद्योग व्यवसायात उतरा, अनुभव घेत घेतच तुम्ही यशस्वी व्हाल.”


अश्विनीकुमार


Previous
Next Post »
0 आपले विचार