'संजीवनी' च्या संघर्षाची आणि सिद्धतेची कहाणी
डॉ. विकास नेहमी स्वतःला विचारायचे, "आमच्या सेवेत काय कमी आहे?"
एका संध्याकाळी, जेव्हा
रुग्णालयातील कामगार दिलेले टार्गेट पूर्ण न झाल्याने निराश झाले होते, तेव्हा डॉ. विकास यांनी टीमची बैठक बोलावली.
"मी आजवर एकटाच
शल्यक्रिया करत होतो, कारण मला
वाटायचे की माझ्या निर्णयाची अचूकता इतरांकडे नाही," डॉ. विकास म्हणाले. "पण आता मला जाणवतेय की, प्रत्येक मोठी संस्था एका मजबूत टीमवर उभी असते. तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांनीच 'संजीवनी' जिवंत
आहे."
त्यांनी 'टीमवर्क'ला महत्त्व देण्यास सुरुवात केली. त्यांनी फक्त डॉक्टरांनाच
नाही, तर परिचारिका, वॉर्ड बॉईज आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या सूचना
मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला आत्मविश्वास दिला.
समस्या: केवळ उपचार नाही, सेवेची गरज
टीम मीटिंगमध्ये, एका तरुण
परिचारिकेने एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. "सर, मोठी हॉस्पिटल्स फक्त उपचार देत नाहीत, तर ती 'अनुभव' विकतात. त्यांच्याकडे रुग्णांची तक्रार निवारण यंत्रणा
उत्तम आहे आणि ते कुटुंबातील सदस्यांनाही महत्त्व देतात. आपल्याकडे 'उपचार' उत्तम आहे, पण 'सेवा' नाही."
हा मुद्दा डॉ. विकास यांच्या मनात घर करून गेला. त्यांनी ठरवले, आता फक्त वैद्यकीय गुणवत्ता नाही, तर ग्राहक-केंद्रित
दृष्टिकोन स्वीकारायचा.
बदल आणि नावीन्यतेची लाट
डॉ. विकास यांनी तातडीने दोन मोठे बदल केले:
१. 'संवेदना' कार्यक्रम: रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या
नातेवाईकासाठी त्यांनी 'संवेदना' नावाचा एक विशेष विभाग सुरू केला. हा विभाग रुग्णांच्या
कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या प्रियजनांच्या आरोग्याबद्दल पारदर्शक माहिती देत
असे, त्यांच्या शंकांचे निरसन
करत असे आणि त्यांना भावनिक आधार देत असे. हे नावीन्यतेचे पाऊल होते.
२. डिजिटल जोडणी: अमितच्या लघुकथेप्रमाणे, डॉ. विकास यांनी त्यांच्या रुग्णालयाला डिजिटल युगात आणले. त्यांनी एक मोबाईल
ॲप तयार केले, जिथे रुग्ण अपॉइंटमेंट बुक
करू शकत होते, वैद्यकीय अहवाल पाहू शकत
होते आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतरही डॉक्टरांशी संवाद साधू शकत होते. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे 'संजीवनी'ची पोहोच शहरापलीकडे वाढली.
आव्हानांवर मात
या बदलांमुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांकडून काही विरोध झाला. कामाच्या
प्रक्रियेत बदल करताना चुकाही झाल्या. पण डॉ. विकास यांनी सगळ्यांना आठवण करून
दिली की, "अडथळे हेच
सिद्ध करतात की तुम्ही योग्य मार्गावर आहात". त्यांनी आलेल्या प्रत्येक अपयशाला एक अनुभव मानले आणि टीमला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.
त्यांनी बाजारातील स्पर्धकांकडे लक्ष देणे थांबवले आणि फक्त एकच ध्येय ठेवले: उत्कृष्ट गुणवत्ता आणि रुग्णांचा विश्वास.
सिद्धता
काही महिन्यांतच 'संजीवनी
हेल्थकेअर'चे नाव शहरात आदरपूर्वक
घेतले जाऊ लागले. लोक केवळ उपचारांसाठीच नाही, तर 'संवेदना' विभागाने दिलेल्या भावनिक आधारासाठीही या रुग्णालयाला निवडू
लागले.
डॉ. विकास यांनी सिद्ध केले की, व्यवसायात मोठे
यश मिळवण्यासाठी फक्त मोठे भांडवल नाही, तर मानवीय दृष्टिकोन, टीमवर विश्वास
आणि वेळेनुसार बदलण्याची तयारी लागते. 'संजीवनी'चा संघर्ष केवळ एका
रुग्णालयाचा नव्हता, तर हे प्रत्येक
छोट्या व्यवसायाचे प्रतिबिंब होते, जो आत्मविश्वासाने आणि योग्य
मूल्यांसह मोठा धोका घेऊन
यशाच्या शिखराकडे वाटचाल करतो.
अश्विनीकुमार
यशाच्या शिखराकडे: प्रत्येक उद्योजकाने लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
१. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन
तुमचा व्यवसाय कशासाठी आहे? "ग्राहक हा राजा आहे." जर तुम्ही तुमच्या व्यवसायाला केवळ पैसे कमावण्याचे साधन मानले, तर तो दीर्घकाळ
टिकणार नाही.
- समस्या
सोडवा: तुमचा व्यवसाय लोकांच्या कोणत्या गरजा
किंवा समस्या सोडवत आहे, यावर लक्ष केंद्रित करा.
- उत्तम
सेवा: उत्पादने विकून थांबायचे नाही. उत्कृष्ट
ग्राहक सेवा (Customer Service) द्या. ग्राहकांना विशेष वाटेल, असा अनुभव
द्या. समाधानी ग्राहक हा तुमच्या व्यवसायाचा सर्वोत्तम प्रचारक असतो.
२. बदलाचा स्वीकार आणि सतत शिकणे
जगात बदल कधीच थांबत नाही. जो उद्योजक स्वतःला आणि आपल्या व्यवसायाला बदलत्या
काळानुसार बदलत नाही, तो मागे पडतो.
- तंत्रज्ञानाचा
वापर: नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला घाबरू नका. मग
ते ऑनलाइन विक्री असो किंवा तुमच्या प्रक्रियेत आधुनिकता आणणे असो, बदलाला
त्वरित प्रतिसाद द्या.
- अखंड
शिक्षण: "शिकणे
कधीच थांबवू नका." बाजारातील
नवीन ट्रेंड्स, ग्राहकांचे बदलते वर्तन आणि प्रतिस्पर्धकांचे डावपेच
याबद्दल सतत माहिती घेत राहा आणि आपल्या व्यवसायाच्या धोरणात आवश्यक बदल करा.
३. टीमची शक्ती आणि आत्मविश्वास
तुम्ही कितीही हुशार असाल, तरी कोणताही मोठा व्यवसाय एकट्याच्या बळावर उभा राहत नाही.
- टीमचे
महत्त्व: "एकटा
माणूस धावतो, पण टीम एकत्र जिंकते." आपल्या
टीममधील लोकांवर विश्वास ठेवा, त्यांना योग्य जबाबदारी द्या आणि त्यांच्या
यशात सहभागी व्हा. टीमला पाठिंबा देणे, हे
तुमच्या नेतृत्वाचे लक्षण आहे.
- आत्मविश्वास
आणि धैर्य़: "आत्मविश्वास
हा यशाचा मूलमंत्र आहे." व्यवसाय
करताना अनेक अडथळे येतात. त्यावेळी दुसऱ्यांच्या टीकेकडे लक्ष न देता,
तुमच्या ध्येयावर ठाम राहून पुढे जात राहण्यासाठी
आत्मविश्वास आणि धोका घेण्याचे धैर्य़ असणे आवश्यक आहे.
व्यवसाय यशस्वी करणे म्हणजे फक्त नफा मिळवणे नाही, तर योग्य मूल्यांची
निर्मिती करणे आहे. प्रामाणिक प्रयत्न, बदलांचा स्वीकार आणि दृढ आत्मविश्वास यांच्या
जोरावर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या यशाचे शिखर नक्कीच गाठू शकता.
अश्विनीकुमार
तुमचा प्रवास आता ह्या क्षणापासून सुरू होतो
अनेक लोक “योग्य वेळेची” वाट पाहत राहतात, त्यांना वाटते की त्यांची भीती नाहीशी होईल आणि गोष्टी आपोआप सोप्या होतील. पण खरं तर, असं होत नाही. तुम्ही जितकी जास्त वाट पाहाल, तितकी तुमची भीती वाढते आणि शंका अधिकच पक्क्या होतात. चांगल्या संधी हातातून निसटून जातात. एकच गोष्ट बदलते, ती म्हणजे तुम्हाला वाट पाहण्याची सवय लागते आणि तुम्ही तुमची स्वप्ने पुढे ढकलत राहता.
ती पहिली धडधड किंवा अस्वस्थ भावनाच तुम्हाला सतर्क करते आणि खरा बदल घडवून आणते. एकदा तुम्ही त्या परिस्थितीत उडी मारली की, तुमचे मन आणि शरीर स्वतःला त्यानुसार जुळवून घेतात आणि विकसित होतात. म्हणून, वाट पाहत बसू नका. तुम्ही घाबरलेले असलात तरी पहिले पाऊल उचला. प्रगती आणि बदल खऱ्या अर्थाने तेव्हाच सुरू होतात.
अश्विनीकुमार
"उद्योग व्यवसायात जेव्हा क्लाइंट मिटिंग असते तेव्हा तुम्ही एकटे नसता, तुमचा प्रतिस्पर्धी देखील असतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा इथे तुमच्या ज्ञानासोबत तुम्हाला सतत मनातल्या मनात बोलायचे आहे कि "मी करू शकतो." "परिस्थितीवर माझा ताबा आहे." "आरामात शक्य आहे." तेव्हा कुठे जावून तुम्ही मिटिंग यशस्वी कराल. वॉश बेसिन किंवा बाथरूम मध्ये आरसा असतो तिथे आरश्यात बघन केले तर अजून चांगला फायदा होईल किंवा जिथे एकांत असेल तिथे जावून करा. फक्त यश आणि पैसा बहु नका त्यापाठी खूप मेहनत असते, चित्र विचित्र प्रयोग स्वतःला प्रोस्ताहित करण्यासाठी करावा लागतो कारण लाखो करोडोंचा व्यवहार आहे."
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
"उद्योग, व्यवसाय आणि शेअर बाजार म्हणजे आर्थिक आयुष्यात फक्त नफा कमावणारा यशस्वी नाही होत तर कमी तोटा करणारा देखील यशस्वी होतो. जसे दिवस आणि रात्र असते, जसे सुख आणि दुख असते तसेच नफा तोटा हे आर्थिक आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, अमर्याद नफा आणि मर्यादित तोटा असे तुम्हाला सतत करत रहावे लागते."
अश्विनीकुमार
"उद्योजक व्यवसायिक हे त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी टिम वर्क शिकायला येतात पण त्यांच्या कुटुंबासाठी देखील हे टिम वर्क असते हे ते विसरतात. जे उद्योग व्यवसायासाठी शिकतात ते आपल्या आयुष्यात देखील चांगले कामाला येतात आणि त्यांच्या घरी कुटुंब एक टिम सारखे काम करत सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगते, फक्त उद्योग व्यवसायात नाही तर कौटुंबिक यश देखील मिळते. आणि जे हा नियम पळत नाही त्यांच्या कुटुंबात अनेक समस्या दिसून येतात व अनेकांना घटस्फोट, विवाह बाह्य संबंध मूल मुली बिघडणे ह्यांचा सामना करावा लागतो."
अश्विनीकुमार
"जे लोक आज पोट भरण्यासाठी, नोकरी गेली म्हणून किंवा जे काही कारण असेल ज्याने डिलिव्हरी चे काम करणे सुरु केले त्यांनी लक्ष्यात ठेवा, कि एक काळ असा होता जिथे लोकांना कुरिअर डिलिव्हरी चे काम करावे लागत होते आणि तिथून सुरुर्वात करून प्रगती करत नवीन संधी शोधत लोकांनी आयुष्य बदलले, त्या काळातील अनेक उद्योजक व्यवसायिकांच्या भूतकाळाच्या आयुष्यातील एक भाग हे कुरिअर चे काम होते. कामाचे स्वरूप बदलले पण यशाचा मार्ग सर्वांसाठी एकच आहे. तुमचे भविष्य उज्वल आहे, हार मानू नका. तुमची वर्तमान परिस्थिती तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तुमचे पूर्ण आयुष्य नाही."
अश्विनीकुमार
# # # # #
यशस्वी होण्यासाठी कौटुंबिक पार्श्वभूमी असणे गरजेचे आहे, बाकी इमेज मार्केटिंग आहे.
🌐 इंटरनेट वर कुणाचेही प्रोस्ताहन देणारे खासकरून अमेरिकेतील उद्योजक व्यवसायिकांचे प्रोस्ताहन देणाऱ्या कथा वाचत असाल तर थांबा.
📌 त्या मागील अजून एक वास्तव देखील सांगणार आहे ज्यामुळे तुमचा विनाकारणचा भ्रम दूर होईल व तुम्ही वास्तवाचा सामना करत आर्थिक आयुष्यात यशस्वी व्हाल.
👨💼 बिल गेट्स
कुटुंब आणि पार्श्वभूमी
-
👨⚖️ वडील विलियम्स हेन्री गेट्स II सीनियर : सिएटलमधील प्रमुख वकील आणि समाजसेवक.
-
👩💼 आई: मेरी मॅक्सवेल गेट्स – अनेक संस्थांच्या संचालक मंडळावर सदस्य, समाजकार्य व स्वयंसेवा क्षेत्रात सक्रिय.
-
👴 आजोबा: जे.डब्ल्यू. मॅक्सवेल – एक राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष.
💰 आर्थिक आणि सामाजिक स्थिती :
-
उच्च मध्यम वर्ग
-
उत्तम शिक्षण
-
उत्कृष्ट संधी आणि आर्थिक स्थैर्य
-
कुटुंब धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्रिय होते
📍 बिल गेट्स यांना लहानपणापासूनच प्रतिष्ठेची आणि प्रेरणादायक वातावरण मिळाले, ज्यामुळे त्यांना नाविन्याचा आणि नेतृत्वाचा वारसा मिळाला.
✅ बिल गेट्स यांच्या यशात त्यांच्या संपन्न, सुसंस्कृत आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली कुटुंबाची मोठी भूमिका होती.
🚀 एलॉन मस्क
कुटुंब आणि पार्श्वभूमी
-
👨🔧 वडील एरोल मस्क : दक्षिण आफ्रिकेतील इंजिनीअर, राजकारण व व्यावसायिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती. खाणीचा उद्योग.
-
👩🎤 आई मेय मस्क : मोडेल आणि डायटेशियन, मोडेलिंग क्षेत्रात ५० वर्षे झाली.
-
👨🍳 भावंडे: किम्बल मस्क (भाऊ) – खाद्य उद्योग व्यवसायिक; टोसका मस्क (बहिणी) – चित्रपट निर्माती.
💰 आर्थिक आणि सामाजिक स्थिती :
-
दक्षिण आफ्रिकेतील श्रीमंत आणि समृद्ध कुटुंब
-
एलॉन मस्कच्या बालपणी कुटुंब संपन्न आणि उच्च आर्थिक दर्जाचे होते – घराबाहेर मालमत्तेची गुंतवणूक, खाणी, विविध व्यवसाय
✅ एलॉन मस्कच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि सामाजिक पार्श्वभूमी त्याच्या यशात महत्त्वाची ठरली, त्याचा प्रारंभिक जीवन संपन्न, प्रतिष्ठित आणि प्रेरणादायी वातावरणात झाला.
📈 वारेन बफेट
कुटुंब आणि पार्श्वभूमी
-
👔 वडील हावर्ड बफेट : एका स्टॉकब्रोकिंग फर्मचे मालक, नंतर नेब्रास्का राज्यातील चार वेळा कांग्रेस सदस्य होते. कुशल व्यापारी आणि गुंतवणूकदार होते.
-
👩👦 आई लायला स्टॉल बफेट : गृहिणी असून कुटुंबाच्या आर्थिक मेनेजमेंटमध्ये देखील सक्रिय होत्या.
💰 आर्थिक आणि सामाजिक स्थिती :
-
बफेट कुटुंब एक सुव्यवस्थित मध्यमवर्गीय कुटुंब होते
-
वडिलांनी त्याला खूपच ठोस आर्थिक शिक्षण दिले
-
त्यांनी सुरुवात केली खोबऱ्या व्यवसायातून व शेअर्सच्या व्यापारातून
-
वयाच्या 11 व्या वर्षीच काही शेअर्स विकत घेतल्या होत्या
✅ वॉरेन बफेट यांचे यश त्यांच्या साध्या पण भक्कम, आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातून मिळाले जे त्यांच्या शिक्षण व सुरुवातीच्या व्यावसायिक जीवनासाठी पायाभूत ठरले.
💻 मार्क झुकरबर्ग
कुटुंब आणि पार्श्वभूमी
-
🦷 वडील एडवर्ड झुकरबर्ग : डेंटिस्ट आणि स्वतःचा दवाखाना.
-
🧠 आई करेन केम्पनर झुकरबर्ग : सायकियाट्रिस्ट, नवऱ्याच्या डेंटल क्लिनिक मध्ये काम.
-
👩👧👧 तीन बहिणी : विविध क्षेत्रात यशस्वी
📌 वडिलांनी संगणक व प्रोग्रॅमिंगमध्ये मदत केली, "झकनेट" नावाचा संदेश प्रणाली तयार करण्यास मदत केली, आपल्या मुलांना महाविद्यालयात जाणे किंवा व्यवसायात पदार्पण करणे यापैकी पर्याय दिला.
🧠 आई सायकियाट्रिस्ट असल्यामुळे कुटुंबासाठी मानसिक आधार होत्या.
💻 संगणक आणि तंत्रज्ञान यात मार्कच्या सुरुवातीपासूनच रस होता, वडिलांनी त्याला शिक्षण व कौशल्ये देऊन त्याचे बौद्धिक विकास साधला.
📚 त्यांच्या कुटुंबाने त्याला विविध पर्याय देऊन प्रोत्साहन दिले आणि त्याच्या प्रतिभेला जागा दिली.
💰 आर्थिक आणि सामाजिक स्थिती :
-
झुकरबर्ग कुटुंब हे मध्यमवर्गीय आर्थिक स्थितीचे होते
-
घरात संगणक होते आणि मुलांना उत्तम शिक्षण देण्यात आले
✅ मार्क झुकरबर्गचा परिवार त्याच्या यशासाठी एक मजबूत आधार राहिला, ज्यांनी त्याला बुद्धिमत्तेने, प्रोत्साहनाने आणि उत्तम शिक्षणाने समर्थित केले.
🍏 स्टीव्ह जॉब्स
कुटुंब आणि पार्श्वभूमी
-
👨🏫 बायोलॉजिकल वडील अब्दुल्फत्ताह जंडली : सीरियन राजकीय शास्त्राचे प्राध्यापक
-
👩🏫 बायोलॉजिकल आई जोअन्न शीबल : स्पीच-थेरपिस्ट
-
👨🔧 दत्तकवडील पॉवेल जॉब्स : नायटेड स्टेट्स कोस्ट गार्डचा वयोवृद्ध आणि यांत्रिक कारखानदार
-
👩💼 दत्तकआई क्लारा जॉब्स: बुककीपर म्हणून काम
💰 आर्थिक आणि सामाजिक स्थिती :
-
बायोलॉजिकल वडील अब्दुल्फत्ताह जंडली सिरीया मधील श्रीमंत व्यक्ती आणि जमीनदार
-
स्टीव्ह जॉब्स चा जन्म आई वडील विना लग्नाचे असतांना झाला
-
स्टीव्ह जॉब्स बायोलॉजिकल वडील श्रीमंत आणि दत्तक घेणाऱ्या वडिलांचा यांत्रिकी कारखाना
-
म्हणजे उच्च मध्यम वर्ग ते श्रीमंत अशी परिस्थिती
✅ स्टीव्ह जॉब्स यांचं आयुष्य आणि यश त्यांच्या दत्तक कुटुंबाच्या प्रेमळ आणि प्रेरणादायी वातावरणातून सुरू झालं, जे त्यांच्या तंत्रज्ञानातील उत्क्रांतीसाठी महत्त्वपूर्ण होता.
🔍 अश्या खाजगी आयुष्यातील कारणांमुळे अनेकदा लोक मग ती भारतातील असो किंवा जगभरातील ते अध्यात्म मानसशास्त्र कडे वळतात.
⚠️ कधीही एक बाजू बघू नका, हे काही चांगले किंवा वाईट असे नाही तर इमेज मार्केटिंग केली जाते तो भ्रम दूर करण्यासाठी देत आहे.
✅ आणी हे वास्तव आहे कि ज्यांनी प्रगती केली अनेकदा त्यांच्या आई वडिलांचा हात त्यात दिसून आला आहे.
🚫 इथे गरिबी मुळे गरिबांची मुले लहानपणी दगावतात तिथे इतका पुढचा विचार कोण करणार?
🌊 गरीबांमध्ये यशस्वी होणार्यांची संख्या हे समुद्रातील एका थेंबासारखे आहे.
🧭 जे व्हा तुम्ही हे वास्तव स्वीकारलं तेव्हाच तुम्ही तुमची गरिबी दूर करू शकतात ना कि अश्या खोट्या मार्केटिंग केलेल्यांचे जीवनशैली वाचून.
🕵️ हो अजून एक काळी बेकायदेशीर बाजू देखील असते ते देखील तुम्हाला इंटरनेट वर मिळेल.
📰 अश्या बातम्या दाबल्या जातात.
✍️ अश्विनीकुमार
🚀 चला उद्योजक घडवूया
आयुष्य जगतांना आपल्या विरुद्ध असणाऱ्या व्यक्तीला शत्रू समजण्याची गरज नाही तर त्याला प्रतिस्पर्धी समजा. ह्यामुळे भले प्रतिस्पर्धी जरी असले तरी तुमचे मित्र जास्त बनतील व जे मर्यादा ओलांडतील ते आपोआप शत्रू. ह्या जगात सर्वच तुमचे मित्र नाही आणि सर्वच तुमचे शत्रू नाही, स्वतःला सेफ ठेवत आयुष्य जगा.
अश्विनीकुमार
मराठी लोकांचे व्यवसाय होते पण ते एका क्षणात कमी झाले नाही तर अनेक दशकांचा प्रवास होता तो
मुंबई मध्ये वडापाव च्या व्यवसायात मराठी जास्त प्रमाणात होते, खानावळ च्या व्यवसायात मराठी जास्त प्रमाणात होते.
ह्यापुढील टप्पा हा फ्रेंचायझी किंवा हॉटेल मध्ये परिवर्तीत व्हायला पाहिजे होता तो जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या प्रमाणात झाला नाही.
सेलिब्रेटी चे सोडून बोलत आहे, कृपया इमेज मार्केटिंग नको.
मुंबई आंतरराष्ट्रीय शहर, इथून मराठी खाद्य पदार्थ हे जगभरात पसरायला पाहिजे होते जसे पंजाबी आणि दक्षिण भारतीय पसरले तसे, हे झाले नाही.
ह्या नंतर रस्त्यावरील खाद्य पदार्थ हे मराठी खाद्य व्यवसायिकांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होते, जसे कि दक्षिण भारतीय पदार्थ इडली वडा वगैरे, फ्रेन्की, मोमोज, मंच्युरीयन, वगैरे.
नंतर असे दिसून आले कि उत्तर भारतीय दक्षिण भारतीय पदार्थ विकतांना दिसले, पण मराठी नाही.
चायनीज मध्ये देखील उत्तर आणि दक्षिण भारतीय दिसून आले, पण मराठी चा टक्का प्रचंड कमी झाला.
आता मराठी व्यवसायात आहे पण अनेक ठिकाणी पार्टनर म्हणून. जसे कि हॉटेल, बार व इतर व्यवसायात.
एक समजले कि मराठी लोकांचे व्यवसाय होते पण ते एका क्षणात कमी झाले नाही तर अनेक दशकांचा प्रवास होता तो.
एक नाही तर अनेक व्यवसाय आहेत जिथे मराठी कमी होत गेले व आता नामशेष होण्याच्या मार्गावर किंवा पार्टनर म्हणून.
कारणे शोधणे खूप महत्वाचे आहे. कारण हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कृपया मुंबई मध्ये येवून प्रत्यक्ष अनुभव घ्याल.
कारण जर पुण्यात अशी परिस्थिती निर्माण झाली तर उर्वरित महाराष्ट्र हातातून जायला वेळ लागणार नाही.
आणि हे फक्त खाद्य पदार्थाच्या व्यवसायाबद्दल नाही तर अनेक व्यवसायातून मराठी जवळपास हद्दपार झाले आहेत.
माझ्या समोर मराठी किराणा व्यवसायिकाचे दुकान बंद होतांना बघितले आहे.
परप्रांतीय उद्योग व्यवसाय बंद होतो तिथे परत परप्रांतीय उद्योजक व्यवसायिक येतो, आणि मराठी उद्योग व्यवसाय बंद होतो तिथे जास्त प्रमाणात परप्रांतीय उद्योजक आणि व्यवसायिक येतात, मराठी खूपच कमी
मराठी चायवाले देखील होते जे टपरी चालवायचे ते देखील गायब होत गेले.
उद्योग, व्यवसाय करणे काही रॉकेट सायंस नाही आहे, शांत डोक्याने विचार केला आणि अनुभवी लोकांची साथ मिळाली तर परत जसे जुना काळ होता त्यामध्ये आपण जावू.
धन्यवाद
अश्विनीकुमार
फेसबुक : चला उद्योजक घडवूया
#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #रिअलइस्टेट #आर्थिकमानसिकता #फ्रीलांसर #कौशल्य





























.jpg)





