राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने Byju वर विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे क्रमांक घेवून धमकी वजा सूचना देत त्यांचे कोर्सेस विकतात हा आरोप केला आहे.




Byju's ऑनलाईन शैक्षणिक सेवा पुरवणारी कंपनी आहे. मी मध्यंतरी अश्या सर्वांवर किंवा अश्या लोकांवर किंवा अश्या लोकांचे सुविचार टाकणे बंद केले कारण मला माहिती होते कि ह्यांची माझ्याकडून नकळत मार्केटिंग होईल, माझे फेसबुक पेज वाढत जाईल, कोणीतरी पालक Byju's चे महागडे कोर्सेस घेईल व व स्वतःच्या मुलांवर दबाव टाकेन.


Byju's चा मालक त्याच्या जीवनावर देखील मी एक लेख लिहिणार होतो पण जेव्हा शिक्षण शैक्षणिक क्षेत्राची काळी बाजू समजले तेव्हापासून हात जोडले. जे जे प्रोस्ताहन देणारे आहेत, अब्जो कमावलेले आहेत, त्या सर्व पैसे देवून मार्केटिंग करण्यात आले आहे नाहीतर आमच्या काळापासून ते आता पर्यंत का नाही चांगले शिक्षक यशस्वी झालेत? ज्यांना मार्केटिंग जमले आणि ज्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा जास्त चिंता हि त्यांच्या पालकांकडे असलेल्या पैश्यांवर होते तेच कसे पुढे गेले?


शिक्षण किती मुलांसाठी घातक होत गेले हे आपण आता समजून घेवू


"NCPCR" हि सरकारी संस्था "National Commission for Protection of Child Rights" मराठीत "राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग" हा तिचा फुलफोर्म, ह्या संस्थेचे काम काय आहे माहिती आहे काय? ह्यावरून तुम्हाला समजले पाहिजे कि हे प्रकरण किती गंभीर आहे ते. हि संस्न्था लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करते. म्हणजे विचार करा कि ह्या संस्थेला मध्यस्थी करावी लागली ते.


राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग Byju's ला हजर राहण्याचा हुकून बजावला. Byju's वर आरोप काय करण्यात आले? काहीतरी असेल म्हणून तर हुकुम बजावण्यात आला. त्यांच्यावर आरोप malpractice म्हणजे व्यावसायिक सेवेतील निष्काळजी, गैर किंवा बेकायदेशीर वर्तन; गैरव्यवहार, दुराचार चा करण्यात आला. विचार करा शैक्षणिक संस्था आणि तिच्यावर असले आरोप.


आरोप काय आहे तर कोर्स, क्लास म्हणजे शिकवणी विकत घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जातो, चुकीची माहिती दिली जाते, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे फोन क्रमांक विकत घेतले जातात, जर त्यांचे कोर्सेस क्लासेस म्हणजे शिकवण्या नाही घेतल्या तर मुलांचे भविष्य उध्वस्त होईल अशी भीती घातली जाते. भारतातील सामाजिक व्यवस्था अशी होती कि काहींना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण तेच इंग्रजांनी निर्माण केलेल्या शिक्षण व्यवस्थेत होता मग अशे पालक जसे कि कमी शिकलेले, किंवा ज्यांची पहिली किंवा दुसरी पिढी १० वी, १२ वी , १५ वी किंवा उच्च शिक्षण पूर्ण नाही करू शकले अश्यांना टार्गेट केले जाते.


आयोगाला जेव्हा काही वृत्तपत्रातील बातम्या अश्या दिसून आल्या कि ज्यामध्ये पालक सांगत होते कि मुलांच्या उज्वल भविष्याचे आमिष दाखवून त्यांचे कोर्स विकत घेण्यात भाग पाडत होते, काही पालकांनी आर्थिक शोषणाची तक्रार केली तर काहींना फसवण्यात आले आणि ह्याप्रकारे पालकांची कठीण परिश्रमाने मिळवलेले, बचतीचे पैसे देखील कोर्स क्लास च्या नावाखाली उकळण्यात आले. ह्यामध्ये असे आढळून आले कि फी परत करण्याचे सांगून पालकांना फी परत केली जात नव्हती.


शिक्षण चांगले आहे कि वाईट हा भाग आणि वाद वेगळा झाला, मी तर आपली इंग्रजांनी दिलेली शिक्षण व्यवस्था मानतच नाही, गुरुकुल पद्धत जिथे प्रात्यक्षिक देखील करून घेतले जायचे आणि त्यासोबत आधुनिक वैज्ञानिक पद्धत जिथे सर्वांगीण विकासाभर भर देण्यात येईल अश्या शिक्षण पद्धती आवडतात. पण इथ मुद्दा येतो तो पालक आपल्या मुलांवर टाकत असलेल्या दबावाचा आणि 


ह्या अगोदर सुद्धा Byju संस्थेचा मालक रविंद्रन ह्याला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग संस्थेने हजर राहण्याची नोटीस बजावली होती. आणि Byju चा मालक रविंद्रन ह्याचे अनेक प्रोस्ताहित करणारे व्हिडीओ नेट वर उपलब्ध आहेत. त्याची महती सांगत आहेत ते सर्व पेड मार्केटिंग आहे असे समजा.


६० पैकी पहिल्या ५ मध्ये काही मुले सतत वर्गात पहिली येतील उच्च शिक्षण पर्यंत पहिली येतील मग बाकींच्या मुलांचे काय? त्यामुळे अश्या जंजाळात अडकू नका, ह्या जगात संस्कार आणि अनुभवापेक्षा दुसरे शिक्षण कुठलेही नाही, बाकी निर्णय तुमचा.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार