दंगल ह्या सिनेमासाठी आमीर खान ह्या बॉलीवूड कलाकाराने आपले वाढलेले वजन कमी करून आपले शरीर हे उत्तम आकारात आणले आहे.


हा व्हिडीओ शेअर करण्याचा उद्देश कुठल्याही सिनेमाची जाहिरात करण्याचा नाही. दंगल ह्या सिनेमासाठी आमीर खान ह्या बॉलीवूड कलाकाराने आपले वाढलेले वजन कमी करून आपले शरीर हे उत्तम आकारात आणले आहे.
आमीर खानचे वय हे ५१ वर्षे आहे, तसे वय मी मानत नाही. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत तो तरून आहे. आमीर खानने अतिशय व्यस्त आणि महत्वाचे म्हणजे प्रचंड दबावाखाली कारण हे त्याचे जगण्यासाठी पैसे कमावण्याचे साधन आहे तिथे तो सतत नवनवीन प्रयोग व स्वतःमध्ये बदल घडवत असतो.
सिने श्रुष्टी अशी आहे कि तिथे मनुष्याच्या भावनेचा प्रचंड प्रमाणात वापर करून घेतला जातो. इथे सामान्य मनुष्य एक छोट्याश्या समस्येने संपूर्ण मानसिक दृष्ट्या कोलमडून जातो तिथे हे कलाकार कसे काम करत असतील तो विचार करा.
सिनेमामध्ये पहिले गरज होती ती लठ्ठ कलाकाराच्या भूमिकेची. तिथे लठ्ठ होण्यासाठी जास्त मेहनत नाही करावी लागली असे आमीर खान बोलत होता. इथे मुद्दाम मी नमूद करतो कि नकारात्मक (लठ्ठ असणे नव्हे) परिस्थिती निर्माण करणे खूप सोपे असते.
त्याचा जेव्हा लठ्ठ पणाचा अभिनय साकारून झाला त्यानंतर त्याला बॉडी बिल्डर व्हायला म्हणजे परत शरीर हे आकार रुपास आणायला खूप त्रास झाला. त्याचा स्वतःचा विश्वास बसत नव्हता कि परत बॉडी बिल्डर सारखे शरीर होऊ शकते कि नाही म्हणून.
हिमालयाच्या शिखरासारखे हे आवाहन वाटत होते, सतत शंका घर करत होत्या, हो असे विचार यशस्वी लोकांच्याही मनात येतात. आवाहन खूप दूर आहे असे वाटत होते हे नकारात्मक विचार यशस्वी लोक मी करू शकतो हे बोलून परत ध्येयाच्या दिशेने कृती करायला लागतात.
एकदा का ध्येय निश्चित झाले तर फक्त लक्ष्य आज आता ह्या क्षणावर होते. आज दिलेले १०० टक्के हे भविष्य घडवते. असे केल्यावरच आपल्याला बदल दिसू लागतो. व्हिडीओ मध्ये बघू शकता. मनुष्याचे प्रयत्न आणि मेहनत हि लपून राहत नाही. ती चेहऱ्यावर दिसून पडते.
इथे आमीर खानने एक शब्द वापरला ट्रान्सफोर्मेशन म्हणजे परिवर्तन. सांगायचा उद्देश हा कि आमीर खानने ६ महिन्यात बदल घडवून आणला तसेच तुम्हीही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता.
तुम्हाला कसे आयुष्य पाहिजे, काय काय आयुष्यात पाहिजे ते सगळे तुम्हाला भेटू शकते. आमीर खान चा ट्रेनर हा स्वतः कबूल करतो कि प्रचंड एकाग्रता आणि इच्छा शक्तीने स्वतःला झोकून देतो, म्हणून आज आमीर खान हा अयशस्वी लोकांमध्ये बसलेला आहे.
गुरु, प्रशिक्षक हे कधीच सामान्य विद्यार्थ्याला दिसत नाही, जो उत्तम शिष्य असतो त्याला अनेक गुरु असतात. आज जो कोणी यशस्वी आहे तो त्याला भेटलेल्या गुरूमुळे नाही तर त्याच्यामधील नवनवीन शिकण्याची आणि अनुभव घेण्याच्या ज्वलंत आगीमुळे तो आज यशस्वी आहे.
अयशस्वी माणसांकडे अनेक गुरु, प्रशिक्षक आणि समुपदेशक आयुष्यभर असतात. अयशस्वी माणसाकडे एकही नसतो किंवा एखादा असतो तोही ठराविक वेळेसाठी.
हे आताचे वर्तमान काळातील उदाहरण ह्यासाठी दिले आहे कि तुम्ही तुमचे स्वप्नांचे आयुष्य ह्या मार्गाने आरामत आणि कमी वेळेत जगायला सुरवात करू शकता.
मग विचार काय करत आहात, लागा कामाला, ध्येय निश्चित करून वर्तमानात १०० टक्के द्या आणि जगा आपल्या स्वप्नांचे आयुष्य.
धन्यवाद,
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार