अपयश हे आजचे शेवट हि नाही व कायमस्वरूपी देखील नाही त्यामुळे अपयशीच होणार हा विश्वास दृढ करायची गरज नाही

आपल्या आयुष्यातील अपयश दूर करणारा लेख


नेहमी प्रमाणेच पश्चिम महाराष्ट्र मधून एक व्यवसायिक समुपदेशनासाठी आला होता. अनेक वर्षे तो अपयशाने ग्रासला होता. जस जसे समुपदेशन पुढे जात होते तस तसे सर्व समस्यांमधून मूळ समस्या हि दिसायला लागली होती.

आता जे सांगेन ते तुम्ही तुमच्या अंतर्मनात कायमस्वरूपी रुजवून ठेवा.

त्या व्यवसायिकाने इतके अपयश बघितले होते कि त्याचा दृढ विश्वास बसला होता कि तो जे काही करेल त्यामध्ये तो अपयशीच होईल. आणि इथेच तो चुकला होता. यश अपयश हे येतच असते. काहींच्या आयुष्यात यश अपयशाचा कालावधी हा थोडा जास्त वेळ असतो ह्याचा अर्थ असा नाही कि ती अवस्था हि कायमस्वरूपीच असलीच पाहिजे.

सामान्यतः लोक हि कुठलीही अवस्था मग ती यश अपयश असो, आरोग्याविषयी असो, खाजगी किंवा व्यवसायिक आयुष्याविषयी असो ते हीच अवस्था किंवा परिस्थिती कायमस्वरूपी राहील असे समजतात, स्वतला दुर्भाग्यशाली समजतात, ते मानसिकताच इतकी टणक करून टाकतात कि ती परत भुशभूषित करून तिच्यात यशाची बी देखील नाही पेरू शकत.

अजून एक चुकी अशी होते ज्यामध्ये इतक्या नकारात्मक विचारात देखील सकारात्मक विचार कल्पना येत असतात पण त्या प्रचंड प्रमाणात असलेल्या नकारात्मक विचारांमुळे कल्पनांमुळे अडगळीत टाकले जातात. संधी आयुष्यात येत असते ती तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा पकडायची असते आणि ती जे पकडतात तेच चमत्कारिक आयुष्य जगतात. अगदी शून्य काय वजा मधून लोकांनी अवकाशात झेप घेतली आहे ज्याला इतर लोक भाग्यशाली असे म्हणतात.

यशस्वी आयुष्य जगा किंवा अपयशी नेहमी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा कि सतत आपल्या आयुष्याच्या जमिनीची मशागत करत राहा, जर यशस्वी आयुष्य जगत असाल तर कुठेतरी अपयशाचे बीज पडले असेल ते नंतर फोफावत जाईल, ह्या मशागती मध्ये तुम्ही ते बीज किंवा रोपटे आरामात काढू शकता, पण एकदा का जर त्याचा वटवृक्ष झाला कि तो वटवृक्ष मुळासकट काढायला खूप त्रास होतो.

यशाचे बीज रोवले गेले तर त्याला खतपाणी घालायचे व जर अपयशाचे बीज रोवले गेले तर त्याला लवकरात लवकर समूळ काढायचे बघायचे, हि सतत चालणारी क्रिया आहे, काही हुशार आणि समजूतदार लोक हि आत्मविकासाची क्रिया आपोआप चालेले अश्या परिस्थितीत आणून ठेवतात व काही तज्ञांची मदत घेत असतात.

रात्र आहे तर दिवस देखील आहे, उत्तर धृवामध्ये ६ महिने रात्र असते तर ६ महिने दिवस देखील असतो. कुठेतरी तुमच्या ह्या अंधकारमय आयुष्याला शेवट हा आहेचच. फक्त मानसिक रित्या आपण एखाद्या लहान समस्येचे मोठ्या समस्येत कल्पनेत रुपांतर करतो व नंतर ते वास्तवात उतरवतो.

कुठलीही परिस्थिती हि कायमस्वरूपी नसते, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीची सवय करून घेऊ नका. यश अपयश ह्या दोघांची सवय करून घ्या. दोन्ही परिस्थितीत स्थिर आणि शांत मनाने रहा, भावनांवर ताबा ठेवा. आयुष्यात यश अपयश हे निरंतन चालत राहणारच आहे. तुम्हाला फक्त सामना करण्यासाठी सक्षम बनायचे आहे.

आपण जर अश्या परिस्थिती मधून जात असाल तर आजच संपर्क करा. विनाकारण नकारात्मक परिस्थिती मध्ये राहू नका.

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार