वर्तमान शिक्षण व्यवस्था आयुष्य कसे बरबाद करते?

सुरुवातीला लागणारे मानसिक शारीरिक व सामाजिक विकासाचे शिक्षण दिले जात नाही. ज्याला संस्कार बोलतात.


कौशल्य विकासावर भर दिला जात नाही.


भावनांवर ताबा ठेवायला शिकवले जात नाही.


अध्यात्म, मानसशास्त्र ह्याची योग्य माहिती दिली जात नाही.


विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक क्षमता ओळखण्याचा प्रयत्न केला जात नाही.


इयत्ता आठवी ते बारावी जिथे जबाबदारीची जाणीव करून द्यायची असते तिथे १० वी १२ वी च्या परीक्षेची भीती घालतात.


इयत्ता आठवीत आर्थिक परिस्थिती मध्ये शिक्षण सोडावे लागल्यामुळे अनेक विद्यार्थी काळाच्या ओघात वाहून जातात तर काहीच पुढे जातात.


शिक्षण प्रचंड महाग करून ठेवले.


चौकटीबाहेर विचार करायचा शिकवला जात नाही. काही शिक्षक असतात जे आपल्या विद्यार्थ्यांना अगोदरच हि माहिती देवून ठेवतात पण हा शिक्षणाचा भाग नाही.


मोची कसे बनावे, दुकान कसे सुरु करावे, फोटोग्राफी चा व्यवसाय कसा सुरु करावा, प्लंबर कसे बनावे ह्या आणि अश्या अनेक क्षेत्रांना वाव दिली जात नाही किंवा त्यांना खालच्या दर्ज्याचे काम म्हणून हिणवले जाते.


नोकरी शिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही.


स्थानिक बाजारपेठेला अनुसरून शिक्षण पद्धती बनवली जात नाही, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ती देखील फक्त अमेरिका बाजारपेठेला अनुसरून शिक्षण पद्धती तयार केली जाते.


नोकरी ह्या फक्त एकाच मार्गामुळे अनेक लघु उद्योजक व्यवसायिक तयार होणे कधीच बंद झाले.


ज्यांनी शिक्षण सोडले किंवा चौकटीबाहेर पाउल ठेवले त्यापैकी अनेक प्रगतीपथावर आहे.


अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार