पैसा टिकवण्यासाठी आर्थीक मानसिकता खूप महत्वाची असते. एका विद्यार्थ्याला त्याचा नवीन व्यवसाय सुरु करेपर्यंत ते स्थिर होईपर्यंत मार्गदर्शन केले. जिथे सुरुवातीला सर्व बरोबर सुरु होते पण जस जसा व्यवसाय जमू लागला तस तसा विद्यार्थी बदलला. आलेले पैसे हे साठवले नाही तर परदेशी सुट्ट्या, मुली आणि दारू ह्यावर खर्च केले. अशी वागणूक होती कि जसे ह्या पैश्यांच्या प्रवाहाचा सातत्य आहे तसाच राहणार आहे पण असे काही झाले नाही, पैश्यांचा प्रवाह तर आटलाच पण सोबत वडीलांचे आजारपण आले. पैसा जो पर्यंत तुमच्याकडे आहे तो पर्यंत तुमचा आहे, एकदा का गेला कि परत शक्यता नाही कि तुम्हाला भेटेलच म्हणून. आहे तो जपून वापरा ह्याचा अर्थ असा नाही कि घाबरून करत आहात, ह्याचा अर्थ असा आहे कि हुशारीने वापरत आहात. एक वेळ अशी येईल कि पैसा साठलेला देखील असेल, गुंतवलेला देखील व खर्च करून देखील उरत असेल. नफा तोटा व्यवसायाचा भाग आहे आणि फक्त नफा हा घोटाळा, फसवणूक आहे.

अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार