शुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या



शुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या

आपल्या आयुष्यात शुद्धीकरणाचे खूप महत्व आहे. जर आपण ठराविक वेळेस शुद्धीकरण करत राहिलो तर जी उर्जा आणि भावना साठून काळी झालेली असते व तिचे गाळात रुपांतर होवून ती तुमच्या आयुष्यात नवीन चांगले काही घेऊन येवू देत नाही आणि आले तरी साठू देत नाही, सर्वकाही वाहून नेले जाते.

मग कधीतरी वैतागून तुम्ही तुमच्या अंतर्मनातील अथांग खोल तलाव ढवळता आणि जे नकारात्मक होते ते भूतकाळाच्या गाळात साठून त्यांनी एक स्वरूप प्राप्त केले जे त्या व्यक्तीला वास्तवात दिसायला लागते, तशी परिस्थिती परत निर्माण होते पण काळी, लोक आयुष्यात येतात पण जे वाईट झाले आहेत तेच, आणि काही तर अश्यात लग्न करून आपले आयुष्य हे नर्क करून घेतात, स्त्रिया तर पती परमेश्वर मानतात म्हणजे नकारात्मक जोडीदारासोबतच ते आयुष्य व्यतीत करतात व बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही.

गाळ हा काढून बाहेर टाकायचा असतो, त्याचा वापर खतासारखा केला जातो, तो गाळ अंतर्मनाचा तलाव स्वतः वापरू शकत नाही, आणि जर अध्यात्मिक लोक असतील विविध प्रकारच्या बाधा होण्याची दाट शक्यता असते.

तुम्ही आयुष्य जगत आहात, उर्जा, भावना प्रवाहित होत आहेत, त्यापैकी काही साठून राहत आहे, तुमचे शरीर वजनदार बनत आहे पण तुम्हाला समजून येत नाही कारण हे उर्जा आणि भावनेचे वजन असते. आणि बस एकदा तलाव धवळला कि सर्व संपले. इथून भाग्याची जागा दुर्भाग्य घेते.

शुद्धीकरणाचे प्रकार

आत्मा शुद्धी : खूप महत्वाचा टप्पा ज्यामुळे आपण अनेक विधी करतो, खासकरून व्यक्ती मृत्यू मुखी पडल्यावर, वारल्यावर. हे आपल्या भारतीय शास्त्राचे महत्व आहे. इथे तज्ञांची मदत ह्यासाठी घ्यावी लागते कारण जिवंत असताना देखील शुद्धीकरण करण्याची गरज लागते. जर तुमचा अध्यात्मावर विश्वास आहे आणि त्यानुसार आयुष्य जगत असाल तर तुम्हाला कालांतराने तुम्ही उर्जा शुद्ध करून घ्यावी लागते जेणे करून अलौकिक संकटे हि टाळली जातात.

शरीर शुद्धीकरण : ह्यामध्ये काही प्रकार आहेत. जसे उर्जा, कंपने, भावना, विचार, स्वभाव आणि सवयी.

नंतरचा भाग येतो तो आयुष्य शुद्धीकरणाचा. त्या संदर्भात फक्त महत्वाचे मुद्दे देण्यात येतील.

खाजगी आयुष्य शुद्धीकरण, आर्थिक आयुष्य शुद्धीकरण (सर्व प्रकारचे आर्थिक आयुष्य), वास्तू शुद्धीकरण (सर्व प्रकारच्या वास्तू खाजगी, व्यवसायिक ते सार्वजनिक), पुरुष, स्त्रिया, लहान मुले, आणि ज्येष्ठ शुद्धीकरण, शैक्षणिक शुद्धीकरण, वैवाहिक शुद्धीकरण, लैंगिक शुद्धीकरण.

ह्या शुद्धीकरणामध्ये नकारात्मक साठलेले, न वापरलेले गाळ काढून परत तुमचे आयुष्य सुख, समाधान, समृद्धी, संपत्ती आणि पैश्याने प्रवाहित केले जाते. नवीन नद्यारूपी मार्ग हि पुनरजीवित केले जातात. खूप बरे वाटते, हलके वाटते, परमोच्च आनंद गाठल्यासारखे वाटते, भाग्यशाली चमत्कारिक आयुष्य जगायला सुरवात होते, जे हवे ते मिळते आणि ते देखील अमर्याद मिळत जाते.

मी जे सांगत आहे ते अनुभवण्याचा भाग आहे आणि अनुभव हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे ठराविक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, बाकी तुम्ही इनबॉक्स, किंवा व्हास्टएप मेसेज ह्याद्वारे विचारू शकता, तेव्हा फक्त माहिती दिली जाईल ना कि प्रक्रिया केली जाईल, ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी फक्त.

धन्यवाद
अश्विनीकुमार

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

Image by Sabine Zierer from Pixabay
Previous
Next Post »
0 आपले विचार