योग्य दर लावूनही दीर्घकालीन उद्योग व्यवसाय करता येतो.


 एकदा एका व्यक्तीने फोन केला होता, त्याचा व्यवसाय हा व्यवस्थित चालत होता पण काही महिन्यांपासून व्यवसाय पाहिजे तसा नफा देत नव्हता. असे का होत होते? जेव्हा त्याने सल्ला घ्यायला फोन केला तेव्हा मूळ समस्या हि समजून आली.


नवीन इंटरनेट स्वस्त झाले, त्यामध्ये विदेशी भ्रम पसरवणारे प्रोस्ताहन देणारे प्रशिक्षक आले ज्यांचा आणि उद्योग व्यवसायाचा काही संबंध नाही, त्यामध्ये शून्यातून करोडपती असे उदाहरण देत होते. म्हणजे जगात कोणी करोड च्या आत कमावणारा नकोच असे त्यांचे म्हणणे होते जे वास्तवाला धरून नव्हते.


इंग्रजी बोलणे, त्यामध्ये ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही अश्यांना न्यूनगंड, असे वाटायचे कि आपल्यातच काही कमी आहे का? जर काही हजार आणि लाखो रुपये कमावून पण मी अपयशी आहे का? माझे दर कमी आहेत का? कि मी माझी किंमत करत नाही? असे प्रश्न मनात येवू लागले व त्याचा परिणाम हा व्यवसायावर व्हायला लागला.


सर्वात अगोदर तर मी त्या व्यवसायिकाचा इंटरनेट चा वापर हा कामापुरता करायला लावला. भारतीय अर्थव्यवस्था कशी उत्तम आहे आणि बदलाची मानसिकता कशी आणि केव्हा ठेवायची हे समजावून सांगितले. त्यांचे दर योग्य का आहेत हे देखील सांगितले. आणि ह्यामुळे फिक्स ग्राहक कसे मिळतात जो पाया असेल व नंतर अल्पकालीन ग्राहक कसे मिळतात हे त्यांच्या व्यवसायातून दाखवून दिले.


जो खर्च होता तो कमी करायला लावला, जास्तीत जास्त खर्च हा खाजगी जीवनावर होता, फक्त महिन्याला इतके लाखो कमावतात म्हणून इतका खर्च करायचा असतो किंवा अशी जीवनशैली जगायची असते असे सर्व वायफळ खर्च बंद करायला लावले.


पैसा वाचायला लागला, जिथे काम कमी असेल तिथे बचत कामी यायला लागली, पाया भक्कम झाला, हळू हळू वाढ होऊ लागली, नवीन व्यवसायिकांचे आवाहने पेलता येवू लागली, योग्य दर असल्यामुळे ग्राहक काही सोडून जात नव्हते व जे कटकटीचे ग्राहक होते त्यांना सरळ नाही बोलायचे हे सांगितले, ह्यामुळे ना उधारी, ना कमी पैसे आणि ना हि नकारात्मक माउथ पब्लिसिटी झाली.


इथे जोडीदाराची साथ लागते जर ती भेटत नसेल तर कोणीही काहीही करू शकत नाही, जोडीदाराला स्पष्ट शब्दात बोलायला शिका, आयुष्य म्हणजे सिनेमा नाही. नकारात्मक जोडीदारासोबत आयुष्य घालवण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे. हा काही कठीण निर्णय नाही हे लक्ष्यात ठेवा.


मुलांना अगोदरपासून योग्य संस्कार देणे गरजेचे आहे. त्यांना स्वतंत्र पण द्या सोबत लक्ष देखील ठेवा, आयुष्याचा सामना करायला लावा, सुरुवातीपासून भावनिक दृष्ट्या सक्षम बनवा, हे खाजगी सांगण्याचा उद्देश हाच आहे कि खाजगी आयुष्याचा देखील मानसिकतेवर प्रभाव पडतो.


शारीरिक आणि मानसिक आरोग्याला पहिले महत्व द्या, ह्या मार्गावरील सर्व अडथळे दूर करा, लाखो रुपये आजारपणावर खर्च करण्यापेक्षा काही हजार रुपये आरोग्यावर खर्च केलेले कधीही उत्तम.


आता येणाऱ्या ग्राहकांना अभिमानाने सांगतात कि ५ वर्षे झाले मी व्यवसायात आहे आणि इथेच एक स्थैर्य दिसते, ग्राहकांना विश्वास असतो कि जेव्हा गरज असेल तेव्हा ती व्यक्ती इथे असेलच म्हणून कोणीही नवीन जरी आला तरी फुकटात काही घेत नाही आणि इतरांना देखील योग्य माहिती देत सांगतात कि इथे तुम्हाला योग्य दरात चांगली सेवा मिळणार आहे. मी देखील फुकट किंवा कमी जिथे तिथे जात नाही कारण अनुभव घेतले आहे, आणि इंटरनेट रीव्ह्युव वर विश्वास नाही पण जे तिथे प्रत्यक्ष जावून अनुभव घेतले त्यांच्या सांगण्यानुसार जातो व ९९ % माहिती हि योग्यच मिळालेली असते व त्यानुसार पुढे सांगितले जाते.


ह्यामुळे व्यवसाय दुप्पट होऊ शकत होता पण केला नाही, कारण जितके झेपते तितकेच काम करायचे, विनाकारण ताण घ्यायचा नाही, कर्ज घ्यायचे नाही नाहीतर असे उद्योजक व्यवसायिक ह्यांचे फोटो भिंतीवर दिसून येतात, कारण काय तर हायपरटेन्शन, हृदयविकार चा झटका किंवा इतर आजार. हे सांगितले आहे ते वास्तव आहे. आयुष्यात जन्म मृत्यू मध्ये परत संधी भेटत नाही त्यामुळे जे आयुष्य जगत आहात ते हुशारीने जगा.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार