५ + ५ = ५ जीवनात यशस्वी होण्याचे सूत्र


मला माहित आहे तुम्ही विचार करत असाल कि 'ठीक आहे अश्विन सर ५+५=५ नाही होऊ शकत.' कृपा करून स्पष्ट करून सांगा.

                परत प्रश्नापासून सुरवात करूया. तुम्ही किती वेळा "दीर्घकालीन" ध्येयाबद्दल ऐकले आहे आणि त्या "दीर्घ कालावधी" पर्यंत ध्येयावर लक्ष्य केंद्रित करून ठेवले? ह्या मेसेज मधून मी ५ वर्षांच्या ध्येयावर लक्ष्य केंद्रित करणार आहे आणि तुम्ही आयुष्यात खरच ध्येय गाठण्याच्या मार्गावर आहात कि नाही हे स्पष्ट करून सांगणार आहे. ह्या समीकरणात ५ उत्तर हे ५ वर्षाचे ध्येय आणि ५ + ५ मध्ये ध्येय साध्य करायचे रहस्य दडले आहे.

                मी रोज असंख्य लोकांशी बोलत असतो, त्यांनी निश्चित केलेल्या ध्येय आणि त्यांची असमाधानकारक प्रगती ह्यामुळे वैतागलेले असतात. मी सांगितल्या प्रमाणे "उंच डोंगर तयार होण्याची सुरवात एका छोट्या दगडापासून होते आणि तो पार करून जाण्याची सुरवात पहिले पाउल पुढे टाकून होते."

                समीकरणा मधले पहिले ५ म्हणजे ती ५ लोक जे तुमचे मित्र, सोबती किंवा इतर रोजचे उठण्या बसन्यातले दर्शवितात. मी सुचवितो कि  तुम्ही रोज ज्या लोकांसोबत असता अश्या ५ लोकांची यादी बनवा आणि बघा कि त्यांचे आणि तुमचे ध्येय एकसारखे आहे कि नाही किंवा तुमच्या सोबत ५ वर्षांचे ध्येय गाठण्याच्या प्रगतीपथावर आहेत कि नाही. ११० टक्के हे खरे आहे कि तुम्ही तसेच बनता जश्या लोकांसोबत रोज राहता आणि हीच  तुमच्या उज्वल भविष्याचे रहस्य खोलण्याची गुरुकिल्ली आहे. उदाहणार्थ, जर तुमचे स्वप्न निरोगी आणि श्रीमंत बनायचे असेल आणि तुम्ही जास्त वजन असलेला किंवा व्यसनी जो सतत १ क्षण पण जास्त काम केले तर तक्रार करणारा, मग मी भविष्याची शक्यता वर्तवू शकतो कि तुम्ही निरोगी आणि श्रीमंत च्या जागी बारीक आणि गरीब होणार.

                लाखो लोक आपले स्वप्न कधी पूर्ण करू शकले नाही कारण आयुष्यात त्यांचे मित्र जेव्हा ते ध्येयाच्या मार्गाने जात असतात तेव्हा  सिमेंटच्या वजनदार बुटाचे काम करतात. जेव्हा मी माझे ध्येय निश्चित केले होते तेव्हा मी समविचारी लोकांच्या सहवासात राहायला लागलो, त्यांच्या आणि माझ्या आयुष्यातील ध्येय एकाच होते. जर तुम्ही सम विचारी लोकांसोबत मिसळून गेलात तरच तुम्ही तुमचे जीवनातील ध्येय गाठल.

                समीकरणामधला दुसरा ५ हा तुम्हाला स्वयंविकासकडे घेवून जातो त्या मध्ये शेवटची ५ वाचलेली पुस्तके किंवा ऐकलेल्या केसेट. मज म्हणून जेव्हा तुमचा मित्र कशा बद्दल तरी तक्रार करेल तेव्हा त्याला विचार कि शेवटचे ५ पुस्तके किंवा केसेट कुठच्या ऐकल्या होत्या त्याने. तुम्हाला दोघांपैकी एक उत्तर भेटेल : मला नाही आठवत किंवा मला वाचण्यासाठी वेळ नाही आहे. तुमचे शेवटचे वाचलेले ५ पुस्तके तुमच्या जीवनाचे लक्ष्य किंवा दिशा दाखवितात. सामान्य माणूस हायस्कूल नंतर वर्षभरात फक्त एकच पुस्तक वाचतो, आणि हेच पहिली क्रमांकाचे कारण आहे कि ९५% लोक वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत पूर्ण कंगाल होतात. जगातल्या सुपर संगणकाला सुद्धा निट चालण्या करिता प्रोग्राम योग्य क्रमात लागतात.

                आपण सगळे जन काही तरी महान करण्या साठी जन्माला आलो आहोत, पण आपण आपल्या रोजच्या उठण्या बस्न्यातल्या लोकांबद्दल जागृत राहिले पाहिजे आणि आपण रोज काय वाचतो ऐकतो हे आपल्या महानतेची पातळी ठरवते जिथे आपण पोहचणार आहोत. आज पासून निश्चय करा ५ वर्षाच्या ध्येयावर लक्ष्य केंद्रित करा आणि तुमचे ५ समविचारी मित्र किंवा सहकारी लक्ष्यात असू द्या आणि तुमचे ५ पुस्तके किंवा केसेटी ठरवतील कि तुम्ही ध्येय साध्य करणार कि नाही. यशस्वी होणे सोपे आहे पण इतके साधे पण नाही कारण मोठे होण्याची, विस्ताराची क्षमता लागते, ५ वर्षे ध्येयाच्या प्रगतीपथावर वाटचाल करताना प्रत्येक दिवस काही तरी नवीन शोधा आणि आनंदी राहा.

निर्वाना
consultant, speaker, trainer
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७
solution.nirvana@gmail.com
First
0 आपले विचार