गरूडभरारी म्हणजे नक्की काय ?


प्रोस्ताहन देणारा आणि ज्वलंत इच्छा शक्ती जागृत करणारा लेख
गरूड पक्ष्याबद्दल अभिमान होताच: पण त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले ते परवाची त्याच्याबद्दलची गोष्ट ऐकल्यावर.
गरूडाचं दु:ख समजलं. मी आणि माझ्यासारखे अनेक आज त्या दु:खातून जातो आहोत. तो आमच्यातील एक वाटला.
गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.
ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माझ्यात आणि माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. वास्तविक नखांचं उचकटणं नव्हे तर वाईट आचार विचारांच्या नखांचं उचकटणं , पंखांचं फाडणं नव्हे तर गर्विष्ठ मनोवृत्तीचा बीमोड करणं हे तप माणसाला करावं लागेल.
नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरमीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे. गरूडाला बोलता येत नाही तर त्यानं सांगितलं असतं त्याचं दु:ख आपणाला; परंतु शूर माणसाचं वैशिष्ट्य असतं , की तो दु:ख बायकीपणानं सांगत नाही. तो हसतमुखानं भोगतो ते. शौर्य आणि तितिक्षा दोन्ही दृष्टीनं गरूड माझा गुरू झाला. दुर्गम भागामध्ये शिक्षणाची सोय नसताना मैलो अन् मैल पायपीट करणा-या एखाद्या गरीब मुलाच्या जीवनात एका पायरीवर गरूड भिनावा आणि त्यानं भरारी मारावी , अनंत कष्ट सोसून त्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये नावं करावं . नव्या तरूण पिढीला दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करावं ही एका रानपाखरानं घेतलेली गरूडभरारीच नव्हे काय?
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .
मग यमसुध्दा तुला पाहिल्यावर लटालटा कापायला लागेल !!!
ह्याच मानसिक स्थितीमुळे लोक मरणातून परत येताना बघितली आहेत...
ह्याच मानसिक स्थितीमुळे गरिबांना श्रीमंत होताना बघितले आहे....
ह्याच मानसिक स्थितीमुळे अशक्य ला शक्य होताना बघितले आहे...
ह्याच मानसिक स्थितीमुळे लोकांच्या आयुष्यातील संकटांचे पर्वत हलताना बघितले आहे....
ह्याच मानसिक स्थितीमुळे दुर्भाग्य हे जवळ येता येता स्वतःचे भाग्यात रुपांतर करताना बघितले आहे....
जी लोक एका क्षणात बदलतात त्यामागे त्यांचा अब्जो क्षणांचा संघर्ष असतो. आहात तुम्ही भरारी घ्यायला तयार?
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार