शेतकऱ्याच्या कांद्याला २ रुपये भाव मिळत होता, थेट शेतकऱ्याला मदत करायचे ठरवले पण मध्येच सातत्याने बातमी दिसत होती ती उर्फी जावेद ची, हे आहे फेसबुक चे अल्गोरिदम. फेसबुक ने ह्या उर्फी जावेद, धर्म आणि राजकारण ह्याच्या नादापायी अनेक शेतकरी, कष्टकरी आणि शहरी मध्यम वर्गाच्या व्यथा सामान्य नागरिकांपर्यंत पोहचू दिल्या नाही ज्यामुळे ज्या आत्महत्या आपण थांबवू शकत होतो त्या देखील थांबवल्या गेल्या नाही पण  नंतर परत राजकारण्यांचा एकमेकांसोबत भांडतानाच्या बातम्या फेसबुक लगेच दाखवू लागला. हे असे फेसबुक चे अल्गोरिदम जे जगभरातील त्या त्या देशाच्या सामान्य नागरिकांच्या जीवावर उठले आहे.


अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार